Posts

Showing posts from June, 2022

पॅसेंजर तसेच लोकल रेल्वे गाड्यांचे ग्रामीण स्टेशनचे थांबे पूर्ववत करा.....लालबावटा

Image
परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे कोरोणाच्या नंतर नांदेड विभागातील पूर्ववत चालू असलेल्या रेल्वेगाड्या काही बंद तर काहींना एक्सप्रेस केले आहे त्यामुळे ग्रामीण स्टेशन वरील थांबे बंद झाले आहेत तसेच गाड्या एक्सप्रेस केल्यामुळे त्यांचे तिकिटाचे दर वाढले आहेत त्यामुळे सामान्य प्रवाशांना जालना औरंगाबाद कडे किंवा परभणीकडे जावयाचे असल्यास त्यांना परतुर किंवा सेलू सारख्या स्टेशन कडे खाजगी वाहनाने यावे लागते मगच प्रवास करता येतो त्यामुळे सामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे कोरोणाच्या महामारी नंतर रेल्वे विभागाने जनतेला सेवा देणे अपेक्षित होते परंतु रेल्वेने या गाड्यांचे थांबे बंद करून व तिकीट दरात वाढ करून त्यांच्यावर अन्यायच केला आहे तसेच ग्रामीण गरीब जनतेला रीझर्वेशन करता येत नसल्यामुळे त्यांना अत्यंत मानसिक त्रास होत आहे. हैदराबाद- औरंगाबाद, निजामाबाद-पुणे,मन माड-काचिगुडा या पॅसेंजर गाड्या पूर्ववत करून सातोना खुर्द, उस्मानपुर, पारडगाव, कोडी,सारवाडी, येथे थांबा देऊन ग्रामीण विद्यार्थी शेतकरी, शेतमजूर,कामगार यांना सहकार्य करावे गंभीर आजार, गरोदर महिला, लहान मुले असलेल्या मह

नदीवर तात्काळ पुल बांधा' अन्यथा पाण्यात आंदोलन

सिंदखेडराजा प्रतीनीधी समधान खरात सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव नदीवर पुल नसल्यामुळे गावकर्यांना पावसाळ्यात जीव मुठीत धरुन वाट काढावी लागते आहे. याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राधेशाम बंगाळे यांनी केला आहे.     जोराचा पाऊस आल्यावर रस्त्यासाठी नागरिकांची तारांबळ ऊडत आसुन बुलढाणा जिल्हा परीषद च्या बांधकाम विभागाने लक्ष घालणं गरजेचं आसल्याचे मनसेचे राधेश्याम बंगाळे यांनी म्हंटले आहे. लोकप्रतिनिधी तसेच बांधकाम विभागाने दुर्लक्ष करता कामा नये. तात्काळ हा पुल बांधावा नसता पाण्यात ऊतरुनच आंदोलन करु आसा ईशारा राधेश्याम बंगाळे यांनी दिला आहे. पुल मंजुर झाला आहे का? किंवा या पुलाचे पैसे अधिकारी व गुत्तेदारांनी तर ऊचलन खाल्ले नाही ना? आसा सवालहि बंगाळे यांनी केला आहे.

निखिल रामराव साबळेयांचा पीएच.डी.पदवी प्राप्त केल्या बद्दल सत्कार .

Image
परतूर प्रतीनीधी हनमंत दंवडे येथील निखिल रामराव साबळे यांनी पदार्थ विज्ञान शास्त्र या विद्या शाखेत नुकतिच शिक्षण क्षेत्रातील पीएच. डी.ही सर्वोच्च पदवी संपादन केली.         त्यांच्या या यशाबद्दल श्री पतंजली आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिकच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव बरकुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.          निखिल साबळे यांनी " अ स्टडी ऑफ क्रिस्टलाईन सॉलीड मटेरियल अॅण्ड इट्स ऍप्लीकेशन्स " या विषयात डाॅ.किशोर गोपाळराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मलवांचल युनिव्हर्सिटी इंदोर येथे संशोधन प्रबंध सादर केला होता. निखिल साबळे यांना या संशोधन कार्याबद्दल पीएच.डी.ही पदवी विद्यापीठाने बहाल केली.     निखिल साबळे   यांचे पीएच.डी.पदवी प्राप्त केल्यासर्वत्र कौतुक होत आहे.

जालना जिल्ह्यात शिक्षणाचा बाजार थांबवा... मनसे विद्यार्थी सेनेची तक्रार

Image
जालना प्रतीनीधी समाधान खरात  जालना जिल्ह्यातील शिक्षणाचा बाजार थांबवुन विद्यार्थी व पालक यांची अर्थिक लुट होत आसल्याच्या तक्रार चौफुली येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना संपर्क कार्यालयात आल्या आसता या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिध्देश्वर काकडे यांनी जालना जिल्हा परीषदचे माध्यमिक शिक्षण विभाग गाठत जिल्हा शिक्षण अधिकारी सौ.मंगल गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आसुन       यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या तक्रारीने जिल्हा शिक्षण अधिकारी सौ .मंगल गायकवाड यांना जाग येत आपल्याकडे सबंधीत काॅलेज महाविद्यालय, क्लासेस यांची लेखी तक्रार आल्यास आपण कार्यवाही  करु आसे आश्वासन दिल्याने जालना जिल्ह्यातील विद्यार्थी मित्रांना पुढील शिक्षणासाठी काही आडचणी असल्यास सबंधित शाळा काॅलेज महाविद्यालय व क्लासेस यांचे तक्रार 9764462282 या Whatsup क्रमांकावर पाठवावी आसे अहवान मनविसेचे सिध्देश्वर काकडे यांनी केले आहे. तसेच जालना जिल्ह्यातील खाजगी ईंग्रजी शाळा यांची मग्रुरी थां

रिपब्लिकन सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, हजारोच्या संख्येने उपस्थित रहा*- दादराव दौंडे

Image
 परतूर/ प्रतिनिधी समाधान खरात  रिपब्लिकन सेना (अनंदराज अंबेडकर ) जालना जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी धडक मोर्चाचे आयोजन दिनांक २८ जून २०२२ मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता आयोजन जालना जिल्हा अध्यक्ष दिनेशभाई आदमाने व लिंबाजी वाहुळकर यांच्या नेतृत्वा खाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.      सदर मोर्चा अंबड चौफुली येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार असून मोर्चातील विविध मागण्या खालील प्रमाणे १)राज्यातील महागाई वाढल्यामुळे रमाई घरकुल योजना व पंतप्रधान आवास योजनेची रक्कम ग्रामीण भागासाठी १लाख ३८ हजारावरून २लाख ५० हजार एवढी वाढविण्यात यावी व शहरी भागासाठी ३ लाख रुपये करण्यात यावी. २) डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून विहीर वाटप करण्यात यावे, या योजनेमध्ये भु -र्जल सर्वक्षण विभागाकडून पाणी पातळी कमी दाखविण्यात येते या कारणामुळे काही गावातील मागासवर्गीय शेतकऱ्यांचे विहीरी रद्द झाल्या आहेत ,भु-जल विभागाने घातलेल्या अटी रद्द करण्यात याव्यात.३) जिल्ह्यातील गायरान जमिनी कसणाऱ्या कास्तकरी यांच्या नावे ७/१२ करण्यात यावे ४) बहुतांश गावात अन

डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी स्मृतिदिनानिमित्त परतूर येथे वृक्षारोपण,भाजयुमोच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन,पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्ष लागवड करा,युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे  जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजयुमोच्या वतीने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या सूचनेवरून युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या हस्ते परतूर येथे वृक्षारोपण करण्यात आले  यावेळी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी बोलताना युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर म्हणाले की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि संगोपन महत्त्वाचे असून शामाप्रसाद मुखर्जी यांच्या मुक्ती दिनाचे औचित्य साधून आम्ही युवा मोर्चाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून आज परतूर येथे वृक्षारोपण केले असल्याचे ते म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की वातावरणातील अशुद्धी दूर करणे हरित महाराष्ट्राची संकल्पना अस्तित्वात आणणे या कामी युवकांनी पुढाकार घेतल्यास निश्चित पणाने आपण यशस्वी होऊ असेही यावेळी राहुल लोणीकर यांनी सांगितले झाडे लावून ती जगवण्याची आपली प्रत्येकाची जबाबदारी असून प्रत्येकाने कि

निधी उपलब्ध असताना विरोधी पक्ष नेत्यांना जालन्यात येऊन जल आक्रोश मोर्चा काढावा लागणे दुर्देवी- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी, न.प. मुख्याधिकाऱ्यांसह ऊर्जा विभागाला धरले धारेवर,विजेच्या प्रश्नावरून लोणीकर आक्रमक, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि ऊर्जा विभागाचा भोंगळ कारभार म्हणत मोबाईलच्या प्रकाशात घ्यावी लागली जिल्हा नियोजन बैठक,मी मागासवर्गीय आमदार असल्यामुळे माझ्या मतदारसंघावर अन्याय - आमदार नारायण कुचे यांचा आरोप

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर मागील पंचवार्षिक मध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जालना नगरपालिकेला 129 कोटी रुपयांचा भरीव निधी पाणीपुरवठा योजनेसाठी देण्यात आला होता त्यामध्ये आठ मोठे जलकुंभ पाण्याच्या टाक्या आणि वॉर्डनिहाय पाईपलाईन करण्यात येणार होती परंतु या योजनेला पूर्ण करण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी असताना आठ वर्ष उलटून गेले तरी देखील जालना नगरपालिका हा निधी खर्च करण्यामध्ये अपयशी ठरली असून निधी उपलब्ध असताना का खर्च केला जात नाही असा सवाल उपस्थित करत जालना नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यासाठी 129 कोटी रुपये मंजूर असताना विरोधी पक्षाने त्याला जालना शहरात येऊन ज्याला आक्रोश मोर्चा काढावा लागतो ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे देखील लोणीकर यावेळी म्हणाले जिल्हा नियोजन बैठकीदरम्यान माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पालकमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी यांना धारेवर धरत जालना शहरातील पाणीपुरवठा योजना आणि विजेच्या प्रश्नावर जाब विचारला जालना शहराच्या पाणी पुरवठा योजनेबाबत

मंठा येथील कन्या शाळेत वाटप न झालेल्या शालेय पोषण आहाराची चौकशी करा...गट शिक्षण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पालकांची मागणी

Image
मंठा प्रतिनीधी  सुभाष वायाळ  दि.22 शहरातील कें. प्रा.कन्या शाळेत मागील वर्षी म्हणजेच वर्षा आखेरीस शालेय पोषण आहार शासनाकडुन पाठवण्यात आलं होत.कोरोणाच्या काळापासुन शाळेत खीचडी न करता कोणतेही अन्न न शिजवता ते तसेच विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे.        पण मंठा येथील कन्या शाळेत मागील वर्षी शाळेत आलेल शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल नाही. काही पालकांनी शाळेत जावुन शालेय पोषण आहाराची मागणी ही केली कारण ईतर शाळांनी आलेल धान्य त्याच वेळेत विद्यार्थ्यांना वाटप केल पण कन्या शाळेत धान्याची वाटप का?करत नाहीत असे पालकांनी विचारल पण कन्या शाळेतील प्राध्यापक ए टी चव्हाण यांनी कोणाचाही ऐकल नाही आणी वर्ष आखेरीस आलेल शालेय पोषण आहार वाटप केल नाही आणी आता जे विद्यार्थी शाळेतुन टी सी घेवुन बाहेर गावी जात आहेत ते का फक्त धान्यासाठिच शाळेत येवु शकत नाहीत मग ते त्या धान्यापासुन वंचीत राहत नाही का?आणी वर्ष आखेरीस आलेल शालेय पोषण आहार शाळेतच आहे म्हणता आहे की ते परस्पर काळ्याबाजारात विक्री केल गेल माहीत नाही कारण नविन वर्ष सुरू होताच पुन्हा शाळेला शालेय पोषण आहार उपलब्ध झाल

प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना परतुरयांच्या वतीने सामाजिक वनी करण विभाग कार्यालय परतुर यांना निवेदन सादर.

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे प्रहार क्रांती आंदोलन संघटना प्रतुर यांच्या वतीने सामाजिक वनीकरण विभाग परतूर यांना निवेदन देण्यात आले .दिलेल्या निवेदनामध्ये सामाजिक वनीकरण कार्यालय मार्फत सन 2019 ते 2022 पर्यतची शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध योजने अंतर्गत तीन वर्षात परतुर तालुक्यातील एकूण बजेट किती शेतकऱ्यांना मंजूर झालेले आहे व किती फाईल मंजूर करण्यात आलेल्या आहेत यांची सविस्तर माहिती देण्यात यावी. परतूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सामाजिक वनीकरण कार्यालयामार्फत बांधावरील झाडे लावणे ही महाराष्ट्र शासना मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेची शेतकऱ्यांच्या मजुरांची यादी व शेतकऱ्यांची कागदपत्राची वरिष्ठांकडून चौकशी करण्यात यावी .व सण 2019 ते 2022 पर्यंतच्या शासनाचे बजेट कोण कोणत्या स्वरूपात वाटण्यात आले. त्याची माहिती लेखी स्वरूपात शासन नियमाप्रमाणे माहिती देण्यात यावी. 2019 ते 2022 पर्यंतचे रोडच्या साईडने झाडे लावण्यात आले व झाडा साठी वापरण्यात येणाऱ्या जाळ्या यासाठी एकूण किती बजेट खर्च करण्यात आलेले आहे.व कोणत्या साइटवर बजेट वापरण्यात आल्या त्याची सविस्तर शासन निय

परतूर येथे वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक संपन्न.

Image
प्रतिनिधी हनुमंत दवंडे  परतूर येथे वंचित बहुजन आघाडी ची बैठक घेण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष भालचंद्र भोजने यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष सतीश खरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका महासचिव रवींद्र भदर्गे यांच्या नेतृत्वाखाली परतुर तालुक्यातील जिल्हा परिषद ,पंचायत समिती, व नगर परिषद येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली       .यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष भालचंद्र भोजने जिल्हा उपाध्यक्ष सतीश खरात जिल्हा सचिव राहुल नाटकर जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे, बाबू गोसावी वंचित बहुजन आघाडी ता. अध्यक्ष, अच्युत पाईकराव तालुका महासचिव, रविंद्र भदर्गे तालुका उपाध्यक्ष ,शोएब पठाण कोषाध्यक्ष ,रतन शिरसाठ, प्रकाश मस्के ,जमीर शेख, सिद्धार्थ पाणवाले ,कृष्णा पाईकराव, मनोज वंजारे आदींची उपस्थिती या बैठकीला होती.

सीटी हॉस्पिटल कडुन गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य वाटप...

Image
परतुर प्रतिनिधी: हनुमंत दवंडे       Bतालुक्यातील पाटोदा माव येथिल श्री .समर्थ माध्यमिक विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना परतूर येथील प्रसिद्ध अस्थी रोग तज्ञ डॉ.सत्यानंद कराड व स्त्री रोग तज्ञ डॉ.संध्या कराड यांच्या वतिने दरवर्षी गरजू व होतकरू  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते.         या वर्षी त्यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्ये प्रदान केले. या बाबत बोलताना डॉ. म्हणाले की समाजामध्ये आज ही असे विद्यार्थी आहेत कि ते शैक्षणिक साहित्ये खरेदी करू शकत नाहीत.त्यामुळे ते विद्यार्थी शाळाबाह्य होतात अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण हा छोटासा प्रयत्न सुरू केला आहे.भविष्यात या योजनेची व्याप्ती वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले . .         शाळेचे सहशिक्षक पाराजी रोकडे व सी.एन.खवल यांच्या कडे पुस्तकांचे संच सुपूर्द करण्यात आले.गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना डॉ.कराड दरवर्षी मदत करतात यांमुळे संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर , महामंत्री राहू

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी घेतला मध्यान्ह भोजनाचा आनंद...

Image
       .परतुर प्रतिनिधी : हनुमंत दवंडे         परतूर तालुक्यातील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी मध्यान्ह भोजनाचा आस्वाद घेतला आहे        या विषयी सविस्तर वृत असे कि गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी मुळे शाळेसह खिचडी बंद असल्याने विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा घेता आला नाही मात्र या वर्षी शासनाने पहिल्या दिवसापासून खिचडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे याचा आनंद आज आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला आहे एक वेगळा अनुभव आज पहायला मिळाला . गेल्या दोन वर्षांत कोरोना मुळे शाळेंत खिचडी शिजलीच नाही शैक्षणिक नुकसान तर झालेच शिवाय सहभोजनाचा आनंद मिळत नव्हता तो आनंद आज पहायला मिळाला .या बाबत बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनीसांगितले की शाळेच्या पहिल्या दिवसापासून खिचडी सुरू केल्याने मुले आनंदाने शाळेत येतील व दोन वर्षांपासून झालेले शैक्षणिक नुकसान ही भरून काढतील .या वेळी शाळेचे सहशिक्षक आबासाहेब गाडेकर , भास्कर कुलकर्णी, चत्रभुज खवल, पांडुरंग डवरे, गणेश वखरे, मदतनीस संगिता ताई करपे यांच्यासह अनेक जन उपस्थित होते

राज ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त ५४ रक्त दात्यांनी रक्त दान केले- मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके

Image
परतुर प्रतीनीधी हनुमंत दंवडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष  राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्त,मराठवाडा संपर्क,मनसे नेते दिलीप  धोत्रे, प्रकाश  महाजन,संतोष  नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली, लोकमान्य रक्तपेढी संभाजीनगर, मार्फत आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेना ५४ रक्तदात्यांनी रक्तदान राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवुन रक्तदान केले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिबिराचे आयोजन केले         या रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटक एम.डी. खालापुरे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष.डॉक्टर आकात, डॉक्टर नवल ,डॉक्टर तापडीया,डॉक्टर कराड ,डॉक्टर कदम,डॉक्टर भापकर,डॉक्टर सोळंके,डॉक्टर उढान, उपस्थित होते, मनसे अध्यक्ष जालना प्रकाश सोळंके,यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना लोकमान्य ब्लड बँक संभाजीनगर रक्तपेढीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन मनसेच्या वतीने पुष्पहार घालून वृक्ष देऊन स्वागत केले              कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हाध्यक्ष राम नवल, परतुर तालुका अध्यक्ष कृष्णा सोळंके तालुका अध्यक्ष गणेश बोराडे

केंद्र सरकारला ८ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल युवा मोर्चाच्या वतीने परतूर येथे विकास तीर्थ बाईक रॅलीचे आयोजन-विकास तीर्थ बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा- युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली विकासकामे घरा घरा पर्यंत पोहचवण्याचे काम युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी करावे-प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दंवडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला आठ वर्ष पूर्ण झाले असून या आठ वर्षाच्या कारकीर्दीमध्ये भारत देशाला यशस्वीतेच्या शिखरावर पोहोचवल्या बरोबरच जागतिक पातळीवर आपला दबदबा निर्माण केला आहे यानिमित्ताने महाराष्ट्र भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या सूचनेवरून युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या उपस्थितीत दिनांक 15 जून 2022 रोजी सकाळी अकरा वाजता परतूर येथे विकास तीर्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी दिली ते परतुर येथे संपन्न झालेल्या बाईक रॅली संदर्भात आयोजित पूर्व नियोजन बैठकीत बोलत होते पुढे बोलताना प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये देशभरामध्ये समतोल विकास साधण्याचे काम झाले असून यामध्ये सर्वसामान्य दीनदलित दुबळ्यांना आधार देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झाले आहे जनधन योजना

आपला मुलगा मुलगी अधिकारी झाले पाहिजे यासाठी आई वडीलांने पुढे येऊन पुढाकार घ्यावा-खानाळ साहेब ( पोलीस निरीक्षक गुन्हा शाखा अधिकारी उस्मानाबाद)

Image
 बीड प्रतिनिधी हनुमंत दंवडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव बीड येथे मा प्रकाश  सोनसळे यांच्या नेतृत्वाखाली ना नेता ना पक्ष सर्व धनगर समाज एकत्र हेच लक्ष या विचारांना समाजाने दिला मोठा प्रतिसाद या जन्मोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष खानाळ साहेब , स्वागत अध्यक्ष प्रकाश  सोनसळे प्रमुख पाहुणे, हनुमंत राव काळे कृषी अधिकारी, विकास कोरडे साहेब नायब तहसीलदार बीड ,शरद माळशिकारे तुरुंग अधिकारी बीड, सुंदरराव काकडे मंडलाधिकारी बीड,महादेव हजारे ग्रामसेवक, डॉ हनुमंत पारखे ,अर्जुन मासाळ सर, व,पोलीस अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडलाधिकारी,कृषीअधिकारी, महावितरण अधिकारी, ग्रामसेवक, परिवहन अधिकारी, युवा उद्योजक, मेंढपाळ बांधव यांच्या उपस्थितीत बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा येथे माता-भगिनी पत्रकार बांधव व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.   या कार्यक्रमास संबोधित करताना  खानाळ साहेब (पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद) यांनी पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपला विद्यार्थी विद्यार्थिनी अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्याला चांगलं घडवलं पाहिजे विद्यार

परतूर नगरपरिषद प्रभाग आरक्षण जाहीर..

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे परतूर नगर परिषद प्रभाग आरक्षण  उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव व मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनी प्रभागाचे आरक्षण जाहीर केले       काही दिग्गजांची उघडली लॉटरी तर काही दिग्गजांचे स्वप्नभंग परतूर नगर परिषदेच्या अकरा प्रभागांच्या जागेसाठी आज 13 जून सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली.  अनेकांची लॉटरी लागली .जाहीर झालेली प्रभाग निहाय आरक्षण सोडत कशी. जागा प्रभाग क्रमांक 1 अ, मध्ये अनुसूचित जाती महिला व ब, मध्ये सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 2 अ ,मध्ये  अनुसूचित जमाती 2 ब, मध्ये सर्वसाधारण (महिला) प्रभाग क्रमांक 3 अ, सर्वसाधारण (महिला) प्रभाग क्रमांक 3 ब, सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 4 अ, मध्ये सर्वसाधारण (महिला) 4 ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 5 अ; मध्ये सर्वसाधारण (महिला) 5 ब मध्ये सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 6 अ, मध्ये सर्वसाधारण (महिला) 6 ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 7 अ ,मध्ये  सर्वसाधारण (महिला) 7 ब ,सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 8 अ, मध्ये  सर्वसाधारण (महिला) 8 ब, सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 9 अ, मध्ये सर्वसाधारण (महिला) 9ब मध्ये सर्वसाधारण प्रभाग क्रमा

तरुणांनी रक्तदान शिबिर या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेऊन रक्तदान करावे -प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष

Image
परतूर प्रतीनिधी हनुमंत दंवडे मनसे मराठवाडाचे संपर्क नेते दिलीप (बापु) धोत्रे,मा. प्रकाश (काका) महाजन,संतोष  नागरगोजे,अशोक  तावरे. सतनाम सिंग गुलाटी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कार्य रक्तदान शिबिर व वृक्ष रोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे         मनसे अध्यक्ष  राज साहेब ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्ताने १४ जुन २०२२, मंगळवार रोजी  मनसे परतुर मंठा तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिर व वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटक एम.डी. खालापुरे (समाजसेवक) कार्यक्रमाचे अध्यक्ष लिंबुळकर (वकील)  प्रमुख पाहुणे,डॉ.नवल , डॉ.प्रमोद आकात,डॉ.चव्हाण,डॉ.सातोनकर,डॉ.कराड,डॉ.मंत्री, डॉ.संजय पुरी,डॉ.लाहोटी,डॉ.बरकुले, डॉ.संजय सोळंके,डॉ.भापकर,डॉ.कदम,डॉ.उढाण, डॉ.तापडिया हे राहणार असून प्रमुख उपस्थिती.भाऊसाहेब जाधव साहेब(उपविभागीय अधिकारी परतूर) मोरे (उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर) सौ.रुपा चित्रक (तहसीलदार परतूर) कौठाळे (पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे परतुर) प्रा.डॉ.भगवान दिरंगे सर (माजी प्राचार्य लालबहादूर शास्त्री महाविद्यालय परतूर) सुधीर गवळी  (मुख्य

स्वच्छता अभियानात सर्वात मोठा वाटा हा जैन समाजाचा आमदार लोणीकर यांचे प्रतिपादन,गोहत्या बंद व्हावी यासाठी जैन समाजाचे मोठे योगदान आमदार लोणीकर,आमदार लोणीकर यांनी भाषणाला गोमाता च्या जयजयकाराने केली सुरुवात

Image
प्रतिनिधी समाधान खरात जैन समाजाला हिंदुत्ववादी समाज असून गेल्या अनेक वर्षापासून जैन समाजाने गोहत्या बंदीसाठी रस्त्यावर उतरून योगदान दिले आहे गोहत्या बंद व्हावी यासाठी नेहमीच या समाजाने प्रयत्न केला आहे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी, राष्ट्रपती रामनाथजी कोविंद, तंत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना भेटून सुद्धा वेळोवेळी गोहत्या बंदीची मागणी जैन समाजाने केली आहेत स्वच्छता सारख्या कामात ही जैन समाजाचे मोलाचे योगदान आहे मी स्वच्छता खात्याचा मंत्री असताना जैन समाज मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियानात सहभागी झाला होता असे आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले  ते ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स दिल्ली यांच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की मी पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याचा मंत्री असताना महाराष्ट्रात 18000 गावात पिण्याच्या पाण्याच्या योजना केल्या आणि 70 लाख स्वच्छतागृह बांधले हे काम करत असताना जैन समाजातील अनेकांची मदत झाली असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की जैन समाजाचा शालीन

जालना पोलीस अधीक्षक पदी अक्षय शिंदे यांची वर्णी..

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे जालना पोलिस अधीक्षक पदासाठी गेल्या दीड महिन्यापासून रस्सीखेच सुरू होती. ८ जून रोजी गृह विभागाने आदेश आहेत . अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख , एसपी हर्ष पोद्दार , एसपी आर . रागसुधा यांच्याकडे काही दिवस जिल्ह्याचा पदभार होता. दरम्यान , बुधवारी गृह विभागाने अक्षय शिंदे यांची पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाल्याचे काढले असून आदेश जारी केले आहेत. पोलिस अधीक्षकपदी अक्षय शिंदे यांची वर्णी लागली आहे. निवडणुका असल्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी असणार व आहे . गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात चोऱ्या – घरफोड्या क लूटमारीचे प्रमाणही वाढले आहे. मागील दीड महिन्यापासून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे जालन्याचा पदभार दिला गेला होता . अक्षय शिंदे यांचे नाव पहिल्यापासूनच चर्चेत होते. बुधवारी याबाबत आदेश निघाले वाढती गुन्हेगारी रोखण्याचेही मोठे आव्हान शिंदे यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे आता शहरवासीयांचे याकडे लक्ष लागले आहे.

राज्यसभा निवडणुकीचा निकाल महा विकास आघाडीचे 3 तर भाजपचे 3 उमेदवार विजयी..

Image
 प्रतिनिधी हनुमंत दवंडे           राज्यसभा निवडणुकीचा नाट्यमय घडामोडींनंतर अखेर शनिवारी पहाटे निकाल आला. राज्यातील सहा जागांपैकी भाजपला अनुक्रमे तीन शिवसेना, काँग्रेस ,आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक जागा जिंकली तत्पूर्वी महाराष्ट्र आणि हरियाणा मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी दिवसभराच्या गदारोळानंतर संध्याकाळी मतमोजणी थांबवण्यात आली होती .भाजप आणि महा विकास आघाडीने एकमेकांच्या मतदार आमदारावर आक्षेप घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत बैठक घेतली तब्बल साडे आठ तास मतमोजणी रखडली होती. बैठकीनंतर आयोगाच्या निर्देशानुसार शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले त्यानंतर मतमोजणी सुरुवात करण्याचे निर्देश दिले होते. मतमोजणी अखेर भाजपचे तीन उमेदवार तर महा विकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. माविआचे तीन उमेदवार तर भाजपची तीन उमेदवार जिंकले पहिल्या पसंतीच्या मतमोजणी मध्ये महा विकास आघाडीचे तीन उमेदवार भाजपचे उमेदवार तीन विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीकडून संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी विजयी झाले आहेत .त्याचबरोबर भाजपचे उमेदवार पियुष गोयल आणि अनिल

अन्सारी इफत फातेमाचे बारावीच्या परीक्षेत यश

Image
परतूर/प्रतिनिधी हनुमंत दंवडे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते कुणीही घेतले तर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणतात. यामुळे आता अनेकजण शिक्षणावर भर देतात. आपण नाही शिकलो तर आपली मुलं शिकायला पाहिजे, अशीही धारण आता ग्रामीण भागासह शहरी भागात सुद्धा रुजू लागली आहे. त्यामुळे शिक्षण किती महत्वाचे आहे, हे लक्षात येत. हेच महत्व लक्षात घेत शहरातील वृत्तपत्र घरोघरी वाटप करणारे रईस अन्सारी यांची मुलगी अन्सारी इफत फातेमा हिने बारावीच्या प्रथमश्रेणीत येत 86.00 टक्के मार्क घेऊन यश मिळवले आहे या यशाबद्दल इफत फातेमा हिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

पोलीस उपनिरीक्षक पदी केदार गरड यांची नियुक्ती झाल्याबद्दल वाढोणा येथे सत्कार..

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे  परतूर तालुक्यातील वाढोणा येथे केदार गरड यांची पोलीस उपनिरीक्षक(psi) पदी नियुक्ती झाल्याबद्दल एका घरगुती कार्यक्रमात त्यांचा पुष्पगुच्छ व राष्ट्रमाता जिजाऊ यांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. केदार गरड हे मूळचे सूर्डी ता. माजलगाव जि. बीड येथे वास्तव्यास आहेत.एमपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि एमपीएससी परिक्षेमधून त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी नियुक्ती झाली आहे .केदार गरड याने अत्यंत मेहनतीने व जिद्दीच्या बळावरती एमपीएससी परीक्षा मध्ये घवघवीत असे यश संपादन केले आहे. कारण की त्याने यशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे कुठलाही कोचिंग क्लास न लावता स्वतःच्या मनगटाच्या बळावरती आणि बुद्धीच्या जोरावरती एमपीएससी परीक्षे मधून मी पीएसआय होणारच ही खुणगाठ मनाशी बांधलेली होती. एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करत असताना अनेक संकट आली त्या संकटाला मी एक चान्स मानून सामोरे गेलो असे केदार गरड याने सांगितले . माझ्या पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याची बातमी सर्वत्र पसरताच मला अनेक नातेवाईकांनी फोन करून शुभेच्छा दिल्य

हा तर राज्य सरकारचा नैतिक पराभव- आमदार बबनराव लोणीकर,सर्वसामान्यांच्या भावनांचा अनादर करीत सत्तेत बसलेल्यांना राज्यसभा निवडणुकीच्या निकालामुळे , पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष नीतीचा हा विजय- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

Image
प्रतिनिधी हनुमंत दंवडे राज्यसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा जनतेने दिलेला जनादेश झुगारून सत्तेत बसलेल्या आघाडी सरकारला बसलेला हादरा असून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष नीतीचा हा विजय असल्याचे मत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले आहे विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना बबनराव लोणीकर म्हणाले की काय राज्यातील आघाडी सरकारचा हा खऱ्या अर्थाने नैतिक पराभव असून जनतेचा विश्वास घात करून सत्तेत बसलेल्या आघाडी सरकारला सरकार मध्ये असलेले घटक ही सांभाळता आली नाहीत खऱ्या अर्थाने राज्यसभेत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा झालेला विजय हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा हा विजय असून, आजही अनेक आमदारांच्या मनामध्ये सत्ताधारी आघाडीच्या अनैतिकतेची सल असून त्याचाच परिणाम म्हणून राज्यसभेमध्ये भारतीय जनता पार्टी ने उभे केलेले तिन्ही उमेदवार दणदणीत विजय झाले असल्याचे आमदार लोणीकर यांनी म्हटले आहे ======================  *देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष नीतीचा विजय* ======================= सर्वसामान्य जनतेच्या भावना आजही भारतीय जनता पार्ट

लिंगसा येथे अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी..

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे परतूर तालुक्यातील लिंगसा येथे अखंड भारताचे वैभव वाढवणाऱ्या भारतीय संस्कृतीची विचारधारा जोपासताना संपूर्ण आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाताअहिल्याबाई होळकर यांची 297 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते प्रतिमा पूजन करून भव्य मिरवणूक काढण्यात आली अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा जागर करण्यात आला आजच्या महिलांनी व युवा तरुणांनी अहिल्याबाई होळकरांचा विचारांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे अहिल्याबाई होळकरांनी. त्याग, शौर्य ,पराक्रम, खूप महान आहे.अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा, पानपोई,बारव, यांचे बांधकाम केले. अहिल्याबाई होळकर यांचे कार्य फार महान आहे असे प्रतिपादन कु. सुनिता गायकवाड यांनी केले आहे. तसेच अहिल्याबाई होळकर यांचा त्याग, पराक्रम ,व विचार आपण आत्मसात केला पाहिजे आपण जीवन जगत असताना अहिल्याबाई होळकरांच्या जिवन चारित्र्या मधून हीच विचार प्रेरणा आपण घ्यावी .असे प्रतिपादन कु. कोमल शाहू आव्हाड यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपस्थित म्हणून रंगनाथ येवले पंचायत समिती सभापती परतुर, व र

माजी सरपंच अच्युतराव सवने यांचे निधन

Image
परतूर – प्रतिनिधी हनूमंत दंवडे तालुक्यातील दैठना खुर्द येथील माजी सरपंच अच्युत श्रीपतराव सवने यांचे दीर्घ आजाराने दि १० जून २०२२ शुक्रवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान निधन झाले. मृत्यू समयी ते ७० वर्षाचे होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, जावई, बहीण, भाऊ, नातू असा परिवार आहे. त्यांच्यावर संध्याकाळी दैठना खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्त्ये होते. 

आदर्श कॉलनी ते शिवाजीनगर रोड चे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून काम नव्याने करण्यात यावे या मागणीसाठी नागरिकांचे नगरपरिषद परतुर यांना निवेदन सादर.

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे आदर्श कॉलनी येथील सिमेंटचे रोडचे काम गेल्या चार महिन्यापूर्वी करण्यात आले होते. त्यामध्ये सिमेंट अत्यंत बोगस पद्धतीने वापरून निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलेले आहे अशा तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत कारण की सिमेंट रस्ता झाल्यानंतर त्यावरून जड वाहनांची वाहतूक पूर्णता झाली असल्यामुळे रोडवरील खडीचे दगड आहे उडून नागरिकांना अपघात झाल्याच्या काही घटना घडलेल्या आहेत. तसेच सीमेंट रोड हा पूर्णता खीळ खीळ झाला आहे .बोगस सिमेंट वापरून निकृष्ट दर्जाचे काम आदर्श कॉलनी रोडचे करण्यात आलेली आहे याची ही वरिष्ठांनी चौकशी केली पाहिजे व तो सिमेंट रस्ता तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कॉलनीतील नागरिकांच्या वतीने नगरपरिषद कार्यालय परतुर यांना देण्यात आलेले आहे. व निवेंदना वरील सह्या  कुंताबाई भुसारे शिवसेना महिला आघाडी परतुर, प्रज्ञा जगताप, प्रियांका जवळकर, गीता भारस्कर ,सुशिलाबाई शिंदे, उर्मिला राऊत, वेणू राऊत, आशा राऊत ,अश्विनी आवटे ,रोशनी खरे, मंडोदरी शिंदे, गौरव डहाळे, संगीता नाचणे ,जयश्री मुजमुले, जिजाबाई म

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन बार्शी ते कुर्डूवाडी दरम्यान असलेले नॅरोगेज पटेल ची जागा शेगाव पंढरपुर दिंडी मार्गाला पूर्ण करण्यासाठी द्यावी या मागणीसाठी भेट घेतली,शेगाव पंढरपूर दिंडी मार्गा संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी झाली सकारात्मक चर्चा-आमदार बबनराव लोणीकर

Image
प्रतिनिधी समाधान खरात शेगाव ते पंढरपूर दिंडी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी संत गजानन महाराजांच्या शेगावात पासून ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर पर्यंत हा महामार्ग मंजूर करून घेतला होता या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून बार्शी ते कुर्डूवाडी दरम्यान चे काम बंद असलेल्या नॅरोगेज रेल्वे पटरी मुळे अद्याप पर्यंत पूर्ण झालेले नाही त्यामुळे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन जुनाट झालेली पटरी पण आवश्यक ती अस्तित्वात नाही त्याचबरोबर या ठिकाणाहून रेल्वेचे आवागमन ही होत नसल्यामुळे ही जागा शेगाव पंढरपूर दिंडी मार्गासाठी द्यावी या संदर्भामध्ये चर्चा केली  या संदर्भामध्ये दिंडी मार्गाची पार्श्वभूमी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या लक्षात आणून देत हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी बार्शी ते कुर्डूवाडी दरम्यानची रेल्वेची जमीन देण्याची मागणी यावेळी केली    या चर्चेदरम्यान अश्वि

लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात गुणवंताचा सत्कार

Image
परतूर प्रतिनीधी हनुमंत दंवडे येथील लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयतील गुणवंत विध्यार्थाचा सत्कार करण्यात आला परतूर ता. परतूर जि. जालना येथील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु / मार्च २०२२ चा विज्ञान शाखेचा निकाल ९७.१७%  ३८९ विद्यार्थी परिक्षेला बसले ३७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून  १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा निकाल ८४.३७ % , कला शाखेतून ४२६ विद्यार्थी परीक्षेला बसले २६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेचा निकाल ६२.२०% कला शाखेचा निकाल ६२.२० %  महाविद्यालयाचा एकूण निकाल ७९.६३ %  विज्ञान शाखा  १ ] देवडे सिध्देश्वर गजानन ५२४ गुण सर्वप्रथम  २ ] कु. जोगदंड प्रिती दत्तात्रय ५१७ गुण द्वितीय  ३ ] कु . बोरकर रोशनी किशनराव ५१५ गुण तृतीय 4) आढे सचिन नंदकुमार 508   वाणिज्य शाखा  १] लाटे श्रीकृष्ण ज्ञानेश्वर -४७१ गुण सर्वप्रथम   २] कु. चामशीकर प्रांजल अमरीश -४५५ गुण द्वितीय   ३] मोर महेक अरविंद ४४९ गुण तृतीय    कला शाखा १) राऊत आस्मिता भगवान ४८३ गुण सर्वप्रथम २] शेळके सुप्रिया गजानन ४७५ गुण द्वितीय ४६१ गुण तृतीय  ३ ] कु. तेलगड ईषा

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावी निकालात यश

मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ दि.०९ माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च / एप्रील २०२२ -स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मंठा जि.जालना येथील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २०२२ चा एकूण निकाल ९ ४.८६ टक्के एवढा लागला असून , कला शाखेतील २ ९ ५ विद्यार्थ्यांपैकी २६६ विद्यार्थी पास झाले आहेत . एकूण निकाल ९ ०.१६ असून त्यापैकी ०६ विद्यार्थ्यांनी विषेश प्राविण्य मिळवले आहे .      या शाखेतून कु . मुक्ता विष्णू मिंड हिने ८४.१६ टक्के गुण घेउन प्रथम क्रमांक मिळवला तर संजय बरसाले ८१.३३ टक्के दुसरा व निकीता उत्तम गोरे हीने ८०.८३ टक्के गूण घेउन तृतीय क्रमांक मिळवला . ५ विज्ञान शाखेतून २४८ विद्यार्थ्यापैकी २४६ विद्यार्थी पास झाले एकूण निकाल ९९.९९ टक्के असून त्यापैकी ३८ विद्यार्थ्यांनी विषेश प्राविण्य मिळवले आहे . या शाखेतून कु . गौरी प्रशांत देव हिने ८६.०० टक्के घेउन प्रथम क्रमांक तर धनजंय विलास खरात याने ८२.६६ टक्के घेउन द्वितीय तर शिवाणी दशरथ निर्मल हिने ८२ . ३३ गुण घेउन तृतीय क्रमांक मिळवला . वाणिज्य शाखेतून ६३ विद्यार्थ्यांपैकी ६ विद्यार्थी पास झाले असून एकूण निकाल ९ ५.२३ टक्के लागला असून ०१ विद्यार

पैशासाठी विद्यार्थ्यांचं एडमीशन थांबवल्यास काॅलेजच्या काचा फुटणार:-सिध्देश्वर काकडे

Image
जालना प्रतिनीधी समधान खरात जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी काही काॅलेज डोनेशन फिससाठी व एडमीशन फीस च्या नावाखाली विद्यार्थी मित्रांसह पालकांना वेठीस धरत आसतात. शिक्षणाचा बाजार आता आपण मनसे विद्यार्थी सेना संस्थापक अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या थांबवणार आसुन ज्या काॅलेज मध्ये विद्यार्थ्यांना पैशासाठी व डोनेशन फिससाठी प्रवेश नाकारतील त्या काॅलेजच्या योग्य वेळी आपण काचाच फोडु आसा थेट ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे आक्रमक नेते राज्य कार्यकारीणी सदस्य सिध्देश्वर काकडे यांनी दिला आहे.        मेडिकल काॅलेज, इंजिनिअर काॅलेज कोणतंही काॅलेज आसो त्या काॅलेजच्या काचा आपण फोडणार म्हणजे फोडणारच आसा ईशारा काॅलेज व शिक्षण विभागाला मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. कोणत्याही विद्यार्थी मित्राला एडमीशनसाठी अडचणी येत आसतील तर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकार्यां सोबत संपर्क करावा आसे अहवान मनसे विद्यार्थी सेनेचे नेते सिध्देश्वर काकडे यांनी केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास जागा करण्यासाठी युवकाने पुढाकार घ्यावा- आमदार गोपीचंद पडळकर

Image
बीड प्रतिनिधी हनुमंत दंवडे आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 व्या जयंतीनिमित्त मोफत भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवदास बिडगर या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष-धनगर समाज महाराष्ट्र राज्य, तसेच युवा नेते बळीराम तात्या खटके ,सुधाकर पांढरे, संदीप काजगुंडे उपसभापती, या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला.   यावेळी या कार्यक्रमास संबोधित करताना माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी सांगितले की अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास, राजे यशवंतराव होळकर यांचा इतिहास, राजे मल्हारराव होळकर यांचा इतिहास, जागा करण्यासाठी गावगाड्यातील वाडी वस्तीवरील युवकांनी पुढे येऊन पुढाकार घेतला पाहिजे ‌. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे कार्य देशभर असून या कार्याचा जनजागृती आपण सर्वांनी केली पाहिजे अहिल्यादेवी होळकरांनी सर्व समाज बांधवांसाठी काम केले अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य देशभर आहे हे आपण युवा पिढीने सांगितले पाहिजे असे बोलताना पडळकर

शिवसेना वाहनचालक मालक संघटनेच्या परतूर तालुका प्रमुख रामजी सोळंके यांची नियुक्ती

Image
परतूर  प्रतिनिधी हनुमंत दंवडे शिवसेना वाहन चालक मालक संघटनेच्या परतूर तालुका प्रमुख पदी रामजी बापूराव सोळंके यांची नियुक्ती पत्राद्वारे दि ४ जून २०२२ रोजी तालुकाप्रमुख अशोक आघाव यांनी केली आहे. नियुक्तीचे पत्र माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख ऐजे बोराडे यांच्या हस्ते देण्यात आले आहे. दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विचाराशी प्रेरित होऊन स्व. बाबासाहेब ठाकरे यांचे विचार व शिवसेना युवासेनाचे ध्येय धोरण गोरगरीब जनतेला फायदा होईल. असे काम करून शिवसेना पक्ष वाढीस कामे करावे. या नियुक्तीबद्दल माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख ऐजे बोराडे, पंडित भुतेकर, जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, बाबासाहेब तेलगड, माधवराव कदम, अशोक आघाव, रामेश्वर नळगे, महेश नळगे, सुदर्शन सोळंके, विकास खरात, संदीप पाचारे, संजय  गोंडगे, दीपक हिवाळे, अनंता बागल, राहुल कदम, दत्ता सुरुंग, अबासाहेब कदम, मधुकर पाईकराव, गजानन सोळंके, आदींनी अभिनंदन केले आहे.      *फोटो ओळी.. शिवसेना वाहन चालकमालक संघटनेच्या परतूर तालुका

दैठणा येथील अंबादास चव्हाण याचे निधन

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे परतूर: तालुक्यातील दैठणा बु.येथील रहिवाशी अंबादास चव्हाण (वय-103) यांचे रविवारी (ता.पाच)रोजी निधन झाले. त्यांचे सोमवारी (ता.सहा) रोजी सकाळी आठ वाजता दैठणा बु.येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पच्यात मुली,मूल, सून,नातवंड पतृंड असा मोठा परिवार आहे.ते भावसाहेब,शामराव ,रामराव, रावसाहेब चव्हाण याचे वडील होते.... -

येनोरा येथे पर्यावरण दिनानिमित्त बांबू लागवड

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे परतूर तालुक्यातील  मौजे येनोरा येथे पर्यावरण दिनानिमित्त बांबू वृक्ष लागवडी करण्यात आली. व तसेच गावातील सर्व शेतकऱ्यांना बांबू वृक्ष लागवड विषयी जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करावा याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले  .नानाजी देशमुख कृषी संजीवनी समितीचे अध्यक्ष सरपंच विष्णू गायकवाड व कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी परतुर जी.एम सोनकांबळे . तालुका कृषीअधिकारी परतुर एस. एन. पवळ साहेब. मंडळ कृषी अधिकारी परतुर माने साहेब मंडळ कृषी अधिकारी आष्टी सांगवे. कृषी सुपर कांबळे साहेब. व कृषी सहाय्यक इंजेवाड. प्रगतशील शेतकरी नितीन जोगदंड .गीताराम भुंबर सुरेश भुंबर .अर्जुन दवंडे .नारायण गायकवाड. संदीप गायकवाड .पांडुरंग भुंबर. कैलास साळवे. कृषी सहाय्यक विजापूरे. इतर गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...

लोकमाता अहिल्याबाई होळकर धार्मिक होत्या परंतु धर्मांध नव्हत्या-बाळासाहेब सोनसळे

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे  लोकमाता अहिल्याबाई होळकर धार्मिक होत्या परंतु धर्मांध नव्हत्या त्यांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण समाजाला देऊन मानवता हा एकच धर्म आहे         .असा संदेश दिला असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते बाळासाहेब सोनसळे यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान मित्र मंडळ पिंपरी धामणगाव तालुका परतुर जिल्हा जालना. आयोजित राजमाता अहिल्याबाई होळकर सार्व जनिक जन्मोत्सव प्रसंगी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की भारतीय संस्कृतीचे विचारधारा जोपासत संपूर्ण भारतभर स्वतःच्या खाजगी कोशातून यांनी सर्व समाजासाठी लोककल्याणकारी राज्यकारभार केला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैय्यासाहेब चौधरी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून परतूर पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद थोरात अहिल्या ज्योतीचे संपादक रमेश आढाव बहुजन वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष बापू गोसावी रासपचे नेते शिवाजी तरवटे क्रांती संघाचे हनुमान दौंडे युवा व्याख्याते गोविंद गोचडे, नंदकुमार गांजे, हातकडके सर, दत्ता कोल्हे ,इत्यादी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते. महापुरुषांचे प्रतिमापूजन भव्य मिरवणूक व महापुरुषांच्या व

मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या अवैधरीत्या दारू विक्रेत्यावर विविध ठिकाणी धाडी ,खेड्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे , ३,४१,३६० रूपायांचा देशी विदेशी दारू

Image
मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ दि.०३ मंठा पोलीसांची स्टेशनच्या हद्दीत विविध ठिकाणी धाडी टाकुन देशी,विदेशी दारू व इंडिगो वाहानासह तीन आरोपींना अटक करण्यात आले. सविस्तर बातमी अशी कि, मंठा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील हाॅटेल अण्णा येथुन ८०० रू.किमतीच्या भिंगरी संञा दारूच्या १० बाटल्या जप्त करण्यात आले. हाॅटेल मालक नामे गजानन काशीनाथ डोईफोडे रा सरहद वडगांव ता मंठा पोलीस अमलदार सुभाष राठोड यांच्या फिर्यादिवरून मंठा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले.व तसेच मंठा ते तळणी रोडवर वैष्णवी हाॅटेलच्या समोर दारूची अवैध वाहतुक करतांना रंगनाथ उर्फ पिनु अंकुश राठोड रा दहिफळ खंदारे यांच्या कडुन २४०० किमतीच्या मॅकडाॅल नं -१ कंपनीची १२ बाटल्या जप्त करण्यात आले .व पोउपनि बालभिम राऊत यांच्या फिर्यादिवरुन मंठा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले. तसेच मंगेश नारायण जाधव रा जांभरून ता.मंठा हा व्यक्ति त्याच्याकडिल टाटा इंडिगो कंपनीच्या गाडी मध्ये ७२००रू किंमतीच्या इम्प्रियल ब्ल्यु कंपनीच्या विदेशी दारूच्या ४८ बाटल्या व ३९६०रू किंमतीच्या कॅनाॅन १००० कंपनीच्या २४ बाटल्या व ५७,६००रू किंमतीच्या द

पोलिस हेड कॉन्स्टेबल रविंद्र गायकवाड सेवानिवृत*

Image
परतूर  प्रतिनिधी हनुमंत दंवडे येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल रविंद्र निवृत्ती गायकवाड हे दि ३१ मे २०२२ रोजी सेवानिवृत झाले या बद्दल त्यांचा उपविभागीय पोलिस अधिकारी आर डी मोरे, पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी परतूर पोलिस ठाण्यात एका सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन दि ३१ मे रोजी करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पुंडगे, उपनिरीक्षक नितिन गट्टुवार, पोलिस कर्मचारी गजानन राठोड, भाऊसाहेब पाऊलबुद्धे, अशोक गाढवे, संजय वैद्य, भागवत खाडे, नितिन बोंडारे, सुनील होंडे, माने, राम हाडे, दशरथ गोपानवाड, शाम पाढरपोटे, आबासाहेब बनसोडे, वाघ, संगीता मांडे, यांच्यासह आदि पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

परतूर येथे अहिल्याबाई होळकर यांच्या 297 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दंवडे परतूर शहरात अहिल्याबाई होळकर यांच्या 297 व्या जयंतीनिमित्त .व्याख्याते श्री. गोविंद गोचडे यांच्या व्याख्यानमालेचा कार्यक्रम दिनांक 3/6/2022 वार शुक्रवार रोजी ठीक 7:00 वा. अहिल्याबाई होळकर सांस्कृतिक सभागृह परतूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या व्याख्यानमालेला सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. आमदार बबनरावजी लोणीकर साहेब पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया माजी आमदार परतुर , राहुल लोणीकर प्रदेश महामंत्री, कपिल आकात राष्ट्रवादी युवा जिल्हाध्यक्ष जालना, माधवराव मामा कदम, शिवसेना अशोकराव शिवसेना तालुकाप्रमुख परतुर, उपजिल्हाप्रमुख जालना, महेश नळगे शिवसेना नेते,रंगनाथ येवले पंचायत समिती सभापती परतूर ,रामप्रसाद थोरात उपसभापती पंचायत समिती परतुर ,इंद्रजीत बापू घनवट जिल्हा परिषद सदस्य जालना, पांडुरंगजी नवल मराठा सेवा संघ परतुर ,बाबुरावजी हिवाळे नगरसेवक परतुर ,एडवोकेट महेंद्रकुमार वेंडेकर, एकनाथराव कदम सं

मंठा येथील माता भगवती गोशाळा शासकीय अनुदानाच्या प्रतीक्षेत

Image
 मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ      दि.०१महाराष्ट्रात जनावरे व पशुपालकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतीला पूरक असणारा दुग्ध व्यवसाय ही काही जण करत असतात. यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती तर होतेच त्याबरोबरच शेती कसण्यासाठी लागणारे बैल ही उपलब्ध होतात.           परंतु सध्या शेतीमध्ये होत चाललेल्या आधुनिकीकरणामुळे, मनुष्यबळाच्या अभावामुळे, शासनाचे पशुपालका विषयी असणारे उदासीन धोरण अशा अनेक समस्यांमुळे जनावरे व पशुपालकांची संख्या कमी होऊन ग्रामीण भागातून हि गोठ्यातील गाय नाहीशी झाली आहे. अशा कठीण परिस्थितीतही गो पालणाचे काम मंठा शहरात रेणुका देवी परिसरामध्ये दोन ध्येयवेड्या तरुणाने महेश सराफ व संतोष तिवारी यांनी शासनाची कुठलीही मदतीची अपेक्षा न ठेवता गेल्या दहा वर्षांपासून स्वखर्चाने माता भगवती गोशाळा अवघ्या पाच गाईपासून सुरवात केली. आज घडीला जवळपास 125 गाई आहेत. काही गाई पाळणारे व्यक्ती आजारी, अपंगत्व आलेल्या, म्हाताऱ्या गाई, या गो शाळेमध्ये हक्काने आणून घालतात.शहरातील व परिसरातील काही दानशूर व्यक्त

प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे फळ निश्चित मिळते -- कपील आकात सेवानिवृत्त कला शिक्षक अमृतराव सवने यांचा सपत्नीक सत्कार

Image
परतूर – प्रतिनिधी हनुमंत दंवडे शिक्षकांनी काळानुसार स्वतःमध्ये बदल करावे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. आपल्या विषयाचे सखोल ज्ञान ठेवावे. विज्ञान व कम्प्युटर युगाच्या स्पर्धेच्या टिकून राहावे. येथे तोडजोड करता येत नाही. शिक्षण क्षेत्रात वेळोवेळी होणाऱ्या बदलाची माहिती बाळगावी.         येणारा काळ कठीण आहे. स्पर्धा वाढली आहे. स्पर्धेत या विद्यालयाचे विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत. प्रामाणिकपणे केलेल्या कामाची फळ शेवटी निश्चित मिळते. असे उद्गार मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कपिल आकात यांनी काढले. लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे कलाशिक्षक अमृतराव सवणे हे मंगळवारी (दि.३१ मे) रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सेवागौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बंडेराव सवणे, विजय राखे, प्रभाकर धुमाळ, अंकुशराव तेलगड, अखिल काजी, शिवाजी सवणे, सिनेअभिनेते योगेश कुलकर्णी, संतोष डव्हारे, सरपंच सोनाजी गाडेकर उपस्थित होते.  याप्रसंगी अमृतराव सवणे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मंदाकिनी सवणे यांचा शाल,श्रीफळ,

मंठा येथील दोन तलाठी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात,महसुल विभागाच भ्रष्टाचार चव्हांट्यावर

मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ दि.०१ तक्रारदाराच्या वाळू वाहनावर कारवाई न करण्यासाठी दोन तलाठ्यांना 30 हजार रुपयांची लाच फोन पेद्वारे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी ताब्यात घेतले . उमरखेड सज्जाचे अक्षय गणेश भुरेवाल  ( ३५ , रा वैभव कॉलनी , जालना ) व मंगरूळ सज्जाचे मंगेश शंकर लोखंडे ( ३ ९ , रा . शिफा कॉलनी , मंठा ) अशी संशयितांची नाव आहेत तक्रारदार सहा चाकी वाहनांनी वाळू , मुरूम व खडी वाहतूक करतात . २ ९ मे रोजी तक्रारदार हे कोकरसा पाटीजवळून वाळूचे वाहन घेऊन जात होते . तेवढ्यात तलाठी भुरेवाल तलाठी लोखंडे यांनी गाडी अडवून तू पावत्यांमध्ये खाडाखोड केलेली आहे . ती चालणार नाही . तुझ्यावर कारवाई करावी लागेल , असे म्हणून ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली . तडजोडीअंती ३० रूपये ठरवून त्यापैकी ५ हजार रोख घेतले . नंतर ८ हजार रुपये फोन पेद्वारे घेतले . त्यानंतर उर्वरित पैसे उद्या दे असे सांगितले . तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली . मंगळवारी पडताळणी केली असता कारवाई न करण्यासाठी भुरेवाल व लोखंडे यांनी १७ हजार रुपयांची लाच पंचासमक्ष मागण