Posts

Showing posts from December, 2023

देशात २२ जानेवारीला रामराज्य स्थापन होईल- ह.भ.प.रुपालीताई सवने

Image
प्रतीनीधी समाधान खरात भोकरदन - देशातील तरुणांनी प्रभू श्रीरामांचा आदर्श घ्यावा. देशाने आपल्यासाठी काय केले हा विचार केल्यापेक्षा आपण देशासाठी काय करू शकतो, हा विचार तरुणांनी करावा. तसेच २२ जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिरात रामलल्लांची मूर्ती स्थापन होत आहे. त्या दिवसापासून देशात रामराज्य स्थापन होईल, असे प्रतिपादन ह.भ.प. रुपालीताई सवने यांनी केले.  भोकरदन शहरात स्व.भिकनराव श्रीनिवासराव देशमुख यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त लक्ष्मणराव देशमुख, राम देशमुख यांच्या वतीने ह.भ.प.रुपालीताई सवने परतुरकर यांचे किर्तणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या किर्तनात विष्णु महाराज सास्ते,  गोरक्षनाथ महाराज, शंकर महाराज साबळे, सोमनाथ महाराज सहाने, दत्ता महाराज, नितीन महाराज, संतोष महाराज, साहेबराव बारोकर, प्रभाकर तळेकर  यांच्यासह नागेश्वर बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी त्यांना सहकार्य केले.  पुढे बोलतांना रुपालीताई सवने म्हणाल्या की, नव्या वर्षात 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे. 500 वर्षानंतर राममंदिर लोकार्पणाचा हा अविस्मरणीय प्रस

2020 मधील गुन्ह्या च्या आरोपीस राजस्थान येथुन अटक

जालना प्रतिनिधी समाधान खरात     सन 2020 मध्ये दाखल असलेल्या गुन्हाचे तपासात निष्पन्न झालेल्या आरोपीस अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो जालनाचे पथकाने राजस्थान येथे जाऊन पकडले आहे.  अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो जालना यांचेकडुन उघड चौकशी करून खालील नमुद आरोपीतांनी माहे 07/2011 ते 12/2013 या कालावधीत पंचायत समिती घनसावंगी जि जालना अंतर्गत कुं.पिंपळगाव शिवारातील मग्रारोहयो अंतर्गत विहीरींचे कामासंबंधी संगनमत करून खोटे व कपटाने प्रत्यक्षात न केलेल्या कामाची नोंद हजेरी पुस्तकात घेऊन बनावट व खोटी पुस्तके तयार करून वेळोवेळी रकमा मंजुर करुन घेतली वा शासनाचे 9,65,952 रूपयांचे नुकसान करून स्वत:चा व इतरांचा फायदा करून घेतला या वरुन दि. 21.07.2020 रोजी पोलीस ठाणे घनसावंगी जि.जालना गु र नं 271/2020 कलम 13(1)(क), सह 13(2) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 सह कलम 420, 467, 468, 471, 114,109, 201, 34 IPC प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात  आरोपी नामे  1. शे.शकील मो खलील, तत्कालीन शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, पं स घनसावंगी  2. धोंडीभाऊ भाऊराम काळे, तत्कालीन ग्रामसेवक कुं.पिंपळगाव  3. अंशीराम भिमराव

युवांनी अंनिसचे सभासद व्हावे-- डॉ. ठकसेन गोराणे

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात जालना -महाराष्ट्र अंनिसच्या जालना जिल्हा व शहर शाखांचे कार्यकर्ते ,पदाधिकारी यांची बैठक नुकतीच जालना रेल्वे स्टेशन रोडवरील आपुलकी बेघर निवारा केंद्रात संपन्न झाली. त्यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे म्हणाले की, संघटितपणे समाजातील अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे आणि समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक करणे असे काम मागील ३५वर्षांपासून महाराष्ट्र अंनिस समाजात करीत आहे. त्याचबरोबर व्यक्तीचे व्यक्तिमत्व विवेकी घडण्यासाठीही या कृतिशील विचारांचा फार मोठा उपयोग होतो, म्हणून या कामांमध्ये युवा वर्गाने जाणिवपूर्वक सहभागी होण्यासाठी अंनिसचे सभासद व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले की अंनिसचे सभासद होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. देवाधर्माच्या नावाने होणारे शोषण, फसवणूक व दिशाभूल याला अंनिस विरोध करते, म्हणून या विचारांचा स्वतःबरोबरच कुटुंबाला आणि समाजालाही मोठा उपयोग होतो.     या बैठकीत संघटनात्मक व उपक्रमात्मक कामाबद्दल चर्चा होऊन नियोजन करण्

गोर सेनेचा वाटूर फाट्यावर रास्ता रोको, दोन तास वाहतूक ठप्प : विमुक्त जातीतील घुसखोरी थांबविण्याची मागणी

Image
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण    परतूर - विमुक्त जाती अ' प्रवर्गातील इतर जातीची घुसखोरी थांबविण्यात यावी, बनावट जात प्रमाणपत्राबाबत विशेष तपासणी पथकाची स्थापना करण्यात यावी, या इतर मागण्यांसाठी गोर सेनेच्या वतीने गुरूवारी (दि. २८) जिल्हा- नांदेड महामार्गावरील वाटूर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण, अविनाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बंजारा समाजातील महिला पारंपारिक वेशभूषा धारण करून या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. विमुक्त जाती 'अ 'प्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थ्यांसह खोटे प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक स्थापन करण्यात यावे, संपूर्ण महाराष्ट्रत जिल्हा ठिकाणी जिल्हा जात वैधता पडताळणी समितीम ध्ये वि.जा. (अ) प्रर्वगातील एका तज्ञ व्यक्तीची शासकीय प्रतिनिधी म्हणून नेमणूक करावी, २४ नॉव्हेबर २०१७ च्या महाराष्ट्र शास

मुख्यधीकारी अभिषेक परदेशी यांच्या अव्हानाला प्रतिसाद,नागरीकांनी स्वःत हून काढले अतिक्रमण

Image
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण     शहरातील न.प. परतूर येथील मुख्यधीकारी अभिषेक परदेशी यांनी मांगळवार रोजी नागरिकांना अतिक्रमण स्वःत काढून घेण्या करीता आवाहान केले होते  त्यांच्या आवाहानाला प्रतीसाद देत परतूर शहरातील नारारीकांनी स्वःत हून नाल्या वरील अतिक्रमण काढून घेतले व शहरातील आ.लोणीकर यांच्या माध्यमातून होणाऱ्या रस्त्याचे कामा संदर्भात समाधान व्यक्त केले व शहरातील मुख्य रस्त्या वरील दोन्ही बाजूने नाल्या व्हाव्या तसेच रस्त्यावरील लागणारे हातगाड्या साठी योग्य जागा द्यावी व त्यांनी रस्त्यावर हातगाडे लावू नये आशी अपेक्षा शहरातील नागरीकांनी व्यक्त केली आहे

राजेगाव येथुन तीन बैल चोरीला ,चोरीच्या घटनेने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

Image
घनसावंगी -- प्रतिनिधी तालुक्यांतील राजेगावं शिवारात शेत गट क्र. सतरा मध्ये गोठ्यात बांधलेले तीन बैल चोरीला गेल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या घटनेने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. शेतकरी सचिन सुरेश उगले यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की राजेगांव शिवारात शेत गट क्र. 17 मधील शेतामध्ये जनावराचा गोठा आहे. तिथे जनावरे नेहमी बांधतो दी 25 डिसेंबर 2023 रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारस  गोठ्यावर चक्कर मारुन घरी आले होतो. दि 26 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतामध्ये गेलो आसता गोठ्यात बांधलेल्या तीन बैल दिसुन आले नाही. बैलाच्या गळ्यातील घागरमाळ तुटुन खाली पडलेला दिसल्या  तीन बैलाचा आजुबाजुला शोध घेतला असता मिळुन आले नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी एक लाल रंगाचा, आणि दोन पाढ-या रंगाचे साठ हजार रुपये किमतीचे बैल कोणीतरी अज्ञात चोरट्याने शेतातील गोठ्यतून चोरुन घेऊन गेले आहे.      या प्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकों  वैराळ हे करीत आहेत. या घटनेने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केल

मेन रोड वरील अतिक्रम स्वःता काढून घ्यावे -मुख्यधीकारी अभीषेक परदेशी

Image
 परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  आज परतूर शहरात मेन रोडची नगर परिषद चे मुख्यधीकारी अभिषेक परदशी यांनी पाहानी केली यावेळी त्यांनी व्यापाऱ्या ना सुचना केल्या की जर कोणाचे अतिक्रमण असतील तर त्यांनी स्वःताहून काढून घ्यावे    परतूर शहरात मेन रोड राजू मुंदडा यांच्या पानपट्टी पासून पुढील रस्ता राहीलेला असून या राहीलेल्या रस्त्याची पाहनी केली व व्यापाऱ्याना सुचना केल्या की येत्या 29 की डींसेबर रोजी शहरातील या राहीलेल्या रस्त्याच्या कामाचे उद्घघाटन आमदार बबनराव लोणीकर हे करणार असून हया रस्त्यावर ज्यांचे अतिक्रमण असतील,रोड वर काही पाट्या असतील,काही साहित्य असतील तर ते तातडीने स्वतःहून काढून घ्यावे नसता न.प.अतीक्रमण काढेल व रस्त्यावरील साहित्य जप्त करील असे शेवटी सुचना देताना न.प. मुख्यधीकारी अभिषेक परदेशी यांनी दिल्या     यावेळी त्याच्या सोबत अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी तसेच फायरमन अनील पारीख, स्वच्छता निरीक्षक रवी देशपांडे,सुरेश अर्सुल ,आदी होते

शिकलकरी मोहल्यातून तलवार चाकू जप्त.परतूर पोलिसांचे शहरात कोंबींग ऑपरेशन

Image
परतूर – प्रतिंनिधी कैलाश चव्हाण  येथील शिकलकरी मोहल्ल्यात पोलिसांनी कोंबींग ऑपरेशन राबवून दोघा जणांच्या घरातून पोलिसांनी तलवारी आणि चाकू जप्त त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी कोंबींग ऑपरेशन दरम्यान सोन्यासिंग प्रेमसिंग टाक, हरदीपसिंग हरजितसिंग जुनी दोन्ही रा. शिकलकरी मोहला परतूर यांचे घरात तलवार आणि चाकू मिळून आले आहे. या त्यांचेवर भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.     सदरची कारवाई पोलिस अधीक्षक शैलेस बलकवडे , उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश बुधवंत यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.टी. सुरवसे, पोऊपनि यू.बी.चव्हाण, पोऊपनि विठ्ठल केंद्रे, पोना अशोक गाढवे, पोका ज्ञानेश्वर वाघ, पोका अच्युत चव्हाण, पोका शामूवेल गायकवाड, पोका दशरथ गोपनवाड, पोका दिपक आढे, पोका संगीता मांडे, होमगार्ड कपिल आखाडे, अर्जुन बोंडगे यांनी कारवाई केली.

४०० खासदार आणि २०० आमदारांसाठी युवा मोर्चा ने सदैव प्रयत्नशील राहणे आवश्यक - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन,आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत युवा मोर्चाची भूमिका निर्णायक - प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विकसनशील असलेला भारत विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत आहे २०१४ व २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पूर्ण बहुमतातील सरकार देशात स्थापन केले त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या सर्वांच्या समोर असून तिसऱ्यांदा पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ४०० खासदार आणि महाराष्ट्रात २०० आमदार निवडून आणण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक असून आपल्या मेहनतीच्या बळावर तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात सरकार स्थापन होईल असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी केले परतुर येथे आयोजित भारतीय जनता युवा मोर्चा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्त पत्र वाटप व सत्कार कार्यक्रम प्रसंगी श्री लोणीकर बोलत होते यावेळी मंचावर भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री राहुल लोणीकर युवा मोर्चा जालना जिल

भारतीय जनता युवा मोर्चा ची जालना जिल्हा कार्यकारणी जाहीर

जालना प्रतिनिधी समाधान खरात  माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या सूचनेवरून भाजप जिल्हाध्यक्ष संपत टकले यांनी युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे   यामध्ये सरचिटणीस पदी प्रकाश टकले विक्रम उफाड विजय खटके शिवराज नारियल वाले विकास पालवे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी रामेश्वर दादाराव काळे रोहन विलासराव आखात महादेव बबनराव वाघमारे विवेक किसनराव काकडी गणेश रामेश्वर कदम रामेश्वर बाबासाहेब सोळंके संदीप देवराव हिवराळे गजानन मुरलीधर उफाड तुकाराम गणेशराव सोळंके सचिन बळीराम राठोड अनिल भील्लू चव्हाण अमोल गणेशराव मोरे महादेव एकनाथ आटोळे आश्विनी विष्णू आंधळे, सुनयना शेषनारायण दवणे यांची उपाध्यक्षपदी तर विलास निवृत्तीराव भुतेकर शरद रामेश्वर जी पाटील ज्ञानेश्वर उद्धवराव गोंडगे, अमोल अरुणराव जोशी, बाळासाहेब अभिमन्यू बहिर ,जयराम शाहूराव मिसाळ रामदास भानुदास ढाकणे, विलास तुकाराम चव्हाण लहू नुरा आढे, मजेद खा इब्राहिम खा पठाण मयुरी संजय तोर, सविता धोंडीराम नवल कृष्णा परमेश्वर यादव, देविदास बाबुराव करडे, सुरेश काशिनाथ पोट

जालना पीपल्स बँक निवडणूक; पत्रकार विकासकुमार बागडी यांचा अर्ज मंजूर

Image
जालना प्रतिनीधी (समाधान खरात)  येथील पत्रकार वीकास बागडी यांनी दाखल केलेला अर्ज निवडणूक अधिकार्‍यांनी मंजूर केला असून श्री. बागडी यांनी आपल्या प्रचारास प्रारंभ देखील केला आहे.     याबाबत अधिक माहिती अशी की, जालना पीपल्स बँक निवडणूकीत यावेळी आपण आपले भविष्य आजमाविण्याचा निर्धार श्री. बागडी यांनी केला होता. त्यानुसार त्यांनी अनुसूचित जाती- जमाती प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज निवडणूक अधिकार्‍यांनी मंजूर केल्यामुळे आता श्री. बागडी यांनी आपल्या प्रचारास सुरुवात देखील केली आहे. जालना पीपल्स बँक ही व्यापार्‍यांची बँक असली तरी या ठिकाणी सर्वसामान्य नागरीकांचे कामे झाली पाहिजेत, त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे म्हणून आपण या निवडणूकीत उतरलो असल्याचे श्री. बागडी यानी म्हटले आहे.

परभणी लोकसभा मतदार संघ शिवसेनेचाच आणि शिवसेनाच पुन्हा भगवा फडकणार - सुभाष साळुंखे

Image
  परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण     परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच आणि शिवसेनाच पुन्हा भगवा फडकणार असून मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांमध्येही शिवसेनेचेच उमेदवार निवडून येतील असे परतुर येथील शिवदुत, बूथ प्रमुख, व शिवसेना पदाधिकारी मेळाव्या प्रसंगी परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्ष निरीक्षक सुभाष साळुंखे यांनी आपले वीचार मांडले    परतुर येथे परतुर /मंठा विधानसभा शिवसेनेच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला असता अध्यक्ष म्हणून परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्ष निरीक्षक सुभाष साळुंखे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर ,शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, महिला आघाडी प्रमुख कालींदाताई ढगे युवा सेेेना जिल्हा प्रमुख अजय कदम हे होते. पूढे बोलताना साळुंखे म्हणाले की, परभणी लोकसभा मतदारसंघ गेल्या कित्येक वर्षापासून शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे या ठिकाणी शिवसेनेचेच उमेदवार निवडून आलेले आहेत आणि आताही शिवसेनेचाच उमेदवार या परभणी मतदार संघाला दिला जाणार आहे यामध्ये

ऑल इंडिया राष्ट्रीय कराटे स्पर्धेत परतूर च्या 24 विद्यार्थ्यांना यश,

Image
परतूर प्रतिनीधी संतोष शर्मा   ऑल     इंडिया राष्ट्रीय कराटे स्पर्धा दिनांक 9 व 10 डिसें 2023 रोजी  मराठा मंदिर भवन जळगाव रोड औरंगाबाद येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत परतूरच्या 24 खेळाडूना यश मिळाले    या मधे  पायल सोपान काकडे, अक्षदा लक्ष्मण घायाळ, मनस्वी दुष्यंत इगारे, धनश्री राजेश घारे, अश्विनी दिनकर जोशी, साक्षी भारत घारे, श्रद्धा भागवत ग्राम, पूजा सुरेश गोरे, चंचल वासुदेव दाते,अनिकेत सचिन काळे, सोहम संतोष जाधव, समाधान जगन्नाथ काकडे, जगजीत सिंग बलजीत सिंग जुनी, यावरील तेरा विद्यार्थ्यांनी आपापल्या गटामध्ये मुंबई कर्नाटक आंध्र प्रदेश भुसावळ नागपूर अशा मोठ्या शहरावर व राज्यावर मात करून गोल्ड मेडल पटकावले आहे, आकाशी अशोक खताळ, सानिका सोमेश घारे, श्रावणी सोमेश घारे, वरील तीन विद्यार्थिनींनी आपापल्या गटामध्ये अहमदनगर लातूर सांगली कोल्हापूर पुणे अशा मोठमोठ्या शहरांवर मात करून सिल्वर मेडल पटकावले आहे, अभिषेक अशोक घारे, नेहा सोमेश निर्वळ, आरती पद्माकर घारे, साक्षी प्रकाश तांबे, गीता अशोक काकडे, कोमल सिंग तुषार सिंग पाल, यावरील सहा विद्यार्थ्यांनी आपापल्या गटात अमरावती अकोला वर्

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील- संतराम आखाडे : गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   ,दि.१४ - पीकविमा,दुष्काळी अनुदान, घरकुल योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविणे यासह विविध समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असून या समस्या जाणून घेण्यासाठी थेट गावपातळीवर जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संतराम आखाडे यांनी एका पत्रकाद्वारे दिली.    यासंदर्भात आखाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गावागावात शेतकऱ्यांचे,सुशिक्षित बेरोजगार युवकांचे अनेक प्रश्न यासह अनेक प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहेत.पीक विमा,दुष्काळी अनुदान, अतिवृष्टी अनुदान, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत.ग्रामीण भागासह शहरी भागातील घरकुल योजना, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, अपंगांचे प्रश्न,विविध कर्ज प्रकरणे, शिधापत्रिका असे एक ना अनेक प्रश्न आहेत.       या प्रश्नांवर चर्चा करणार असून हे सर्व प्रश्न आगामी काळात मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. यासाठी दोन दिवसांचा दौरा करणार असून १५ डिसेंबर रोजी आष्टी,कोकाटे हदगाव व श्रीष्टी गटाची तर दि.१६ रोजी सातोना व

शेषराव धुमाळ यांचे निधन

Image
परतूर(प्रतीनीधी) कैलाश चव्हाण     येथील रेणूका नगर पारडगाव रोड रहीवाशी शेषराव धुमाळ यांचे वयाच्या 65 व्या वर्षी निधन      शेषराव मारोतराव धुमाळ हे परतूर येथील रेणूका नगर पारडगाव रोड येथील रहीवासी असून वयाच्या 65 व्या वर्षी अल्पशा अजाराने त्यांचे दि.12 डींसेबर मंगळवारी रात्री 11.30 च्या दरम्यान निधन झाले त्यांचा अत्यंवीधी दि. 13 रोजी परतूर येथील स्मशान भुमीत सकाळी11.00 वा.करण्यात आले त्यांच्या पश्चात भाऊ,पत्नी, चार मुल,सुना, नांतवड आसा मोठा परीवार आहे     ते एमरासबी चे निवृत कर्मचारी असून वारकरी संप्रदायचे  होते त्यांच्या अत्यंवीधी मोठा गोतावळा,समाज बांधव उपस्थीत होता

बंधार्याचे नित्कृष्ट काम शेतकर्याचे जिल्हाधिकार्याना निवेदन

Image
तळणी : प्रतिनिधी तळणी ( रवी पाटील)         येथून जवळच असलेल्या देवठाणा शिवारात होत असलेल्या बंधार्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याने या बंधार्याच्या कामाची स्वःत जिल्हाधिकार्यानी पाहणी करून संबंधीत ठेकेदारावर योग्य ति कारवाई करवी असे  दिलेेल्या निवेदनात  नमूद केले आहे   बंधार्या शेजारील शेतकर्यानी ठेकेदाराला तुम्ही नित्कृष्ट दर्जाचे काम का करता म्हणुन विचारणा केली असता ठेकेदाराने शेतकर्याना . तुला एका तासात गुंडे आनुन उचलुन नेईल व जिवे मारून टाकीन अशा प्रकारची धमकी दिल्याने धास्तावलेल्या शेतकर्यानी जिल्हाधिकार्याकडे धाव घेऊन सबंधीत कामाच्या दर्जाची पाहणी करण्या संबंधीची विनंती या निवेदनात केली आहे कामाचा दर्जा चांगला ठेवा यासदर्भात शेतकर्यानी अनेक वेळा ठेकेदाराला सांगून सुध्दा या बंधार्याचे काम नित्कृष्ट झाले आहे  संबंधीत शेतकरी हे सेनगाव तालुक्यातील असुन त्याच्या जमीनी या देवठाणा . शिवारात आहे गट न ४६० / ४६१/ ४६२/४६३ / ४५४ / ४८१ / या गट नबर मध्ये संबंधीत शेतकर्याच्या जमीनी आहेत संबंधीत बंधार्याचे काम मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने मजूर करण्य

भारतातील सर्वात मोठी लक्ष छावणी आणि तोफखाना ज्यांनी उभा केला त्यांचे नाव चक्रवती महाराजा यशवंतराव होळकर........

Image
प्रतिनिधी समाधान खरत   दि 03/12/2023 बीड शहरात राजे यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंतीचे आयोजन प्रकाश  सोनसळे (अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र) राज्य यांनी केले होते. ‌ राजे यशवंतराव होळकर यांचा इतिहास मोठा असून त्यांनी इंग्रजा विरुद्ध मोठमोठाल्या लढाई जिंकून मोठा इतिहास घडवला असा स्वातंत्र्य योद्धा म्हणून महाराजा यशवंतराव होळकर यांची ओळख आहे.    यशवंतरावांचा जन्म ३ डिसेंबर १७७६ रोजी वाफगाव जिल्हा पुणे येथील भुईकोट किल्ला येथे झाला.  भारतातील सर्वात मोठी लष्कर छावणी आणि तोफखाना उभा करणारे चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर असुन इतिहासकारांनी एकदा मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात असलेल्या. भानपुरा-रामपुरा-हिंगलाजगड-गांधीसागर भागात जावून इतिहासाची अवशेष शोधावीत देशातील सर्वात मोठी लष्करी छावणी महाराजा यशवंतराव होळकर यांनी केली होती. तर नावली गावात मोठा तोफखाना तयार करुन त्यांनी तोफा तयार केल्या होत्या इंग्रजांचा समुळ नायनाट करण्यासाठी यशवंतराव महाराजांनी मोठी मोहीम हाती घेत तोफखाना सुरू करुन स्वतः तोफखान्यात तोपचीच्या खांद्याला खांदा देत काम करीत होते.कोणत