Posts

Showing posts from August, 2022

दिव्यांगांनाही मोफत बस सेवा प्रवास द्यावा- अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना

Image
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे        जालना सध्या महाराष्ट्र शासनाने देशाच्या 75 वा अमृत महोत्सव निमित्त ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत बस सेवा प्रवास दिली आहे त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन पण राज्यामध्ये दिव्यांग हा असा पीडित समूह घटक आहे आहे की दिव्यांगांना महाराष्ट्र शासनाची मदतीची आवश्यकता आहे       तरी महाराष्ट्र शासनाने 50% च्या वरील दिव्यांगांना मोफत बस सेवा प्रवास द्यावा दिव्यांगांना बस सेवा प्रवास मध्ये 75 टक्के सवलत दिली आहे पण जे दिव्यांग बांधव 50 टक्के च्या वर आहेत अशा दिव्यांगांना महाराष्ट्र शासनाने मदत म्हणून मोफत बस सेवा प्रवास द्यावा असे अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना यांनी पत्रकाराशी बोलताना भावना व्यक्त केली

खरपुडी बनते तालुक्यातील विकासाचे रोल मॉडेल, दूरदृष्टी : विविध मार्गाने ग्रामपंचायतीने खेचून आणला विकास निधी

Image
जालना जिल्हा प्रतिनिधी समाधान खरात:        तालुक्यातील शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खरपुडी गावाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या सरपंच कविता अरुण गिरी यांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने विविध मार्गाने विकास कामासाठी निधी खेचून आणला आणि गावांमध्ये विकास कामाचा धडाका लावला आज गावाचा चेहरा मोहरा बदलत आहे तालुक्यातील खरपुडी हे गाव विकासाचे रोल मॉडेल बनत आहे             जालना तालुक्यातील खरपुडी गावाच्या विकास कामासाठी फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची अरुण गिरी यांनी अलीकडेच भेट घेतली जवळपास 45 लाख रुपयांचा निधी त्यांनी मंजूर केला यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला   मयूर फोटो जवळपास साडेतीन हजार लोकसंख्येचे असलेले हे गाव या ठिकाणी आनंदाने असणारे विविध जाती धर्माचे लोक सातत्याने विकास कामाला सहकार्य करत असून शासन प्रशासन स्तरावरून या गावाला होणारी मदत यामुळे गावाचा कायापालट होताना दिसत आहे गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी तसेच विस्तार अधिकारी आणि  ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी आर.बी. कोथलकर उपसरपंच भरत शेजुळ तसेच माजी पंचायत समिती सभापती समाधान शेजुळ ग्रामपंचायत सदस्य आणि ग

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथील विद्यार्थ्यांनी साकारल्या गणरायांच्या आकर्षक मूर्ती.....

Image
  परतूर प्रतीनिधी हनुमंत दवंडे     तालुक्यातील यश प्रायमरी इंग्लिश स्कूल तसेच यश प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सातोना खुर्द या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी चिखलापासून गणपती बाप्पांच्या सुंदर मूर्ती बनवण्याचे आठवडाभर प्रशिक्षण घेतले. विद्यार्थ्यांनी स्वतः मूर्ती तयार करण्यासाठी प्रयत्न करावा तसेच याच स्वनिर्मित मूर्तीचीच आपल्या घरी व शाळेत स्थापना करावी अशी संकल्पना संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष बालासाहेब सितारामजी आकात यांची होती. मुख्याध्यापक जयराम खंदारे , अनिल बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या स्पर्धेत वर्ग पहिली ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आकर्षक अशा मूर्ती साकारल्या.      सर्व विद्यार्थ्यांना इकोफ्रेंडली व सोप्या पद्धतीने चिखलापासून गणपती बनवण्याचे प्रशिक्षण सर्व शिक्षकांनी दिले. यासाठी पालकांनीही मोलाचे सहकार्य केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरज दूधगोंडे , दीपा सावंत व भावना पाटिल ,सरिता गायकवाड , ज्योती बिडवे , महादेव गायकवाड़,गणेश गोरे, तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले.

ब्राईट स्टार मध्ये 'इको फ्रेंडली गणपती' उत्सव

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे आज ब्राईट स्टार इंग्लिश परतूर मध्ये इको फ्रेंडली गणपती उपक्रम राबविण्यात आला . यामध्ये सर्व विद्यार्थांनी विविध मातीपासून आकर्षक अशा श्री गणेश मूर्ती बनवल्या . कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थांचे क्रमांक काढण्यात आले       यामध्ये नर्सरी ते सिनियर ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक पवार राधिका तर द्वितीय क्रमांक लहाने सम्यक यांनी पटकावला तर इ 1 ली ते 10 वी च्या ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक - मींड अंबिका द्वितीय - बन्सीले अक्षरा तृतीय - भापकर ज्ञानेश्वरी चौथा क्रमांक - तनपुरे भक्ती तर उत्तेजनार्थ बक्षिस बागडीया तनिशा या विद्यार्थांनी पटकावले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माहेश्वरी महिला मंडळाचे सचिव - कल्पना लोया, कोषाध्यक्ष - सीमा भुतडा उपाध्यक्ष - शिल्पा मालपाणी मा. पालक - पूजा बागडीया व संगीता अग्रवाल उपस्थित होते . प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थाना खूपच प्रेरक व मौलिक असे मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुण्यांचे शाळेच्या वतीने शाल व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कुकडे सर यांनी केले . याप्रसंगी शाळेचे मुख

परतुर येथील मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहाच्या कामाची आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडून पाहणी,परतुर तालुक्यातील मुली आय. एस आय पि एस अश्या उच्य पदावर विद्यार्थी गेल्या पाहिजे - आ.लोणीकर,दिवाळीपूर्वी काम पूर्ण करण्याच्या कार्यकारी अभियंता सूचना

Image
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे  माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आंबा तालुका परतुर येथे बांधकाम करण्यात येत असलेल्या 15 कोटी रुपये किमतीच्या मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहा च्या बांधकामाची पाहणी केली परतूर तालुक्यातील मागासवर्गीय मुलीं मुलींना चांगले शिक्षण मिळावे मुली चांगल्या शिकाव्यात मोठे होऊन डॉक्टर इंजिनियर वकील या पदावर जाव्या याकरिता परतूर येथे सुसज्ज भव्य दिव्य असे वस्तीग्रह बांधण्यात आले, आता मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा वस्तीगृहाचा प्रश्न आमदार लोणीकर यांनी कायमचा मिटविला यावेळी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उपकार्यकारी अभियंता व संबंधित कंत्राटदारांना दीपावली पूर्वी हे काम पूर्ण करून लोकार्पण करा अशा प्रकारच्या सूचना दिल्या     तात्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये परतूर तालुक्यातील आंबा येथे व मंठा येथे अनुक्रमे 15 कोटी रुपये किमतीच्या मागासवर्गीय मुलींच्या वस्तीग्रह कामाला मंजुरी मिळाली होती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा भार सांभाळताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदारसंघातील विकास कामाकडे विशेष लक्ष देऊन दलित पीडित

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निषेध आंदोलन

Image
परतूर,ता.३१ प्रतिनिधी हनुमंत दवंडे   येथील विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाच्या वतीने जांबसमर्थ येथील मूर्ती चोरीच्या प्रकरणी तसेच आंबा येथील गाईंच्या मृत्यूप्रकरणी मंगळावारी (ता.)३० रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तसेच पोलीस ठाण्यात निषेध आंदोलन करून समस्त हिंदू बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जांबसमर्थ या ठिकाणी श्रीरामाचे पुरातन मंदिर असून या मंदिरामध्ये ७०० वर्षांपूर्वीच्या श्रीराम,सीता,लक्ष्मण,भरत,शत्रुघ्न आणि वीर हनुमानाच्या पंचधातूच्या मुर्त्या होत्या,त्या मुर्त्या अज्ञातांनी मागील १० दिवसांपूर्वी चोरून नेल्या त्यामुळे संबंध महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत असल्याने या चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावून त्यांना कठोर शासन करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच आंबा गावात पोळ्याच्या दिवशी घडलेल्या घटनेत बागेश्वरी देवीच्या मंदिरातील गाईंचा विद्युत तारांना धक्का लागून मृत्यू झाला.झालेली ही घटना संशयास्पद असल्याची गावकरी सांगत आहेत.संबंधित घटना घातपात असल्याने या घटनेचा पूर्ण तपास करून घटनेला जबाबदार असणाऱ्याला योग्य शिक्षा करण्याची मा

अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष श्यामसुंदर सोनी तर सचिव सचिन खरात यांची निवड

Image
परतुर  प्रतिनिधी हनुमंत दवंडे   परतूर येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची बैठक घेण्यात आली ही बैठक देवगिरी प्रांत अध्यक्ष श्री डॉ.विलास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजन करण्यात आली होते      या बैठकीमध्ये सर्व विचारांनी व प्रांत अध्यक्ष यांच्या अध्यक्ष खाली परतुर तालुका अध्यक्ष पदवी ,श्यामसुंदर सोनी,व सचिव सचिन खरात, संघटक सिताराम काकडे,उपाध्यक्ष शिवप्रसाद स्वामी,सह सचिव राधेश्याम दायमा, सहसंघटक आकाश गायकवाड, यांची निवड करण्यात आली आहे व यावेळी बैठकीला उपस्थित प्रांत अध्यक्ष डॉ.विलास मोरे, राम जेथलिया, विकास पवार, शिवशंकर स्वामी, अशोक बोर्ड, हे उपस्थित होते 

परतूर बैल पोळा उत्साहात साजरा

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे       शहरात सह ग्रामीण भागातही बैल पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी बैलाची सजावट करत ढोल ताशा सोबत मिरवणूक काढली होती.     दरम्यान,शहरातील गाव भागात सायंकाळी चार वाजता येथील मारोती मंदिराजवळ बैलाची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जेष्ठ नागरिक शंकरराव पवार राजेभाऊ पवार,मा.नगरसेवक गणेशराव पवार,अशोकराव उबाळे,द या काटे,जगन्नाथ बागल,शिवा बल्लमखाने, अनिल देशपांडे,लिबाजी गाडेकर,गणेशराव मुजमुले,प्रल्हाद उबाळे,विनोद बागल, संजय कानपुडे,सुनील बागल,पांडुरंग कानपुडे,प्रश्नात पुरी,मकरंद लिबुळकर,समीर देशपांडे,रामकांत बरीदे,लक्ष्मीकांत माने, राजेश पवार,सुधाकर गिरी,मुकुंद खरात,अजय खरात,विलास गायकवाड,रमेश गवळी, ज्ञानेश्वर माने, बाबासाहेब माने, ओंकार माने, अशोक कानपुडे, तानाजी उबाळे, हरिभाऊ उबाळे, दीपक उबाळे, शाम बागल, नंदलाल कपाळे, प्रभाकर बागल, गंगाधर पवार, शंकर उबाळे,पांडुरंग कानपुडे, शिवाजी पुरी, दीपक पुरी, किरण puriओमप्रकाश पुरी, तुकाराम उबाळे, दीपक बरीदे, शिवलिंग राऊत, योगेश काटे, चंद्रकांत कपाळे, सतीश

आंबा येथे 6 गाईंचा मृत्यू, विजेचा शॉक लागल्याने घडला अनर्थ,बैलपोळ्याच्या उत्साहावर पडले विरजण

आंबा प्रतिनिधी कैलाश बोनगे आंबा येथे दरवर्षी पारंपारिक पद्धतीने अतिशय उत्साहामध्ये बैलपोळा साजरा केला जातो मात्र यावर्षी बैल मिरवायच्या वेळेलाच अचानकपणे काळाने घाला घालत विजेचा शॉक लागून सहा गाईंचा मृत्यू झाल्याने पोळा सणाच्या उत्साहावर विरजण पडले असून गावातील मोकाट गाई अचानकपणे मृत झाल्यामुळे गावकरी दुःखाच्या सागरात बुडाले आहेत     शेतामध्ये रानडुक्कर येऊ नयेत यासाठी लावलेल्या कुंपणा शेजारी या गाई गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असून अतिशय हृदय पिळवटून टाकणारी घटना गावात घडल्यामुळे गावावर शोक काळा पसरली असून गावातील बैलपोळ्याच्या आनंदावर विरजण पडले आहे पारंपरिक पद्धतीने या गावांमध्ये नियमितपणे वेगळ्या उत्साहामध्ये पोळा हा सण साजरा केला जातो या ठिकाणची कृषक आपल्या बैलांना सजवून त्यांची भव्य मिरवणूक काढत असतात या गावातील पोळ्याला एक वेगळी महत्त्व असून मारुतीचे मंदिर नसणारे हे परतुर तालुक्यातील एकमेव गाव आहे या गावांमध्ये बागेश्वरी मातेचे दर्शन करून पोळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते मात्र अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे गावकरी दुःखाच्या सागरात बुडाले असून यावर्षीची बैलांची पूजा घरचे घरी क

कमी पावसामुळे पिकांचे नुकसान, जायकवाडी धरणाचे चे पाणी डाव्या कालव्यात सोडा - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी,डाव्या कालव्यात पाणी सुटल्यास परतूर, घनसावंगी व अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ - लोणीकर यांची माहिती,अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) यांच्याकडे पत्राद्वारे लोणीकर यांनी केली मागणी

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  परतुर अंबड व घनसावंगी या तालुक्यामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पिकांचे पाण्यावाचून अतोनात नुकसान होत असून पीके करपुन जात आहेत. त्यामुळे जायकवाडी च्या डाव्या कालव्यात तात्काळ पाणी सोडण्यात यावे अशी मागणी माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी अधीक्षक अभियंता  लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) यांच्याकडे केली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील परतूर, अंबड व घनसावंगी या तालुक्यातील शेतीचा विचार करता जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात पाणी सोडणे आवश्यक आहे. पाणी सुटल्यास परतूर घनसावंगी व अंबड या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे अशी माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली परतुर घनसावंगी व अंबड या भागामध्ये अत्यल्प वृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन कापूस तूर मूग उडीद तत्सम पिके सुकू लागलेली आहेत या बाबीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून घरातील दागदागिने विकून, बँकातील कर्ज काढून यावर्षी पेरणी केली आहे असेही लोणीकर यांनी पत्रात नमूद केले आहे  या हंगामाच्या सुरुवातीला सर्वत्र

भाजपचे जेष्ठ नेते मदनलाल शिंगी यांचे निधन

Image
परतूर: प्रतिनिधी भाजपाचे ज्येष्ठ नेते, निष्ठावंत मदनलाल भाऊ शिंगी यांचे आज दि.२५ ऑगस्ट रोजी सकाळी दिर्घआजाराने दुःखद निधन झाले. ते ६८ वर्षाचे होते.  अत्यंत मनमिळाऊ स्वभावाने ते सुपरिचित होते. रा.स्व.संघ ते भाजपच्या प्रवासात त्यांनी तालुक्यात पक्षाचे मोठे कार्य केले, आष्टी परिसरात भाजपचा बालेकिल्ला करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.  भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या हक्कासाठी त्यांनी वाट्टेल तेथे संघर्ष केला, माजी मंत्री लोणीकर यांचे समकालीन सहकारी व मित्र म्हणून ते परिचित होते. आष्टी परिसरात भारतीय जनता पक्षाला सुरुवातीच्या काळात तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य त्यांनी अत्यंत निष्ठेने केले, भाजपच्या वाईट दिवसातही संकटांना नेहमीच तोंड देत पक्षकार्य अविरत केल्याचे भाजपचे त्यांचे सहकारी भगवानराव मोरे यांनी प्रतिक्रिया दिली.  जनसंघाचे पाहिले शाखा संस्थापक वयोवृद्ध भाजप कार्यकर्ते पं. जगन्नाथ शर्मा यांनी शिंगी यांच्या पक्षकार्याच्या अनेक प्रसंगांना आठवून वेदना व्यक्त केल्या.  स्व.शिंगी याना परतूर, मंठा, आष्टी वाटूर व सातोना परिसरात ठिकठिकाणी श

गेले ते कावळे, सच्चा मावळा सेनेचाच- दत्ता पाटील सुरुंग

Image
परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे परतूर शहर आणि तालुक्यात शिवसेनेला खिंडार अशा आशयाच्या बातम्या येत असून विविध पक्षात फिरून आणखी एखाद्या पक्षात जाणार्‍याच्या इतर पक्षातील प्रवेशामुळे शिवसेनेला खिंडार पडणे हे हास्यास्पद असून सच्चा मावळा आजही शिवसेनेत असून उद्या तो कायम राहिल असा विश्वास शिवसेनेचे परतूर शहरप्रमुख दत्ता पाटील सुरुंग यांनी व्यक्त केला. राज्यात शिवसेना फुटीबाबत नेहमीच चर्चा होते याच पद्धतीने परतूर शहरात शिवसेनेला खिंडार अशी बातमी वृत्तपत्र व समाज माध्यमातून सध्या फिरतांना पहायला मिळते. जे इतर पक्षातून शिवसेनेत आले त्यांच्या जाण्याने शिवसेनेला खिंडार पडणे अत्यंत हास्यास्पद असल्याचे दत्ता पाटील सुरुंग म्हणाले. शिवसेना हा अभेद्य असा किल्ला असून काही कावळे सत्तेसाठी उडाले असतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असे सर्व मावळे शिवसेनेत आहोत ना मग खिंडार कसे पडेल असा सवालही सुरुंग यांनी करून झालेल्या घटनेचा खरपूस समाचार घेतला.

परतूर युवा महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष पदी सौ.साक्षी विकास झरेकर यांची निवड...

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे आज‌‌ वाटूर येथे युवा काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव वंदानाजी बेन‌ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते       यावेळी परतूर महीला युवा तालुका अध्यक्ष म्हणून हातडी येथील सौ.साक्षी विकास झरेकर यांची बेन‌ यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली यावेळी या निवडीबद्दल मा.आ.सुरेशकुमार जेथलिया युवा नेते नितीन जेथलिया, जिल्हा अध्यक्ष युवक राहूल देशमुख,ता‌.अध्यक्ष बाबासाहेब गाडगे, युवा अध्यक्ष लक्ष्मण जी शिंदे,अजहर भाई, प्रविण डुकरे यांनी सौ.साक्षी विकास झरेकर यांचे अभिनंदन केले....

मानव विकास अंतर्गत विद्यार्थ्यांना सायकल वाटप करताना कपिल आकात,गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे केंद्रप्रमुख विष्णू ढवळे, मानवविकास चे तालुका समन्वयक श्री काठमोरे, श्रीमती स्मिता रोडगे,विजय राखे, अंकुश तेलगड,अखिल काजी,गोपनीय शाखा प्रमुख संजय वैद्य,श्याम कबाडी, रामराव घुगे,सचिन कांगने,कैलास खंदारे,अनिल काळे,बळीराम नवल,रमेश निर्वळ, सुभाष बरकुले, राजू वडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

परतूर येथील लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयात मानव विकास अंतर्गत 38 सायकलचे वाटप

Image
परतूर प्रतीनीधी हनुमंत दवंडे        परतूर येथील लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयात मानव विकास अंतर्गत 38 सायकलचे वाटप दि 24 रोजी संस्थेचे सचिव कपिल आकात यांच्या हस्ते तर गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.        परतूर येथील लालबहादूर शास्त्री कन्या विद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात पालकांची उपस्थिती पण लक्षणीय होती. यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे यांनी सांगितले की,विद्यार्थी यांचा शैक्षणिक विकास व्हावा या साठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. असे ते म्हणाले यावेळी उपस्थित केंद्रप्रमुख विष्णू ढवळे, मानवविकास चे तालुका समन्वयक श्री काठमोरे, श्रीमती स्मिता रोडगे,विजय राखे, अंकुश तेलगड,अखिल काजी,गोपनीय शाखा प्रमुख संजय वैद्य,श्याम कबाडी, रामराव घुगे,सचिन कांगने,कैलास खंदारे,अनिल काळे,बळीराम नवल,रमेश निर्वळ, सुभाष बरकुले, राजू वडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्याध्यापक जगदीश कुडे यांचे दातृत्व सहा मुलांचे स्वीकारले पालकत्व..शिक्षकाजवळ संवेदनशीलता अन दातृत्व असावेच - डाॅ.सुहास सदाव्रते

Image
मंठा  प्रतिनिधी सुभाष वायाळ     वर्गाच्या चौकटीबाहेर जावून विद्यार्थ्याच्या मनाचा विचार करणारा संवेदनशील आणि दातृत्व शिक्षक असेल तर जग जिंकता येते. मुख्याध्यापक जगदीश कुडे यांचे दातृत्वाचे कृतीशील विचाराची प्रेरणा घेता आली पाहिजे, असे आवाहन साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष तथा कवी- पत्रकार डाॅ.सुहास सदाव्रते यांनी मंगळवारी ( ता.२३ ) केले.  श्रीरामतांडा ( ता.मंठा) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जगदीश कुडे यांनी शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेल्या ६ विद्यार्थ्याना गणवेश,शैक्षणिक साहित्य, दप्तर देण्यात आले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिली जाणारी शरद पवार फेलोशिप जगदीश कुडे यांना मिळाली आहे. सदर फेलोशिपची प्रेरणा घेत श्री.कुडे यांनी ४ अनाथ आणि २ स्थलांतरित पालकाचे मुले यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डाॅ.सुहास सदाव्रते यांच्या शुभहस्ते पालकत्व स्वीकारलेल्या विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.पुढे बोलतांना डाॅ.सदाव्रते म्हणाले,की शिक्षकाने आपल्या विचारांची चौकट बदलणे आवश्यक आहे. विद्यार्थ

मौजपुरी पोलीस ठाणे स्थालांतरीत होऊ देणार नाही; मौजपुरी गावातील नागरीकांचा पोलीस ठाणे स्थालांतरास प्रखर विरोध

Image
जालना (प्रतिनिधी) समाधान खरात  तालुक्यातील मौजपुरी पोलीस ठाणे हे मौजपुरी येथून रामनगर येथे हलविण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. परंतु, सदरील पोलीस ठाणे यापुर्वी रामनगर येथे गेले होते, ते गावकर्‍यांनी लढून पुन्हा मौजपुरी येथे नेले आहे. पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांनी स्वतःच्या फायद्यासाठी व सुखसुविधेसाठी मौजपुरी येथील पोलीस ठाणे रामनगरला घेऊन जाण्यासाठी स्थानिक नागरीकांना पुढे करुन राजकारण करीत आहेत. या राजकारणाला आम्ही हाणून पाडणार असून पोलीस ठाणे स्थालांतरीत होऊ देणार नाहीत असा निर्धार गावकर्‍यांनी केला आहे. अशी माहीती मौजुपरी येथील भागवत राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी पत्रकार परिषदेस उप सरपंच लखन डोंगरे, रघुदादा डोंगरे, बंडू डोंगरे, अच्युत मोरे यांची उपस्थिती होती. मौजपुरी पोलीस ठाणे हे निजामकालीन असून ते ऐतिहासिक आहे. 72 खेड्यांना जोडलेले पुर्वीचे ग्रामीण पोलीस ठाणे आहे. आता या पोलीस ठाण्याला सुमारे 48 खेडे तर 18 तांडे जोडलेले आहेत. गावात 10 वी पर्यंत शाळा असून पिण्याच्या पाण्याची मुलभुत सुविधा गावात आहे. पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्म

विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे उपोषणाला उपस्थित राहावे-अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना

Image
 जालना प्रतीनीधी समाधान खरात जालना जिल्ह्यातील विविध प्रकारच्या हजारोच्या संख्येने दिव्यांग असून दिव्यांगसाठी ठोस असे कोणतेही धोरण शासनाने राबविलेले नाही व दिव्यांगाचे कायदे जीआर हे कागदपत्रे राहिलेले आहेत       तसेच सन 1995 चा अपंग पुनर्वसन कायदा सन 2001 चे महाराष्ट्राचे दिव्यांग धोरण व सन 2016 चा अपंग हक्क संरक्षण कायदा याची देखील अमलबजावणी होत नाही याकरिता दिव्यांगाच्या संपूर्ण कल्याण व पुनर्वसनासाठी महाराष्ट्र शासनाने महिला बालकल्याण व मागासवर्गीय मंत्रालय प्रमाणे दिव्यांगाचे स्वतंत्र मंत्रालय व विभाग तयार करावा यासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री  आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशानुसार तसेच प्रहार अपंग संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा बापूराव काणे , राज्य संपर्कप्रमुख रामदास खोत  , मराठवाडा अध्यक्ष शिवाजी गाडे  यांच्या  नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे 25 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता दिव्यांग बांधवांनी उपोषणा करीता उपस्थित राहावे  व असे आव्हान अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना , विठ्ठल  चव्हाण, शंकर शिरगुळे  माजी जि.

राशन कार्ड साठी सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने तहसीलदार यांना निवेदन सादर...

Image
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे  परतुर येथील तहसील कार्यालयामध्ये अनेक सर्वसामान्य लोक राशन कार्ड साठी येत असतात अनेक वर्षापासून फाईल प्रलंबित आहेत राशन कार्ड साठी ये जा करून सर्वसामान्य लोकांचा जीव मेटकुटीलाआलेला आहे.         नायब तहसीलदार पुरवठा विभाग यांच्याकडे याचे काम आहे यांच्याकडे अनेक लोक राशन कार्ड च्या तक्रारी घेऊन येतात त्या तक्रारीचे योग्य दिशेने निराकरण होत नाही त्यासंदर्भात विचारणा केली असता हे सांगतात की आमच्याकडे याचा अतिरिक्त पदभार दिलेला नाही अशी उडवा उडवी चे उत्तर नायब तहसीलदार नेहमी लोकांना देत असतात. एजंटच्या माध्यमातून राशन कार्ड देण्याचे काम तहसील विभागांमध्ये सुरू आहे हे एजंट कोण आहेत. यांच्याकडे कोणता पदभार आहे .या सर्व प्रकाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे बेजबाबदार नायब तहसीलदार  यांना कार्यमुक्त करण्याची मागणी सन ऑफ आंबेडकर ग्रुपचे सनी गायकवाड यांनी केली आहे

समर्थ रामदास स्वामींच्या जन्म गावातून चोरीस गेलेल्या ऐतिहासिक राम सीता लक्ष्मणाच्या मूर्ती चोरणारास तात्काळ अटक करा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,आमदार लोणीकर यांनी भ्रमणध्वनी वरून पोलीस निरीक्षक व मंदिराचे पुजारी धनंजय कुलकर्णी यांच्याशी संवाद साधत घटने संदर्भात पोलीस निरीक्षक यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे दिले निर्देश

Image
प्रतिनिधी समाधान खरात  इ स पंधराशे साली समर्थ रामदास स्वामींच्या जांब समर्थ गावामध्ये स्थापित करण्यात आलेल्या राम सीता लक्ष्मणाच्या पंचधातूच्या ऐतिहासिक मूर्ती दिनांक 21 ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरून नेल्या या संदर्भामध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पत्र देत या ऐतिहासिक मुर्त्यांच्या चोरी संदर्भामध्ये उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून संबंधित चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे       याबाबतचे अधिकृत असे की जांब समर्थ तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथील मूर्ती चोरीची घटना समजताच माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महाजन यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलत चोरांना जेरबंद करावे असे सांगितले त्याचबरोबर मंदिराचे पुजारी धनंजय कुलकर्णी यांच्याशी चर्चा करत घडलेल्या घटने संदर्भात इतिवृत्तांत जाणून घेतला  समर्थ रामदास स्वामी हे अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर देश

आ.लोणीकर यांनी नागरतास येथे केली विविध विकासकामची पहानी, नांगरतस जालना जिल्ह्यातील धार्मिक स्थळासह महत्त्वाचे पर्यटन स्थळ

Image
  प्रतिनिधी समाधान खरात  जालना जिल्हातील श्री क्षेत्र नांगरदास हे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते प्रभू रामचंदराणे येथे नांगर फिरवला होता म्हणून या ठिकाणचे नाव नांगरदास असे पडलेले आहे येथे प्राचीन काळापासून महादेवाच्या दगडी पिंड आहे व तीन मंदिर आहेत रामचंद्र रामगिरी बाबा येथे वास्तव्यास होते त्यांचे देखील येथे मंदिर आहे. पावसाळ्यात येथे महाराष्ट्रभरातून विविध पर्यटक येत असतात पावसाळ्यात येथील परिसर हिरवा वातावरण नयनरम्य असते हिरवीगार दाट झाडी पक्षांची किलबिलाट ऐकायला मिळते पर्यटकांना साथ घालून जातो..! माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी तंत्कालिन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणविस व तत्कालीन अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कडे पाठपुरावा करुन 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला.खऱ्या अर्थाने जालना जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर असणाऱ्या नांगर तासातील पायाभूत सुविधांचा विकास माजी मंत्री आमदार लोणीकर यांच्या माध्यमातून झाल्यामुळे या ठिकाणचे सुसज्ज असे सभागृह आसे सभागृह बांधण्यात आले. त्यासोबत येणाऱ्या भाविकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, बलकुलर , पेवरब्लाँक व इतर

डॉ.धोंडोपंत मानवतकर आज आकाशवाणीवर ,महाराष्ट्राच्या सर्व आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार आहे.

Image
मंठा प्रतीनिधी सुभाष वायाळ मराठवाडयातील सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांचे  आज दि.२२ ऑगस्ट रोजी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून सायंकाळी ठीक ६:३५ वाजता "साहित्य सौरभ" या मालेत काव्य वाचन होणार आहे.       " एफ.एम.101.7 आकाशवाणी औरंगाबाद सर्व जनात सर्वांच्या मनात " ही आकाशवाणी औरंगाबाद केंद्राची निर्मिती असून हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सर्व आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार आहे.       हा कार्यक्रम प्रत्यक्ष रेडिओवर किंवा Newsonair ही App डाउनलोड करून ऐकता येईल.          मंठा येथील कवी डॉ.धोंडोपंत मानवतकर हे कवी लेखक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांचे अंतरसाक्षी, रुपांतर, ओढाळ सुरांच्या देही, व लोकशाहीचा जाहीरनामा हे कवितासंग्रह प्रकाशित असून विद्रोही साहित्याचा निर्माता, व काव्यप्रभा ही पुस्तकेसुद्धा प्रकाशित आहेत. मंठा, जि. जालना येथील आविष्कार साहित्य मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष असून गेली ४० वर्षापासून ते लेखन करतात व तीस वर्षापासून आविष्कार साहित्य मंडळाद्वारे वाङ्मयचळवळ चालवतात.      अनेक कविसंमेलनाचे अध्यक्षपद त्

माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांच्या आक्रमक भुमिकेमुळे प्रशासन खडबडुन जाग ,आ.बबनराव लोणीकर यांनी परभणी जिल्हाधिकारी कांचन गोयल यांना लेखी पत्राद्वारे केली होती विनंती, लोणीकरांच्या लेखी पत्रानंतर परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हातील सर्व तहसिदार यांना दिले तांत्काळ पंचनामे करण्याचे आदेश

Image
प्रतिनिधी समाधान खरात मराठवाड्यासह परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रशासनाच्या वतीने मात्र अतिवृष्टी नाही या विचाराने कोणत्याही प्रकारचे पंचनामे करण्याचे टाळले होते      परंतु मागील 20 ते 22 दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याकारणाने मराठवाड्यासह परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे 50% पेक्षा अधिक नुकसान झाले आहे काल माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी परभणी जिल्हाधिकारी कांचन गोयल यांना लेखी पत्र आ.लोणीकर यांनी दिले होते नंतर आरडीसी श्री वाडोदकर यांना फोनवरून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून लोणीकरांच्या सूचनेनंतर तात्काळ पंचनाम यांना सुरुवात झाली आहे..! प्रत्यक्षात अतिवृष्टी झालेली नसेल तरीदेखील शेतकऱ्यांचे 33% पेक्षा अधिक नुकसान झाले असेल तर प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पंचनामे करण्याची तरतूद कायद्यानुसार आहे ही बाब लोणीकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुचवल्यानंतर प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे मागील 20 ते 22 दिवसापासून सतत मराठवाडा सह पर

उपविभागीय कृषी अधिकारी सोनकांबळे यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करून,जिल्हा कृषी अधिकारी यांची सुद्धा चौकशी करा प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना

Image
प्रतिनिधी परतुर हनुमंत दवंडे  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मा.मुख्यमंत्री यांना. जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत निवेदन देऊन मागणी करण्यात आली निवेदनात पुढे म्हटले आहे की,उपविभागीय कृषी अधिकारी परतुर  गजानन सोनकांबळे यांनी १ लाख रुपये घेत असतांनी अँटी करप्शन ब्युरो जालना सापळा रचून कारवाई करूनअटक करण्यात आली,       उपविभागीय कृषी अधिकारी परतुर  सोनकांबळे यांची पहिली पोस्टींग परतूर येथे झाली होती त्यांची सेवा पूर्ण ३ वर्षे झालेली नाहीत, म्हणून  सोनकांबळे यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे, कारण  सोनकांबळे यांच्या कालावधीत पोखरा योजने अंतर्गत कामे झाली ती सर्व कामे संबंधित बोगस आहेत, पोखरा या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना जो लाभ मिळतो तो संबंधित डीलर यांनी श्री सोनकांबळे यांना हाताशी धरून कोट्यावधी रुपयाची लुटमार करून बिल मंजूर करून घेतले, त्याची चौकशी करून संबंधित शेतकऱ्यांना साहित्य पुरवणाऱ्या डीलर कडून रिफंड पैसे वसूल करण्यात यावेत, तसेच  गजानन सोनकांबळे उपविभागीय कृषी अधिकारी परतुर संपत्तीची चौकशी व त्यांच्या नातेवाईकाची चौकशी संपत्ती जप्त करण्यात यावी,  सोनका

शिवसेना जिल्हाप्रमुख ऐ जे बोराडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

Image
 परतूर / प्रतिनिधी हनुमंत दवंडे         शिवसेना जिल्हाप्रमुख ऐ जे बोराडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत परतूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते विजय चिखले, शरद भारुका, प्रभाकर सोळंके यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला        आज दिनांक 19 आगष्ट रोजी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी बोराडे सह मंठा पंचायत समितीचे माजी सभापती संतोष वरकड, परतूर उपतालुकप्रमुख सुदर्शन सोळंके, विकास खरात, सुनील सुरुंग या प्रमुख नेत्यांची उपस्तीती होती. या प्रवेश सोहळ्यात आपल्या भावना व्यक्त करताना ऐ जे बोराडे यांनी म्हटले की, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व तमाम शिवसैनिकाना मान्य असून, कोणी कितीही कट कारस्थाने केली तरी शिवसेनेचे अस्तिसत्व कोणीच संपवू शकत नाही, स्व बाळासाहेबांच्या विचारांचा हा झंझावत पुढे असाच चालू राहणार असून जे गदार झाले ते भविष्यात उघडे पडतील , जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असे म्हणत परतूर विभागात अनेक जण मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश घेणार असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली.

छायाचित्रकार हाच खरा जीवनाचे प्रतिबिंब दाखवणारा आरसा आपल्या कलात्मकतेतून जनसामान्यांच्या व्यथा प्रकट करण्याचे मोठे माध्यम म्हणजे छायाचित्रकार माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,छायाचित्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात छायाचित्रकारांचा आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते सत्कार

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  छायाचित्रकार हाच खऱ्या अर्थाने जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून समाजाच्या पटलावर मांडणारा खरा शिल्पकार असल्याचे मत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले ते जालना येथे आयोजित छायाचित्रकार दिनानिमित्त छायाचित्रकारांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की जीवनाच्या सुंदर चित्रांना बरोबरच जनसामान्यांच्या व्यथा समाज पटलावर मांडण्याची महत्वपूर्ण भूमिका छायाचित्रकार आपल्या कॅमेऱ्याद्वारे टिपत असतो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घडलेल्या घटनेचे छायाचित्रण करत असतो असेही यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले जीवनाचे अगदी सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत अनादी काळापासून तर आधुनिक युगापर्यंत छायाचित्रणाचे अन्यन्य साधारण महत्व असून, प्राचीन कलाकृतीकडे बघितल्यानंतर छायाचित्रणाचे महत्त्व आपल्या लक्षात येते आधुनिक लोकशाहीमध्ये छायाचित्रकाराच्या छायाचित्राच्या जोरावरच अनेक घटनाक्रम सत्य असत्य तपासले जातात यावरच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून या छायाचित्रकारा

रिपब्लिकन सेनेच्या परतुर तालुकाध्यक्षपदी निर्मला वाघमारे यांची नियुक्ती...

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे रिपब्लिकन सेना संपर्क कार्यालय जालना येथे परतूर तालुक्यातील महिला निर्मला संतोष वाघमारे यांची परतूर महिला तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आल        यावेळेस निवडीबद्दल बोलतांना निर्मला वाघमारे म्हनाल्या की, पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार संघटन वाढवण्याचं काम करणार असून सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन महिला सक्षमीकरण्यासाठी प्रयत्न करणार व आंबेडकरी घराण्याशी एकनिष्ठ राहण्याचे त्यांनी वचन दिले, यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष दिनेश भाई आदमाने यांच्या अध्यक्षतेखाली निर्मला वाघमारे यांची निवड करण्यात आली .या वेळेस तिथे पश्चिम जिल्हा अध्यक्ष लिंबाजी बाबळकर, पूर्व जिल्हा अध्यक्ष, दिनेश भाई आदमाने जिल्हा उपाध्यक्ष ,सर्जेराव अंभोरे बदनापुर तालुका अध्यक्ष ,दासु गरबडे परतुर तालुका अध्यक्ष, जयपाल भालके,परतूर युवक तालुकाध्यक्ष कैलास भालके ज्येष्ठ नेते दादारावजी दवंडे,रामभाऊ पाईकराव संतोष वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते निर्मला वाघमारे यांच्यासोबत होते.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्व. अनिल जिंदल परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर जालना येथे उत्साहात साजरा

Image
जालना सुभाष वायाळ      दि.१८माय नेशन माय प्राइड आज़ादी का महोत्स्तव लायंस क्लब ऑफ़ जालना डायमंड डिस्ट्रिक्ट ३२३४ एच-२ तर्फे नगर परिषद शाळा संभाजी नगर,जालना येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम सपन्न झाला.  .   .यावेळी राष्ट्रगीताची सुरुवात करुन विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य सादर केले.तसेच लायंस क्लब ऑफ़ जालना डायमंड तर्फे निबंध , वकृत्व , चित्रकला , रांगोळी , वादविवाद , नृत्य घेण्यात आलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वाटप करण्यात आले , क्लब तर्फे शाळेला कंप्यूटर संच वितरण करण्यात आले व मुलांना बिस्किटे पैकेट चे वितरण केले. यावेळी क्लब चे झोन चेयर पर्सन लॉ मीनाक्षी दाड , लॉ विजय दाड , अध्यक्ष लॉ दिनेश राम सिनगारे , सेक्रेटरी लॉ संजय पित्ती , योगेश सोनुने , दिपक चरखा , सुभाष फत्तेलष्कर संतोष भालेराव बाबासाहेब खिल्लारे गजानन गायकवाड राजू ढाकणे समद मणियार विलास जगधने जयेश मेहता शिवरतन डवले श्रीमती सुनंदा वैष्णव श्रीमती कांचन काळे श्रीमती माधुरी भालेराव सौ.कल्याणी महालकर शाळेचे मुख्याध्यापक राजेश मुंडलिक उपस्थित होते.

परभणी जिल्ह्यात सततच्या पावसामुळे उध्वस्त झालेल्या पिकांचे पंचनामे करा - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना,मदतीसाठी लोणीकर घेणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट

Image
प्रतिनिधी हनुमंत दवंडे  संपूर्ण मराठवाड्यासह परभणी जिल्ह्यात सततच्या पावसाने अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे प्रत्यक्षात अतिवृष्टी नसली तरी मागील 20 ते 22 दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने मराठवाड्यात सहज जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाली आहेत अशा पिकांचे पंचनामे तात्काळ करण्यात यावेत अशा प्रकारच्या सूचना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज परभणी जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री वडदकर यांना दिल्या. मागील 20 ते 22 दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने मराठवाड्यासह परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून च्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी तात्काळ पंचनामे करणे आवश्यक असल्याचे लोणीकर यांनी दूरध्वनी वरून परभणी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री वडदकर यांच्याशी चर्चा करून तात्काळ सदरील पिकांच्या नुकसानीचा आढावा सादर करणेबाबत सूचना केली. मराठवाड्यातील जालना व धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे सुरू केले असून परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा तात्काळ पंचनामे सुरू झाले

लोणीकरांचा दणका - जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर तात्काळ पंचनाम्यांना, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लोणीकरांनी पत्राद्वारे केली पिकांच्या नुकसान भरपाईची मागणी,लोणिकरच्या सुचनेनंतर व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या तहसीलदारांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना

Image
प्रतिनिधी  जालना समाधान खरात  मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रशासनाच्या वतीने मात्र अतिवृष्टी नाही या विचाराने कोणत्याही प्रकारचे पंचनामे करण्याचे टाळले होते परंतु मागील 20 ते 22 दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याकारणाने मराठवाड्यासह जालना जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे 50% पेक्षा अधिक नुकसान झाले आहे काल माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांना फोनवरून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून लोणीकरांच्या सूचनेनंतर तात्काळ पंचनाम यांना सुरुवात झाली आहे प्रत्यक्षात अतिवृष्टी झालेली नसेल तरीदेखील शेतकऱ्यांचे 33% पेक्षा अधिक नुकसान झाले असेल तर प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पंचनामे करण्याची तरतूद कायद्यानुसार आहे ही बाब लोणीकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुचवल्यानंतर प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे मागील 20 ते 22 दिवसापासून सतत मराठवाडा सह जालना जिल्ह्यात पाऊस सुरू असून अतिवृष्टी नसली तरी देखील

सरपंच परिषदेच्या पाठपुराव्याला यश*......!*पंतप्रधान आवास योजनेच्या सर्वेक्षणातून वंचित लाभार्थ्याचे होणार पुन्हा सर्वेक्षण,जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न कणसे पाटील यांची माहिती

Image
* परतूर/प्रतिनिधी: हनुमंत दवंडे  पंतप्रधान आवास योजनेतून ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंब धारकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या अनुषंगाने सन 2018-19 मध्ये ऑनलाइन पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले होते       यातील बहुतांश कुटुंबाची नावे आवास प्लस च्या चुकीच्या सिस्टम मुळे वगळण्यात आले होती व अनेक कुटुंबधारक सर्वेक्षणापासून वंचित राहिले असल्याने या बाबत सरपंच परिषदेच्या वतीने वेळोवेळी मा.उपसंचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह निर्माण मुख्यकार्यालय,जिल्हा प्रकल्प संचालक व मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला  तद्नंतर मा.उपसंचालक राज्य व्यवस्थापन कक्ष महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकरी मुख्याधिकारी यांना पत्र देऊन सर्वेक्षण केलेली पण सिस्टम च्या तांत्रिक अडचणीमुळे अपात्र झालेली व सद्या पात्र असलेली तसेच आवास प्लस अंतर्गत प्र पत्र ड मध्ये सर्वेक्षण न झालेली पंरतु सद्या पात्र असलेल्या सर्व कुटुंबाची माहिती मागवण्यात आली असून त्यामुळे जिल्ह्यातील हजारो पात्र कुटुंब पात्र होऊन त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती सरपंच परिषदेचे

सततच्या पावसामुळे उध्वस्त झालेल्या पिकांचे पंचनामे करा - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना,मदतीसाठी लोणीकर घेणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट

Image
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे  संपूर्ण मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात सततच्या पावसाने अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे प्रत्यक्षात अतिवृष्टी नसली तरी मागील 20 ते 22 दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने मराठवाड्यात सहज जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाली आहेत अशा पिकांचे पंचनामे तात्काळ करण्यात यावेत अशा प्रकारच्या सूचना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज जालना  मागील 20 ते 22 दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून च्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी तात्काळ पंचनामे करणे आवश्यक असल्याचे लोणीकर यांनी दूरध्वनी वरून जालना जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड व आर डी सी केशव नेटके यांच्याशी चर्चा करून तात्काळ सदरील पिकांच्या नुकसानीचा आढावा सादर करणेबाबत सूचना केली. मराठवाड्यातील धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे सुरू केले असून जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तात्काळ पंचनामे सुरू झाले पाहिजे असेही लोणीकर यांनी यावेळी जिल्ह

देवर्षी संगीत विद्यालयाचा देशभक्तांना समर्पित देशभक्तीपर गीतांचा बहारदार कार्यक्रम रंगला

Image
* परतूर: प्रतिनिधी हनुमंत दवंडे  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रामेश्वर नरवडे संचलित देवर्षि संगीत विद्यालयातर्फे 'एक शाम शहीदो के नाम' हा देशभक्तीपर गीतांचा बहारदार कार्यक्रम वरद विनायक लॉन्स येथे कार्यक्रम थाटात संपन्न झाला.  कार्यक्रमाचे माजी नगराध्यक्ष मा श्री विनायक काळे, विजय नाना राखे, श्याम तेलगड, कल्याण बागल, प्रकाश बापू सोळंके मुरलीधर देशमुख,अविनाश शहाणे, प्रवीण डुकरे, कृष्ण आरगडे , डॉ.ज्ञानदेव नवल डॉ संजय पुरी, डॉ.प्रमोद आकात, शत्रुघ्न कणसे आदी मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रामेश्वर नरवडे यांनी केले.  त्यानंतर संगीत विद्यालयाचे विद्यार्थी यांनी देशभक्तीपर गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.  त्यामध्ये वैष्णवी वाकडे हिने देश रंगीला रंगीला दिल दिया है जान भी देंगे संशारदा राज मुंडे यांनी ए मेरे वतन के लोगो दिपाली कुलकर्णीने जयोस्तुते श्री महन्मंगले, रामेश्वर नरवडे यांनी जहा डाल डाल पर सोनेकी, हे राष्ट्र देवतांचे, अमृता नरवडे हिने तेरी मिट्ट

मंठ्यात जि.प. नुतन उर्दू शाळेत शिक्षकाची रिक्त पदे त्वरीत भरावी गटशिक्षणाधिकारी शिंदे यांना पालकांची मागणी

Image
      मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ          दि.१६ शहरातील जि.प. उर्दू प्रा.शाळा नूतन शाळेत इ.१ ते ८ पर्यंत वर्ग असून एकूण विद्यार्थी ३५३ वर्ग १ ते ५ पर्यंत २२५ विदयार्थी व वर्ग ६ ते ८. १२८ विद्यार्थी असे एकूण विद्यार्थी ३५३ आहेत त्यासाठी आर.टी.ई २००९ नुसार शाळेत शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणीचा निवेदन शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी सतीश शिंदे मार्फत मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. जालना मा. शिक्षणधिकारी जि.प. जालना मा. शिक्षण संचालक पुणे मा. शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मा. केंद्र प्रमुख नूतन मंठा यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी केंद्रप्रमुख ए. आर. कुरेशी, गटसमन्वयक के. जी. राठोड, हाफेज शबाब बागवान जिल्हा परिषद कन्या शाळाचे उपअध्यक्ष अशपाक शेख यांची उपस्थिती होती.        या निवेदनत म्हटले आहे की    शासनाचे नियमानुसार ३० विद्यार्थीवर एक शिक्षक मान्य असून आमच्या शाळेसाठी हा नियम लागू नाही का ? शासनाचे नियम फक्त कागदावर पुरतेच आहेत का ? असा प्रशन निर्माण केला आहे.    या निवेदनात शासनाला ईशारा देण्यात आला आहे की जि.प. उर्दू प्रा. शाळा नूतन या शाळे

दैठना खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण उत्साहात

Image
परतूर – प्रतिनिधी हनुमंत दंवडे परतूर तालुक्यातील दैठना खुर्द येथे १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिनानिमित्या येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावात विद्यार्थ्यांची सकाळी सात वाजता प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच शालेय समितीचे अध्यक्ष विजय सवने यांच्या हस्ते शाळेच्या मैदानात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेची विद्यार्थ्यानी मयूरी अशोक पवार हीने एनएमएस परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल शाळेच्या वतीने पालकासह तिचा सत्कार करण्यात आला. तर शाळा परिसरात ध्वजारोहण करण्यासाठी शालेय परिसराची सफाई करण्यात सुरेश काटकर यांनी मोलाचा वाटा उचलल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच येथील पत्रकार भारत सवने यांना पत्रकार भूषण पुरस्कार मिळाल्या बद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्वतंत्र दीना निमित्या शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली. यावेळी मुख्याध्यापक श्रीराम भापकर, शिक्षक अशोक माने, प्रकाश जोगदंड, अंकुश चौधरी, बाबासाहेब कराड, अजू कायमखानी यांच्यासह पालक विद्यार्थी प्रतिष्ठित ग्रामस्थांनीची मोठ्या संख्येने ध्वजारोहणाला उपस्थिती होती.   फोटो ओळी.. दैठना खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेची विद्

गुलाबराव मुक्कादम यांचे निधन

Image
परतूर – प्रतिनिधी हनुमंत दंवडे तालुक्यातील दैठना बू येथील गुलाबराव किसनराव मुकादम वय ५८ वर्ष यांचे दि १४ ऑगस्ट रोजी रविवारी पहाटे साडेतीन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातू, असा परिवार आहे.

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

Image
परतूर  प्रतिनिधी हनुमंत दवंडे  तालुक्यातील यश प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तसेच यश इंग्लिश स्कूल सातोना येथे आज भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.श्री सुरेश लहाने यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयराम खंदारे यांनी केले.  विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळून त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने महेश भाऊ सितारामजी आकात यांनी सुरू केलेल्या संकल्पनेनुसार दरवर्षीप्रमणे याही वर्षी यश अर्बन को. ऑ.क्रे.सो.ली. परतूर यांच्या वतीने वर्ग १०वी परीक्षेत गुणवंत आलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला. जि. प.प्रशाला सातोना खुर्द यथील कु शिंदे पूजा अनिल, पानझडे गीता विष्णू,प्रधान माया मनोज, आकात पूजा कृष्णा तसेच यश प्रा. व मा. विद्यालय सातोना खुर्द येथील प्रणव महादेव लाटे, अनुजा रंजीत लाटे, श्रद्धा बालासाहेब आकात, आदित्य दीपक पानशेवडीकर, वैष्णवी अशोक झोल, श्रद्धा राजेभाऊ काळे या विद्यार्थ्यांचा शाल,सन्मानचिन्ह,धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. या बरोबरच प्रशालेतील अभिनव डांगरे या विद्यार्थ्याने महेश भाऊ

देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था येथे डाॅ.संजय पुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण

Image
* परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे  येथील देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था म.जालना शाखा परतूर येथे स्वांतञ्य दिवसाच्या 75 व्या अमृत मोहत्सव शुभप्रसंगी डॉक्टर संजय पुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.     याप्रसंगी संस्थेचे संचालक श्री द.या. काटे स्थानिक सल्लागार श्री भगवानराव मोरे, डॉक्टर कल्याण बोणगे ,श्री किशन अग्रवाल ,श्री गोविंद मोर ,शाखा व्यवस्थापक शशांक वाळिंबे सर्व कर्मचारी, पिग्मी प्रतिनिधी व सभासद उपस्थित होते.