Posts

Showing posts from May, 2024

सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

आनंद इंग्लिश स्कूल चा एस.एस सी परीक्षेत शंभर टक्के निकाल

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण परतूर येथील आनंद इंग्लिश स्कूलचा पहिल्याच बॅच चा निकाल शंभर टक्के लागला असून त्याचा विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये हर्ष उल्हास निर्माण झाला आहे.   आनंद इंग्लिश स्कूल या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल  शंभर टक्के लागला आहे. निकाला मध्ये वैष्णवी रामप्रसाद माने हिला (89.20%) गुण घेऊन सर्वप्रथम  ,  द्वितीय वैष्णवी भारत थिटे (83.80%) व तृतीय क्रमांक दिनेश गुलाबराव मिसाळ (83.20%) आलेली आहे     शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य एकनाथ कदम, उपाध्यक्ष डॉ. भानुदास कदम, सचिव सुंदरराव कदम, प्राचार्य नारायण सागुते , विकास काळे, दिपाली वापटे, सचिन नंदिकोले , सचिन राठोड, शीतल खरे आदींनी सर्व उत्तर्णी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.

९०% च्या पुढे ४ तर विशेष प्राविण्यासह २३ विद्यार्थी उत्तीर्ण शास्त्री विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण    येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाची दहावी निकालाची उज्वल यशाची परंपरा यंदाही कायम असून नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात ४ विद्यार्थ्यांनी ९०% च्या पुढे गुण मिळविले आहेत तर २३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.     छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाने मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेस (इयत्ता १० वी ) या विद्यालयातून एकूण २१२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा निकाल ८८.६७ टक्के एवढा लागला असून विद्यालयाचे ४ विद्यार्थी ९०% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत तर २३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा यंदाही कायम आहे.    पृथ्वीराज कोरके, प्रीती बोबडे, जयश्री सोळुंके व रिंकल सवणे यांनी उज्वल यश मिळविले.       सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई आकात, सचिव कपिल आकात, उपाध्यक्ष कुणाल आकात, मुख्याध्यापक एल. के. बिरादार, उपमुख्याध्यापक राजकुमार ठोकरे,पर्यवे...

आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपीच्या मुसक्या आवळल्याने परतूर पोलिसांचा गौरव

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण     शहरात धाडसी घरफोडी करून  खळबळ माजवणाऱ्या आरोपींना परतूर पोलीसांनी चोवीस तासाच्या आत पकडुन मुसक्या आवळल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी परतूर पोलिसांचा प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव केला आहे. परतूर येथे काही दिवसापूर्वी राजेश काकडे आणि दिनेश होलानी या दोन ठिकाणी घरात घुसून धाडशी आंतरराष्ट्रीय चोरट्यांनी चोरी अज्ञात आरोपीने केली होती. त्यामुळे नागरिकात घबराटीचे वातावरण पसरली होते. यातील चोरांचा मागोवा घेऊन परतूर पोलिसांनी सराईत आणि खुंकार आरोपीस तात्काळ अटक केली. सदरच्या आरोपी मुंबई, ठाणे आणि बांगलादेश येथील आंतरराष्ट्रीय टोळीतील होते त्यांच्यावर मुंबई, भुसावळ, तेलंगणा, निजामाबाद, हैदराबाद, अमदाबाद, पश्चिम बंगाल हावडा, वर्धमान येथे असे एकूण 53 गुन्हे नोंद झालेले उघडकीस आणले. या उत्कृष्ट कामगिरीमुळे  पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी परतूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एम.टी सुरवसे, यांच्यासह पोउपनि विठ्ठल केंद्रे, पोना अशोक गाढवे, पोका अचुत चव्हाण, पोका दीपक आडे, पोका ज्ञानेश्वर वाघ, पोका दशरथ गोपनवाड, पोका परमेश्वर माने यांना प्रशस्...