तळणीतील हिंदू संमेलनात एकतेचा जागर— “हिंदू समाज एकत्र आला तरच संकटे नाहीशी होतील” ह भ प गजानन महाराज सपकाळ यांचे प्रतिपादन
तळणी प्रतिनिधी रवी पाटील आज आपल्या भारतमातेवर विविध प्रकारचे प्रहार होत असून ती पूर्णतः सुरक्षित नाही, असे स्पष्ट प्रतिपादन विदर्भ प्रांत धर्मजागरण सांस्कृतिकचे ह.भ.प. गजानन महाराज सपकाळ यांनी केले. २०१४ नंतर हिंदुत्वाचा उदय दिसून येत असला तरी हिंदू धर्मावरील संकटे पूर्णपणे संपलेली नसून ती केवळ पुढे ढकलली गेली आहेत, असे त्यांनी नमूद केले. ही संकटे पूर्णपणे नाहीशी करण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज असून, त्यासाठी हिंदू संमेलनाच्या माध्यमातून जनजागृती करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. जगाच्या पाठीवर असलेल्या या हिंदू राष्ट्रावर अनेकांनी आघात केले, तरीही “अनेकतेत एकता” या तत्त्वामुळे भारत आजही ताठ मानेने उभा आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. सनातन वैदिक हिंदू धर्माची संस्कृती ही जगासाठी आदर्श असून, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस यांसारख्या महापुरुषांनी देशासाठी बलिदान दिले आहे. या भगव्या परंपरेची पताका अखंड तेवत ठेवण्यासाठी जातीपातीच्या भिंती गाडून “आपण हिंदू आहोत” ही भावना...