Posts

Showing posts from January, 2022

सावरगाव बुद्रुक ते कुंभार पिंपळगाव कडे जाणारा रस्ता अतिक्रमण ग्रस्त मोकळा करण्यात आला.

Image
प्रतिनिधी /हनुमंत दवंडे परतूर तालुक्यातील सावरगाव (बुद्रुक) येथील सावरगाव बुद्रुक ते कुंभार पिंपळगाव कडे जाणारा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून अतिक्रमण ग्रस्त होता तो तहसीलदार मॅडम यांच्या आदेशाने मोकळा करण्यात आला. गेल्या दोन वर्षापासून अतिक्रमण असलेला रस्ता, शेतकऱ्यांचे व पिंपळगाव कडे जाणाऱ्या लोकांचे झालेले हाल या कारवाईमुळे संपुष्टात आले. गेल्या दोन वर्षापासून शेतामध्ये तयार झालेला माल व शेतीमध्ये नेण्यासाठी लागणारे खत अक्षरशः दुसऱ्या गावाहून शेतीमध्ये नवे लागत होते. शेतकऱ्यांना व मुक्या जनावरांना खूप यातना सहन कराव्या लागल्या. या यातनेचा अंत पाहून सुमारे 40 शेतकऱ्यांनी माननीय तहसीलदार परतूर यांना निवेदन देऊन या वही वाटा प्रमाणे जाणारा अतिक्रमित रस्ता मोकळ्या करण्याची विनंती केली. तसेच माजी मंत्री व विद्यमान आमदार माननीय बबनराव जी लोणीकर साहेब व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री मंत्री युवा नेते माननीय राहुल भैया लोणीकर यांना वेतना व होणारे हाल शेतक-याने यांच्या निदर्शनास म्हणून दिले. माननीय बबनराव जी लोणीकर साहेबांनी व राहुल भैया लोणीकर साहेबांनी माननीय तहसीलदार साहेब

परतुर मतदारसंघातील क्रिडा चळवळ जागृत ठेवण्यात कायमखानी सरांचा मोलाचा वाटा - मा.आ.सुरेशकुमार जेथलिया

Image
परतुर - प्रतिनिधी( हनुमंत दवंडे ) गेल्या तिन तपा पासुन परतुर व परिसरात क्रिडा चळवळीचा वसा चालवत जागृत ठेवण्याचे मोलाचे कार्य सरफराज कायमखानी सर यांनी केले असल्याचे प्रतिपादन मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी केले. जिल्हा परिषद शाळेचे क्रिडा शिक्षक सरफराज कायमखानी हे निवृत्त झाल्याने आयोजीत निरोप समांरंभात ते बोलत होते. जेथलिया यांच्या कार्यलयात सपन्न झालेल्या या सोहळयाला मा.आ.सुरेशकुमार जेथलिया, युवा नेते नितीनकुमार जेथलिया, काँग्रेस चे  तालुकाअध्यक्ष बाबासाहेब गाडगे, विलास झरेकर, इब्राहिम कायमखानी सह कार्यकर्त्यांची उपस्तीथी होती. यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी कायमखानी यांच्या कार्याचे कौतुक करत म्हटले की, शैक्षणीक कांलखंडात सुरवातीपासुनचं क्रिडा क्षेत्राचा लळा असलेल्या कायमखानी सरांनी नौकरी करत असतांना देखील शाळे वितरीक्त ईतर कुठेही क्रिडा स्पर्धो असल्यास हेरारीने सहभाग नोंदवत त्या स्पर्धो यषस्वी देखील करूण दाखवल्या , त्यांचे हे कार्य उल्लेखनीय आहे .या व्यतिरिक्त परतुर सराख्या ठिकाणी राज्य स्तरीय स्पर्धो घेत त्यांनी ग्रामीण खेळाडुना एक प्रका

महात्मा गांधी चे विचार प्रत्येकानी आत्मसात करावेत...-.खवल.

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे : भारत देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी महात्मा गांधीजी नी आयुष्य च्या शेवटच्या घटका पर्यंत अहिंसे च्या मार्गाने  प्रयत्न केले त्यांच्या मुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यांच्या विचारांची आजही आपल्याला गरज असल्याचे प्रतिपादन सी. एन. खवल यांनी सांगितले.पाटोदा येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालय  आयोजित महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम ते बोलत होते.            कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी पाराजी रोकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव खवल , विदयानंद  सातपुते यांची उपस्थिती होती.            पुढे बोलतांना खवल म्हणाले कि अहिंसा,असहकार व  स्वावलंबन,या सारख्या बाबी चा विचार करण्याची गरज आजही भासत आहे. सूत्रसंचालन धनंजय जोशी तर आभार प्रदर्शन पांडुरंग डवरे यांनी केले.   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश वखरे ,विष्णू रोडगे, मस्के, केशव गायकवाड यांनी प्रयत्न केले.

परतूर तालुक्यात नवीन साखर कारखाना निर्माण होणार... मनसे नेते दिलीप- बापु धोत्रे===============

Image
परतूर / हनुमंत दवंडे  मराठवाडा दौरयाच्या अनुषंगाने,दि.३० जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील परतूर मंठा तालुक्यातील परतूर शहरातील शासकीय विश्रामगृहमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक मनसे नेते मा.दिलीप(बापू)धोत्रे, मार्गदर्शन करताना  म्हणाले की परतूर मंठा तालुक्यातील स उत्पादक शेतकर्‍यांचा प्रश्न लक्षात घेता परतूर मंठा तालुक्यात नवीन साखर कारखाना निर्माण करण्याची इच्छा आहे,लवकरच साखर उद्योग सुरू करु असंही धोत्रे म्हणाले, श्री धोत्रे यांच्या कडे पंढरपूर सोलापूर धाराशिव या ठिकाणी त्यांच्या मालकीचे दोन साखर कारखाने आहेत, त्यांनी मागच्या आठवड्यात पंढरपूर येथे इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन करून प्रकल्पाला सुरुवात केली आहे, पक्ष वाढविण्याच्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शक केले, प्रदेश सरचिटणीस मा.संतोष(भाऊ)नागरगोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.यावेळी जालना जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके, बालाजी मुंडे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष,परभणी जिल्हाध्यक्ष राज शे

पांडुरंगाच्या आशीर्वादानेच मतदारसंघाच्या विकासासाठी ताकद मिळाली - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर,०१ कोटी ०७ लक्ष रुपयांच्या विकास कामाचे लोणीकर यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण

Image
मंठा ( सुभाष वायाळ ) पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असून पांडुरंगाच्या आशीर्वादाने परतूर विधानसभा मतदार संघाच्या विकास कामासाठी मला ताकद मिळाली असून विदर्भ पंढरी असणाऱ्या शेगावचे गजानन महाराज आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो विकास कामे करण्याची ताकत पांडुरंगाच्या आशीर्वादानेच मिळाली अशा शब्दांत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मंठा तालुक्यातील तळणी व हेलस या गावातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण प्रसंगी बोलत होते यावेळी हभप शिवानंद महाराज पैठणकर भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ पंचायत समिती उपसभापती नागेशराव घारे जि.प. सदस्य पंजाबराव बोराडे गजानन देशमुख विठ्ठलराव काळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री अशोकराव वायाळ हभप रावसाहेब महाराज खराबे कैलास खराबे पांडुरंग खराबे केशव खरावे दीपक खराबे नितीन सरकटे गणेशराव कापूर भगवान महाराज सरकटे अशोक राठोड रवी पाटील शरद सरकटे सिद्धेश्वर सरकटे शरद सरकटे केशव येऊल काय केलं सोपानराव वायाळ प्रमोद बोर

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात भव्य लसीकरण संपन्न

Image
( सुभाष वायाळ )29 मंठा शहरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथे कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन कोरोना लसीकरण ठेवण्यात आले होते. या लसीकरणात वयोगट 15 ते 18 वयोगटातील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले केंद्र सरकारच्या 15 ते 18 वयोगटातील लसीकरण मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 296 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले या लसीकरणासाठी ,डॉ.स्वाती संजय पवार आरोग्य अधिकारी,प्रियंका असोले आरोग्य सेविका,विलास देशमुख आरोग्य सहाय्यक,वसंत गायकवाड आरोग्य सहाय्यक, व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर जाधव, उपप्राचार्य संभाजी तिडके व सर्व प्राध्यापक, आदी जणांनी परिश्रम घेऊन जास्तीत जास्त लसीकरण करून घेतले यावेळी आरोग्य विभाग, विद्यार्थी, प्राध्यापक, इतर कर्मचारी उपस्थित होते.

शालेय व्यवस्थापन समिती वायाळ पांगरी अध्यक्षपदी ज्ञानेश्वर बाबासाहेब वायाळ यांची निवड

Image
              मंठा( सुभाष वायाळ ) दि.29 बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील भाग 4 कलम 21 नुसार प्रत्येक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येते त्यानुसार मंठा तालुक्यातील वायाळ पांगरी येथे कोरोना चे सर्व नियम पाळून शालेय व्यवस्थापन समितीची पालक बैठक बोलवण्यात आली होती.त्यानुसार सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर बाबासाहेब वायाळ तर उपाध्यक्षपदी सो.आशामती प्रसाद वाकळे यांची निवड करण्यात आली. या समितीने सर्वांना असा विश्वास दिला की, शालेय गुणवत्ता वाढवने व मुलांचे भवितव्य उज्वल व्हावे. व शालेय व्यवस्थापनामध्ये पारदर्शकता यावी. शाळाबाह्य व अपंग मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणे, पायाभूत व भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, शिक्षकांच्या समस्याचे निराकरण करणे व त्यांच्या कर्तव्याचा पाठपुरावा करणे,शालेय विकास आराखडा तयार करणे,  या सर्व गोष्टीवर भर देऊन निश्चितच शालेय गुणवत्ता वाढवू अशी हमी दिली. या निवडीबद्दल माजी पंचायत समिती सभापती गंगाधररावजी वायाळ, सुनीलराव वायाळ, युवराज वायाळ, दतराव वायाळ, प्र

रोहन आकात" यांच्या वतीने स्वखर्चाने गरजुवंतांना वरफळ येथे रगीचे वाटप

Image
" परतूर/ प्रतिनिधी( शेख अथर ) समाजाचं काही देणं लागतो ही युक्ती मनात ठेवून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन आकात यांनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा जेष्ट नेते विलास आकात यांच्या हस्ते वरफळ गावातील गरजूवंतांना रगीचे वाटप करण्यात आले भाजपा तालुका सरचिटणीस सुधाकर बेरगुडे यांनी यावेळी सांगितले की सामाजिक भान ठेवत नेहमीच विलास आकात व रोहन आकात यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येतात परंतु आज जो गोरगरीब व गरजूवंतांना थंडीच्या दिवसात आवश्यक असलेल्या रगी वाटप करून एक आदर्श कार्य केल्याचे सांगितले यावेळी सरपंच नदीम पटेल यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी मधुकर गोरे,शेख रउफ,साहेबराव घोंगडे,खाजा भाई,जीवन रेंगले, गुलाब सावंत,आसेफ भाई, योगेश खंडागळे बशीर भाई रणजीत बेरगुडे, दत्ताभाऊ डोईजड,गजानन गोरे,संजय गोरे,जानकीराम गोरे,तसेच बबन दादा आकात यासीन भाई जफर भाई दत्तात्रेय आकात कैलास आकात,पाशा भाई,यांच्यासह अनेक मान्यवर व गावकऱ्यांची उपस्थिती होती.

भैय्यू महाराजांच्या आत्महत्याप्रकरणी त्यांचे ‘हे’ तीन निकटवर्तीय दोषी..====================

Image
परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे मध्य प्रदेशातील प्रसिद्ध भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी इंदूर न्यायालयाने दिनांक 28/1/2021 रोजी मोठा निर्णय दिला आहे. भय्यू महाराज यांना आत्महत्तेसाठी प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने तीन जणांना दोषी ठरवले आहे. यामध्ये भय्यू महाराजांच्या सेवकाचाही समावेश आहे. भैय्यू महाराजांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांनी भैय्यू महाराजांचे सेवक शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक यांना शिक्षा सुनावली आहे. तीन वर्षात ३२ साक्ष आणि १५० वेळा हजेरीनंतर या तिघांना आयपीसी कलम ३०६ अंतर्गत न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या तिघांनाही प्रत्येकी सहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे. १२ जून २०१८ रोजी भैय्यू महाराज यांनी परवाना असलेल्या रिव्हॉल्वरचा वापर करून आत्महत्या केली होती. महाराजांना कुटुंबापेक्षा सेवकांवर अधिक विश्वास होता. त्यांनी त्यांचे आश्रम आणि काम सेवकांकडे सोपवले होते, त्याच सेवेकऱ्यांनी त्यांना पैशासाठी एवढा त्रास दिला की, त्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले.

एकनाथ कदम यांची इसा संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड.....

Image
    परतूर ( हनुमंत दवंडे)  येथील एकनाथ कदम यांची इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोशियन (इसा ) इंग्रजी संस्थाचालक च्या जिल्हाकार्यध्यक्षपदी निवड करण्यात आली     या संघटनेचे संस्थाचालक भारत भांदरगे यांनी एका पत्रकाद्वारे एकनाथ कदम यांची नियुक्ती केली या पत्रकात म्हटले आहे आपण संस्था  स्थापनेपासून कार्यरत आहात आपण संस्था च्या बांधणीसाठी व विस्तारासाठी सदैव प्रयत्नशील आहात आपल्या या कामाची दखल घेत आपल्याला ज्यांना जिल्हा कार्याध्यक्षपदी जवाबदारी देण्यात येत आहे  आपल्या काळात आपण संघटनेचे जोमाने प्रचार व प्रसार कराल अशी अपेक्षा करण्यात येत आहे     या निवडीबद्दल माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया आमदार राजेश राठोड अन्वर बापू देशमुख संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत भांदरगे मराठवाडा अध्यक्ष संदीप बाहेकर तारीख सिद्दिकी रामप्रसाद थोरात डॉक्टर संदीप चव्हाण डॉक्टर रवींद्र घरकुले शब्बीर शेख डॉक्टर प्रशांत अंभुरे डॉक्टर नाझिर कादरी बालासाहेब आकात प्राध्यापक सुधीर यादव अभय काळुंके  समीर देशपांडे गणेश सोळंके एडवोकेट  झेंडे एन कादरी  डॉक्टर दीपक दिरंगे आदींनी या निवडीबद्दल एकनाथ कदम यांचे अभिनंदन केले आ

८९ च्या बॅच च्या वतीनेजि.प प्रशालेच्या गुणवंतांचा सत्कार

Image
परतूर: हनुमंत दवंडे   येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या सन 89 90 या वर्षीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या वतीने डॉक्टर सतीश लालचंद मुंदडा यांच्या तर्फे प्रति वर्षी जिल्हा परिषद प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार केला जातो. यावर्षीही प्रशालेच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात वर्षभरात शालेय शिस्त, अभ्यास, वर्तणूक, वर्षभरातील शालेय सहभाग, शालेय शिष्टाचार या सर्व गुणसंपन्न असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन पुरस्कार दिला जातो,   यावर्षी निवड झालेल्या विद्यार्थी मध्ये प्रथम पारितोषिक प्रांजल पेंदु मैसनवाड(वर्ग१०वि), तर दितीय ऋतुजा भास्कर घोडके(वर्ग१०वि), तर नववी वर्गातील कुमारी प्रतीक्षा सुरेश भुम्बर या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.  तसेच या वेळी ८९ बॅच चे माजी विद्यार्थी राहुल कुंपावत यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वाचनासाठी भावी जीवन उज्वल करण्यासाठी मार्गदर्शन करणारे पुस्तके शाळेला मुकुंद देशमुख यांचे हस्ते भेट दिले. या कार्यक्रमाला भाज

ऊर्जामंत्र्यांच वागणं रजाकारी प्रवृत्तीचं, शेतकऱ्यांना दिलेल्या धमक्या सहन करणार नाही - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा इशारा,विजेच्या प्रश्नावर आमदार लोणीकर यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र========

Image
प्रतिनिधी - हनुमंत दवंडे  ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्रान्सफार्मर बंद न करणे किंवा विजेचे कनेक्शन न तोडणे प्रकरणी लक्ष देणे गरजेचे असताना ते मात्र रजाकारी वृत्तीने वागत आहेत प्रसारमाध्यमांवर जाहीर मुलाखतीदरम्यान शेतकऱ्यांना धमकावण्याचे काम ते करत आहेत महाराष्ट्रातील किंवा मराठवाड्यातील शेतकरी ऊर्जामंत्री यांचीही रजाकारी कदापि सहन करणार नाही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने देणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांनी आश्‍वासनाची पूर्ती केली तर नाहीच उलट ट्रांसफार्मर बंद करण्याचे आणि विजेचे कनेक्शन तोडण्याचे आदेश देऊ अशी जाहीर धमकी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांना दिले जाते आहे ऊर्जामंत्री यांची ही रजाकारी आम्ही कदापि सहन करणार नाही ही बाब अत्यंत गंभीर असून आपण व्यक्तिशः यावर लक्ष देऊन शेतकऱ्यांची विजेचे कनेक्शन तोडले जाणार नाहीत किंवा ट्रान्सफार्मर बंद केले जाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती त्यामुळे सगळी पिके

तुकोबारांयानी कधीच काही देवाकडे काही मागीतले नाही हीच वृत्ती मनुष्याची असली पाहीजे -ह. भ.प. तुकाराम महाराज मुंढे

Image
तळणी ( रवी पाटील ) मनुष्याच्या आयुष्यात कितीही मोठा सघर्ष करण्याची वेळ आली तरी किचतही न डगमगता त्या संकंटाला सामोरे जाण्याची वृती मनुष्यात असली पाहीजे पांडूरंगावरची  नितांत असलेला भक्ती भावच त्याच्चा ईच्छा आकांशा पूर्ण करणारा असला तरी तुकोबारांयानी कधीच काही देवाकडे काही मागीतले नाही हीच वृत्ती मनुष्याची असली पाहीजे देवाकडे जाताना आपण काही मागायचे नसते आपल्या कर्मानुसार सर्व गोष्टीची उपलब्धतता होत असते त्या साठी मनुष्याने सांसांरीक आयुष्य जगत असताना समाधानी असले पाहीजे असे उदगार ह भ प तुकाराम महाराज मुंढे यानी व्यक्त केले तळणी येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्य चालू असलेल्या श्री संत तुकोंबारायांचे चरित्राचे कथन करत असुन सहाव्या दिवशी पंचक्रोशीतील अनेक जणांनी या चरित्राचा आस्वाद घेतला   प्रत्येक संकटाला सामोरे जाऊन स्वःतचे अस्तीत्व निर्माण करणारे जगदगुरू तुकोबाराय आपल्यासाठी पाचवा वेद म्हणून गाथा निर्माण केला तो गाथा आपल्यासाठी आदर्श आहे तो गाथा माथ्यात घेऊन आपले सांसारीक आयुष्य जगणे सध्याच्या युगात गरजेचे आहे तरच आपल्या पीढीसाठी आपण काहीतरी आदर्श समोर ठेवू शकूत संत तुकाराम यांचे आदर्श सं

जालना जिल्ह्यासह परतूरकर गारठले : पारा घसरला..===..

Image
परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे जालना जिल्ह्यात परतूरसह राज्यात सध्या गारठा वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा खाली गेला आहे. या थंड हुडहुडी भरविली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातील परतूर ला किमान तापमान ९ अंशांवर पोहोचले असल्याची माहिती आहे.  हवामानात अचानक मोठा बदल होऊन रविवारी राज्याच्या बहुतांश भागावर धूळ आणि धुक्याचं मळभ निर्माण झाले होते. वाढलेल्या आर्द्रतेतून धुकं आणि धूळ वाढवणार्‍या वेगवान वार्‍याच्या एकत्रित परिणामाने ही स्थिती निर्माण झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. धुळीच्या वादळामुळे राज्यातील अनेक भागातील पारा घसरला आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडली आहे. २५ व २६ जानेवारी रोजी उत्तर, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली.  नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये कमाल तापमान नोंदवले गेलं आहे. तर, नंदुरबारसह नाशिकच्या निफाडमध्येही पारा प

लोणी येथे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते गूळ युनिट चे उद्घाटन

Image
प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे   आष्टी व कोकाटे हादगाव सर्कल मधील शेतकरी प्रचंड प्रमाणात ऊस लावत असतात, या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कुचंबणा होऊ नये या उद्देशाने लोणी खुर्द येथे सुरू होत असलेले हे गुळ युनिट शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले ते लोणी खुर्द तालुका परतुर येथे प्रथमेश ऍग्रो इंडस्ट्रीच्या गुळ युनिट चे उद्घाटन प्रसंगी बोलत होते   पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाला पूरक असे व्यवसाय सुरू करणे ही काळाची गरज असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत कुक्कुटपालन शेळीपालन मत्स्यपालन त्याचबरोबर शेतमालावर आधारित छोटे-मोठे प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची गरज असून या भागातील तरुणांनी या कामात पुढाकार घेतल्यास निश्चितपणे आर्थिक क्रांती घडून येणार असल्याचे यावेळी त्यांनी प्रतिपादन केले      पुढे बोलताना ते म्हणाले की, या भागांमध्ये जलयुक्त शिवार च्या माध्यमातून जलक्रांती झाली असून या ठिकाणच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे त्यामुळे या भागांमध्ये शेतकऱ्यांना मुबल

यश ग्रुप ऑफ इन्स्टीट्युट मध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Image
  परतूर (शेख अथर )तालुक्यातील सातोना खुर्द येथे यश प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तसेच यश इंग्लिश स्कूल येथे  73 वा भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण युवानेतृत्व  यश महेशराव  आकात  यांच्या हस्ते करण्यात आले.   याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून यश महेशराव आकात , स्वप्निल  आकात ,विलासराव लाटे,अनंतराव आकात, संतोष आकात ,आकाश आकात, संदीप कवडे , शामीर शेख , यश माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक  जयराम खंदारे व यश इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल अनिल बोराडे  यांची उपस्थिती होती .        कार्यक्रमाचे  प्रस्ताविक जयराम खंदारे  यांनी केले, तसेच प्रजासत्ताक दिनाचे महत्व यश महेशराव आकात व  संदीप कवडे  यांनी सांगितले. राष्ट्रीय सण-उत्सव उत्साहात साजरे करण्याबरोबरच प्रत्येक भारतीयाने  आपल्या क्षेत्रात महान कार्य करून देशहितासाठी महत्त्वाचे योगदान दिले पाहिजे असे आवाहन यश आकात यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन  बळीराम भले  यांनी केले.कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

मुलाच्या जन्मदिनाचा खर्च टाळून एस टी कामगारांना राशन वाटप...

Image
परतूर / हनुमंत दवंडे  एसटी महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरणासाठी तसेच आर्थिक विवंचनेला कंटाळून ८३ कर्मचाऱ्यांनी आत्मत्याग केला. त्यांच्या दुःखात सामील होऊन गेल्या तीन महिन्यापासून त्यांचा दुखवटा पाळून परतुर आगारातील एसटी कर्मचारी विलीनीकरणाचा लढा लढत आहेत. परंतु महामंडळाने गेल्या तीन महिन्यापासून कामगारांना पगार न दिल्याने त्यांचे कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले असून त्यांच्या मनात नाना प्रकारचे विचार येत आहेत त्याची जाण ठेऊन माझ्याकडून काही मदत करता येईल का या उद्देशाने तसेच भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि माजी पाणी पुरवठा मंत्री तथा आमदार बबनरावजी लोणीकर यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हा सरचिटणीस तथा दैठना खुर्द चे सरपंच संपत दादा टकले यांनी त्यांचा मुलगा शंभूराजे यांचा जन्मदिन साधेपणाने साजरा करून व्यर्थ खर्च टाळून एसटी कामगारांना एका महिन्याचे राशन वाटप केले. माननीय आमदार बबनरावजी लोणीकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या  भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हा सरचिटणीस तसेच दैठणा खुर्द चे सरपंच संपत दादा टकले यांनी सर्वच गरजू एसटी कर्मचाऱ्यांना

सर्व क्षेत्रात श्रेष्ठ क्षेत्र म्हनुन शिक्षण क्षेत्राची ओळख-कपिल आकातपरतूर-विशाखा राखे याची गैरव समारंभ

Image
परतूर / हनुमंत दवंडे  सर्व क्षेत्रात श्रेष्ठ क्षेत्र म्हणून शिक्षण क्षेत्राची ओळख आहे आणि या क्षेत्रात ज्यांना सेवा करण्याची संधी मिळते ते खूप भाग्यवान असतात असे उदगार मंगळवारी ता. 25 रोजी आयोजित ला बहादूर शास्त्री कन्या विद्यालयाच्या सह शिक्षिका  विशाखा राखे यांच्या निरोप समारंभ प्रसंगी मराठवाडा सर्वोदय शिक्षक प्रसारक मंडळाचे सचिव कपिल आकात यांनी काढले. या वेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई आकात,उपाध्यक्ष कुणाल आकात,माजी नगराध्यक्ष विनायक काळे ,माजी उपनगर अध्यक्ष विजय राखे आदी उपस्थित होते.                                                 या वेळी पुढे बोलताना श्री.आकात म्हणाले शैक्षणिक क्षेत्रातुन च भारत देशाचा सुजाण  नागरिक घडवण्याचे कार्य होते. आणि ही संधी शिक्षक वर्गाला मिळते त्यामुळे शिक्षक हा खूप नशीबवान व्यक्ती असल्याचे ते म्हणाले.  या वेळी श्रीमती विशाखा राखे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. या वेळी श्रीमती वर्षाताई आकात, नगरसेवक अंकुश तेलगड,अखिल काजी, प्रा. भारत खंदारे, प्रा.अंकुश मोरे,मा. प्रा. भगवान दिरं

परतूर शहरातील वाहतूक कोंडी बाबत सम-विषम पार्किंग व्यवस्थावाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे पोलीस निरीक्षक कौठाळे याचे आवाहन

Image
परतूर/ शेख अथर    शहरात नेहमीच होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी परतूर पोलिसांनी शहरात पी.वन पी टू पार्किंग व्यवस्था येत्या दोन दिवसात सुरू करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी दिली. शांतता कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवर यासाठी फलकही लावण्यात येणार असून याबाबत व्यापारी वर्गात व जनसामान्य नागरिकांना माहिती व्हावी म्हणून जनजागृती ही करण्यात येणार असून. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात का होईना सुटणार आहे . शहरात ग्रामीण भागातील शेतकरी खरेदी - विक्रीसाठी येतात तसेच शासकीय व खाजगी कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही अधिक आहे .त्यामुळे शहरात वाहनांची नेहमी वर्दळ असते . शहरातील मुख्य रस्त्यावर सर्व शासकीय कार्यालये व बाजारपेठेतील महत्वाचे दुकाने असल्याने मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहने उभी केली जातात.या बेशिस्त वाहनांमुळे मुख्य रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी वाढत जाते . ही समस्या लक्षात घेऊन  पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी  पुढाकार घेऊन शहरातील मुख्य रस्त्यावर पार्किंगसाठी

श्रदेवगाव खवणे येथील श्रीक्षेत्र ओंकारेश्वर येथे हायमस्ट दिव्यांचे उदघाटन ।गल्ली ते दिल्ली परेंत पसरले येथील भक्तांचे जाळे ।प्रत्येक चतुर्थीला केले जाते महाप्रसादाचे आयोजन ।

Image
मंठा (सुभाष वायाळ) तालुक्यातील खवणे देवगाव येथील ओंकारेश्वर देवस्थान हे मंठा तालुक्यातील अकरा गाव एक गणपती साठी एक प्रसिद्ध जागृत देवस्थान मानले जाते याठिकाणी असलेले संन्याशी महंत श्री संत भागवत गिरी व बालकगिरी बाबा यांच्या विनंतीला मान देऊन पंचायत समिती सदस्य किसनराव मोरे यांनी चतुर्थी निमित्य दि.21 जानेवारी शुक्रवार रोजी येथील आश्रमासाठी उजेड राहावा म्हणुन हायमस्ट दिवा बसवला तर स्वच्छता राहावी या दृष्टीने देवस्थान साठी प्ल्यास्टिक कचरा कुंड्यां अर्पण केल्या.  ओंकारेश्वर देवस्थान हे तालुक्यातील एक प्रसिद्ध संन्याशी आश्रम म्हणुन ओळखले जाते या ठिकाणी अनेक भक्त गण राहतात त्याच बरोबर विद्यार्थी देखील राहतात विद्यार्थ्यांना अध्यात्मिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षण देखील दिल्या जाते  श्री संत भागवत गिरी आणि बालक गिरी या संतांचे परिसरात तालुक्यासह देशभरात भक्त गणांचे जाळे पसरले असुन या परिसराचा विकास करण्यासाठी ठिकठिकाणच्या मोठं मोठ्या दानशूर भक्तांचे हजारो हात या ठिकाणी लागत असल्याने या परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. या ठिकाणी अकरा गाव मिळुन एकच गणपती बसवल्या जातो त्यामुळे परिसरा

जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी सहसचिवपदी सौ .उर्मिला खाडे यांची नियुक्ती..=======

Image
परतूर/ हनुमंत दवंडे परतूर तालुक्यातील आष्टी येथील रहिवासी श्रीमती. उर्मिला सूर्यकांत खाडे यांची दि. 20 जानेवारी रोजी जालना जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या सहसचिवपदी एका पत्रकाद्वारे पालकमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात नियुक्ती केली .यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सुरेखा लहाने यांची उपस्थिती होती. यांच्या नियुक्ती निमित्त पालकमंत्री राजेश टोपे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख प्रदेश, सरचिटणीस बळीराम कडपे, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात, तालुकाध्यक्ष रमेश सोळंके, शिवाजी भालेकर राष्ट्रवादी ओबीसी सेल उपाध्यक्ष जालना,  युवकचे तालुकाध्यक्ष ओमकार काटे, महिला आघाडी उपाध्यक्ष पुष्पा मुळे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण, तालुकाध्यक्ष शीला गोरे, सूर्यकांत खाडे, आदींनी अभिनंदन केले.

उद्धव ठाकरेंचा शाळा सुरू करण्याला हिरवा कंदील, सोमवारपासून सुरू होणार शाळा========

Image
प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे सोमवार पासून सुरु होणार शाळा मुंबई आणि महाराष्ट्रात ओमिक्रॉनची तिसरी लाट डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पसरण्यास सुरूवात झाली. कोरोनाचे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून उद्धव ठाकरे सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, "सोमवारपासून राज्यभरातील शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी संमती दिलीये," येत्या 24 जानेवारीपासून महाराष्ट्रातील प्री-प्रायमरी ते बारावी शाळा सुरू होतील. कोरोना संसर्ग पसरल्यापासून राज्य सरकारने पहिल्यांदाच प्री-प्रायमरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्या पुढे सांगतात, "प्रत्येक भागातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत." एका महापालिलेने निर्णय घेतला म्हणजे सर्वांनी तो फॉलो करावा असं नाही. अधिकाऱ्यांनी त्यांच्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा. शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने याआधीच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचना पुन्हा शाळा सुर

औरंगाबाद येथे महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास खा. इम्तियाज जलील यांचा विरोध परतूर येथे तरुणांनी केला निषेध...

Image
प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे महाराणा प्रताप, देशाच्या शौर्याचं, राष्ट्रभक्तीचं, राष्ट्रवादाचं प्रतिक आहे"            औरंगाबाद शहरात आणखी एका पुतळ्यावरून सध्या वाद  निर्माण झाला आहे. शहरातील कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यावरून हा वाद सुरु झाला आहे. तब्बल एक कोटी खर्च करुन हा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव आहे. एकीकडे शिवसेना, भाजपाने या पुतळ्यासाठी आग्रही मागणी केली असताना दुसरीकडे एमआयएमने मात्र विरोध दर्शवला आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी पुतळ्याला विरोध केला आहे. याच्या निषेधार्थ परतूर येथे अनेक तरुणांनी एकत्र येऊन खा. इम्तियाज जलील यांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केला या मध्ये राजपूत, सावता काळी, गोपी ठाकूर, कृष्णा आरगडे, शिवा भाऊ बलमखाणे , अमोल जोशी, मुकुंद ठाकूर, मुकेश राजपूत, पवन पवार, प्रवीण द डूकरे ,बाळू चींचाने,  , नंदू राजपूत, दिनेश राजपूत , नितीन राजपूत, भैया राजपूत, संदीप राजपूत, सर्व रास्ट्रप्रेमी , समाज प्रेमी या वेळी उपस्थित होते.

शाळा सुरू करण्यासाठी पुढाकार घेत राज्य सरकार समोर आक्रमकपणे बाजू मांडल्याबद्दल इसा तर्फे लोणीकर यांचा सत्कार, असोसिएशनने मानले आभार

Image
परतूर/ हनूमंत दंवडे मागील अनेक दिवसांपासून मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या सर्वच शाळा बंद करण्यात आल्या होत्या प्रत्येक वेळी कोरोना महामारी धाक दाखवत शाळा बंद करण्यात आल्या होत्या परंतु यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे ते नुकसान टाळण्यासाठी कोरोना नियमांचं पालन करून शाळा पूर्ववत सुरू करण्यात याव्यात अशी मागणी इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने करण्यात येत होती राज्य सरकार समोर ही बाजू मांडण्यात यावी यासाठी असोसिएशनने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना विनंती केली होती त्यानुसार श्री लोणीकर यांनी अत्यंत आक्रमकपणे व मुद्देसूद असोसिएशन आणि विद्यार्थ्यांची बाजू मांडली आणि शासनाला शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यास भाग पाडले त्यामुळे आज इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन महाराष्ट्र संघटनेच्या राज्य कार्यकारणी च्या वतीने श्री लोणीकर यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले प्रत्येक वेळी करुणा महामारी चे संकट आहे या नावाखाली राज्यातील शिक्षण विभागाने शाळा बंद करण्याचे धोरण अवलंबिले होते कोरोना महामारी चे संकट असताना विद्यालय बंद आणि मदिरालय सुरू अशी प

तुकाराम महाराज यांचे चरित्र हे शब्दामध्ये व्यक्त करणारे चरिञ नाही -ह.भ.प. तुकाराम महराज मुंढे

Image
तळणी ( रवि पाटील ) मी कोण आहे हे कळले पाहीजे यासाठी संत पाहीजे असतात तुकारामची कथा म्हणजे धर्मकथा आहे संत सहवास हा मनुष्य जीवनाचा आधार बनले पाहीजे जगदगुरु तुकाराम महाराज यांचे चरित्र हे शब्दामध्ये व्यक्त करणारे चरिञ नाही तर ते आचरणात आणायसाठी असले पाहीजे तुकोबारायाचे चरित्र हे त्याग निष्ठा आणि समर्पन शिकवते वारकरी सप्रदायामध्ये अनेक अवतारीक पूरुष आहेत असे ऊदगार ह भ प तुकाराम महाराज मुढे परळीकर यानी तळणी येथील अखंड हरीनाम सप्ताह मधील पहील्या दिवशीच्या तुकाराम महाराज चरित्राचे कथन करताना व्यक्त केले  महापूराषाचे चरिञ हे प्रेरणादाई असतात त्याचे चरित्र आपन आत्मसात केले पाहीजे महापुरुषाचा  भूतकाळ हा आपला वर्तमानकाळ असला पाहीजे छञपती शिवाजी महाराज विरशिरोमणी महाराणा प्रताप वीर सावरकर भगतसीगं राजगूरू सुखदेव सुभाषचंद्र बोस यांची चरीञ आत्मसात करणे सध्या गरजेचे आहे राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतार आहे मानवी जीवनात रामाचे आचरण तर कृष्णाचा विचार सध्याच्या मानवी जिवनात महत्वाचा आहे आणि ते आत्मसात करणे गरजेचे आहे संताकडे चारीत्र्य आहे म्हणून त्यानी चरित्र गहन करून घेतले आहे आजच्या या धावपळीच

आष्टी येथे पंचायत समिती उपसभापती रामप्रसाद थोरात यांच्या हस्ते बोरवेल चे उद्घाटन..==========

Image
परतूर/   हनुमंत दवंडे परतूर तालुक्यातील आष्टी येथे पंचायत समिती परतूर चे उपसभापती रामप्रसाद थोरात सर यांच्या विशेष फंडातून व  मधुकर मोरे ग्रामपंचायत सदस्य यांच्या पाठपुराव्याने सम्राट नगर येथे बोरवेल घेण्यात आली . यावेळी उपस्थित पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद थोरात सर मधुकर मोरे ग्रामपंचायत सदस्य ,रोहन वाघमारे,नसरुल्लाह काकड ग्रामपंचायत सदस्य, बाबासाहेब बागल ग्रामपंचायत सदस्य,फुलारी मामा ग्रामपंचायत सदस्य, संतोष रोहीमल, नितिन मोरे, गौतम भाई शेळके, राहुल कांबळे, गायकवाड सर, वासुदेव वाघमारे, व सर्व उपस्थित सम्राट नगर मधील  रहिवासी उपस्थित होते..

माळेगावात मासिक सभा होत नसल्याने सरपंच ग्रामसेवकावर कारवाई करण्याची ग्राम पंचायत सदस्यांची गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार

Image
मंठा प्रतिनिधी(सुभाष वायाळ)  मंठा तालुक्यातील माळेगाव येथे गेल्या वर्षभरापासून मासिक सभा झाली नसल्याने तसेच दि. २० जानेवारी २०२२ रोजी मासिक सभेची नोटिस देऊनही मासिक सभा झाली नसल्याने सरपंच आणि ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार वाढला आहे. यामुळे गावाच्या विकासाला खीळ बसत बसत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी चार ग्रामपंचायत सदस्य यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती मंठा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की माळेगाव ता. मंठा येथील ग्राम पंचायत मध्ये फेब्रुवारी २०२१ ते जानेवारी २०२२ या कार्यकाळामध्ये ग्रामसेवक तथा सरपंच यांनी आजपर्यंत कुठल्याही मासिक सभेला ठरावाच्या मासिक मिटींगसाठी विश्वासात घेतले नाही. तसेच दि.१७ जानेवारी २०२२ रोजी ग्रामसेवक व सरपंच यांनी त्यांच्या सही शिक्यानिशी मासिक सभेची नोटीस दि. २०/०१/२०२२ रोजी साडे अकरा वाजता ग्रा.पं. कार्यालयामध्ये मासिक सभासाठी हजर राहण्याचे सांगितले होते. त्यानुसार आम्ही चार ग्रा.पं. सदस्य दि.२० जानेवारी २०२२ रोजी सकाळी अकरा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ग्रामसेवक तथा सरपंच यांची मासि

तळणी येथे अंखड हरिनाम सप्ताहास शनीवारीपासून प्रारंभ

Image
तळणी (रवी पाटील) मंठा तालूक्यातील तळणी येथे उद्यापासून शनिवार पासून अंखंड हरिनाम सप्ताहास प्रारभं होत असून या सप्ताह मध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण जगदगूरू तुकाराम महाराज संगीत चरिञ भाव कथा काकडा भजन हरिपाठ व हरीकीर्तनाचे आयोजन संमस्थ तळणी ग्रामस्थ श्री संत सेवा तरूण मंडळाच्या वतीने आयोजीत केले आहे या सात दीवसीय सप्ताह मध्ये तुकोबाराय यांचे चरीञ वक्ते म्हणून ह भ प तुंकाराम महाराज परळीकर हे असणार आहेत तर या सप्ताहचे व्यासपीठ चालक म्हणून ह भ प दत्तात्रय महाराज पवार ह भ प कैलास महाराज टीटवीकर व ह भ प चरणसिह महाराज हे असणार आहेत तर या सात दीवसात महाराष्ट्रातील नामंवत कीर्तनकाराची हरीकीर्तनाचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये ह भ प सुदाम महाराज पानेगावकर ह भ प सोपान महाराज सानप ह भ प निलेश महाराज कोरडे ह भ प जंयवंत महाराज बोधले ह भ प झानेश्वर महाराज पाटील ह भ प अशोक महाराज ईदगे ह भ प संजय महाराज पाचपोर तर काल्याचे कीर्तन भागवताचार्य शिवांनंद महाराज शास्त्री यांचे होणार असुन या सप्ताह निमित्य भव्य समुदायक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन या साठी नोदणी करण्याचे आव्हाहन श्री

अग्रवाल परिवाराच्या वतीने हॉटेल अतिथी येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

Image
परतूर/हनूमंत दंवडे -हॉटेल अतिथी येथे परतूर शहरातील महिला साठी कोरोना नियमाचे पालन करीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम सौ.आरती मोहन अग्रवाल , सौ.छाया अनिल अग्रवाल, सौ.निशा तेजस अग्रवाल यांनी परतूर येथील हॉटेल अतिथी येथे आयोजित केला होता.        पर्यायवरणासाठी घरातील प्रत्येकानी एक एक झाड लावावे म्हणून मकर संक्रांतीचे वाण भेट म्हणून झाडासाठी कुंड्या ह्या भेट म्हणून देण्यात आल्या. परतूर शहरातील सर्वच स्तरातील महिलांनी या मध्ये सहभाग नोंदविला होता. प्रत्येक महिलांसाठी कोविड नियमाचे पालन करीत आसन व्यवस्था व नाष्टा सोय ही अग्रवाल परिवाराच्या वतीने करण्यात आली होती.      महिलांसाठी फोटो सेशन करीता सेल्फी पॉईंट सुद्धा लावण्यात आले होते.        सदरील कार्यक्रम हा परतूर शिवसेना जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांच्या परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सौ.आरती अग्रवाल, सौ.छाया अग्रवाल, सौ.निशा अग्रवाल, सौ.सोनू केजरीवाल, सौ.सीता अग्रवाल, सौ.हेमा अग्रवाल, सौ.स्वाती अग्रवाल, सौ.रोशनी अग्रवाल, सौ.कंचन अग्रवाल, सौ.पद्मा अग्रवाल यांच्या सह अनेक महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नो

मंठा नगर पंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकला

Image
मंठा (सुभाष वायाळ) मंठा नगर पंचायात चा निकाल नूकताच जाहीर झाला असून शिवसेनाने या नगर पंचायत 12 जागावर वीजय मिळवून स्पष्ट बहूमत पटकावले आहे तर भाजप व कॉग्रेस प्रत्येकी दोन तर राष्ट्रवादी कॉग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले  वीजयी उमेद्वावार खालील प्रमाणे  प्रभाग क्रमांक एक विजयी उमेदवार शिवसेना अचित नाना बोराडे प्रभाग क्रमांक तीन विजयी उमेदवार काँग्रेस शेख साजेद शेख जलील  प्रभाग क्रमांक चार विजयी उमेदवार सौ नंदा उत्तमराव राठोड शिवसेना प्रभाग क्रमांक दोन विजयी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस बाजमोहम्मद खान पठाण  प्रभाग क्रमांक पाच विजयी उमेदवार दीपक आसाराम बोराडे शिवसेना  प्रभाग क्रमांक सात विजयी उमेदवार छाया अरुण वाघमारे शिवसेना प्रभाग क्रमांक 10 विजयी उमेदवार मीना सचिन बोराडे शिवसेना प्रभाग क्र आकरा उबेद बागवान शिवसेना प्रभाग क्रमांक आठ विजयी उमेदवार राजेश खंदारे काँग्रेस  प्रभाग क्रमांक सहा विजयी उमेदवार एन डी दवणे भाजपा प्रभाग क्रमांक 13 विजय उमेदवार मीरा बाळासाहेब बोराडे शिवसेना प्रभाग क्रमांक 9 विजयी उमेदवार जे के कुरेशी शिवसेना  प्रभाग क्रमांक 15 विजयी उमेदवार सरोजा

युवा मोर्चाचे आष्टीत नाना पटोले यांच्या वीरोधात आंदोलन या प्रंसगि युवा मोर्चाचे तालूका महामंत्री रवी सोंळके आपली प्रतीक्रिया देतांना

 

महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्याची आता पलकांची मागणि

Image
महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्याची पालकांची मागणी मंठा ( सुभाष वायाळ )दि.18 मंठा तालुक्या सह महाराष्ट्रातील सर्व शाळा व कॉलेज पूर्ववत चालू करण्यात यावे यासाठी मंठा तालुक्यातील पालकांनी मंठा तहसीलदार यांना निवेदन देऊन विनंती केली की, कोरोनाच्या पार्श्वभूमी वर शासनाने सर्व शाळा व कॉलेज बंद केलेले आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासावर होत आहे. तसेच गेली दोन वर्ष झाले सतत शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे त्याबरोबर बौद्धिक विकलांगता सुद्धा येत आहे. शाळा बंद असल्या कारणामुळे बालविवाह, बालमजुरी, अशा समस्या उद्भवत आहेत. व ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक समस्यांना पालकांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये काही पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल नसणे, नेटवर्क नसणे, आर्थिक भुर्दंड यातून पालकांची मुक्तता व्हावी. तसेच इतर क्षेत्रामध्ये जशी 50 टक्के सुट देऊन सुरू ठेवण्यात आलेले आहेत.कमीत कमी तशी शिक्षणक्षेत्राला सूट देऊन विद्यार्थ्यांचे होत चाललेले शैक्षणिक नुकसान टाळून शासनाने त्वरित शाळा पूर्वत चालू कराव्यात. अशी मागणी मंठा तालुक्यातील पालकांनी

नाना पटोले यांचे वागणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धि, पटोले यांना तात्काळ अटक करा,त्री आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी,प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी पटोले यांची धडपड, अटक न केल्यास भाजपाच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन - लोणीकर

Image
प्रतिनिधी- हनूमंत दंवडे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींना मारू शकतो शिव्या देऊ शकतो अशा शब्दात गरज ओळखली असून नाना पटोले यांचे वागणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धि अशा स्वरूपाचे आहेत त्यांना तात्काळ अटक करून महाराष्ट्र सरकारने लोकशाही जिवंत आहे असे महाराष्ट्रातील जनतेला दाखवून द्यावे अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केले सत्तेचा माज आणि मस्ती चढल्यानंतर आपण काय बोलतो याचे भान राहात नाही आणि तीच अवस्था काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची झाली असून नाना पटोले यांच्या बुद्धिचा भोपळा झालेला आहे संपूर्ण राज्यभरात नाना पटोले यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले असून नाना पटोले यांना तात्काळ अटक न केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने याहीपेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असेही लोणीकर यावेळी म्हणाले देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताची मान जगभरात उंचावली असून देशाला आर्थिक महासत्ता जागतिक महासत्ता बनवण्यासाठी मोदीची प्र

नाना पटोले यांच्या पंतप्रधान मोदी विषयी च्या त्या वक्तव्याचा परतूर येथे निषेध,कार्यकर्त्यांनी केले जोडे मारो आंदोलन,पटोले वर गुन्हा दाखल करा युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांची मागणी

Image
प्रतिनिधी/ हनूमंत दंवडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विषयी गरळ ओकणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करा नसता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात पटोले ना फिरू देणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी केले आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अतिशय अभद्र प्रकारची भाषा वापरली असून ही भाषा खपवून घेतले जाणार नसल्याचे राहुल लोणीकर यांनी म्हटले आहे  देशाच्या सर्वोच्च स्थानी असलेले पंतप्रधान यांच्या बाबतीत अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या पटोले वर रासुका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही राहुल लोणीकर यांनी केली असून आज परतूर येथे युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या आदेशाने युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या नेतृत्वात जोरदार निदर

तळणि येथे मरावीकंपनी च्या वतीने हर घर दस्तक योजने अत्तर्गत विज बील भरण्याचे व्यवस्था

Image
तळणी (रवी पाटील)महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी च्या वतीने हर घर दस्तक योजने अत्तर्गत विज वितरणच्या ग्राहंकांना विज बिल भरण्याची व्यवस्था या योजनेद्वारे महावीतरणकडून ग्राहकांच्या घरीच होणार असल्याने या योजनेमुळे विज वितरणच्या ग्राहकांमध्ये नियमित बिल भरण्याची सवय लागून वसुलीच्या प्रमाणात वाढ होऊन ग्राहंकाचा सुध्दा वेळ व विज बीला साठी भरण्यासाठी इतर सेवा केद्रावर लागणारा अतिरीक्त पैसा सुध्दा यामुळे वाचणार आहे या योजने मुळे महावीतरणचे कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन विज बिलाचा भरणा केल्यावर जाग्यावरच पावती पाँश मशिनद्वारे ग्राहकांना मिळणार आहे  तळणी गावचा विचार करता बिल भरण्यासाठी ग्रांहकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असे या पाँश मशिनद्वारे ग्राहंकाकडे विज बिल नसले तरी त्या ग्राहकांकडील बिलाची रक्कम किती आहे हे कळनार आहे ग्राहकाने ग्राहक नबंर सागीतल्यानंतर त्याची पूर्ण बिलाच्या रकमेची  माहीती कळनार आहे तळणी येथे एकुण ७३० आधिकृत ग्राहक असुन जवळपास चार लाख रूपयाच्या आसपास ची महिन्याची वसुली तळणी गावातून महावीतरण ला जाते मोठा व्यापारी वर्ग असून स्थानिक लाईनमन वसुलीच्या निमित्याने प्रत्य

मुलाच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना कोविड सुरक्षा साहित्य वाटप,सामाजिक दायित्व निभावून समाज हिताचा विचार करणार -- सरपंच शत्रुघ्न कणसे

Image
परतूर / हनुमंत दवंडे तालुक्यातील दैठना बू. येथील सरपंच तथा भाजपा युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांनी आपल्या मुलांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून वाढदिवसानिमित्य शालेय विद्यार्थ्यांना कोविड पासून बचाव करण्यासाठी सुरक्षा साहित्य व गरजूंना १०० ब्लँकेट वाटप केले आहेत.   जयश शत्रुघ्न कणसे यांच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त दैठना बू व हरेराम नगर येथील प्रशाला येथे कोविडच्या प्रादुर्भावमुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे त्याचीच खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून वाढदिवसाचे औचित्य साधून मास्क सॅनिटायझर, व खाऊचे वाटप विद्यार्थ्यांना केले. तसेच येथील गरजवंताना थंडीपासून संरक्षण व्हावें यासाठी शंभर ब्लँकेट वाटप करण्यात आले. मागील दोन वर्षात कणसे कुटुंबियांनी वाढदिवसाचे औचित्य साधून हरेरामनगर येथील मंदिर जिर्णोद्वार देणगी दिली तसेच गंगाभारती संस्थान दैठना फाटा येथे देणगी. परतूर येथील मराठा क्रांति भवनासाठी रोख स्वरुपात देणगी, ऊसतोड कामगारांना ब्लँकेट, मागील वर्षी कोरोंना काळात डॉक्टरांना कोविड सुरक्षा साहित्य ५० किट, राममंदिर निधि

प्रा. शा. पांगरा तांडा शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड..====================

Image
प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे घनसावंगी तालुक्यातील प्राथमिक शाळा पांगरा तांडा (केंद्र) जिरडगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली. पुढील दोन वर्षासाठी शालेय समितीची निवड करण्यात आली आहे . यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून शिवाजी शेषराव राठोड यांची निवड करण्यात आली. तर प्रीतम एकनाथ जाधव उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. डोळझाके आर. बी. (सचिव) गुरमे एन. एम.(शिक्षक प्रतिनिधी), विष्णू राठोड (पालक सदस्य) निवडी नंतर शाळेचे मुख्याध्यापक यांनी अध्यक्ष ,उपाध्यक्ष आणि सदस्य यांचा सत्कार केला आहे. पालक सभेतून सदस्य निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला विशेष उपस्थिती म्हणून संदीप बाबू राठोड, सौ. कल्पना रवी जाधव, श्याम सोपान राठोड ,सौ .वनिता राम राठोड, सौ. सुरेखा प्रकाश राठोड ,अनिल परसराम जाधव ,सौ. ज्योती राजू राठोड ,सौ .ललिता सावजी राठोड (,ग्रा.प. सदस्य)या वेळी उपस्थित होते. मुख्याध्यापक व गावातील सरपंच यांनी नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.

मनुष्याचे शब्दरूपी कार्य विसरते मात्र कृती जीवंत राहते हभप भगवताचा-र्य - रूपालीताई सवने

Image
परतूर – हनूमंत दंवडे              समाजात वावरत असतांना मनुष्याने केलेली शब्दरूपी मदत विसरू शकते मात्र कृतीतून केलेली मदत कायम स्मरणात जीवंत राहते असे प्रतिपादन हभप भागवताचा-र्य रूपालीताई सवने यांनी केले. लॉयन्स क्लब परतूरच्या वतीने हभप रूपाली सवने व बाल कवियत्री श्रावणी बरकुले यांचा सन्मान करून सत्कार प्रसंगी बोलतांना रूपाली सवने यांनी केले. यावेळी पुढे बोलतांना हभप रूपालीताई सवने म्हनाल्या की पीडितांचे दुखदूर करण्यासाठी समाज प्रबोधनातून कार्य केले जाते. प्रबोधनातून सांगितलेले कार्य समाज विसरू शकतो मात्र कृतीतून केलेले कार्य मनुष्याच्या कायम स्मरणात राहते ते कार्य आज लॉयन्स क्लबच्या माध्यमातून नेत्रसेवेचे कार्य होत असून समाज हे कार्य कदापि विसरू शकत नाही. लॉयन्स क्लब आज समाजातील वंचित घटकांना सेवा कार्य करून त्यांना नवी दुर्ष्टी देण्याचे कार्य नव्या जगाची ओळख त्यांना या माध्यमातून देत आहे. गरजू पीडितांना मदत करणे आणि माणुसकी प्रत्येकांच्या मनात जागवणे हाच खरा परमार्थ असल्याचे वारकरी संप्रदाय सांगत आहे. प्रत्येकाने गरजू आणि पीडितांना मदत करण्याचे आवाहन हभप सवने केले. तर याप

मैदानी खेळ म्हणजे उत्कृष्ट खेळाडूनां आपले कौशल्य दाखवण्याचं उत्तम व्यासपीठ-मोहन अग्रवाल

Image
परतूर/ हनूमंत दंवडे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या  वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात अंतिम सामन्यात नितीन ११ चा पराभव करत बुद्धभूषण या संघाने विजेतेपद मिळवले         दि.9 रविवार रोजी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना शहर च्या वतीने क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचा अंतिम सामना रविवार रोजी रंगला होता या अटीतटीच्या सामन्यात बूद्धभुषण संघाने जेतेपद पटकावले याप्रसंगि शिवसेना जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी बोलताना मोहन अग्रवाल यांनी सांगितले की शहरासह ग्रामीण भागातील क्रिकेट प्रेमींनी अश्या स्पर्धेच्या माध्यमातून आपले कर्तृत्व व कौशल्य सिद्ध करून शहराचे नाव राज्य पातळीवर न्यावे तसेच अश्या स्पर्धेमधून गुणी खेळाडू तयार व्हावे अशी भावना व्यक्त केली प्रथम पारितोषिक शिवसेनेचे युवा नेते महेश नळगे यांच्याकडून ठेवण्यात आले होते तर दुसरे पारितोषिक नगरसेवक शरीफ कुरेशी यांच्या वतीने होते यावेळी महेश नळगे,शरीफ कुरेशी,अशोकराव आघाव,मधुकर पाईकराव

तळणि येथीलआदर्श तथा शिस्तप्रिय शिक्षक एस.टी. पाटील सर यांचे निधन

Image
तळणी(प्रतीनीधी) येथील आदर्श शिक्षक एस टी (श्रीकृष्ण त्र्यंबंकराव पाटील) पाटील सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले मूत्यू समई त्याचे वय ७८ वर्षाचे होते त्याच्या पश्चात दोन मुले दोन मुली एक भाऊ नांतवंडे असा मोठा परिवार होता तळणी येथील केद्रीय प्राथमिक शाळेचे केद्रीय मुख्याध्यापक म्हणून अनेक वर्ष कारभार साभांळला कडक शिस्तीचे पाटील सर म्हणून ते सर्वाचे परिचीत होते संगळ्याना सोबत घेऊन चालणे व कितीही मोठी संकट आले तर त्याला सहजपणे सामोरे जाणे ही त्याची विशेषता त्यानी मोठया प्रमाणात घडवलेल्या विद्यार्थ्याची संख्या मोठी आहे समाजातील प्रत्येक स्तरातील अनेक जणासोबत त्याचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते त्याच्या जाण्याने एक शिस्तप्रिय शिक्षक आम्ही गमावला अशा प्रतिक्रीया त्याच्या सहकारी शिक्षकांनी यावेळी व्यक्त केल्या त्याच्या अंतिम सस्कारासाठी अनेक मान्यवरानी अंतिम दर्शन घेऊन श्रध्दांजली अर्पण केली तळणी ग्रामस्थाच्या वतीने सरपंच उध्दवराव पवार यानी आदरांजली वाहून आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या त्याच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम बुधवारी ठीक नऊ वाजता करण्याचे ठरले आहे

एसटी कर्मचार्‍या करीता धावून आले समाज सेवक इज्जरान कुरेशी , केले किराणा किटचे वाटप

Image
परतूर / हनूमंत दंवडे गेल्या अनेक दिवसापासून एस टी कर्मचारी हे संपावर  असल्याने त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे  त्यांचा कुटुंबांना आधार देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्ये   इज्जरान कुरेशी यांनी पुढाकार घेत एस टी कर्मचारी यांना रविवारी किराणा किटचे वाटप केले                       सध्या एस.टी. कर्मचारी हे संपावर आहेत त्यातच  कोरोना  ची चौथी लाट आलेली आहे या काळात गरीब गरजू कुटुंब अनेक अडचणीचा सामना करीत उदरनिर्वाह करीत आहे. कोरोंना काळात अनेकांच्या नौकार्‍या गेल्या रोजगार बुडाला तर एस टी कर्मचारी यांनी आपल्या मागण्यासाठी संप पुकारला मात्र त्याच्या मागण्या शासन  मान्य करीत नसल्याने व्यथित झालेल्या अनेकांनी आत्महत्या केल्या.  मात्र त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उद्सभवत असल्याने अनेक कर्मचारी संकटात सापडला आहे असे असतांना कुणाकडे आपल्या कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी गाऱ्हाणे न मांडता जीवन जगत आहे. कुणी हताश होऊन चिंतेत जगत आहे. त्यांच्या भावना ओळखून त्यांच्या परिवारांची काळजी घेत सामाजिक कार्यकर्त्ये व हाजारोचे चहाते  भावी नगरसेवक इज्जरान कुरेशी यांनी  आपण समाजाचे काही देणे लागतो या भावन

हातडी येथे सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली =================

Image
परतूर / हनुमंत दवंडे परतूर तालुक्यातील हातडी येथे सावित्रीबाई फुले बाल संस्कार शिक्षण प्रसारक मंडळ व सर्व महिला ग्राम संघाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची  जयंती साजरी करण्यात आली.  या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून   ,पोलीस कॉन्स्टेबल निता नवले   निता नवले (महिला पोलीस कॉन्स्टेबल ) गंगाताई जोगदंड (महीला बचतगट सुपर वायसर)सावित्रीबाई फुले बाल संस्कार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अर्जुन गाढवे,उपाध्यक्ष रवींद्र गायकवाड  सरपंच, उपसरपंच, सर्व ग्राम पंचायत महिला सदस्या, आरोग्य सेविका  आशा कार्यकर्ती   शाळेतील विद्यार्थी व हातडी येथील ग्रामस्थ यांची उपस्तीती होती या वेळी संस्कृती झरेकर, स्वरा झरेकर, शारदा बोरकर, संस्कृती बोरकर यांनी यांनी जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरवात केली .  या नंतर पोलीस कॉनीस्टेबल निता नवले  यांनी मार्गदर्शन केले बोलतांना त्या म्हणाल्या मुलींनी शिक्षणावर भर द्यावा कोणीही बालविवाह करू नये महिलांवर कौटोंबिक अत्याचार होत असतील तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा   या नंतर समता कलामंच येनोरा यांनी लेक वाचवा ल

सेवली जालना रोडवर दोन मोटरसायकल समोरा समोर धडकल्याने एक ठार तीन जखमी ================

Image
परतूर / हनुमंत दवंडे . जालना तालुक्यातील सेवली जालना रोड वर सेवली पासून १ किमी अंतर वर अपघात झाला  गोविंद धर्मा चव्हाण राहणार वय 48 व जखमीचे नाव बळी धना राठोड वय 50. सेवली वरून आपल्या घरी  जात असताना समोरून भागडे सावरगाव येथील दोघीजणी येत असताना त्यांच्या गाडीने धडक दिल्याने हे चौघेही जखमी झाले .त्यामध्ये जखमी बळीराम राठोड, गजानन इंगळे, वय 30 व किशोर सदावर्ते वय 35 मोटर सायकल नंबर एम .एच. 21 बी. टी. 50 42 व दुसरी मोटरसायकल एम .एच. 28 3709  या दोन मोटारसायकली  व जखमींना सेवली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता या केंद्रामध्ये एकही डॉक्टर नसल्याने दवाखान्यामध्ये दोन ते तीन तास जखमी तडपत पडले होते .नंतर जखमींच्या नातेवाइकांनी जखमींना खाजगी वाहनातून जालना येथे नेण्यात आले सेवली  येथे ॲम्बुलन्स  असताना ॲम्बुलन्स मध्ये डिझेल टा का यला सांगितले त्यामुळे नातेवाईकांनी खाजगी वाहन करून जालना येथे गोविंद धर्मा चव्हाण या जखमींना जालना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता जालना सिविल हॉस्पिटल  मधील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. तीन जखमी चा उपचार जालना येथे चालू आहे.