Posts

Showing posts from March, 2023

भाजपा -शिवसेनेतर्फे 30 पासून राज्यव्यापी सावरकर गौरव यात्रा. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची माहिती ,स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी काढण्यात येणार गौरव यात्रा

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात ३० मार्च पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने तर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री दत्ता आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली. ही यात्रा ६ एप्रिल पर्यंत चालणार आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.     राहुल गांधी व काँग्रेस च्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावीच, असे आव्हानही आ. बबनराव लोणीकर यांनी दिले.  राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांतून सावरकर गौरव यात्रा प्रवास करेल. ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा - शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत.   उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून

मोहन अग्रवाल यांच्या प्रयत्नामुळे मंजुर झालेल्या सभा मंडपाचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते उद्घाटन

Image
 परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूर करण्यात आलेल्या परतुर येथील गाव भागातील राम गल्ली व बागल गल्ली येथील सभा मंडपाचे उद्घाटन राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी भाजप युवा मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, नगरसेवक संदीप बाहेकर ,प्रकाश चव्हाण ,कृष्णा आरगडे, भगवानराव मोरे ,डॉ.संजय पुरी अंकुशराव बागल, श्रीराम राठोड, अशोक मसलकर, एँड अभय जवळेकर ,प्रकाश दीक्षित, बालाजी सांगुळे ,गोविंद सातोणकर, लक्ष्मणराव पवार, सोनू अग्रवाल, शत्रुघन कणसे, लक्ष्मीकांत कवडी ,रितेश अग्रवाल, अशोक उबाळे ,कल्याण बागल, वैजनाथ बागल, शेषराव बागल ,विठ्ठल कुलकर्णी ,खंडू कुलकर्णी,शिवसेना तालुकाप्रमुख अमोल सुरूंग, शहर प्रमुख दीपक हिवाळे, शिवाजी तरवटे, अविनाश कापसे,राजेभाऊ मुळे,मधुकर निलेवाड, विष्णू जगताप व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

श्री समर्थ माध्य. विद्यालयात मुलींना मोफत सायकल वाटप.

Image
 परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  पाटोदा [ माव ] येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना मोफत सायकल चे वितरण करण्यात. दरम्यान मुख्याध्यापक श्री सुरेश पाटोदकर यांनीसांगीतले की , शासनाची ही अत्यंत महत्वाकांशी योजना असुन. शाळेपासुन तिन किलोमीटर अंतरावरुन पायी चालत येणार्या मुलींना या योजणे अंतर्गत मोफत सायकल दिल्या जाते. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्यासाठी या योजणेचा खुप फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले . शासनाकडुन मोफत सायकल मिळाल्यामुळे पायी चालत येण्याचे श्रम वाचतात व मुली दररोज ऊत्साहाने शाळेत ऊपस्थीत राहतात तसेच मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाणही कमी होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन केले.      गटसाधन केंद्र परतुर चे गटशिक्षणाधीकारी श्री साबळे साहेब , गट समन्वयक श्री कल्याणराव बागल , श्री काटमोडेसाहेब , केंद्रप्रमुख श्री थोटे सर यांनी सायकल प्राप्तीसाठी मार्गदर्शन केले.     समर्थ शिक्षण प्रसारक' अध्यक्ष माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री बबनरावजी लोणीकर साहेब यांनी सर्व मुलींचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.

शेतकरी रेशन कार्ड लाभार्थ्यांना धन्याऐजवजी मिळणार मानधन परतूर:लाभार्थ्यांनी कागदपत्रे रास्त भाव धान्यदुकानदारा कडे जमा करावी-नायब तहसिलदार राजेंद्र धुमाळl

परतूर/प्रतिनिधी कैलाश चव्हाण  महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठीच्या मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये मोठमोठ्या अनेक घोषणांचा सामावेश आहे. त्याचबरोबर आता केशरी रेशनधारक शेतकऱ्यांना मिळणारे धान्य आता बंद होणार असून त्याऐवजी त्यांना थेट पैसे मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली. यामुळे विपत्तीग्रस्त केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम दिली जाणार आहे. त्यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यावर पैसे दिले जाणार आहेत. रेशनऐवजी आता मिळणार थेट पैसेया शेतकऱ्यांना केशरी रेशनधारकांना आता थेट त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात पैसे मिळणार आहेत.प्रति लाभार्थीं कुटूंब प्रमुखाला महिन्याला १५० प्रतीवर्षी १८०० रूपये थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार येणार आहेत. केशरी रेशन कार्डधारकांना अन्नधान्याऐवजी दरमहा प्रती लाभार्थी 150 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत देण्यात येणारी रोख रक्कम ही महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार कार्डशी लिंक असलेल्

परतूरकरांनी राम नवमी उत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी-सावता काळे

Image
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण  30 मार्च रोजी परतूर शहरात प्रभू श्री राम नमवी निम्मित विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येणार आहेत.  सांय. ६ वाजता महादेव मंदीर मोंढा येथे भव्य महारतीचे आयोजन करण्यात आले असून परतूर शहरात प्रथमच भव्य ७ फुटी श्री राम यांची फायबर पासून बनवलेली मूर्ती तसेच लेजर लाईट अँड ढोल ताशा पथकाचे आकर्षण असणार आहे.    30 मार्च रोजी राम नमवीच्या दिवशी सायंकाळी 4 वाजता छात्रपती संभाजी नगर उढाण पूल ते नारायण दादा पवार चौक भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे या मिरवणुकीत लेझिम पथक, भजनी मंडळ, इत्यादी विशेष आकर्षण असणार आहे. तरी जास्तीत जास्त परतूरकरानी श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विश्व हिदू परिषदचे सावता काळे यांनी केले आहे

जालनेकरांनी राम नवमी उत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी- राम अवघड़

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  येत्या 29 मार्च आणि 30 मार्च रोजी जालना शहरात प्रभू श्री राम नमवी निम्मित विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येणार आहेत. यात 29 मार्च रोजी अंबड चौफुली येथे स्थानिक मित्र मंडळातर्फे भव्य महारतीचे आयोजन करण्यात आले असून जालना शहरात प्रथमच भव्य 11 फुटी श्री राम यांची पिओपी पासून बनवलेली मूर्ती तसेच लेजर लाईट अँड साऊंड विशेष आकर्षण असणार आहे. तसेच येत्या 30 मार्च रोजी राम नमवीच्या दिवशी सकाळी 9:30 वाजता चंदनझिरा ते श्री राम मंदिर बडी सडक भव्य मोटार सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता गांधी चमन ते श्री राम मंदिर बडी सडक भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे या मिरवणुकीत लेझिम पथक, भजनी मंडळ, मल्लखांब इत्यादी विशेष आकर्षण असणार आहे. तरी जास्तीत जास्त जालनेकर श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात येत आहे.

उस्वद येथे अंखंड हरीनाम सप्ताह मधे शिवमहापूराणाचे आयोजन

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील      येथून जवळच असलेल्या उस्वद येथे चालू असललेल्या अंखंड हरीनाम सप्ताह मधे शिवमहापूराणाचे आयोजन करण्यात आले कथेच्या दुसऱ्या दिवशी महाराजानी शिव महापूराणातील अनेक दाखले देऊन मञ मुग्ध केले  मनुष्याने त्याच्या आयुष्यात शिवभक्तीचे अनुष्ठान केले पाहीजे शिव आराधना मनुष्याच्या सांसारीक आयुष्यातील एक गरज असली पाहीजे सध्या शिवाची उपासना मोठया प्रमाणात चालू आहे शिव आपल्या सगळ्यांची आराध्य दैवत असून या शिवाच्या साधनेत सगळ्या देवी देवतांचे पूजन व त्या सगळ्यांची आराधना होत असते भवरोगापासून मनुष्याला जर मुक्ती मिळवायची असेल तर त्याने शिवसाधनेची कास धरणे गरजे आहे भवरोगाची मुक्ती करण्यासाठीच आपण या शिव महापूराण कथेच्या दरबारात बसलो आहे प्रतेक मनुष्या जीवनात काही ना काही दुःख हे आहेच ते दुःख नाहीसे करायचे असेल तर शिवनामस्मरणाचा स्वीकार मनुष्याला करावाच लागेल तरच त्याला त्याच्या प्रांपचीक आयुष्यात सुखाची प्राप्ती झाल्याचा अनुभव येणार नाही  बाष्कल नावाचाबिदूंक नावाच्या राजाच्या पत्नी चंचूंला बिंदूक नावाचा राजा हा साधू वृत्तीने त्याचा राज्यकारभार चालवत अस

आपत्यकालीन लग्न चिंता नको 37 मुहूर्त....जिल्ह्यातील विविध इच्छुकांची जुळवाजुळव सुरू

Image
सातोना प्रतिनिधी पांडुरंग शिंदे काही अपत्यकालीन कारण असल्यास अगदी चतुर्मासातही लग्न करता येते. त्यामुळे आता लग्न मुहूर्त निश्चित करण्यासाठी विवाह इच्छुकांची जुळवा जुळव सुरू आहे. यासाठी मंगल कार्यालयाचे लॉन्स केटरिंग ब्रँड पथक घोडा सजावट अशा विविध बाबींनी प्राधान्य देण्यासाठी आधी लग्न मुहूर्त निश्चित केले जात आहेत. त्यानुसार वधू-वरांच्या कुटुंबाकडून सर्व तयारी केली जात आहे.चतुर्मासात काही लग्न मुहूर्त असल्याने अनेकांची आता लग्नाचा बार ओढण्यासाठी नियोजन केले आहे. आपत्यकालीन लग्नाचा मुहूर्ता कोणासाठी चतुर्मासात आपत्तीकालीन विवाह मुहूर्त देण्यात आले आहेत. ज्यांचे आधीच लग्न ठरले आहे किंवा साखरपुडा झाला आहे घरात कोणी आजारी असेल किंवा या परिस्थितीतील लग्न लावायचे आहे अशांनी आपत्तीकालीन विवाह करावा काही घरगुती अडचण असल्यास आपत्तीकालीन विवाह करावा. एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 37 आपत्तीकालीन लग्न तिथी यंदा लग्न तिथी कमी असली तरी अधिक मास चतुर्मास काळातही लग्न करता येणार आहेत त्यासाठी दिवाळीनंतर तुळशीच्या विवाहाची वाट पाहावी लागणार नाही एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान आपत्तीका

लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयायात मानव विकास अंतर्गत 88 मुलींना सायकल चे वाटप

Image
परतूर ता.27 प्रतिनिधी कैलाश चव्हाण      परतूर येथील लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयाय मानव विकास अंतर्गत 88 मुलींना सायकल चे वाटप संस्थेचे सचिव कपिल आकात यांच्या हस्ते दि.25 रोजी करण्यात आले. या वेळी पोलीस निरक्षक शामसुंदर कौठाळे, माजी नगराध्यक्ष विनायक काळे प्रा. डॉ. भारत खंदारे, विलास पौळ यांची प्रमुख उपस्थिती होती.     ग्रामीण भागातील मुलींची पायपीट थांबावी व मुलींना वेळेवर शाळेत पोहचून ज्ञान ग्रहण करता यावे यासाठी केंद्रशासनाकडून इयत्ता आठवी च्या मुलींना मानव विकास अंतर्गत मोफत सायकलीचे वाटप करण्यात येते. या अनुषंगाने लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयातील 88मुलींना सायकालीचे वाटप करण्यात आले. या वेळी अंकुश तेलगड, विजय राखे, अखिल काजी, सचिन खरात,इजरान कुरेशी, शबीर शैख, संदीप वाघ,भालेराव सर, इसरार खतीब, मुख्यध्यापक संजय जाधव, रामराव घुगे, श्याम कबाडी, कैलास खंदारे, रामप्रसाद नवल, अनिल काळे, सुरेश मसलकर, सचिन कांगणे, बळीराम नवल, श्रीमती व्रदा डक, श्रीमती स्वरा देशपांडे, सुभाष बरकूले, राजाभाऊ वडेकर आदी उपस्थित होते. कार्यकामाचे सूत्र संचालन योगेश बरिदे यांनी केले तर आ

देशासाठी प्रानांची आहुती देणाऱ्या परिवाराचे सदस्य राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे हे दुर्दव्य! काँग्रेसच्या वतीने निषेध निदर्शनात मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी खंत व्यक्त केली.

Image
परतूर/प्रतिनिधी कैलाश चव्हाण                देशाच्या सेवेसाठी एक नव्हे तर दोन सदस्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अशा परिवारातील राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे हे लोकशाहीला घातक असून हे दुर्दवी असल्याचे प्रतिपादन मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी व्यक्त केली. खा.राहुल गांधी यांच्या रद्द केलेल्या खासदारिकीच्या निषेथ करत आज दिनांक 26 मार्च 2023 रोजी काँग्रेसच्या वतीने आयोजित निषेध निदर्शनात ते बोलत होते. यावेळी मा.आ.सुरेशकुमार जेथलिया, अन्वर बापू देशमुख, नितीनकुमार जेथलिया, बाळु काका आकात, बाबासाहेब गाडगे, इंद्रजित घनवट, संतोष दिंडे, सादेक बापू देशमुख, निळकंठ तौर,माउली तनपुरे, सुखलालाजी राठोड, एजाज जमीनदार, दादारावजी खोसे,बाळू काका ढवळे, बाजीराव खरात, मंजुळदास सोळंके,सचिन लिपने,विकास खुळे, श्रीरंगराव मोगरे,दत्ताकाका तौर, पांडू आबा कुरधने, रुस्तुम राव राजबिंडे, आणिकराव ढवले, उद्धवराव बोनगे, अशोकराव खरात, अर्जुन बरकुले,इंद्रजित डवले, बाळासाहेब भदर्गे,अण्णासाहेब लिपने आदींची उपस्तीती होती.  मोंढा भागातील काँग्रेस संपर्क कार्यालय परिसरात या निषेध निदर्शनात पुढे बोलताना जेथल

कृषी बाजार समिती निवडणूक युवा ने लढवावी - सचिन खरात (ता.अध्यक्ष शिवसंग्राम)

Image
 परतुर । प्रतिनिधी कैलाश चव्हाण          परतुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आता युवा शेतकरी पुत्रांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी अन् सुलतानी दोन्ही संकटे ओढवत असताना शेतकरी पुत्रांनी हक्काच्या कृषी बाजार समिती व शेतकरी हित चळवळ उभा करावी परतुर बाजार समितीत शेतकऱ्यांच्या बाबत समाधानकारक असे काहीच काम होत नाही, शेतकऱ्यांच्या हितासाठी आता शेतकरी युवा पुत्रांनी पुढाकार घेतला असून शेतकरी कृषी बाजार समितीची निवडणूक लढवावे असे आव्हान शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष सचिन खरात यांनी केले. कृषी बाजार समितीमध्ये गेल्या काही काळापासून निवडक व्यक्तींची सत्ता आहे. या ठिकाणी अपहार, असुविधा या बाबी वारंवार पुढे आलेल्या आहेत. शेतकऱ्यांना बाजार समितीत विश्राम व्यवस्था चांगली नाही, बाजार समिती इमारती बांधकाम झालेले आहे मात्र तेथील परिस्थिती मरणासन्न अवस्थेत आहे. बाजार समिती शेतकऱ्यांचा विश्वास संचालक मंडळाच्या दुर्लक्षामुळे जिंकू शकलेली नाही म्हणून आता शेतकऱ्यांच्या पोरांनी पुढाकार घेने आवश्यक आहे संपूर्ण जागेवर युवा शेतकरी उभे करून विजयी करण्याचा संकल्प केला असल्याचे शिवसंग्रामचे

विस्तार अधिकारी डॉ. अंजली कोळकर यांची राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कारासाठी निवड.

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  विस्तार अधिकारी तथा पदवीधर शिक्षिका यांची अविष्कार सोशल एज्युकेशन फाउंडेशन (एनजीओ) कोल्हापूर मराठवाडा शाखेच्या वतीने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार 2023 साठी निवड करण्यात आली आहे. अविष्कार फाउंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य व सांस्कृतिक क्षेत्रात गेली पंधरा वर्षापासून कार्यरत संस्था आहे. संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करते. या वर्षाच्या पुरस्कारासाठी संस्थेच्या वतीने विस्तार अधिकारी डॉ. अंजली कोळकर यांची निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की आपण शैक्षणिक (प्रशासकीय कार्य) क्षेत्रात केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे त्यामुळे आपणास राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन आपला गौरव करीत आहोत असेही दिलेल्या निवड पत्रात म्हटले आहे. या पुरस्काराने वि. अ. डॉ. अंजली कोळकर यांचे सर्वत्र स्वागत होत आहे सदरील पुरस्कार वितरण सोहळा दि. 26 मार्च रविवार रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

मराठावाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्य विविध उपक्रम

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण       निजामाच्या राजवटीतुन मराठवाडा मुक्त अनेक स्वातंत्र्यवीरांनी प्राणाची आहुती दिली तेव्हा निजामाच्या तावडीतुन आपली सुटका झाली त्या गोष्टीला यावर्षी 75 वर्ष पुर्ण होत आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समिती परतुर तर्फे वर्षभर विविध कार्यक्रम,उपक्रम सुरु आहेत.परतुर - मंठा तालुका आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम यांच अतुट नात आहे.या चळवळीसाठी परतुर येथे बैठक होवुन अनेक स्वातंत्र्यवीरांनी यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला व हौतात्म पत्करले याचे स्मरण म्हणुन या वीरांना अभिवादनाचा कार्यक्रम 26 मार्च 2023 रोजी जि.प.प्रशाला येथे सायंकाळी 5.00 होणार आहे तसेच 17 सप्टेंबर 2023 पर्यंत प्रत्येक महिन्यात विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येणार आहे तरी जास्तीत देशभक्त नागरीकांनी,माता-भगिनी,विद्यार्थी मित्रांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहान अमृत महोत्सव समितीचे श्री.प्रकाश काका दिक्षीत,डाँ.भानुदासजी कदम,विठ्ठल कुलकर्णी,अर्जुन जगताप,सचिन काटे,विकास पवार,योगेश दहिवाळ,गजानन मस्के,राहुल मोरे,कुणाल बन्सिले यांनी केले आहे.

पोहरागड (पोहरादेवी) येथे बंजारा जनजागृती महा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा - अर्जून नायक

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण     बंजारा समाजासह वंचित, उपेक्षित, कष्टकरी, शेतकरी, ऊसतोड कामगार बांधवांची काशी समजल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्र पोहरागड (पोहरादेवी) येथे दि. २९ मार्च रोजी अखिल भारतीय बंजारा जनजागृती महा मेळाव्याचे आयोजन सर्व संत महंतांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आले आहे, तरी समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बंजारा ब्रिगेड मराठवाडा संघटक अर्जुन नायक यांनी केले आहे.       या जनजागृती महा मेळाव्याला धर्मगुरु बाबुसिंग महाराज,महंत कबिरदास महाराज, महंत सुनिल महाराज, महंत रमेश महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत यशवंत महाराज, देवी - बापू भक्त महंत शेखर महाराज, महंत खुशाल महाराज यांच्यासह भारतभरातून येणाऱ्या संत महंत आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या महामेळाव्याला बंजारा ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड हे मार्गदर्शन करणार आहेत.          मागील अनेक वर्षापासून देश पातळीवरील अनेक समस्यांना बंजारा समाज तोंड देत असून त्याकडे कोणतेही शासन प्रशासन लक्ष द्यायला नसल्याने आता देशपातळीवर सामाजिक एकजुटीचा निर्णय घेण्याची वेळ आलेली असल्या

का गेली? राहुल गांधी यांची खासदारकी ,लोकप्रतिनिधित्व सदर्भात कायदा 1951 काय सांगतो?

Image
 प्रतीनीधी समाधान खरात कॉग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सुरत कोर्टाने एका अब्रूनुकसानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली.    राहुल गांधी यांनी 2019 मध्ये त्यांनी मोदी आडनावावरुन एक टिप्पणी केली होती. यामध्ये दोषी मानून कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. राहुल गांधी हे केरळच्या वायनाड येथून खासदार होते. मात्र, सुरत कोर्टाच्या निकालानंतर आता लोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना आपली खासदारकी गमावावी लागणार आहे. आदेशात काय म्हटलं? लोकसभा सचिवालयाने यासंदर्भात काढलेल्या आदेशामध्ये राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली आहे. सचिव उत्पल कुमार सिंह यांच्या नावाने हे पत्र राहुल गांधी, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, राज्यसभा, निवडणूक आयोग तसंच सर्व मंत्रालय/विभागांना पाठवण्यात आलं आहे. या पत्रानुसार, भारतीय संविधानातील लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मधील कलम 10 (1) (e) अन्वये राहुल गांधी यांची खासदारकी 23 मार्च 2023 पासून रद्द करण्यात येत असल्या

तळणी : येथील कुस्ती स्पर्धला मोठा प्रतिसाद नववर्षाच्या दिवशी लाखो रुपयाची उधळण

Image
तळणी प्रतीनीधी रवी पाटील नववर्षाच्या शुभारभांच्या दिवशी तळणी येथील कुस्ती स्पर्धला जवळपास ७oवर्षाची पंरपरा आहे सुरवातीच्या काळात गावातील शौकीन व परीसरातील कुस्ती शौकीनाचा या स्पर्धत सहभाग असायचा परतू गेल्या पंधरा वर्षापासून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तळणी येथे कुस्ती खेळण्यासाठी आवर्जून येत असून दरवर्षी या स्पर्धचे स्वरूप वाढत आहे लाल मातीच्या या खेळाला हिगोली वाशीम परभणी लातूर बुलढाणा जालना छञपती संभाजीनगर पूणे महाराष्ट्राच्या अन्य ग्रामीण भागातून जवळपास एक हजाराच्या वर कुस्ती पहैलवानानी या लाल मातीत हजेरी लावली विषेश बाब म्हणजे लाल मातीच्या कुस्तीसाठी दहा ते पंधरा मुलीनी कुस्तीचा आनंद घेतला  गेल्या अनेक वर्षाची पंरपंरा असलेल्या स्पर्धला गावातुन वर्गनी जमा केल्या जाते व अनेक मान्यवराकडून स्वंतञ बंक्षीसाची खैरात या वेळी करण्यात आली वय वर्ष दहा ते चाळीस पचेचाळीस वयाच्या पहैलवानाच्या कुस्त्या मोठ्या उत्साहात पार पाडल्या तीनशे रुपयापासुन ते पचवीस हजाराच्या बक्षीसाची लयलूट करण्यात आली  या स्पर्धसाठी महाराष्ट्र केसरी ९२ किलो वजन गटातील विलास कापसे व

आशा डे कार्यक्रम परतूर येथे संपन्न,आरोग्य सेवेसारखं पुण्य या जगात दुसरं काही नाही - सौ मंदाताई बबनराव लोणीकर

Image
      परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण       आशा स्वयंसेविका केंद्र शासनाने दिनांक १२ एप्रिल, २००५ रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान Maharashtra (NRHM) राज्य पातळीवर राबविण्यास सुरवात केली. या अभियानाअंतर्गत विशेषतः ग्रामीण पातळीवर आरोग्या संदर्भात जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका Accredited Social Health Activist म्हणून गावातील स्थानिक महिलांची नेमणूक केली. आशा स्वयंसेविकां महत्वपूर्ण आरोग्य सामाजिक दुवा म्हणून राज्यात कार्य पार पाडत असतात. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील The National Rural Health Mission शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहचविण्याची कामगिरी आशा स्वयंसेविका बजावत असतात.     यांच्या चांगल्या व उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर व राज्यस्तरावर सन्मान केला जातो. असा च आशा डे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परतूर अंतर्गत आशा डे ग्रामीण रुग्णालय परतूर येथे आयोजित करण्यात आला त्या प्रसंगी कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा. बबनराव लो

पाटोदा येथे समर्थ विद्यालयात प्रेरणा सत्र संपन्न.

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  पाटोदा [ माव ] ता.परतुर येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणासत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रेरक व तज्ञ मार्गदर्शक श्री देविदास आठवे सर यांनी विद्यार्थ्यांना विवीध ऊदाहरणे देवुन अभ्यास कसा करावा - स्पर्धा परिक्षेची तयारी - वाचन - लेखन - चिंतन -मनन या विषयी प्रेरणादाई असे मार्गदर्शन केले.     बाल वयातच आपले ध्येय निश्चित करुन ध्येयाच्या पुर्ततेसाठी कठोर मेहणत करण्याची तयारी प्रत्येक विद्यार्थ्यांने मनात बाळगली पाहीजे.असे प्रतिपादन केले. चांगल्या सवयी आपणास ध्येयापर्यत पोहचण्यास मदत करतात.तेव्हा प्रत्येकाने मोबाईल , टि.व्ही. चा आवश्यक तेवढाच वापर करावा असे आग्रही प्रतिपादन केले. दरम्यान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुरेश पाटोदकर यांनी मुख्य मार्गदर्शक श्री देवीदास आठवे यांचे शाल पुष्पहार घालुन स्वागत केले.       ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधे प्रचंड क्षमता असते त्या क्षमतेचा ऊपयोग करुण प्रत्येकाने मोठे यश मिळवावे व त्या साठी प्रेरणा मिळावी म्हणुन या ऊपक्रमाचे आयोजण करण्यात आल्याचे सांगितले .     प्रास्

अंबा वि वि का सोसायटीच्या चेअरमन पदी श्रीराम बोंनगे तर व्हाईस चेअरमन पदी सुनील झिंजाडे

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण       आंबा तालुका परतुर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी वर भारतीय जनता पार्टीचे श्रीराम बोंनगे यांची चेअरमन म्हणून तर व्हाईस चेअरमन म्हणून सुनील झिंजाडे यांची निवड करण्यात आली या सेवा सहकारी सोसायटीमध्ये भारतीय जनता पार्टीने वर्चस्व राखत तेरापैकी तेरा जागा जिंकल्या होत्या या पार्श्वभूमीवर आज झालेल्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध श्रीराम बोणगे यांची चेअरमन म्हणून तर सुनील झिंजाडे यांची व्हॉइस चेअरमन म्हणून निवड करण्यात आली या निवडीबद्दल राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आमदार बबनराव लोणीकर युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर आंबा गावचे सरपंच मेराज खतीब प्रशांत बोनगे रामजी कोरडे कृष्णा भदरगे, रघुनाथ बोनगे, रमेश बोनगे सुनील बोंनगे, सोनू खतीब रमेश बोनगे रविद्र झिजाडे अंकुश बोनगे सुनिल बोनगे विलास डोईफोडे रोहिदास बोनगे विठ्ठल बोनगे रंगनाथ तायडे कैलास बोनगे आदींनी अभिनंदन केले आहे

जालना शहरातील पुरातन म्हसोबा मंदीर बांधकामाचे भूमिपुजन उद्योजक सचिन मिसाळ यांच्या हस्ते संपन्न

Image
जालना प्रतिनीधी समाधान खरात शहरातील नळगल्ली भागात असलेले पुरातन म्हसोबा मंदीर बांधकामाचे भूमिपुजन उद्योजक सचिन मिसाळ यांच्या हस्ते शुक्रवार (दि १७) रोजी पार पडले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक जगदिश केवलराम प्रित्यानी व माजी नगरसेवक राजु सरोदे, माजी नगरसेवक संजय भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. नळगल्ली येथील पुरातन असलेले म्हसोबा मंदीराचे वेगळे महत्त्व सांगितल्या जाते.    मुल बाळ होत नसलेल्यांवर या देवतेच्या कृपा आशिर्वादाने संतानप्राप्ती होते अशी धारणा असल्यामुळे म्हसोबा मंदिरात दर्शनासाठी महिलांची मोठी गर्दी नेहेमीच पहायला मिळते. या मंदिराकडे शासनासह शहरातील पालिकेनेही दुर्लक्ष केले. त्यामुळे नळगल्ली परिसरासह शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन मंदिर बांधकामाचे कार्य हाती घेतले आहे. शुक्रवार (दि १७) रोजी मोठ्या थाटात मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिर बांधकामाचे भूमिपुजन संपन्न झाले. उपस्थितांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी भानुदास मिसाळ, सुनील नंद, संजू दोडके, दुर्गेश दोडके, शुभम घाटेकर, राजू खडके, रामेश्वर पवार, डॉ. कोयाळकर, कचरू घारेगावकर, संतोष दोडके, आनंद झारकंडे वि

पक्ष बांधनीसाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कंबर कसुन कामाला लागावे -जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर

Image
रिपब्लिकन सेनेची पक्ष कार्यालयात बैठक संपन्न जालना (प्रतिनिधी) समाधान खरात      सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी आणि आगामी काळातील निवडणुकांच्या पुर्वतयारीसाठी महाराष्ट्र अध्यक्ष सागर डबरासे यांच्या सुचनेवरून जालना जिल्हा रिपब्लिकन सेनेच्या वतीने शुक्रवार दि. 17 मार्च रोजी पक्ष कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी पु. जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने, महासचिव एक्स आर्मी चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक मच्छिंद्रआप्पा खरात, सिध्दार्थ पानवाले, महिला अध्यक्षा कांताबाई बोरूडे, युवक आघाडी अध्याक्षा पिया जैन, सर्जेराव आंभुरे, समाधान खरात आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बैठकीमध्ये बोलतांना वाहुळकर म्हणाले की, काल झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या गहू, ज्वारी, हरबरा आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच परभणी येथे होणारा रिपब्लिकन सेनेचा स्वाभीमानी मेळावा दि. 25 मार्च

तळणी परीसरात गारपीट,शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Image
तळणी प्रतीनीधी रवी पाटील गारपीटग्रस्त शेतकर्योना मदतीसाठी  ३३ टक्के नुकसानीच्या अटीची आड खाठी   तळणी येथे काल झालेल्या गारपीटग्रस्त ठिकाणची पाहणी मंठा तहसीलदार कैलासचद्र वाघमारे यानी केली ज्वारी आणि कांदा पिक असलेल्या ठिकाणची पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेतला या पाहणी दरम्यान मंठा कुषी अधिकारी व्ही जी राठोड मंडळ अधीकारी भगवान घुगे कृषी मंडळ अधिकारी आर आर आघाव तलाठी गोपाल कुटे तळणी चे गौतम सदावर्ते उंपसरपंच विश्वनाथसिंग चंदेल ज्ञानेश्वर सरकटे .करीम पठाण गजानन सरकटे शेतकरी विश्वबंर सरकटे बाबूमामा रणमूळे उपस्थीत होते  यावेळी तहसीलदार वाघमारे यांनी सांगितले की शासनाच्या ३३ टक्के नुकसानीची अटीच्या अधीन राहुनच शेतकर्यांना मदत होऊ शकते बहुताश शेतकर्यानी गहु व हरभरा सुरक्षीत ठेवला असून पीक विमा भरणा करणार्या शेतकर्या पिक विमा कंपनीकडे तक्रार करण्याच्या सुचना वाघमारे यानी दिल्या तसेच हवामान खात्याने आणखी दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे या दोन दिवसात आणखी काही नुकसान झाले तर नुकसान ग्रस्त शेतीची पंचनामे करण्यात येतील असे वाघमारे यांनी सांगीतले सद्यस्थितीत

आज काल गळ्यात माळ घातली का त्याला ब्रम्हज्ञान प्राप्त झाल्याचा आव येतो व त्याला वाटते की आपण ज्ञानी झालो -हभप चांगदेव महाराज काकडे कंडारीकर

Image
तळणी प्रतीनिधी  रवी पाटील मंठा तालुक्यातील कानडी येथे नाथ षष्टी निमीत्य चालू असलेल्या अखड हरीनाम सप्ताह मध्ये ह भ प चांगदेव महाराज काकडे कंडारीकर याची किर्तन सेवा झाली अवघेची ञेलौकी आनंदाची आता चरणी जगननाथा चित्त ठेले माय जगन नाथ बाप जगन्न नाथ अनाथाचा नाथ जनार्धन एका जनार्धनी एकपण उभा चैतन्याची शोभा शोभलीसे या अंभगावर निरूपण केले एकनाथ महाराज याच्या नाथषष्टीच्या निमीत्याने श्री कानीफनाथ महाराज सस्थांन मध्ये सालाबाद या सप्ताहचे आयोजन करण्यात येते  एकनाथ महाराज हे मुळ नक्षञावरचे होते त्याचा जन्म होताच त्याचे आई वडील गेले त्यांचा सांभाळ आजी आजोबांनी केला नाथ महाराजाची दत्त परपरा होती एकनाथ महाराज हे अवतारीक पूरुष होते लहानपणापासून परमार्थाची आवड होती भानुदासाच्या कुळी महाविष्णुचा अवतार नाथ महाराज हे योगभ्रष्ट होते पूर्वजन्माची काही साधना करून घ्यायची शिलक असल्याने त्याना परत हा नरदेह धर्माच्या उथ्यानासाठी मिळाला म्हणून त्याला योग भ्रष्ट म्हणतात योग भ्रष्टाचा जन्म पवित्र आणि श्रीमंत कुळात होत असतो नाथ महाराज सुध्दा योग भ्रष्ट होते बालपणापासून त्याना असे वाटायचे की आपल्याला ब्

शासकीय गुत्तेदार एम.पी. पवार यांचा मृतदेह घानेवाडी जलाशयात आढळल्याने खळबळ

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात       जालना नगर पालिका क्षेत्रात गुत्तेदारी करणारे नामांकित शासकीय गुत्तेदार एम. पी. उर्फ मधुकर परशुराम पवार (वय 51) हे काल, मंगळवारी (दि. १४) सांयकाळपासून त्यांच्या जुन्या जालन्यातील समर्थनगर येथील राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाले होते  यासंदर्भात त्यांचे भाऊ रामेश्वर पवार यांनी कदीम जालना पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मिसिंगची नोंद करण्यात आली नातेवाईक आणि पोलिसांनी रात्रीपासून एम. पी. पवार यांचा शोध सुरू केला होता परंतु आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घानेवाडी येथील जलाशयात काही नागरिकांना एक मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनास्थळी चंदनझिरा पोलिसांनी तातडीने भेट देऊन, मृतदेह नागरिकांच्या मदतीने जलाशयातून बाहेर काढला पवार हे गायब असल्याची फोटोसह माहिती सकाळपासून सर्व समाजमाध्यमावर फिरत होती._पवार यांचा फोटो मृतदेहाशी मिळताजुळता असल्याने मृतदेहाची ओळख पटली._ पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसारल्यानंतर जिल्हा रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

पत्रकार व वृत्तपत्रातील कर्मचार्‍यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याची हिंदी मराठी पत्रकार संघाची मागणी

Image
जालना प्रतिनीधी समाधान खरात    पत्रकार आणि वृत्तपत्रातील कर्मचार्‍यांना बँकांचे कर्ज व शासकीय योजना लाभ देण्यात यावा, अशी मागणी हिंदी मराठा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी केली आहे.  या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात श्री. बागडी यांनी म्हटले आहे की, जिल्हा उद्योग केंद्र, राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक, पतसंस्था, महामंडळ, समाज कल्याण विभागासारखे अनेक विभाग राज्य शासन आणि केंद्र शासन चालवित असून बेरोजगार उद्योजक, व्यापारी, शेतकरी, शासकीय अधिकारी- कर्मचारी, अंध- अपंग, अनुसूचित जाती- जमाती आदी अनेकांना भरपूरप्रमाणात कर्ज वाटप योजना आणि सबसिडीचे लाभ दिले जातात. परंतू पत्रकार किंवा वर्तमानपत्रातील कर्मचार्‍यांसाठी शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये जागा देण्यात आलेली नाही. महागडे छपाई यंत्र, कॉम्प्युटर संच, कार्यालयीन फर्निचर, कागद रोल, शाईपासून ते वृत्तपत्र वितरणासाठी किंवा बातमी संकलनासाठी मोटार सायकल, महाग कॅमेरे, जनसंपर्कासाठी लागणारे मोबाईल सर्व काही पत्रकारांना नगदी स्वरुपात खरेदी करावे लागते. किंवा खासगी फायन्सास कंपनी अगर सावकारा

संतांनी आपल्याला दाखवून दिलेला निस्वार्थ भक्तीचा मार्ग स्वीकारावा लागेल-हभप ज्ञानेश्वर महाराज महाले

Image
तळणी प्रतिनीधी रवी पाटील  तळणी येथून जवळच असलेल्या कानडी येथे चालू असलेल्या सप्ताह मध्ये पाचव्या दिवशीची किर्तन सेवा ह भ प शिवचरीञकार ज्ञानेश्वर महाराज महाले याची किर्तन सेवा झाली    जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या संतचरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय या अंभगावर निरुपण केले सद्य स्थितीत मनुष्य करत असलेला परमार्थीक साधना ही तकलादू असून त्या साधनेच्या पाठीमागे स्वार्थाचा गंध दिसून येतो त्या ईश्वराला आपल्याला प्राप्त करायचे असेल तर संतांनी आपल्याला दाखवून दिलेला निस्वार्थ भक्तीचा मार्ग स्वीकारावा लागेल मनुष्याला संताच्या चरणपदाचे जरी वास्तव्य मिळाले तरी सुध्दा त्याला देव भेटल्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही कारण की देवाचे आणि संतांचे अस्तीत्व हे सारखेच असते ते अस्तीत्व जर मनुष्याला प्राप्त करायचे असेल तर संत सहवास फार महत्वाचा आहे आज मनुष्याची वासना ही सांसारीक सुखावर जास्त जात असल्याने परमार्थीक आयुष्याची त्याची गोडी कमी झाली संकटे आल्यावर आपण त्याचा धावा करावा म्हणजे आपला तो स्वार्थ आहे जर त्याला आपल्याला प्राप्त करायचे असेल वासने रुपी स्वार्थाला जाळून टाकावेच लागेल तरच तो प

नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिले निवेदन,परतूर विधानसभा मतदारसंघातील आष्टी सातोना वाटुर सेवली पांगरी गोसावी तळणी या ठिकाणच्या खरेदी केंद्रांना तात्काळ मान्यता द्याआमदार बबनराव लोणीकर यांची मागणी

Image
 प्रतिनिधी समाधान खरात  सध्या हरभरा काढणीचा हंगाम सुरू असून अवकाळी पावसाची दाट शक्यता असल्यामुळे काही ठिकाणी पाऊसही झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे नाफेडणे त्वरित खरेदी केंद्रांना मान्यता द्यावी असा लक्षवेधी प्रश्न माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर विधानसभे मध्ये उपस्थित केला    यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की सध्या अवकाळीचे चावट असून काही ठिकाणी गारपीट झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हरभऱ्याची खळे करून घेण्यात गुंग आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा हरभरा त्यांना त्वरित बाजारपेठेत विकण्यासाठी नाफेडणे आपले खरेदी केंद्र सुरू करावेत असे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले नाफेड व्यवस्थापक हे फारसे याबाबतीत गंभीर नसून त्यांनी तात्काळ खरेदी केंद्रांना मान्यता देणे गरजेचे आहे माझ्या परतूर विधानसभा मतदारसंघातील आष्टी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे या ठिकाणी जवळपास 60 गावांचे शेतकरी आपले धान्य वितरित करीत असतात तर सातोना हेही बाजारपेठेचे गाव असून येथे परतुर कृषी उत्पन्न बाजार समिती ची उप बाजारपेठ आहे सातोना या ठिकाणी जवळपास 20 गावातील शेतकरी धान्य

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून परतुर विधानसभा मतदारसंघासाठी 88 कोटी रुपयांचा निधी,तर परतूर नगरपालिकेतील अंतर्गत रस्त्यांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण   उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पांतर्गत परतुर विधानसभा मतदारसंघासाठी 88 कोटी रुपयांचा निधी रस्ते विकासासाठी प्राप्त झाल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्रकार दिली आहे  पुढे या पत्रकात म्हटले आहे की, मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असून विकासासाठी कधीच निधी कमी पडू देणार नाही असेही या पत्रकात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील खालील रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळाला आहे  आष्टी ते रायगव्हाण रस्ता रामा ६१ किमी २०२/ ते २०५/८०० मध्ये नळकांडी पुला सह सुधारणा करणे (किंमत 8 कोटी) परतुर तालुक्यातील राममा -५५८ सी ते संकणपुरी सावरगाव गुंज रस्ता रामा-६२ किमी १०/००० ते १२/५०० मध्ये सूटलेले लांबीचे बांधकाम करणे* (किंमत-7 कोटी) परतुर तालुक्यातील परतुर सेलु रस्ता रा.मा.२५३ किमी १६/५०० ते १९/०० व २०/०० ते २२/०० २५/०० ते ३०/०० मध्ये रस्त्याची सुधारणा करणे (किंमत-7 कोटी )  परतुर तालुक्यातील येनोरा, पाटोदा जां

बूथ सशक्तिकरण अभियानांतर्गत परतुर येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शक्ती केंद्रप्रमुख बूथ प्रमुख विस्तारकांचा प्रशिक्षण वर्ग

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  बूथ सशक्तिकरण अभियानाच्या माध्यमातून शक्ती केंद्रप्रमुख विस्तारक बूथ प्रमुख यांनी, समाजाच्या प्रत्येक घटकातील युवा महिला यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रवास आणण्यासाठी काम करण्याचे आवाहन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले  ते परतुर येथे आयोजित बूथ सशक्तिकरण अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गात बोलत होते पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की भूत समितीमधील कार्यकर्त्यांना बूथ अध्यक्ष, बूथ सचिव, यांच्यासह कार्यकारिणी निवड करणे गरजेचे असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा येत्या 26 मार्च रोजी होणारा मन की बात कार्यक्रम प्रत्येक बूथप्रमुखांनी करणे आवश्यक असून एप्रिल महिन्यातील शेवटच्या रविवारी म्हणजेच 30 एप्रिल रोजी होणारा 100 वां मन की बात कार्यक्रम, नाविन्यपूर्ण साजरा करण्याचे आवाहन यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित बूथ पदाधिकाऱ्यांनीं दिले, पुढे बोलताना ते म्हणाले की प्रत्येकाने भूत स्तरावर व्हाट्सअप ग्रुप निर्माण करणे आवश्यक असून प्रत्येक बूथ प्रमुखाकडे सगळी समाज माध्यमे इन्स्टॉल असावी व त्या माध्यमातून मोदी

महिलांचा सन्मान करणारे आमचे सरकार - आमदार लोणीकर, राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत

Image
  जालना प्रतिनिधी समाधान खरात     शेतकरी महासन्मान निधी योजनेत आता वर्षाला महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना12,000 रुपयांचा सन्माननिधी मिळणार असून प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर पडली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत  प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार आणी केंद्राचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार असून 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार असून 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे. आता शेतकर्‍यांवर कोणताच भार नसून राज्य सरकार केवळ 1 रुपयांत पीकविमा घेणार असून  3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार असल्याचे प्रतिपादन मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचे जनक लोकप्रिय लोकनेते माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी देवठाणा उसवद मंठा विडोळी पाटोदा ते जिल्हासरहद्द रस्ता 13 किलोमीटर तालुका मंठा जिल्हा जालना रस्त्याची सुधारणा करणे कामाची अंदाजीत किंमत 339 लक्ष रुपये या कामाचा व सभामंडप भूमिपूजन आणी २५१५ योजने अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम उद्घाटन सोहळा आज विडोळी तालुका मंठा जिल्हा जालन

मनुष्याने भक्ती मार्ग स्वीकारावा -ह भ प विष्णू महाराज बादाड

Image
तळणी रवी पाटिल मनुष्याने भक्ती मार्ग स्वीकारावा जो की तुम्हा आमच्या उद्धाराचा मार्ग आहे तो मार्ग आपल्याला ज्ञानोबा तुकोबाने दिला ज्यानी वारकरी संप्रदायाचा पाया रचुन उध्दार करून घेतला ते ज्ञानोबा व ज्यानी त्याच पायावर उभारलेला कळस हे भक्ती मार्गाच्या प्रबळ इच्छेच ज्वलंत उदाहरण तुमच्या आमच्या समोरे असल्याचे . प्रतिपादण ह भ प विष्णू महाराज बादाड यानी कानडी येथे जगदगूरू . तुकाराम . महाराज बीजेच्या निमीत्य या किर्तन सेवेचे आयोजन ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले जगदगुरू तुकाराम महाराज याच्या आपूलीया हीता जो असे जागता धन्य माता पिता तयाचीया . कुळी कन्या पूञ. होती जे सात्वीक तयाचा हरीक वाटे देवा या अंभगावर निरूपण केले संत हे तुमचा आमचा उध्दार करण्याकरीता या पूथ्वीतलावर अवतीर्ण होत असतात जगदगूरू तूकाराम महाराज हे सुध्दा तुमच्या आमच्या उद्धारासाठीच या पूथ्वीतलावर अवतीर्ण झाले आहे संत ज्ञानेश्वरानी ज्ञानेश्वरीच्या रूपाने एक अनमोल ठेवा आपल्याला . दिला आहे तर संत तुकारामांनी गाथा दिला आहे ज्या संसारीक मनुष्याच्या जिवनात ज्ञानेश्वरी व गाथा यांचा वावर आहे त्याना कुठल्याच गोष्टीची गरज पडणार नाही मनुष्य

शेतकरी, कष्टकरी,महीला सबलीकरण या सह सर्वसामान्या चा वीचार करानारा अर्थसंकल्प- मा . मंत्री आ. बबनराव लोणीकर

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण    राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प हा राज्याला विकासाच्या उंच शिखरावर घेऊन जाणारा असून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी महिला युवक उद्योग या सर्वांना उभारी मिळणार असून, या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी 20,000 हजार कोटी रुपयांची तरतूद केली गेली असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे मराठवाड्यातील दुष्काळ मुक्तीसाठी अर्थसंकल्पामध्ये 20,000 हजार कोटी रुपयांची तरतूद, मराठवाडा वॉटर ग्रीड योजना कार्यान्वित करणार, कोकणातील पाणी मराठवाड्यात नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून आणले जाणार,मराठवाड्यासाठी घर घर जल योजना,शेतकरी सन्मान योजनेत केंद्राच्या 6000 हजाराबरोबरच राज्यही देणार 6000 त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणार आता वार्षिक 1200 हजार रुपये मदत, शेतकरी ,महिला, युवकांना सशक्त करणारा अर्थसंकल्प, अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये 1500 रुपयांची वाढ, राज्यातील 81 हजार अंगणवाडी सेविकांना होणार लाभ, महिलांना एसटी बस तिकिटामध्ये 50 टक्क्यांची सूट, महिलांना सशक्त क

महिला ने सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे- डॉ नीता वानखेडे

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात      श्री क्षेत्र आजूबाई प्रेसिडेन्सी विज्ञान वाणिज्य कला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आन्वा ता भोकरदन  जिल्हा जालना या ठिकाणी महिला दिन साजरा करण्यात आला  यावेळी प्राचार्य डॉक्टर नीता वानखेडे यांनी सांगितले की माता जिजाऊ माता रमाबाई माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रमाणे खंबीरपणे उभे राहून  शिक्षण घेऊन महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे आजच्या युगात फार गरजेचे असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले      यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष तुषार गवळी, प्राचार्या श्रीमती डॉ नीता वानखेडे, रिता वानखेडे, खंडेलवाल सर, सपकाळ सर, देशमुख , वानखेडे सर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या उपस्थित होते यावेळी डॉ नीता वानखेडे यांनी महिला दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या