सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

सामाजिक वनीकरणच्या शेतकऱ्याच्या बांधावर वृक्ष लागवड लाभर्थ्यांची चौकशी करण्याची मागणी


परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे 

तालुक्यात सामाजिक वनीकरण परिक्षेत्रात शेतकऱ्याच्या बांधावर वृक्ष लागवडी प्रस्ताव मंजुर लाभर्थ्यांची चौकशी करण्याची सामाजिक कार्यकर्त्ये पांडुरंग शेजुळ यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कार्यालया, परतुर या अतर्गत सन २०२०-२१ मध्ये वृक्ष लागवड योजने अंतर्गत तालुक्यातील अर्ज मागविण्यात आली होती. प्राप्त प्रस्ताव मंजुर झालेले आहे. मंजुर लार्भाथ्यांना करारपत्र बंदपत्र / शपथपत्र या तिन अटी बंधनकारक ठेवण्यात येऊन त्या मध्ये शंभर रुपयाच्या बॉड पेपरवर शपथपत्र पत्र मागितले आहे. पत्रकामध्ये नियम व अटी प्रमाणे यापूर्वी कोणत्याही शासकीय निमशासकीय खासगी संस्थेत वृक्षलागवडीच्या करिता अनुदान घेतले नाही किंवा योजना चालू असे पर्यंत लाभ  घेणार नाही. असे बंधन असतांना सामाजिक वनीकरण कार्यालयाने यापूर्वी लाभ घेतलेल्या लाभर्थ्यांना प्रस्ताव मंजूर करून परत दुसर्‍यांदा लाभ देण्यात आला आहे. तर जाणीव पूर्वक नियमात बसणार्‍य लाभर्थ्यांना डावलण्यात आले आहे. सामाजिक वनीकरणने बांधावर वृक्ष लागवड योजनेत निवडलेल्या लाभर्थ्यांची चौकशी समिती नेमवून चौकशी करावी. तसेच कृषि विभाग मार्फत महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत लाभ घेतलेल्या लाभर्थ्यांना दुबार लाभ देण्यात येऊ नये. अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर सामाजिक कार्यकर्त्ये पांडुरंग तुळशीराम शेजुळ यांची स्वाक्षरी आहे.  

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत