Posts

Showing posts from November, 2020

जवळा येथील कृषीदूतांकडुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Image
परतुर : येथुन जवळ असलेल्या जवळा येथील शेतकऱ्याना  वंसतराव  नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत  सेलू येथील कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांनी जवळा (ता.परतूर)  येथील  शेतकऱ्यांना शेतीविषयी विविध योजना, कामांची माहिती दिली . ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत  कृषिदूत योगेश राजबिंडे यांनी बिज प्रक्रिया, बिज उगवण क्षमता चाचणी, निंबोळी अर्क तयार करणे,कलम तयार करणे, तण व्यावस्थापन, आदी  विविध विषयांवर  प्रात्याक्षिकांसह माहिती दिली .  यावेळी समस्त गावातील शेतकरी उपस्थित होते.

डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घरातच अभिवादन करावे - अर्जुन पाडेवार

Image
परतुर प्रतिनिधी  भारतीय संविधानाचे शिल्पकार भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व आंबेडकर अनुयायांनी  चैत्यभूमी दादर मुंबईला न जाता आप आपल्या घरातच सुरक्षित राहून अभिवादन करावे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी केले आहे.  सध्या देशात कोरोना महामारीने थैमान घातले असुन राज्यात कोरोना रोगाचा वाढता प्रभाव पाहुन सर्व आंबेडकर अनुयायांनी  शासनाच्या नियमाच्या अधिन राहुन  शासनाच्या निर्देशाचे पालन करावे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व आंबेडकर अनुयायांनी  चैत्यभूमी दादर येथे गर्दी न कराता आप आपल्या गावातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर व  बौद्ध विहारात फक्त पाच पाच  व्यक्तीनी जमा होऊन दीपप्रज्वलन,  बौद्ध वंदना घेऊन  अभिवादन करावे, तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आपल्या कुटुंबासमवेत आपल्या घरातच सामूहिक बौद्ध वंदना घेऊन अभिवादन करावे असे आव्हान ही पाडेवार यांनी केले आहे.

सर्व पक्षीय व गावकऱ्यांच्या वतीने तिर्थपुरी ग्रामपंचायत प्रशासकास निवेदन

Image
घनसावंगी(प्रतीनीधी) तीर्थपूरी येथील ग्रामस्थांनी प्रशासक यांना निवेदन दिले निवेदनात सांगितल कि  तिर्थपुरी येथे मुख्यमंत्री पेजजळ योजनेचे पाईप लाईन चे काम चालू आहे सदर कामासाठी गुत्तेदार श्री. वाघ यांनी गावातील अंतर्गत  सिमेट रोड पोकलेन ब्रेककरणे अक्षरस फोडून काढले गावातील सर्व रस्त्याची तोडफोड करून नास दुस केले आहे. हे सर्व करत असताना गावकऱ्यानी ग्राम विकास अधिकारी व प्रशासक यांना वरील काम थांबवणे बाबत विनंती केली होती परंतु त्यांना काही उपयोग झाला नाही. गावातील रस्त्याच्या तोडफोडीमुळे आज रोजी गावात बैलगाडी, गुरेढोरे दुचाकी वाहन घालने  मुश्कील झाले आहे. त्याचप्रमाणे लहान मुलं महिला बरेच नागरिक यांना चांगले सुद्धा अवघड झाले आहे.गावातील सर्व सिमेंट रोड गेली पंधरा वर्षापासून विविध योजनेतून साधारण 50 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आले होते. त्यामुळे ते फोडण्याआधी रस्त्याच्या दुरूस्तीची तरतुद होणे आवश्यक होते. परंतु तसे काही झाले नाही. वरील प्रमाणे रस्त्यांची नासधुत ही प्रशासक श्री. नागलवाड साहेब ग्रामविकास अधिकारी श्री. मुपडे व गुत्तेदार श्री. वाघ यांनी अतिशय बेजबाब

महाराष्ट्रात सर्वत्र अराजकता माजविणारे हे मोगलाई प्रवृतीचा सरकार युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांचा घणाघात,तीघाडी सरकारच्या भोंगळ कारभार, जनता माफ करणार नाही - राहुल लोणीकर,मंठ्यात भाजपा युवा मोर्चा आक्रमक, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना जोडे मारत युवा मोर्चाने केलं पुतळ्याचे दहन

Image
 मंठा(प्रतिनिधी) तीघाडी सरकारच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर अराजकता माजली असून महाराष्ट्रात जनतेचा सरकारमधून मोगलाईच्या सरकार अस्तित्वात आलो आहे अशी घणाघाती टीका भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली मोगलांच्या काळात जे अत्याचार जनतेवर ती होत होते अगदी त्यात पद्धतीचे अत्याचार या सरकारमध्ये किती केले असून शून्य विकास काम करणाऱ्या या आघाडीच्या सरकारला जनता नक्की त्याची जागा दाखवेल असेही ते पुढे बोलताना म्हणाले मंठा येथे आयोजित वाढीव वीज बिलाच्या होळी करण्यासाठी आयोजित आंदोलनादरम्यान विक्रांतवपतील बोलत होते यावेळी भाजपायुमो चे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र साबळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य हर्षवर्धन कराड जिल्हाध्यक्ष सुजित जोगस, तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ, गणेशराव खवणे, पंजाबराव बोराडे, युवमोर्चा तालुकाध्यक्ष अविनाश राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती  गेल्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये वीज वितरण कंपनीने केवळ दोन वेळा वीज ग्राहकांना वीज बिले दिली असून दरम्यानच्या काळामध्ये वीज मीटरची रिडींग घेण्यासाठीही क

यावेळी भाजपा मराठवाडा पदवीधर निवडणूक जिंकणारच - विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला विश्वास,कंत्राटदार पदवीधरांचा आमदार झाल्याने पदवीधरांचे बारा वर्ष मातीत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा घणाघात,दरेकर, लोणीकर यांच्यासह उमेदवार शिरीष बोराळकर यांनी केले राहुल लोणीकर यांच्या कामाचे कौतुक

Image
  परतूर(प्रतीनीधी) मराठवाडा पदवीधर मतदारसंघ पूर्वी पार भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा मतदारसंघ आहेत या मतदारसंघांमध्ये श्रीकांत जोशी यांच्यासह अनेकांनी पदवीधरांचे प्रश्न मांडले असून पदवीधरांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे मागील काळात हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या हातातून थोडक्यात निसटला त्यानंतर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या अचानक अपघाती निधनाने भारतीय जनता पार्टीने जवळजवळ ही निवडणूक लढली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती तरीदेखील मागील निवडणुकीत बोराळकर यांचा अगदी थोड्या मताने पराभव करावा लागला होता पण यावेळी मात्र प्रत्येक बूथ पर्यंतची रचना अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले असून मागील दोन निवडणुकांमध्ये निवडून दिलेला कंत्राटदार उमेदवार पूर्णपणे पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरला असून त्यामुळेच या पदवीधर निवडणुकीत भारतीय जनता पार्टी चे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांचा विजय निश्चितपणे होईल व भारतीय जनता पार्टी मराठवाड्याचा पदवीधर मतदार संघाचा बालेकिल्ला पुन्हा एकदा ताब्यात घेईल असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर य

रुग्णांना लाखाची मदत करत केला वाढदिवस साजरा *सभापती आकात यांचा स्तुत्य उपक्रम

Image
परतूर : वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून सभापती आकात यांनी किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना एक लाख रुपयांची मदत केली.             सभापती कपिल आकात यांचा 21 नोव्हेंबर ला वाढदिवस होता. वाढदिवसाच्या पूर्व संध्येला सभापती कपिल आकात यांनी वाढदिवसावरील हार, तुरे, शाल श्रीफळ आदी खर्च टाळून याबाबरोबरच लोकांचा वेळही वाया घालणे टाळून गरजू रुग्णांना आर्थिक मदत केली. दोन किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या यशोदा दत्ता सागडे व हनुमान खंडागळे यांना प्रत्येकी 25 हाजाराची मदत दिली . तसेच अपघातात जखमी झालेले असराबाई गवारे व ज्ञानेश्वर पारद यांना प्रत्येकी 25 हाजारची रोख मदत केली. याबरोबरच हार , तुरे, होल्ड्रिंग लावण्यापेक्षा सामाजिक उपक्रम राबवून माझा वाढदिवस साजरा करावा असे आव्हानही सभापती कपिल आकात यांनी केले. यावेळी उपाअध्यक्ष कुणाल आकात, विजय राखे, महेश आकात, आसाराम लाटे, सरपंच ओंकार काटे सह रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते

संपादकास धमकाविल्याचा निषेध ,पत्रकार संघटनांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांना निवेदन

Image
जालना ।(प्रतिनिधी) येथील संपादकास बुधवारी (दि 18) दिवसभरात विविध फोन नंबरवरून अर्वाच्च भाषेत बोलून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आमदार लोणीकर यांच्या समर्थकांकडून देण्यात आल्या. या घटनेचा जालना जिल्ह्यातील पत्रकार संघटनांनी निषेध नोंदवत जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दैनिक युवा आदर्शचे संपादक दीपक शेळके यांंनी आमदार बबनराव लोणीकर संदर्भात प्रकाशित केलेल्या वृत्तात आक्षेपार्ह असे काही नाही. योग्य त्या शब्दांचा वापर करून बातमी दिली आहे. दि 18 नोव्हेबर सकाळी आठ वाजल्यापासून दिपक शेळके यांना फोनवर जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहे. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात रितसर तक्रार करण्यात आली आहे. धमकावणे आणि अवार्च्च भाषेत बोलण्याचा जिल्ह्यातील पत्रकार आणि संपादक यांनी निषेध केला असून शेळके यांना व त्यांच्या परिवारास पोलीस संरक्षण देण्यासह आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी ही निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर असोसिएशन ऑफ स्मॉल अ‍ॅण्ड मिडीयम न्युजपेपर्स ऑफ इंडियाचे जालना जिल्हाध्यक्ष विकास बागडी, प्रेस क्लब ऑफ जा

वाढीव आणि चुकीच्या वीज बिलामध्ये सवलत न देणाऱ्या आणि जनतेशी खोटे बोलून *फसवणूक करणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग आणणार - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर* ================ *कोरोना प्रादुर्भाव काळात वाढीव आणि चुकीची वीज बिल देणे हा महा विकास आघाडी सरकारचा निर्लज्जपणा- लोणीकर यांचा घणाघात

 

पदवीधरांच्या भक्कम पाठिंब्यावर बोराळकर यांचा विजय निश्‍चित - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

Image
प्रतिनिधी मागील पंचवार्षिक मध्ये पदवीधर निवडणुकीदरम्यान लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे अपघाती निधन झाले होते त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नियोजन करता आले नाही भारतीय जनता पार्टी पूर्णपणे स्वर्गीय मुंडे साहेब यांच्या निधनामुळे दुःखात होती त्यामुळे निवडणुकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आणि शिरीष बोराळकर यांचा पराभव झाला परंतु यावेळी मात्र पदवीधरांचा भक्कम पाठिंबा आणि शिस्तबद्ध नियोजन यामुळे भारतीय जनता पार्टीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला आहे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची जालना येथील निवासस्थानी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली यावेळी राज्यसभा खासदार डॉ.भागवत कराड मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांची उपस्थिती होती  प्रत्येक बूथ पर्यंत शिस्तबद्ध रचना करण्यात आली असून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी करण्यात आली आहे त्यामुळे यावेळी बोराळकर

भाजपाच्या आंदोलनाने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अखेर बंदीवसातील मंदिरे उघडली --. देर आये..दुरुस्ती आये ...आठ महिन्यांनंतर मंदिरे उघडली परतुरात आ.बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत महादेव मंदिरात महाआरती

Image
 - परतूर/प्रतिनिधी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठ महिन्यांपासून देशातील आणि राज्यातील सर्व मंदिरे बंद होती.काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मंदिरे उघडण्याची परवानगी दिली परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आजपर्यंत बंदीवासातील देवांची मंदिरे उघडण्याची परवानगी दिली नव्हती.भाविक भक्तांना मंदिरात दर्शनासाठी जाता येत नव्हते.यासाठी देशातील आणि राज्यातील साधू,संत,ऋषीमुनी यांनी तसेच भारतीय जनता पार्टीने मंदिरे उघडण्यासाठी मोठे आंदोलन केले होते.राज्यातील मंदिरे उघडण्यात यावी म्हणून माजी मंत्री तथा आ.बबनराव लोणीकर यांनी स्वतः महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,मुख्य सचिव यांना पत्रे लिहिली होती आणि या पत्रात मंदिरे उघडण्याबाबत विनंती केली होती. तसेच युवा मोर्चाचा माध्यमातून युवा मोर्चाचे महाराप्ट्राचे महामंत्री राहूल लोणिकर यांच्या मार्गदर्शना खाली राज्यातील  आंदोलनाची आणि आ.लोणीकर यांच्या पत्राची दखल घेत राज्य सरकारने पाडव्यापासून राज्यातील मंदिरे उघडण्याची परवानगी देण्यात आली यानिमित्त आज सोमवारी (दि.१६) सकाळी राज्याचे मा

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी अतिशय साध्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जालना येथील अनाथाश्रमात जाऊन प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी तेथील अनाथ मुलांना कपडे व फराळाचे वाटप केले

 

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची साधेपणाने दिवाळी साजरी,अनाथाश्रमातील मुलांना कपडे व फराळ वाटप करून केली दिवाळी

Image
* जालना(प्रतिनिधी) येथील स्वर्गीय शंकरलाल मुंदडा अनाथालया मध्ये अनाथ मुलांना कपडे व फराळाचे वाटप करून माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी आपली दिवाळी अतिशय साधेपणाने साजरी केली  यावेळी संस्थेचे  वीरेंद्रजी धोका, दत्ता नाना आर्दड, अनाथ आश्रमाचे अधीक्षक राठोड ,नारायण पवार, सुनील राठी आदींची उपस्थिती होती  गेल्या पाच वर्षापासून  माजी मंत्री बबनराव लोणीकर परतुर येथील आपल्या निवासस्थानी व जालना येथे मातोश्री लॉन्स वर दीपावली पाडव्याला स्न्हेह मिलन कार्यक्रम आयोजित करत असतात परंतु यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर परतूर व जालना येथे दीपावली स्नेह संमेलनाचे आयोजन करता येणार नाही त्यामुळे प्रत्येक वर्षी दोन स्नेहमिलन सोबतच माजी मंत्री बबनराव लोणीकर वीरेंद्र जी धोका यांच्या अनाथ आश्रम मध्ये जाऊन दीपावली साजरी करत असतात मात्र या  वर्षी स्न्हेह मिलन कार्यक्रम होणार नसला तरी  माजी मंत्री लोणीकर यांनी स्वर्गीय शंकरलाल मुंदडा अनाथ आश्रम येथे जाऊन अनाथ मुलांसोबत दिवाळीचा आनंद घेत कपडे व फराळाचे वाटप करत अतिशय साधेपणाने दीपावली साजरी केली  यावर्षी दिवाळी सणावर असलेले  कोर

शासनाच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांसाठी यावर्षी "काळी दिवाळी", माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची टीका,मंठा येथे भाजपाचे पिठलं-भाकरी आंदोलन

Image
मंठा(प्रतिनिधी) केवळ सत्तेच्या हव्यासापोटी  कुरघोडी करून  सत्तेवर आलेल्या या महाविकास आघाडी  सरकारकडे  शेतकऱ्यांसाठी कोणताही ठोस अजेंडा  नसून सरकारने अतिवृष्टी, पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. कोणत्याही शेतकऱ्यांपर्यंत शासनाची मदत पोहचली नाही. मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांची नावे या मदतीमध्ये आलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी संवाद कार्यक्रमात फराळ करा, रोषणाई करा असे वारंवार म्हटले परंतु आज शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच आहे. ना गोड धोड, ना रोषणाई म्हणून शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी ‘काळी दिवाळी’ आहे अशी टीका माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे भारतीय जनता पार्टी  शेतकऱ्यांसह तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना दिवाळीच्या पर्वावर आंदोलन करत निवेदन देऊन काळी दिवाळी साजरी करतील. भाजपा भाजपा युवा मोर्चा व भाजपा किसान मोर्चा तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शेतकरी तहसीलदार उपविभागीय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना पिठलं भाकर देऊन धरणे आंदोलन करतील. या आंदोलनाद्वारे सरकारकडे खालील मागण्या केल्या आहेत-  १) महाराष्ट्रमध्ये अतिवृष्टी, सततच्या पाऊस व पुरा

शासनाच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांसाठी यावर्षी "काळी दिवाळी", माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची टीका,13 नोव्हेंबरला भाजपा पिठलं भाकरी देऊन करणार आंदोलन

परतूर(प्रतिनिधी) केवळ सत्तेच्या हव्यासापोटी  कुरघोडी करून  सत्तेवर आलेल्या या महाविकास आघाडी  सरकारकडे  शेतकऱ्यांसाठी कोणताही ठोस अजेंडा  नसून सरकारने अतिवृष्टी, पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. कोणत्याही शेतकऱ्यांपर्यंत शासनाची मदत पोहचली नाही. मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांची नावे या मदतीमध्ये आलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी संवाद कार्यक्रमात फराळ करा, रोषणाई करा असे वारंवार म्हटले परंतु आज शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच आहे. ना गोड धोड, ना रोषणाई म्हणून शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी ‘काळी दिवाळी’ आहे अशी टीका माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे भारतीय जनता पार्टी  शेतकऱ्यांसह तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना दिवाळीच्या पर्वावर आंदोलन करत निवेदन देऊन काळी दिवाळी साजरी करतील. भाजपा भाजपा युवा मोर्चा व भाजपा किसान मोर्चा तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर 13 नोव्हेंबरला शेतकरी तहसीलदार उपविभागीय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना पिठलं भाकर देऊन धरणे आंदोलन करतील. या आंदोलनाद्वारे सरकारकडे खालील मागण्या केल्या जातील -  १) महाराष्ट्रमध्ये अतिवृष्टी, सततच्या पाऊस व प

आयपिएस गोहर हसन यांची फटाका मार्केट ला भेट

Image
परतूर ( प्रतिनिधि )  येथील दि.11 रोजी परतूर पोलीस स्टेशन येथे टट्रेनिंग करीता आलेले आयपिएस आधीकारी गोहर हसन यांनी फटाका मार्केट ला सकाळी 11 वाजता अचानक भेट दिली       या भेटीत गोहर हसन यांनी फटाका मार्केट येथे दुकानास भेटी देऊन दुकानदारांनी कागद पत्राची पुर्तता पूर्ण केली का नाही याची पाहणि केली असून या ठिकाणि कोवीड19 यांचे पालन केले करण्यात येत आहे का तसेच येथे आग्निशामदलाची गाडी जर फायर झाले काय उपाय योजना आहे या सह काय काय उपाय योजना फटाका मार्केट वाल्यांनी केलेल्या आले याची माहीती घेतली

माजी मंत्री लोणीकरांच्या दणक्याने रेल्वे फाटक ते रेल्वे स्टेशन रस्ता पूर्वपदावर,उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे शहरातून होणाऱ्या ऊस वाहतुकीमुळे व्यापारी, नागरिकांना होणारा त्रास टळणार

Image
परतुर (प्रतिनिधी)  रेल्वे फाटकावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे याठिकाणी रहदारीची होणारी कोंडी व शहरातील मुख्य रस्त्याने जाणाऱ्या जड वाहतुकी  सोबतच ऊसाची वाहने यामुळे शहरात होणारे प्रदूषण टळणार असून माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या दणक्याने सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला व उड्डाणपुलाच्या बाजूने जाणाऱ्या रेल्वे स्टेशन कडील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण केले असून यामुळे आष्टी रोड कडून शहरांमधून जाणारी उसाचे ट्रॅक्टर जड वाहतूक करणारी वाहने ही वाहने रेल्वे गेट कडून रेल्वे स्टेशन मार्गे जाणार असल्याने शहरात होणारे धुळीचे प्रदूषण यामुळे व्यापाऱ्यांना होणारा त्रास त्याचबरोबर दिवाळीच्या हंगामामध्ये होणारी वाहतूक कोंडी यांना चाप बसणार आहे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरील व्यापारी व ग्राहकांना होणारा त्रास लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता,अधीक्षक अभियंता यांना फैलावर घेत आष्टी मार्गे येणाऱ्या वाहनांना उड्डाणपुलाच्या बाजूने पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा असे खडसावल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग

नेरसह जालना तालुक्यातील शाळा खोली बांधकाम भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा=भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गजानन उफाड

प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील नेर येथील दोन शाळा खोल्यांमध्ये बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून असाच भ्रष्टाचार तालुक्यातील इतर शाळा खोली बांधकाम मध्ये सुद्धा झालेला असू शकतो त्‍या सर्व शाळा खोल्यांची तात्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे जालना जिल्हा उपाध्यक्ष गजानन उफाड यांनी केली आहे. नेर येथील दोन शाळा खोल्यांच्या बांधकामामध्ये अंदाजपत्रकात प्रमाणे कोणतेही काम झालेले नसून तरी देखील उपअभियंता टोम्पे यांनी अंदाजपत्रकानुसार काम झाले असल्याबाबतची लेखी जि प श्रीमती निमा अरोरा व तक्रारदार गजानन उफाड यांना कळवले आहे प्रत्यक्षात अंदाज पत्रकाप्रमाणे ऍशब्रिक चा वापर करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र ब्लॉकचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे संबंधित कार्यकारी अभियंता डाखोरे उप अभियंता टोम्पे, तत्कालीन उपअभियंता फारुकी व ठोके पाटील यांनी संगनमताने शासनाची दिशाभूल केली असून संबंधित कंत्राटदारासोबत अर्थपूर्ण व्यवहार केल्याचा संशय गजानन उफाड यांनी व्यक्त केला आहे. *अंदाजपत्रकाप्रमाणे काम झालं आहे की नाही हे सांगण्यास कार्यकारी अभियंता डाखो

विद्यार्थी, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार - आ. सतीश चव्हाण

Image
मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वात अंबड येथे सहविचार सभा पार पडली. यावेळी आमदार सतीश चव्हाण यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.  तसंच महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला नोकरी कशी मिळेल, यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. त्याचबरोबर आपण ग्रामीण भागातील शाळांसाठी 6 हजार कॉम्पुटर आणि वाचनालयातील पुस्तकांसाठी 4 कोटी रुपये दिल्याची माहिती दिली.. यावेळी सभेला उपस्थित पदाधीकार्यांनी सतीश  चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प व्यक्त केला... दरम्यान या कार्यक्रमात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील ऑडिओ कॉल द्वारे सभेला संबोधित केलं. महाविकासघाडीची स्थापना झाल्यानंतर ही महत्त्वाची निवडणूक असून सतीश चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन उपस्थित पदवीधर मतदारांना केलं... यावेळी राष्ट्र्रवादी कॉग्रेस पार्टी,जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख,जि.प.कृषी सभापती मा.विष्णुपंत गायकवाड,माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस आय मा.भिम

ठाकरे सरकारकडून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मीडियाची मुस्कटदाबी , परतुरात युवा मोर्चा कडून तीव्र निषेध

 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 1 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी, विभागात आचारसंहिता लागू

  औरंगाबाद, दि. 2 (विमाका) -  मा. भारत निवडणूक आयोगाने 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. निवडणुकीसाठी मतदान हे मंगळवार दि. 1 डिसेंबर 2020 रोजी तर मतमोजणी गुरुवार, दि. 3 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून औरंगाबाद विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत  श्री. केंद्रेकर यांनी निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती दिली. निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली जाणार आहे.  दि. 12 नोव्हेंबर 2020 रोजी नामनिर्देंशन पत्र भरण्याची अंतिम तारीख राहील. दि. 13 नोव्हेंबर 2020 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी केली जाईल.  दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजी  उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक असेल. दि. 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत मतदान होईल.  मतमोजणी  ही दि. 3 डिसेंबर 2020 रोजी होईल. दि. 7 डिसेंबर 2020 रोजी निवडणुक

युवा मोर्चाची मराठवाड्यामध्ये मोठी ताकद पदवीधर मतदारसंघात भाजपा चा उमेदवार निवडून अणन्या साठी पूर्ण शक्ती लावणार- प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर

Image
नांदेड(प्रतिनिधी) प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष ,आणि शेवटी मी, ही विचारधारा घेऊन चालणारा भारतीय जनता पार्टी हा भारतीय राष्ट्रीयत्व  मानणारा पक्ष असून येत्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी युवा मोर्चा संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याचे भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी सांगितले.       पदवीधर मतदार संघाच्या नांदेड ग्रामीणच्या अर्धापूर जि नांदेड येथे संपन्न झालेल्या आढावा बैठकी प्रसंगी बोलत होते    या वेळी व्यासपीठावर खा प्रताप पाटील चिखलीकर,भा ज पा विभागीय संघटन मंत्री संजयजी कोंडगे, भा ज पा नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख ,ज्येष्ठ नेते धर्मराज देशमुख, भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव इंगोले, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेभाऊ देशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती .        पुढे बोलताना महामंत्री राहुल लोणीकर म्हणाले की दोन, तीन निवडणुका अगोदर मराठवाडा पदवीधर मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला होता जयसिंगराव काका गायकवाड ,श्रीकांतजी जोशी आदी मान्यवरांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केलेल

भारतीय क्रांती सेना व नवरात्र महोत्सव समिती यांच्या वतीने महीला बचत गटांना मार्गदर्शन

Image
औरंगाबाद(प्रतीनीधी) भारतीय क्रांती सेनेच्या वतीने व नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाच आयोजन करण्यात आले होते           यावेळेस जिल्हा अध्यक्षा सौ संगीता  हनवते यांनी महानगरपालिका महिला बचत गट संघटक श्रीमती शारदा त खरात यांचे स्वागत केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष  वनिता  चव्हाण होत्या          या प्रसंगि   उपस्थित महीला बचत गटांना शारदाताई खरात यांनी, पंचशीला महिला बचत गट, त्रिशरण महिला बचत गट, अहिल्यादेवी होळकर महिला बचत गट व राजमाता जिजाबाई महिला बचत गट या महिला सदस्यांना बचतीबाबत व शासकीय योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तद्ननंतर  गटातील महिला सदस्यांना  ब्लँकेटचे वाटप केले याप्रसंगी  मंगल उफाडे ,अमृता सावंत, सखुबाई खकाळ, राणी चिंतामणी ,सुरेखा डख,,रेखा चिंतामणी , शारदा काळे ,नीता डख, सुनीता ताई तिघुले,, संगीता ताई जाधव , मंदाताई काटे, चंदाताई धुमाळ, तसेच वार्डातील शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते.

ब्राह्मण समाजच्या महामंडळाबाबत राज्यसरकारला निर्देश देणार - राज्यपाल कोश्यारी

Image
मुंबई - समस्त ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने आज रोजी मुंबईतील राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याची आज भेट घेतली यावेळी समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा काकासाहेब कुलकर्णी यानी ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाबाबात चर्चा केली असता मा राज्यपाल महोदयांनी राज्य सरकारला सकारात्मक निर्देश देण्याचे वचन दिले .               यावेळी  ब्रम्ह महा शिखर परिषदेचे प्रवक्ते विश्वजीत देशपांडे यानी ब्राह्मण समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या व त्यांच्या ग्रामीण भागातील अडचणी मा राज्यपाल याना सांगितले .    यावेळी मकरंद कुलकर्णी यानी राज्यसरकार शी आज पर्यंत झालेला पत्रव्यवहार व आजची स्थीती कथन केली .   यावेळी संजीवनी पांडे यानी ब्राह्मण समाजातील महिला त्यांची आर्थिक व शैक्षणिक स्थीतीबाबत  अडचणी कथन केली .   तसेच  ॲड आरती सदावर्ते -  पुरंदरे यानी ब्राह्मण समजावर होणाऱ्या लिखाणावर बंदी घालावी व ब्राह्मण समाजाच्या सरक्षंणसाठी कडक कायदे करावे  असेहि त्या म्हणाले  यावेळी मा राज्यपाल महोदयानी सगळ्या अडचणी  एकून घेउन तसेच सकारात्मक चर्चा करून  राज्य सरकारला निर्देश देण्याचे अभिवचन दिले .