जयपुर तलाठी सज्जा सौ.माळी यांची तात्काळ बदली करा शेतकरी क्रांती सेनेची मागणी







मंठा (सुभाष वायाळ)तालुक्यातील मौजे जयपुर सज्जावर गेली सहा वर्षापासुन तलाठी सौ.माळी या रूजु आसुन कधीच सज्जावर हजर रहात नाही. यामुळे शेतीचे कामं व शेतकरी वर्गाला मोठी अडचण निर्माण होत आहे. जयपुर तलाठी सज्जा माळी यांनी सज्जावर काम करत आसतांना शासकीय कामात खुप मोठी अफरातफर केली आसल्याची लेखी तक्रार शेतकरी क्रांती सेना संस्थापक सिध्देश्वर काकडे यांनी परतुर उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्याकडे केली आहे. जयपुर तलाठी सज्जा सौ.माळी यांच्या गैर कारभाराची तात्काळ चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी शेतकरी क्रांती सेनेच्या वतीने परतुर उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे. मंठा तालुक्यातील अनेक सज्जावर काही तलाठी हजर रहात नसुन यामुळे शेतकर्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आसुन जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष आसल्याचा आरोप शेतकरी क्रांती सेनेचे सिध्देश्वर काकडे यांनी केला आहे. जयपुर तलाठी सज्जा माळी यांची बदली न झाल्यास आपण आंदोलन करणार आसल्याचे काकडे यांनी म्हटले आहे. जयपुर तलाठी सज्जा सौ.माळी या मंठा येथे बसुन काम पहातात. जयपुर तलाठी माळी यांचे सर्व कामकाज हे दलाला मार्फत चालत आसल्याचे शेतकरी क्रांती सेना अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी म्हटले आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती