Posts

Showing posts from November, 2023

सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतूर -मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा अधिवेशनात मांडा,.आ.सुरेश जेथलिया यांचे विरोधी पक्ष नेते मा.वीजय वडेट्टीवर यांना साकडे

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात    जिल्हात दिनांक २६ ते २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागा आणि शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  ही पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते मा.श्री.विजयजी वडेट्टीवार हे आज जालना जिल्हा दौऱ्यावर आले होते.  तसेच परतूर व मंठा तालुक्यात देखील अवकाळी पाऊसाने कापूस, तूर, ज्वारी, गहू या पिकांचे अतोनात नुकसान झालेले असून देखील परतूर -मंठा तालुके शासनाने अवकाळी पाऊस नुकसानग्रस्त तालुक्यातुन वगळले असून त्या तालुक्यांचा देखील सहभाग करण्यात यावा या संदर्भात आपण अधिवेशनात आवाज उठवावा या संदर्भात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना मा. आ. सुरेश जेथलिया यांनी निवेदन देत मतदारसंघातील शेतकऱ्यांना न्यान देण्याची विनंती केली. तसेच विरोधी पक्ष नेत्यांनी प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.

कोल्हापूरी बंधाऱ्याचे रूपांतर उच्च पातळी बंधाऱ्यात करण्यासाठी तळणी येथे दि.३० नोव्ह. रोजी रास्ता रोको

Image
तळणी : . प्रतिनिधी ( रवि पाटील ) तळणी परीसराची जीवनदाईनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्णा नदीपात्रावरील कोल्हापूरी बंधार्याचे उच्च पातळी बंधार्‍यात रुपांतर करण्यासाठी तळणी येथे किशोर खंदारे याच्या नेतृत्वाखाली दि ३० नोव्हबर गुरुवार रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे पूर्णा नदी पाञातील वाघाळा इंचा व देवठाणा उस्वद या तीन ठिकाणचे कोल्हापूरी बंधाऱ्यचा बाजूचा भराव आतिवृष्टीत वाहून गेला आहे यामुळे या बंधार्यात एक थेबं सुध्दा पाणी अडवल्या जात नाही या तिनही ठिकाणची हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली येऊ शकते उस्वद देवठाणा येथील बंधार्याचे दोन वेळा दुरुस्तीचे काम केले तरी परीस्थीती जैसे थै आहे वाघाळा पूर्णा पाटी (ईचा ) व देवठाणा येथील कोल्हापूरी बंधार्याच्या बाजूच्या शेतकर्याच्या जमीनी पूर्ण पूणे खरडून गेल्या आहेत या बंधार्यामुळे उस्वद देवठाणा कानडी तळणी हानवतखेडा लिबंखेडा ईचा सासखेडा टाकळखोपा वाघाळा दुधा किर्ला या बारा गावांना या बंधार्याचा फायदा होईल वाघाळा येथील बंधारा हा पंधरा वर्षापासुन नांदुरुस्त आहे पूर्णा पाटी ईचा येथील बंधारा चार पाच वर्षापासून तर देवठाणा उस्वद येथील बंधारा गेल्या द...

आष्टी या माझ्या कर्मभूमीमध्ये, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देता आले हे माझे सौभाग्य- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संपूर्ण जनतेच्या आरोग्याची काळजी घेताना, आयुष्यमान भारत योजने अंतर्गत गोल्डन कार्ड, उपलब्ध करून दिल्याने सामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले ते आष्टी ता परतूर येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळा कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते  पुढे बोलताना ते म्हणाले की, उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये आपण मंत्री असताना समाधान शिबिर घेतले होते जालना जिल्ह्यातील एक लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र उर्वरित लाभार्थ्यांनी उज्वला गॅस योजनेचा फायदा घेण्यासाठी पुढे यावे असे ही या वेळी बोलताना सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आज आष्टी गावाला शुद्ध पिण्याचे पाणी सोडण्याचे भाग्य मला लाभले याचा मला मनस्वी आनंद असून, ज्या गावां पासून मी माझा राजकीय प्रवास सुरू केला त्या गावाला आज मी पाणी देऊ शकलो याचा मला अभिमान असल्याचे यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले पुढे बोलताना...

परतुर येथे श्रीराम जन्मभुमी मंदिर व शिवराज्यभिषेक सोहळा आयोजनाची रविवारी बैठक

Image
परतुर प्रतिनिधी  कैलाश चव्हाण  श्रीराम जन्मभुमी मंदिर व शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी आयोजनाची बैठक परतूर येथे रविवारी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आयोध्या येथे निर्माण होत असलेल्या भव्य श्रीराम जन्मभुमी मंदिर पुर्णत्वाकडे जात आहे. दि 22 जानेवारी 2024 मध्ये ते पुर्ण होवुन रामलल्लाची मुर्ती त्याठिकाणी विराजमान होणार आहे. हा सर्वच हिंदुसाठी आनंदाचा क्षण आहे. तसेच परकीय आक्रमण परतवुन हिंदुचा  सार्वभौम राजा म्हणुन छत्रपती शिवरायाचा "शिवराज्याभिषेक सोहळा  झाला. या घटनेस 6 जुन 2024 रोजी 350 वर्ष पुर्ण होत आहे. या आनंदाच्या क्षणाचा आनंदोत्सव कसा साजरा करायचा याबाबत प्रत्येक हिंदु बांधवापर्यंत श्रीराम जन्मभुमी निर्माण न्यास समितीतर्फ देण्यास आलेल्या अक्षता पोहचविण्याच काम स्वयंसेवक करणार आहेत. दोन्ही आनंदमयी क्षणात जास्तीत जास्त हिंदुबांधवाचा सहभागी व्हावे. यासाठी तालुक्यातील स्वयंसेवक, बजरंगी, हिंदुत्ववादी संलग्न संघटन...

परतूर येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नांना यश

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण      परतूर येथे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी मिळाली असून, माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे गेल्या पाच वर्षापासून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी, परतूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून १०० खाटांच्या रुग्णालयाचा दर्जा परतूर ग्रामीण रुग्णालयाला मिळाला असून, यामुळे ग्रामीण भागातील जालना परभणी कडे जाणाऱ्या गंभीर रुग्णांना परतूर शहरातच उच्च दर्जाचे उपचार उपलब्ध होणार आहेत अशी माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे  पुढे या पत्रकार माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे की, परतूर येथे या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, परतूर तालुक्यातून व शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात त्यामध्ये छत्रपती संभाजी नगर जालना परभणी नांदेड हा एक महामार्ग असून दुसरा महत्त्वपूर्ण शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग असल्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतात त...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी विभागाच्या प्रदेश सचिव पदी शिवाजी भालेकर यांची नियुक्ती.

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ओबीसी विभागाच्या "प्रदेश सचिव" पदी श्री शिवाजी भालेकर यांची नियुक्ती करण्यात आली. आहे . नियुक्ती पत्र आ.रोहित पवार आणि राजेश टोपे यांच्या हस्ते देण्यात आले. शिवाजी भालेकर हे पक्ष बळकटीसाठी व पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षांची ध्येय धोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवत असतात. आणि त्यांचा या पक्षावरील बांधिलकी व कटूब्ध विश्र्वास पाहता त्यांना हे पद देण्यात आले आहे. तसेच त्यांनी पक्ष वाढीसाठी व पक्षाला बळकटी आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करावेत असे दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

नायब तहसील दार विनोद भालेराव यांचा युवासेना च्या वत्तीने सत्कार

Image
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण   परतूर येथे नव्याने रुजू झालेले नायब तहसीलदार विनोद भालेराव यांचा युवा सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला    परतूर येथे तहसील कार्यालय मधे नायब तहसीलदार यांचे पद रिक्त होते त्या जागी रिक्त जागी नायब तहसीलदार विनोद भालेराव यांनी पद्भार घेतला असून त्यांचा परतूर तालूका युवा सेना प्रमुख अविनाश कापसे यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला या वेळी तहसील येथील कर्मचारी पेशकर संतोष पवार,कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनील सींगाडे, दंडेवार , हेलग,ड इतर कर्मचारी उपस्थीत होते

शासनाने केलेले विकास कामे व शासनाच्या योजना घराघरात पोहोचवा- मोहन अग्रवाल

Image
  परतुर/( प्रतिनिधी) कैलाश चव्हाण   रात्री दोन दोन वाजेपर्यंत जागरण करून सामान्य नागरिकांच्या फाइल्सवर सह्या करणारा देशातील एकमेव मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री शिंदे यांनी परतुर तालुक्यासह शहरासाठी कोट्यावधीचा निधी माझ्या माध्यमातून मंजूर केला असून सदर निधी अंतर्गत ग्रामीण भागात व शहरात विविध विकास कामे चालू आहेत. शासनाच्या विविध योजना शिवदूत व बुथ प्रमुखांनी शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवाव्यात, शासनाने केलेले विविध विकास कामे शिवसैनिकांनी नागरिकांना सांगावे, दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने परतुर तालुक्यातील बूथ प्रमुख व शिवदूतास मिठाईवाटप कार्यक्रमास शिवदुत स्नेह मेळावा प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल बोलत होते. पुढे अग्रवाल यांनी सांगितले की राज्याचे मुख्यमंत्रींनी परतुर तालुक्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी दिला व सर्व ठिकाणी विकास कामेही झाले यानंतरही अशाच पद्धतीने विकास कामे सुरू राहतील. यामध्ये मुख्यमंत्री यांनी पाठवलेले मिठाई बॉक्स शिवदूत व बूथ प्रमुखास मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या मेळाव्यास स...

संघ' संस्थेच्या वतीने गरजू महिलांना दिवाळी भेट किराणा सामानाची कीट वाटप ; संस्थेचा सामाजिक उपक्रमाने शुभारंभ

Image
' जालना प्रतिनिधी समाधान खारात 'सोसायटी फॉर सोशल,अँग्रीकल्चरल,नॅचरल ग्रोथ अँड हेल्थ' अर्थात 'संघ' ( SANGH ) या सेवाभावी संस्थेच्या शुभारंभानिमित्त गरजू महिलांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर किराणा कीट वाटप करण्यात आल्या. सिरसवाडी ( ता.जालना) येथे हा उपक्रम नुकताच घेण्यात आला.       यावेळी जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध 'कार्ड' संस्थेचे सचिव पुष्कराज तायडे, 'दैनिक बदलता महाराष्ट्र'चे कार्यकारी संपादक विनोद काळे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.   'संघ' संस्थेचे अध्यक्ष संघपाल वाहूळकर,सचिव वंदना  वाहूळकर, सोमनाथ खळेकर,गजानन गाढे,अमोल लिहीनार,सुयोग कुलकर्णी यांनी ही सेवाभावी संस्था स्थापन केली असून कार्ड संस्थेचे सचिव पुष्कराज तायडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संस्थेचा सामाजिक उपक्रम राबवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी श्री. तायडे, पत्रकार विनोद काळे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी गावातील गरजू महिलांची उपस्थिती होती.

यश प्रायमरी इंग्लिश स्कूल सातोना येथे दिवाळी निमित्त आकाश कंदील कार्यशाळेचे आयोजन

Image
      परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण           दि. ८  रोजी यश ग्रूप चे अध्यक्ष मा. बालासाहेब आकात यांच्या कल्पनेतून दिवाळी सणाशी निगडित आकाश कंदील बनवण्याचा उपक्रम यश प्रायमरी इंग्लीश स्कूल येथे राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवला.          यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सुंदर अशा कलाकृतींचा प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रिन्सिपल शामीर शेख अध्यक्षस्थानी तर चि. यश महेशराव आकात हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी आपल्या स्वहस्ते कागदापासून विविध प्रकारचे व आकारांचे रंगीबेरंगी आकर्षक आकाश कंदील बनवले. यासाठी त्यांना कला शिक्षिका अश्विनी कोळपे , भावना पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच प्रशालेच्या प्रांगणात शिक्षिकांनी सुंदर रांगोळी व दिव्यांची आरास यांनी सर्वांचे लक्ष वेधले.           यावेळी विद्यार्थ्यांना प्रिन्सिपल शामीर शेख यांनी दिवाळी सुट्ट्यांचे नियोजन, विषय शिक्षकांनी दिलेला दिवाळी होमवर्क कसा पूर्...

आशा व गट प्रवर्तकांचा जिल्हा परिषदेसमोर दोन तास रस्ता रोको,मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात    दिनांक 7 नोव्हेंबर रोजी आशा व गट प्रवर्तक यांनी आपल्या न्याय मागण्यासाठी रस्ता रोको करून दोन तास जिल्हा परिषदेसमोर सत्याग्रह आंदोलन केले. व निर्धार केला की,जो पर्यंत मागण्या मान्य केल्याचा शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आशा व गट प्रवर्तक यांचा संप सुरूच राहील. दि. 18 ऑक्टोंबर पासून महाराष्ट्रातील 70 हजाराच्या व 3600 चे गटप्रवर्तक आपल्या न्याय मागण्यासाठी बेमुदत संपावर आहेत. आशा व गटप्रवर्तक अल्प मानधनावर काम करतात. इतर काही राज्यांमध्ये गटप्रवर्तकांना सुपरवायझरचा दर्जा असून त्यांना किमान वेतन मिळते. आणि आशांना पंधरा ते वीस हजार रुपये मानधन मिळते. कोरोना काळात आशाने आपला जीव धोक्यात घालून जनतेला आरोग्य सेवा दिली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेले विशेष भत्ते महाराष्ट्र सरकारने आपल्या आशा व गटप्रवर्तकना दिलेले नाही.यासह स्थानिक मागण्या देखील प्रलंबित आहे.त्या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी आश्वासन देऊनही त्या मागण्या पूर्ण न केल्याने आज सत्याग्रह आंदोलन करण्याची वेळ आली.           यावेळी कामगार नेते,संघटनेचे अध...

मा बागेश्वरी च्या दहाव्या गळीत हंगामाचा मोळी टाकून शुभारंभ.

Image
परतूर. प्रतिनिधी कैलाश चव्हाण    मा बागेश्वरी साखर कारखान्याच्या दहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज दिनांक ६ रोज सोमवारी कारखान्याचे जनरल मॅनेजर रमेश निर्वळ यांच्या हस्ते मोळी टाकून करण्यात आला. मा बागेश्वरी साखर कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज झाला असून मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.    या कारखान्याने गळीत हंगाम २०२२- २३ मध्ये ४ लाख ४१ हजार ३३६.१२७ मे. टन उसाचे गाळप करून साखर पोती उत्पादन ५०२११० क्विंटल होऊन सरासरी साखर उतारा ११.३७ एवढा राहिला याप्रमाणे येणारा निव्वळ एफ आर पी दर रुपये २६७८.४० पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून जाहीर केल्याप्रमाणे कारखान्याने उद्दिष्ट पूर्ण केले. मागील दहा वर्षापासून साखर कारखान्याचे सर्व गळीत हंगाम यशस्वी पणे पूर्ण करून ऊसाला चांगला भाव देण्यात आला आहे. या चालू हंगामात शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन पहिली उचल २२०० रुपये प्रमाणे देण्यात येणार आहे. त्यानंतर बैलपोळा सणासाठी दुसरा हप्ता व दीपावली पूर्वी तिसरा हप्ता निघालेल्या एफ आर पी प्रमाणे दर शेतकऱ्यांना देण्यात येईल मागील गळीत हंगाम २०२२- ३३ पेक्षाही...

ॲड.सुनिल जाधव यांची भाजपा पदवीधर प्रकोष्ट मराठवाडा विभाग सह संयोंजक पदी नियुक्ती...

Image
.परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  पांगरी गोसावी येथील ग्रामीण भागातील तालुका मंठा एका शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित ॲड. सुनिल जाधव यांची मराठवाडा विभागावर नियुक्ती ,अभाविप पूर्व कार्यकर्ते विद्यार्थी चळवळीतुन आलेलं नेतृत्व तसेच यावेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर , सिनेट पदवीधर निवडणुक लढलेले ॲड. सुनिल जाधव यांची नियुक्ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा ना देवेंद्रजी फडणवीस साहेब, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या मान्यतेने मराठवाडा विभाग संयोजक योगेशजी जगताप यांनी ॲड सुनिल जाधव यांची मराठवाडा विभाग भाजपा पदवीधर प्रकोष्ट सह संयोंजक पदी नियुक्ती केलेली आहे .    एका ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना विभागावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल पक्ष श्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करतो. आगामी काळात भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याचा आणि पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि न्याय ,हक्क मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहील.असे नवनियुक्त ॲड. सुनिल जाधव यांनी सांगितले .

शेगाव पंढरपूर दिंडी मार्गा वरील पथदिवे दिवाळीपूर्वी प्रकाशमान होणार आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नांना यश ,आठ दिवसात काम सुरू करण्याचा दिला होता आमदार लोणीकर यांनी कंपनीला इशारा

Image
प्रतिनिधी  कैलाश चव्हाण  शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरील सावंगी गंगा व सृष्टी येथील पुलाच्या कामासह इतर कामे पूर्ण करण्यासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्णनाथ पांचाळ, उपजिल्हाधिकारी मैत्रेवार रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता सुनीता वनवे सुनिता वनवे,परतूर तहसीलदार प्रतिभा गोरे मंठा तहसीलदार रूपा चित्रक, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मठपती , मेघा कंपनीचे कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर सत्यनारायण यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली होती    यावेळी शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरील सावंगी गंगा येथील पुलाचे काम तसेच. श्रीष्टी येथील बंद असलेल्या पुलाचे काम आष्टी तालुका परतूर येथील उर्वरित काम परतुर येथील उर्वरित काम पूर्ण करण्यासंदर्भात तसेच शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरील पथदिवे सुरू करण्यासंदर्भात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी कंपनीला अल्टीमेटम दिला होता या पार्श्वभूमीवर कामाला सुरुवात झाली असून दिवाळीपूर्वी पथदिवे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार लोणीकर यांनी दिली , शेगाव पंढरपूर ...

इंटरनेट बंद असल्यामुळे तळणी परिसरात आनेक घटकावर परीणाम,अन्न त्याग उपोषणाचा तीसरा दिवस

Image
तळणी : ( रवि पाटील)    गेल्या आठ दिवसापासुन आतरवाली सराटी येथे चालू असलेल्या मराठा आरक्षणाचा उठावाचे लोण आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पोहाचले असून त्याचा परीणाम सार्वजनीक व्यवस्थेवर पाहावयास मिळत आहे तळणी हे परीसरातील बाजारपेठेचे मोठे गाव विस बावीस गांवाचे आर्थीक व्यवहार याच ठिकाणावरून चालतात गेल्या दोन दिवसापासुन इंटरनेट सेवा बंद असल्याने बँकीग व्यवहारावर मोठा परीणाम झाल्याने व्यवस्था ठप्प झाली आँनलाईन कामकाज बंद आहे असल्या कारनाने कोट्यवधी रुपयाची उलाढाल ठप्प झाली नियमीत मोबाईल चा वापर करणारी तरुणाई माञ विदर्भाच्या सिमेवर जाऊन मोबाईल बघण्याच्या नादात गर्क होती, तळणी येथे चालू असलेल्या अन्नत्याग उपोषणाचा आजचा तिसरा दिवस नानासाहेब खंदारे हे गेल्या तीन दिवसापासुन अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत, उपोषण स्थळी किर्तन भजन सुरु करण्यात आले, आहे तळणी परीसरातील अंनेक गावातील सकल मराठा समाजातील तरुण या उपोषणात सक्रीय सहभाग घेत आहेत  आज गुरूवार रोजी देवठाणा येथील असख्य मराठा तरुणानी सर्वपक्षीय नेत्याची आठ गावावरून धिडं काढली देवठाणा येथून निघालेली धिडं याञा तळणी येथे ...