Posts

Showing posts from February, 2023

शेलगाव शिवारात देशी दारूच्या २४ बाटल्या पकडल्या, आष्टी पोलिसांची कारवाई

परतूर – प्रतिनिधी कैलाश चव्हाण   परतूर तालुक्यातील सेलगाव ते गणेशपुर जाणाऱ्या रोडवर सेलगाव शिवारात देशी दारुच्या २४ बाटल्या ताब्यात बाळगुन चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असतांना आष्टी पोलिसांनी पकडून दुचाकी जप्त करून कारवाई केली आहे.     याबाबत अधिक माहिती अशी कि संशयित अशोक रामचंद्र पवार, रा. रंगोपंत टाकळी हा दि २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मौजे सेलगाव ते गणेशपुर जाणाऱ्या रोडवर सेलगाव शिवारात सोळाशे अंशी रुपये किमतीची एका वायरच्या पिशवी मध्ये देशी दारुच्या २४ सिलबंद बाटल्या तसेच वीस हजार रुपये किमतीची मोटार सायकल क्र. एमएच २१ ए.के.३५७० वर एकुण २१ हजार ६८० रुपयाच्या. अशोक पवार यांनी विना परवाना बेकायदेशिर रित्या प्रोव्हिशन गुन्ह्याचा माल देशी दारुच्या २४ बाटल्या ताब्यात बाळगुन चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने मोटार सायकलवर घेऊन जात असताना मिळुन आला. या प्रकरणी पोकॉ गणेश शिंदे यांच्या फिर्यादी वरून आष्टी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ जे.डी पालवे हि करीत आहेत. या कारवाईने अवैध देशी दारू विक्री व वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.

आनंद इंग्लिश स्कूल परतूर मध्ये मोफत कलचाचणी संपन्न

Image
परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण आपल्या देशात डॉक्टर, इंजिनिअर, आयएस,आयपीस, सीए या सारख्या सर्व व्यावसायिक पदवी शिक्षणासाठी स्पर्धा परीक्षे द्वारे प्रवेश दिला जातो. आपला कल नेमका कोणत्या शाखेकडे आहे याचा संभ्रम असतो. हा संभ्रम दूर होण्यासाठी विद्यार्थ्यांची कलचाचणी करणे आवश्यक असते. परंतु हि कलचाचणी महाग असल्यामुळे व स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने पालक टाळतात. याचे महत्त्व लक्षात घेता परतूर शहरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंद इंग्लिश स्कूल परतूर ने लिड एज्युकेशन कंपनी च्या सहकार्याने दि.26 फेब्रुवारी रविवार रोजी मोफत घेण्यात आली. यामध्ये परतूर शहरातील एकूण 600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.          यासाठी परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून मुख्याध्यापिका सत्यशीला तौर- कदम , सह केंद्रप्रमुख म्हणून प्राचार्य नारायण सागुते, मुख्याध्यापक संजय कदम यांनी काम पाहिले. यावेळी निरीक्षक म्हणून लिड एज्युकेशन कंपनी चे व्यवस्थापक स्वप्नील वाटेगावकर उपस्थित होते.     परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आनंद इंग्लिश स्कूल, आनंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षक, शिक्षिका, व इतर कर्मचा

मानव विकास मिशन अंतर्गत परतुर येथील जि प प्रशालेतील विद्यार्थिनींना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले 59 सायकलचे वाटप,मुल मुली शिकल्या पाहिजेत मोठ्या अधिकारी झाल्या पाहिजेत- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  शिक्षण हे वाघिणीचे दूध असून जो शिक्षण रुपी दूध प्याला त्याला समाजात वावरताना कुठलीही अडचण येत नसून प्रत्येकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले यांच्या आदर्श वर चालत शिक्षण घ्यावे असे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले ते जि प प्रशाला परतूर येथे मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना 59 सायकल वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते    पुढे बोलताना ते म्हणाले की ग्रामीण भागातील मुलींना शहरात येऊन शिक्षण घेण्यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकली वितरित करण्यात येतात या माध्यमातून मुलींनी निश्चितपणाने नियमितपणे शाळेत येऊन अध्ययन करावे जेणेकरून भविष्यात डॉक्टर इंजिनियर कलेक्टर वैमानिक शास्त्रज्ञ आणि पदापर्यंत मोठ्या संख्येने महिला झेप घेतील  पुढे बोलताना ते म्हणाले की जिल्हा परिषद प्रशाला ही अतिशय उत्कृष्ट शाळा असून येथील व्यवस्थापन ही अतिशय चांगले असल्यामुळे, या ठिकाणाहून गेलेली अनेक मुले मुली उच्च पदावर पोहोचलेली आहे, या शाळेच्या विकासामध्ये आपलेही योगदान असून शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होऊन इथल्या समस्या सोडवण्याचे काम करीत

चोरट्यांचा पाठलाग करून पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले,परतूर पोलिस आणि चोरट्यांचा मसाला शिवारात अंधार्‍या रात्री थरार

Image
परतूर – प्रतिनिधी कैलाश चव्हाण  पोलिस चोरांचा पाठलाग करून चोरट्यांना पकडत असल्याचे सिनेमात अनेकदा पाहिले आहे. मात्र परतूर पोलिसांनी सिनेमातील हकीकत सत्य घटनेत उतरवून दाखवीले  याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील काही दिवसापासून टाटा सोलर प्लांट येथे चोरीच्या घटना घडत आहे दिनांक 23 फेब्रुवारी रोजी शंकर गोपीनाथ जईद (सेक्युरीटी गार्ड सोलर प्लॉन्ट मसला) यांनी फिर्याद दिली की नेहमी प्रमाणे रात्र पााळीवर असतांना दिनांक 22 फेब्रुवारी रात्री साडे बारा ते एक वाजेच्या सुमारास दोन अनोळखी इसम हे सोलार प्लांटमध्ये केबल चोरीचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले  बॅटरीच्या  उजेडात केबल कापताना दिसून आले. त्यांनी जोरात ओरडुन आवाज दिला असता तोडलेले केबल जागेवरच टाकुन चोरट्यांनी पळ काढला. त्या अनुषंगाने परतुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शामसुंदर  कैठाळे   यांनी पथक स्थापन केले व चोरांच्या मुस्क्या आवळण्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या दिनांक 23 फेब्रुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पोकॉ गजानन राठोड यांना गुप्त माहितीगारा कडून माहिती मिळाली की मसाला शिवारातील प्लांट मध्ये तीन चार इसम प्लांट मध्

परतूर येथे एचआयव्हि/एडस् विषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण     महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक (डापकु) मार्फत जिल्हास्तरावर कलापथकांचे एचआयव्ही / एड्स विषयी माहिती व व्यापक जनजागृतीकरिता शहरी/ग्रामिण भागात पोहचण्याच्या अनुषंगाने परतूर येथे जनजागृति कार्यक्रम संपन्न झाला.            हा जनजागृति कार्यक्रम जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जालना व एकात्मिक सल्ला व चाचणी केन्द्रग्रामीण रूग्णालय परतूर ,आयएसआरडी अंतर्गत लिंक वर्कर स्कीम जालना, सेतू चॅरिटेबल ट्रस्ट जालना यांच्या सहकार्याने पार पडला. यावेळी ईश्वर सेवा लोक कला ग्रूप द्वारे गाण्यांच्या माध्यमातून एचआयव्ही होण्याची कारणे, उपचार व एचआयव्ही लागण होऊ नये म्हणून करण्यात येणारे प्रतिबंधक उपाय याविषयी सविस्तर माहिती दिली.यावेळी असंख्य नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयसीटीसी समुपदेशक शिवहरी डोळे, लिंक वर्कर स्कीम चे नरेश कांबळे तसेच सेतू चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रियंका कांबळे व ईश्वर सेवा लोक कला ग्रूप मधील कलाकार शाहीर बाबू सेवा राठोड,सुनील मुरलीधर केलकर,अंकुश स

परतूर शहराच्या विकासासाठी भाजपाला येत्या पालिका निवडणुकीत संधी द्या-मा.मंत्री आ. बबनराव लोणीकर यांचे परतूर शहरातील नागरिकांना आवाहन,पालिकेची सत्ता हाती दिल्यास 500 कोटीचा निधी आणून अधिक वेगाने विकास कामे करू

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण येत्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष करा संपूर्ण सत्ता भारतीय जनता पार्टीच्या हाती द्या परतूरच्या विकासासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी आणतो असे आश्वासन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी परतुर शहरातील नागरिकांना दिले ते परतुर शहरातील ताराराणी मळा व माने मळा येथे संपन्न झालेल्या 40 लक्ष रुपयांच्या रस्ते बांधकामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते  पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की गेल्यावेळी थोडक्यात विजयाने हुलकावणी दिली मात्र यावेळी जनता आपण केलेल्या 350 कोटी रुपयांच्या विकास कामाला कौल देईल असा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला राज्यात मतदार संघात काँग्रेस भुई सपाट झालेली आहे तिला परतूर शहरात भुई सपाट करा अशी यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले     आपण प्रत्येक निवडणुकी विकासाच्या मुद्द्यावर लढवलेली असून राजकारणाच्या सुरुवातीपासून समाजसेवेचा वसाहती घेऊन काम करत आलो असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले सामाजिक बांधिलकी जपत 1100 मुलींचे कन्यादान सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्य

शेतकऱ्यांच्या कापसाला 12000 प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा व विज बिल माफ करण्यात यावे, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परतुर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

Image
 परतुर  प्रतिनिधी कैलाश चव्हाण  वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र भर कापसाला 12000 प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा याकरता महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल  महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचे  कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. शासनाचा हमीभाव ६ हजार असल्यामुळे खाजगी व्यापारी सुध्दा ७ ते ८ हजारामध्ये कापूस खरेदी करत आहेत. हा भाव शेतकऱ्यांना परवडत नाही. यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुध्दा निघत नाही. अजुन शेतकऱ्यांचा ७०-८० टक्के कापुस घरामध्ये पडून आहे. हा कापुस शेतकऱ्यांना विकणे खुप गरजेचे असुन त्यांच्या मुलां-मुलींचे लग्न शिक्षण व दैनंदीन गरजा भागवण्यासाठी कापुस विकणे गरजेचे आहे. योग्य हमीभाव न मिळाल्यामुळे व इतर शेतीशी संबंधीत प्रश्न निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कापसाला हमीभाव १२ हजार रूपये करावा व शासनाने स्वतः कापूस खरेदी करावा. महाराष्ट्र शासनाने घरगुती वीज बीलाच्या युनिट मध्ये वाढ न करता इतर आकारामध्ये भरमसाठ वाढ केलेली असुन त्यामुळे ती दिसुन येत नाही. केलेल

होणाऱ्या पत्नीचा खून करणारा अखेर जेरबंद, परतूर- सेवली पोलिसांची कामगिरी,मोबाईल लोकेशनवरून शोधले

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा     लग्न अवघे एका महिन्यावर आलेले असतानाच एका तरुणाने होणाऱ्या पत्नीचा अत्याचार करून गळा चिरून खून केल्याची घटना मंठा तालुक्यातील बेलोरा गावात १८ फेब्रुवारी दुपारी घडली होती. दीप्ती ऊर्फ सपना संदीप जाधव (१७) असे मृत तरुणीचे नाव आहे.  परतूर पोलिसांनी आरोपीला सुशील सुभाष पवार याना परतूर पोलिसांनी ताब्यात घेत अटक केले यावेळी उपविभागीय अधिकारी राजू मोरे,पोलीस कर्मचारी दिसत आहे  या प्रकरणातील संशयित सुशील सुभाष पवार (रा. वरुड, ता. मेहकर) हा फरार झाला होता. मोबाईल लोकेशनद्वारे शोध घेऊन त्याला मुंबई येथील वसई उपनगर भागातील माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले आहे. बेलोरा गावातील दीप्ती ऊर्फ सपना संदीप जाधव (वय १७) हिचा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरुड येथील सुशील पवार या तरुणासोबत विवाह जुळला होता. येत्या १७ मार्च रोजी विवाह असल्याने १८ फेब्रुवारी वधू आणि वर या पक्षांकडील मंडळी दुसरबीड येथे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गेले होते. हीच संधी  साधून सुशील पवार याने थेट बेलोरा हे गाव गाठले. कुटुंबीय बस्त्यासाठी गेल्याने घरी भावी नवरी दीप्

पत्रकार धुमाळ यांना पितृशोक

Image
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण    दि.२२ - तालुक्यातील शेवगा येथील जेष्ठ नागरिक तुळशीदास किसनराव धुमाळ यांचे मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, एक मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर परतूर शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.     पत्रकार आशिष धुमाळ त्यांचे चिरंजीव होत.

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते बाबुल्तारा ते जालना ते मंठा हायवे रस्त्यापर्यंतच्या 01 कोटी 26 किमतीच्या डांबरीकरणाच्या कामाचे करण्यात आले उद्घाटन,राज्यातील सरकारमध्ये बदल होताच परतूर मतदार संघामध्ये विकास कामांसाठी 500 कोटी रुपयांचा निधी आणला

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  राज्यातील सरकारमध्ये बदल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर परतुर विधानसभा मतदारसंघासाठी विविध माध्यमातून 500 कोटी रुपये निधी आणला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले     ते बाबुलतारा ता परतूर येथे संपन्न झालेल्या एक कोटी 26 लाख रुपये किमतीच्या बाबुल्तारा ते जालना मंठा हायवे रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की, मतदार संघातील विकास कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही, निधी खेचून आणण्यासाठी आपण नाबार्ड मुख्यमंत्री ग्रामसडक योजना बजेट जिल्हा नियोजन मंडळ आदी माध्यमातून मतदार संघासाठी निधी खेचून आणला असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले,   परतूर विधानसभा मतदारसंघातील 176 गावच्या वाटर बीडचे पाणी येत्या महिनाभरामध्ये सर्वच गावांमध्ये पोहोचणार असून या माध्यमातून गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले उन्हाळ्याचे चाहूल लागली असून पाणवते असताना दिसत आहेत अशा परिस्थितीमध्ये निश्

176 गावच्या वॉटर ग्रीड मधील मधील, सर्व गावांना एका महिन्याच्या आत पाणी सुरू करा कुठलीही सबब ऐकून घेणार नाही- माजी मंत्री आमदार बबनराव लोणकर,ग्राम पातळीवर आयुष्यमान भारत योजनेतील गोल्डन कार्ड साठी कॅम्प आयोजित करा,परतुर नगरपालिकेचे अधिकारी आमदार लोणीकरांच्या प्रश्नावर चिडीचूप

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  176 गावच्या वॉटर ग्रीड मधील पाणी मार्च महिन्यापर्यंत सर्व गावापर्यंत पोहोचवा कुठेही अडचण आली ती सोडवण्यासाठी आपण समर्थ असून स्वतःला झोकुन देऊन काम करा व काम पूर्ण करा असा सज्जन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी वॉटर ग्रीड अधिकाऱ्यांना भरला  176 गावची वॉटर बीड मधील योजनेचे पाणी सर्व गावापर्यंत पोहोचवताना 120 गावाच्या विस्तारित योजनेतील कामे परीने पूर्ण करा खऱ्या अर्थाने पाण्याची टंचाई असणारा तालुका म्हणून मंठा तालुका कडे पाहिले जाते त्यामुळे या तालुक्यातील कामे अगोदर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी दिल्या नेर शेवली भागातील 58 गावातील कोळवाडी येथील मुख्य जल कुंभातून पाणी सोडण्यासाठी तयारी करून या ठिकाणचे पाणी 58 गावांना सोडण्याचे नियोजन करा असे यावेळी बोलताना लोणीकरांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले    पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की निम्न दुधना प्रकल्पांतर्गत शेती पोहोच रस्त्याचे गेल्या दोन-तीन वर्षापासून केवळ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पडून असून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय करा काम करा

जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या मुद्द्यावरून आमदार लोणीकर यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर,जालना शहरातील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर मुख्याधिकाऱ्यांना केले निरुत्तर

Image
प्रतिनिधी समाधान खरात  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी गेल्या दोन वर्षात कृषी संजीवनी योजना मृत झाली होती तिला नवसंजीवनी देण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करणे गरजेचे असल्याचे म्हणत जिल्हा कृषी अधीक्षकांना चांगलीच धारेवर धरत शेतकऱ्यांच्या हिता च्या असलेल्या योजनेला, गती देण्याचे काम करा असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले पुढे ते म्हणाले की गेली अडीच वर्षे ही योजना गतप्राण झाली होती अधिकाऱ्यांनीही मध्यंतरीच्या काळात हाराकिरी केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना वारंवार चकरा मारूनही त्यांच्या कामाच्या संदर्भातली पूर्वसंमती त्यांना दिली जात नाही, हा अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड दम यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की आपण मंत्री असताना मंठा येथील श्री रेणुका देवी मंदिरासाठी पर्यटन विकास निधी अंतर्गत 15 कोटी निधी आणला होता या निधीच्या माध्यमातून हजार असं क्षमता असलेले भव्य भक्तनिवास, जलकुंभ शौचालय परिसर विकास त्यासोबत स्वयंपाक ग्रह

धागडधिंगा करण्यापेक्षा विचारांची शिवजयंती साजरी होणे आवश्यक - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर वीर शिवा काशिदांचे १३ वे वंशज श्री आनंदराव काशीद यांना शिवछत्रपती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान,सर्व महापुरुषांनी शिवरायांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवली आनंदराव काशीद यांचे प्रतिपादन,मंठा येथे मोरे पाटील परिवार व शिवसृष्टी आयोजित शिवजन्मोत्सव उत्सव कार्यक्रमानिमित्त रक्तदान शिबिर, पुरस्कार वितरण, स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न

Image
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ छत्रपती शिवाजी महाराज अखंड विश्वाची प्रेरणा असून धांगडधिंगा करण्यापेक्षा विचारांची शिवजयंती साजरी होणे आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच मंदिरावरचे कळस आणि अंगणातील तुळस आज आपल्याला पाहायला मिळते आहे मोरे पाटील परिवाराच्या वतीने मागील सोळा वर्षापासून शिवजन्मोत्सव कौटुंबिक स्वरूपात साजरा करण्यात चा पायंडा अत्यंत स्तुत्य असून हा पायंडा अखंडपणे जपावा शिवरायांच्या प्रेरणेने सर्व कार्य सिद्धीस जातात तेव्हा प्रत्येकाने शिवाजी महाराज डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केले मंठा येथे मोरे पाटील परिवार व शिवसृष्टी आयोजित शिवजन्मोत्सव 2023 निमित्त आयोजित पुरस्कार वितरण समारंभ रक्तदान शिबिर व स्नेही भोजन कार्यक्रम प्रसंगी श्री लोणीकर बोलत होते यावेळी मंचावर वीर शिवा काशीद यांचे तेरावे वंशज श्री आनंदराव काशीद श्री अंकुशराव बोराडे श्री गणेशराव खवणे श्री संदीप गोरे श्री राजेश मोरे पंजाबराव बोराडे कैलासराव बोराडे श्री नागेश घारे विठ्ठलराव काळे राजेभाऊ खराबे प्रसादराव ग

परतूर येथे शिवजयंती उत्साहात , पूजन करून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते उद्घाटन करून मिरवणुकीस करण्यात आला प्रारंभ,आमदार लोणीकर यांनी मिरवणुकीत ढोल वाजवून केले शिवरायांना अभिवादन कार्यकर्त्यां मध्ये संचारला उत्साह,ढोल ताशे, आकर्षक देखावे, विविध क्रीडा प्रात्यक्षिके सादर मिरवणुकीतआली रंगत

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा आज परतुर येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य दिव्य अशी शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली रेल्वे गेट परिसरात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या वेळी माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया माधवराव कदम, रामेश्वर अण्णा नळगे, कपिल अकात , नीतिन जेथलीया, विनायक काळे वीजय राखे रमेश सोळंके,महेश नळगे प्राध्यापक पांडुरंग नवल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शिवप्रतिनिधी पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली    मिरवणूकीची सांगता नारायण दादा चौक येथे महेश अकात ,उत्सव समती ,पत्रकार पोलीस बांधव यांच्या उपस्थीत करण्यात आली मिरवणुकी दरम्यान आकर्षक ढोल पथक , कराटे चे विविध प्रात्यक्षिके लेझीम पथक आदी गोष्टी नागरिकांची लक्ष वेधून घेत होत्या शहरामध्ये सर्वत्र वातावरण दिसत होते  या उत्सव मिरवणुकीमध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी ढोल वाजवून शिवभक्तांना प्रोत्साहित केले  अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय जय

का-हाळा येथे महाशिवरात्रीचे औचित्य साधून पर्यटन विकास निधीअंतर्गत करळेश्वर मंदिर येथे १ कोटी ७५ लक्ष रुपये किमतीच्या भक्त निवास तीन सभागृह सार्व जनिक स्वछता ग्रह तार कुंपण व विकास कामांचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते लोकार्पण,वॉटर ग्रिड योजने करीता कऱ्हाळा येथे नवीन जळकुंभाचे आमदार लोणीकर यांच्या हस्ते भूमिपूजन

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  खंडेश्वर करळेश्वराच्या आशीर्वादाने गेली 35 वर्ष राजकीय पटलावर काम करताना मला सदैव यश मिळत गेले प्रतिपादन राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले   पुढे बोलताना ते म्हणाले की माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात खंडेश्वर मंदिराचे आष्टी येथील सिद्धेश्वर मंदिराचे अन्यन साधारण महत्व असून, माझ्या प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ खंडेश्वर सिद्धेश्वराच्या मंदिरातच वाढवण्यात आला त्यामुळे संपूर्ण राजकीय प्रवासा आष्टी व परिसर या ठिकाणाहून सुरू झाल्याने आपण मंत्री पदावर असताना पर्यटन विकासाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून आष्टी येथील खंडेश्वर मंदिर असेल मंदिर असेल गणपती मंदिर असेल बाप्पा या मंदिरा असेल आष्टी येथील कारळ्याचे करळेश्वर मंदिर असेल, नागरतास असेल या सर्व भागांमध्ये पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणत विकास कामे केली असे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले यावेळी बोलताना लोणीकर पुढे म्हणाले की महाशिवरात्र श्रावण महिन्यामध्ये करळे

सर्वांगीण विकासाच्या बाबतीत माझा परतुर विधानसभा मतदार संघ राज्यात एक नंबर ला माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन ,भारतीय जनता पक्ष घनसावंगी विधानसभा पूर्ण ताकतीने लढणार - आमदार लोणीकर

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  उच्चस्तरीय तज्ञांची टीम तयार करून इजराइल सारख्या प्रगत राष्ट्राचे अभ्यास दौरे करून मराठवाडा वॉटर ग्रीड योजना परतूर मतदार संघात यशस्वीपणे राबवली असून मतदार संघात पिण्याचे शुद्ध पाणी घराघरात पोहोचवले आहे. त्यामुळे परतूर मतदारसंघातील खेड्यापाड्यात गाव गाड्यात फक्त बारा रुपयात 1000 लिटर पिण्याचे शुद्ध पाणी गोरगरीब सर्वसामान्य जनतेला मिळत असून लवकरच ही योजना मराठवाड्यातील सर्व तालुक्यात यशस्वीपणे राबविण्याचा आपला मानस असून त्या करिता आपण प्रयत्न करणार आहोत. असे प्रतिपादन लोकप्रिय लोकनेते मराठवाडा वाटर ग्रीड योजनेचे जनक माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी घनसावंगी मतदार संघातील रांजणी येथे परतुर ते रांजणी रस्त्याच्या मजबुतीकरण खडीकरण व डांबरीकरण कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.     यावेळी बोलताना आमदार लोणीकर पुढे म्हणाले की राज्यातील नागरिकांना रस्त्यावर शौचालयास जावे लागत होते राज्यातील महिलांच्या मुलींच्या सन्मानाचा प्रश्न होता, महिलांच्या मुलींच्या मनात संकुचित भावना निर्माण होत होती स्वच्छता खात्याचा कारभार आपल्याकड

अखेर त्या वानरास पकडण्यात वन विभागाला यश

Image
  परतुर प्रतिनिधी संतोष शर्मा    परतुर शहरातील मोंढा भागात गेल्या सात-आठ दिवसापासून एका पिसाळलेल्या वानराने धुमाकूळ घालून साठे नगर या भागातील चार नागरिकांना कडाडून चावा घेतला होता त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावी लागले होते या संदर्भात परतुर शहरातील साठे नगर भागातील नगरसेवक बाबुरावजी हिवाळे यांनी वन विभागाला एका निवेदनाद्वारे मागणी केली होती की पिसाळलेल्या वानरास त्वरित पकडावे नसता तो पिसाळलेला वानर अजूनही नागरिकांना चावा घेऊ शकतो यामध्ये चावा घेतलेले नागरिक दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही         दिनांक 16/02/2023 रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्याच्या कुशल बुद्धी ने अनेकांना चावा घेणारा पिसाळलेला लंगुर प्रजा तिचा माकडस वनविभागाच्या सर्व टीम ने साठे नगर येथे दाखल होऊन त्या पिसाळलेल्या माकडाला जेर बंद केले या माकडाने परतुर मध्ये दहशितेचे वात वरण निर्माण केले होते आता परतूर करांनी दिलासा मिळाला असुन सर्व वन विभाग अधिकाऱ्याचे शहरातील नागरिकांनी मनापासून आभार मनले आहे 

ला.ब. शास्त्री वरिष्ठ महाविद्यालयात कळ्या फीती लावून महाराष्ट्र शासनाचा निषेध

Image
 परतुर प्रतिनिधी कैलास चव्हाण   शासनाने जुनी पेन्शन योजना सुरू करावी व सातव्या वेतन आयोगाचे पैसे त्वरित खात्यात जमा करावे या मागणी करिता आज लालबहादूर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालय परतूर येथे सर्व कर्मचाऱ्यांनी काळे किती लावून निषेध केला व निदर्शने केली  या प्रसंगी काळ्या फिती लावून निषेध करतांना लाल बहादुर शास्त्री महाविल्यातील सर्व कर्मचारी निर्देशने करताना पाराजी धुमाळ शिवाजी लाटे हानुमान दांगट डॉ केशव बरकुले राजेश काबळे ज्ञानेश्वर चव्हाण भगवान मस्के डॉ कदम संतोष प्रा अमोल काळे डॉ श्रीमंत सुरवसे काळे प्रा खालनापुरे गणेश बानसोड गणेश मोरे भाऊसाहेब पाटिल राम सरकटे गजु खालपुरे आदिसह कर्मचारी प्राध्यापक सहभागी झाले होते

500 लक्ष रुपयांच्या 46 सभागृह बांधकामाची शासनाने उठवली स्थगिती,आमदार लोणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Image
जालना प्रतिनिधी समधान खरात लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा अंतर्गत मतदार संघातील 46 सभागृह बांधकाम कामास स्थगिती देण्यात आली होती. या कामावरील स्थगिती उठावी व मतदार संघात सभागृह निर्माण व्हावीत या उद्देशाने मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचे जनक लोकप्रिय लोकनेते माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांना भेटून स्थगिती उठवण्याची विनंती केली होती.  शासन निर्णय लेखाशीर्ष 25 15 - 12 38 शासन निर्णय क्रमांक विकास 2022 /प्र. क्र.227 योजना शासन निर्णयान्वये महाराष्ट्र शासनाचे उपसचिव का गो वळवी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार काढण्यात आलेल्या अध्यादेशानुसार परतुर तालुक्यातील आष्टी आसनगाव कोकाटे हादगाव आनंदगाव बानाची वाडी रायगव्हाण लोणी रंगोपंत कनकवाडी सुरमगाव कोरेगाव चिंचोली आंबा ढोकमळ वाटूर बाबुल्तारा कावजवळा तर मंठा तालुक्यातील तळणी पांगरी अर्धा तोलाजी गुळखंड आखणी रानमळा नानसी उमरखेडा पांगरा खोरवड कानडी तळणी केंदळे पोखरी किल्ला तळणी शिवनगिरी बेलोरा देवगाव

पुतळा परिसरात विटंबना प्रकरणी त्या आरोपची सखोल चौकशी करणे बाबत राष्ट्रीय लहूशक्ती संघटने चे निवेदन

Image
   जालना प्रतिनिधी समाधान खरात      खरपुडी तालुका जिल्हा जालना येथे काही दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरामध्ये आरोपी शंकर जाधव यांनी येथे विटंबना केली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी सदर आरोपीस अटक केली आहे परंतु सदर आरोपीने ही विटंबना एकट्यानेच केली किंवा आणखीन कोणी होते किंवा त्याला या विटंबना करण्यासाठी कोणी पाठबळ दिले का याची सखोल चौकशी करून संबंधितात वर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय लहुजी लहूशक्ती संघटनाने एका निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक यांना केलेली आहे    निवेदनात पुढे सांगितले आहे की संबंधित कारवाहिनी लवकरात लवकर झाली नाही तर राष्ट्रीय लहुशक्ती संघटना तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा केला आहे    या निवेदनावर शहराध्यक्ष योगेश भोसले शाखा अध्यक्ष रितिक भोसले साहिल भोसले आशिष भोसले आतिश भोसले आशिष मनोज भोसले किरण घोरपडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

वानराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी नगरसेवक बाबुरावजी हिवाळे यांची वन विभाग अधिकाऱ्याकडे मागणी

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  चार दिवसापासून परतूर येथील साठे नगर भागात पिसाळलेलं वानर हे साठे नगर परिसरात साठे नगर येथील सर्व रहिवाशांना परेशान करत आहे      साठे नगर येथील चार बालकांना त्या वानरांनी चावा घेतलेला आहे मंथन विजय वाणी रुद्र अशोक हिवाळे संजना अनिल साठे कल्पेश राहुल आरसाड असे चावा घेणाऱ्या मुलांचे नावे आहेत ही बाब कळतात नगरसेवक बाबुरावजी हिवाळे यांनी वन विभाग च्या अधिकाऱ्याला याबाबतची माहिती देतात वन विभाग यांना एका निवेदनामध्ये त्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची विनंती अर्ज केला आहे तसेच या फिसळलेल्या वानराला लवकरात लवकर पकडून देऊ तसेच जखमी झालेल्या कुटुंबाला मदतीचा आश्वासनही असा शब्दही वन विभागाच्या अधिकाऱ्याने नगरसेवक बाबुरावजी हिवाळे यांना दिला आहे यावेळेस निवेदन देताना नगरसेवक बाबुराव हिवाळे भीमशक्तीचे तालुका अध्यक्ष विष्णूजी कसारे अशोक हिवाळे लक्ष्मण साठे अशोक हिवाळे सनी गायकवाड इत्यादी लोकांच्या या निवेदनावर सह्या आहेत

रस्ते बांधणीच्या माध्यमातून जनसामान्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन,लोणीकरांच्या हस्ते जालना तालुक्यात १३ कोटी ५० लाख रुपयांच्या डांबरीकरण रस्त्याचे उद्घाटन

Image
  प्रतिनिधी कैलाश चव्हाण   परतुर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाडी, वस्ती, तांड्याला डांबरीकरणाच्या पक्क्या रस्त्याने जोडून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली असून डांबरीकरणाच्या पक्क्या रस्त्याच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण केला आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. जालना तालुक्यातील चितळी पुतळी, नेर व सेवली येथील १३ कोटी ५० लक्ष रुपयाच्या डांबरीकरण रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. चितळी पुतळी फाटा ते शेवगा गावापर्यंत नळकांडी पुलासह डांबरीकरण रस्ता ३.७०० किमी (४५० लक्ष रुपये), नेर गाव ते ढगी गावापर्यंत नळकांडी पुलासह डांबरीकरण रस्ता ८.७०० किमी (६०० लक्ष रुपये), सेवली गाव ते भागडे सावरगाव नळकांडी पुलासह डांबरीकरण रस्ता (२०० लक्ष रु), सावरगाव भागडे चौफुली ते सेवली गाव नळकांडी पुलासह रस्ता डांबरीकरण (१०० लक्ष रु) कामाचे उद्घाटन आज श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक गावाच्या विकासासाठी रस्ता अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून डांबरीकरण्याच्या रस्त्यामुळे विधानसभा मतदा

भागुबाई लिंबाजी सवने यांचे निधन

Image
परतूर  प्रतिनिधी कैलाश चव्हाण  परतूर तालुक्यातील दैठना खुर्द येथील जेष्ठ नागरिक श्रीमती भागुबाई लिंबाजी सवने वय ८५ वर्ष यांचे दि १५ फेब्रुवारी २०२३ रोजी पहाटे साडेतीन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.     त्यांच्यावर सकाळी दहा वाजता दैठणा खुर्द येथील शेतात अंतसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. बागेश्वरी साखर कारखान्याचे माजी एम.डी बंडेराव सवने, सुरेश सवने यांच्या त्या आई होत्या. यावेळी अंत्यसंस्काराला माजी आ सुरेशकुमार जेथलिया, बळीराम कडपे, बालासाहेब आकात, रमेश सोळंके, राजेश काकडे, बाबुराव हिवाळे, छत्रुघ्न कणसे, यांच्यासह नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील तरुणांमध्ये कलांगुण सादर करण्याची जिद्द - गौतम सदावर्ते

Image
तळणी प्रतिनीधी रवी पाटील  जिल्हा परिषद प्राथमीक शाळा तळणी येथे दि.13-02-2023 रोजी वार्षिक स्नेह सन्मेलन (सांस्कृतिक) कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये शालेय बालचिमुकल्यांनी उस्फुर्त असा सहभाग घेत गावक-यांची मने जिंकली...    या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी श्री.जे.डी.इंगळे सर सेवानिवृत शिक्षक तसेच आदर्श शिक्षक प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.श्री.जे.डी.इंगळे सरांनी जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा तळणी या शाळेतुन सेवानिवृत होत असतांना आपली आठवण म्हणून दोन संगणक संच शाळेला भेट म्हणून दिले.  या  कार्यक्रमाचे उदघाटक ग्रामपंचायत तळणीचे सरपंच गौतम सदावर्ते,.विश्वनाथ  चंदेल उपसरपंच सर्व सदस्य, व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत         या प्रसंगी सरपंच गौतम सदावर्ते यानी विद्यार्थाना मार्गर्शन केले कलेचे सादरीकरण करते विध्यार्थी स्वःतचे सर्वस्व पणाला लावतात त्याच प्रमाने विद्यार्थानी अभ्यासात सुध्दा कष्टाने लक्ष दिले पाहीजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये आजही कलागून सादर करण्याची मोठी जिद्द आहे गरज आहे ती व्यासपीठाची मिळेल त्

सांगता समारोप प्रसंगी मा.आ.जेथलिया यांना अश्रु अनावर, रामकथेची भक्तीमय वातावरणात सांगता,रामकथा ही परिवर्तनाची कथा ह. भ. प. रामराव महाराज ढोक

Image
. परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण     रामकथा ही परिवर्तनाची कथा आहे. जो पर्यंत मानवाच्या जीवनात परिर्वतन होत नाही तो पर्यंत माणसाची प्रगती होत नाही जीवनात वावरतांना सर्वांचे हिताचे रक्षण करा असे प्रतिपादन ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांनी केले. मा. आ. सुरेशकुमार जेथलिया व जेथलिया परिवाराच्या वतीने परतूर येथे अयोध्या नगरीत सुरू असलेल्या रामकथेच्या सांगता समारंभी मंगळवारी दि.१४ रोजी ह. भ. प. रामराव महाराज ढोक भाविकांना मार्गदशन करत होते.      कथा सांगता प्रसंगी बोलतांना ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांनी रावण वध व रामराज्यअभिषेक या कथे चे वर्णन केले रावण वध हे द्रुष्टाच्या संहाराचे प्रतीक आहे, वाईटावर चांगल्याचा विजय होण्यासाठी द्रूष्ट प्रवृत्तीचा नाश करावा लागतो. रामाला रावणाशी युद्ध करावे लागले आणि द्रूष्ट प्रवृत्तीचा नाश झाला असे ढोक महाराज म्हणाले.रावण हा अत्यंत वाईट माणूस होता कारण रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते, मात्र रावण एक शक्तिशाली योद्धा असण्यासोबतच, खूप ज्ञानी आणि विद्वानही होता.मृत्युसमयी रावणाने लक्ष्मणाला तीन महत्त्वाच्या गोष

संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो; म्हणून चांगल्या विचारांच्या माणसाची संगत धरावी- ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाघाळेकर

Image
तळणी प्रतिनीधी रवी पाटील मंठा तालूक्यातील तळणी येथे संत श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमीत्य गेल्या सात दिवसापासून चालू असलेल्या अंखड हरिनाम सप्ताहची सांगता ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाघाळेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली ज्ञानेश्वर महाराज याच्या नेतृत्वाखाली गेले सात दिवस भागवत कथा हरी किर्तन काकडा आरती आदी धार्मीक कार्यक्रमाची रेलचेल श्री संत गजानन महाराज संस्था येथे दिसून आली  या काल्याच्या प्रसगी कंठी धरला कृष्ण मणी अवघा जणी प्रकाशला काला वाटू ऐकमेका वैष्णव निका सभ्रम या जगदगूरू तूकाराम महाराज याच्या अंभगावर निरुपण केले  प्रत्यक्ष विषयापेक्षा विषयी माणसाची संगत फार वाईट असते, हे ज्याप्रमाणे संसारात, तसेच परमार्थतही लागू आहे. संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो; म्हणून चांगल्या विचारांच्या माणसाची संगत धरावी. चांगलेवाईट हे नेहमी आपल्यावरूनच ओळखावे. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते. जगात संत असतील असे पुष्कळांना वाटतच नाही. संताला ओळखायला आपल्या अंगी थोडेतरी भगवंताचे प्रेम असायला पाहिजे. आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडल

समर्थ विद्यालयात बाल चेतणा शिबीर.

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  पाटोदा [ माव ] आर्ट आॕफ लिव्हींग परीवार व श्री समर्थ माध्यमिक विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी बाल चेतणा शिबीराचे आयोजण करण्यात आले आहे. निर्व्यसणी - चारित्र्य संपन्न तसेच मानसिक व शारिरीक दृष्टीने सक्षम युवक हीच खरी कुटूंबाची व राष्ट्राची संपत्ती असते. असे युवक तयार होण्याची सुरुवात बाल चेतणा शिबीरात होते म्हणुनच श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात या शिबीराचे आयोजण करण्यात आल्याचे मुख्याध्यापक श्री सुरेश पाटोदकर यांनी सांगितले . हे शिबीर चार दिवस चालणार असुण शिबीरास मुख्य शिक्षक म्हणुन श्री डिगांबर बोराडे , रामेश्वर जगदाळे , हरी बरकुले हे मार्गदर्शन करणार आहेत.  विद्यालयाचे शिक्षक पाराजी रोकडे - ऊध्दव खवल - गणेश वखरे आणि कर्मचारी सहभागी झालेले आहेत. आमदार श्री बबनरावजी लोणीकर यांनी या ऊपक्रमाचे कौतुक करुण शुभेच्छा दिल्या आहेत. मोठ्या संख्येने विद्यार्थी शिबीरात सहभागी झालेले आहेत.

परतूर येथील रेल्वे लाईनच्या उडान पुलाच्या कामाचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाले लोकार्पण,येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत सत्ता द्या शहरातील संपूर्ण विकास कामे करून दाखवू

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण आपण विकास कामांमध्ये कधीही राजकारण आणले नाही त्यामुळे मतदारसंघाचा समतोल विकास करू शकलो असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली ते परतुर येथे रेल्वे लाईन उडानपुलाच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की परतूर शहराच्या विकासासाठी आपण 350 कोटी रुपयांचा निधी आपण दिला त्या माध्यमातून परतुर शहरातील नाट्यगृह अंतर्गत रस्ते उडान पूल भूमिगत गटार शहरातील पाणीपुरवठा योजना, गणपती मार्ग स्वर्गीय मुलींचे वस्तीग्रह, यासह शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले पुढे बोलताना ते म्हणाले की जालना जिल्ह्यामध्ये खाली चिरडून 14 वारकऱ्यांचा विदारक अंत झाला होता या गोष्टीचा शल्य मनाला पोहोचणारा होता हा देण्यासाठी खऱ्या अर्थाने काळा डाग होता मी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणाशी जाऊन वारकऱ्यांसाठी सुसज्ज मार्ग तयार करील असे साकडे घातले होते पांडुरंग आणि संत गजानन महाराजांच्या कृपेने माझ्या मंत्रीपदाच्या काळामध्ये केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी तात्कालीन मुख्यमंत्री

रेल्वे उड्डान पूलाला चक्रवती सम्राट अशोक नाव देण्याकरिता निवेदन

Image
*    परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण     परतूर शहरातील महत्वाकांक्षी असलेला रेल्वे पूलाचे आज माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला     या रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी परतुर येथील सम्राट अशोक मित्र मंडळ यांच्या वतीने आमदार बबनराव लोणीकर यांना एक निवेदन देण्यात आले की चक्रवती सम्राट अशोक यांनी काळात मध्ययुगीन काळात भारतात एक संघ ठेवून अखंड भारताचे नेतृत्व केलेले आहे अशा महान चक्रवती सम्राट अशोकाचे नाव रेल्वे उड्डाण पुलाला देण्यात यावे अशी मागणी या निवेदनात केलेली आहे    या दि निवेदनावर सम्राट अशोक मित्र मंडळ यांचे अध्यक्ष संतोष हिवाळे सचिव प्रमोद राठोड यांच्यासह विष्णू काळे नाना डोने विजय यादव सतीश हिवाळे सतीश प्रधान आनंद प्रधान रवी हिवाळे प्रवीण प्रधान नरेंद्र कांबळे कृष्णा प्रधान विष्णू सांगळे कृष्णा ठाकर के संदीप दवंडे प्रवीण बंड राहुल हिवाळे विष्णू भालेकर बळीराम काळदाते रघु काकडे भगवान पितळे विकी हिवाळे केशव काकडे बाळू शेळके अनिल खंदारे योगेश वाघमारे मारुती तोत्रे बापूराव तायडे राजू खंदारे अनिल पाईकराव मुरली सोनखेडकर सु

युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर यांनी घेतले शिर्डी च्या साईबाबा चे दर्शन,राज्यातील युवकांचे प्रश्न बळ मिळू दे साईं बाबा चरणी केली प्रार्थना

Image
 प्रतिनिधि समाधान खरात   युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर राज्यभर दौरे करीत असून राज्यतील युवकाना युवा मोर्चा च्या प्रवाहात सक्रिय करीत असून त्यांनी शिर्डी येथे जाऊन साईबाबा चे दर्शन घेतले साईं बाबा चरणी नतमस्तक होत त्यांनी महाराष्ट्र राज्यतील युवकांचे प्रश्न आपल्या हातून सुटावेत या साठी बळ मिळावे या साठी प्रार्थना केली प्रदेश अध्यक्ष झाल्या पासून यु मो प्रदेश अध्यक्ष राहुल लोनिकर हे राज्यतील युवा वर्ग एकत्रित करण्याचे काम मोठ्या प्रमानावर करित असून, राज्य भर युवा मोर्चा च्या माध्यमातून संघठन मजबूत केले जात असून विविध उपक्रम राबवत युवकाना विधायक दिशा देण्याचे काम केले जात आहे  युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष म्हणून राहुल लोनीकर यांनी राज्यभर युवा ना विधयाक दिशा देण्याचा संकल्प केला आहे   राज्यभरातील युवा युवा मोर्चा च्या माध्यमातुन भाजपासी जोड़ला जात आहे युवा वारियर्स च्या माध्यमातून 18 ते 24 च्या दरम्यान च्या युवा ना मुख्य प्रवाहात काम युवा मोर्चा करित असून युवकाना योग्य दिशा देण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जात आहे