Posts

पोलीस ठाण्याच्या आवारातच पोलीसांची पत्रकाराला धमकी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार; पत्रकार संरक्षण कायद्याबाबत ठाण्याचे पोलीस अधिकारी अनभिज्ञ!

Image
जालना  प्रतिनिधी - समाधान खरात/नरेश अन्ना   पोलीस ठाण्याच्या आवारातच एका पत्रकाराला बुधवार (दि 2) रोजी सुनील भारती, विलास गायकवाड, गणेश सातपुते तिघे पत्रकार उभ्या असताना त्यांच्या समोर धमकी दिल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे संबंधीत पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनाच पत्रकार संरक्षण कायद्याबाबत माहिती नसल्याचे दिसून आले असून याबाबत वरिष्ठांना तक्रार पाठवून त्यांच्याकडून याबाबत पत्रकार संरक्षण कायद्याबाबत माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्‍वासन ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री उनवणे यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. या संदर्भात दिलेल्या तक्रारीत जलजला टाईमचे संपादक आमेर खान याकुब खान याने म्हटले आहे की, त्यांच्या वृत्तपत्रात दि 31 मार्च 2025 रोजी बातमी लावल्याचा राग मनात धरून पोलीस कर्मचारी चंद्रकांत माळी यांनी जालना तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात सुनील भारती, विलास गायकवाड, गणेश सातपुते त्यांना समोर बुधवार (दि 2) रोजी धमकी देत चेतावले आहे. श्री माळी म्हणाले की, खेटायचे असेल तर मी पूर्णपणे आता खेटतोच व तुला बघु...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अध्यक्षपदी अशोक ठोके तर सचिव पदी रवी इंगळे यांची निवड...

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी भारतरत्न, बोधिसत्व परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती परतूर रेल्वे स्टेशन येथे साजरी करण्यात येणार आहे, महामानवाची जयंती थाटामाटात  साजरी करण्याच्या अनुषंगाने परतूर रेल्वे स्टेशन येथे आर.सी. सी. मित्र मंडळ व पंचशील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्याच्याअनुषंगाने दिनांक 1 एप्रिल 2025, वार मंगळवार रोजी जयंती कार्यकारीनी निवडीची बैठक पार पडली.    या बैठकीत दैनिक युवक आधार चे जालना जिल्हा प्रतिनिधी अशोक ठोके यांची अध्यक्षपदी तर सचिव पदी रवी इंगळे व उपाध्यक्षपदी वंचित बहुजन आघाडीचे परतूर शहर अध्यक्ष राहुल नाटकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीने परिसरातील आंबेडकरी अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.या जयंती उत्सव समितीची पुढीलप्रमाणे कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. अध्यक्ष:- आयु. अशोक ठोके  उपाध्यक्ष : आयु.राहुल नाटकर सचिव :- आयु. रवि इंगळे  कोषाध्यक्ष :आयु.दिपक हिवाळे  सहसचिव :- आयु.प्रदीप साळवे संघटक:आयु. स्वप्नील पहाडे सहकोषाध्यक...

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील   चौयार्शी लाख यौन्नी तून मिळालेला हा नरदेह भंगवत कृपेनेच मिळालेला आहे . हे मानव शरीर एकदाच मिळते हे परत परत मिळणार नाही याचा उपयोग आपण भगवंत भक्ती साठी च केला पाहिजे पाप आणि पुण्याचा संचय सारखे असतील तेव्हाच मनुष्य जन्म मिळतो . . परतू पुण्याचा संचय जर जास्त असेल तर तुम्हाला स्वर्गातील देवत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही . मानव शरीर हे हिर्यापेक्षा अनमोल आहे त्या शरिराला इंतर सुंगधाचे व्यसन लागण्यापेक्षा भगवत भंक्ती चे व व्यसन लावा म्हणजे या नरदेहाचा उपयोग होईल . चार कुपा या मनुष्यावर होत असतात यापैकी भगवत कृपा ही पुण्यवानालाच होत असते . भगवंताच्या भजनाने या नरदेहाचा उद्धार होतो गरज आहे त्याला मनापासून आळवण्याची असे प्रतिपादन प पू चेतन्य बापू याचे कृपा पात्र शिष्य आनंद चैतन्य बापू यांनी तळणी येथून जवळच असलेल्या बेलोरा येथे केले तीन दिवसीय गीतारामायण संत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे . या कलयुगात प्रत्येक मनुष्य दुःखी आहे थोडे थोडे सगळेच दुःखी आहे या संसारात तुम्हाला कोणीच सुखी नजरेला येणार नाही . धनाने सुखी असतील पण शरीर व्याधी...

सनी गायकवाड यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे

Image
 परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण    महाराष्ट्र मध्ये फुले शाहू आंबेडकर साठे चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्ते यांना महाराष्ट्रातील सर्वांचे परिचित भंते कश्यप ली यांच्यावतीने दिनांक 30 मार्च 2025 रोजी वार रविवार या दिवशी पारेगाव तालुका जिल्हा जालना येथे दोन दिवसीय धम्म परिषदेच्या औचित्य साधून त्या रोजी सनी गायकवाड यांना समाजाप्रती प्रामाणिक काम केल्याबद्दल तसेच फुले शाहू आंबेडकर चळवळीत व सन ऑफ आंबेडकर ग्रुप परतुर च्या वतीने विविध गोरगरीब वंचित घोषित घटकातील नागरिकांचे कामे मार्गे लावल्याबद्दल तसेच समाजासाठी अहो रात्र झटकल्याबद्दल त्यांना भंते कश्यप ली यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे   यावेळेस सनी गायकवाड यांना  सांगितले की सर्वात आगोदर आदरणीय भन्ते कश्यप ली यांचे मनापासून आभार मानले,तसेच हा समाजरत्न पुरस्कार घोषित झाल्यानंतर त्यांनी पुढे असे म्हटले मानसन्मान हा विकत घेता येत नसतो समाजाप्रती ग्राउंड लेव्हल ला काम केल्यानंतर नक्कीच असे सन्मान मिळत असतात यापुढेही समाजाप्रती तसेच बाबासाहेबांच्या चळवळीसाठी रा...

परतूर तालुक्यात तब्बल 55 दुर्धर आजार ग्रस्त लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना मंजूर., मा मंत्री आ बबनराव लोणीकर व राहुल लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नातून तहसीलदार प्रतिभा गोरे यांची उत्तम कामगिरी

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   परतुर तालुक्यातील दुर्धर आजार ग्रस्त यांचे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे प्रस्ताव तयार करून. पद्माकर कवडे पाटील व एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र ग्रामीण रुग्णालय परतूर, समुपदेशक शिवहरी डोळे. यांच्या पुढाकाराने तालुक्यामध्ये जवळपास 55 लाभार्थ्यांचे प्रस्ताव तयार केले. संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर पेन्शन टाकण्यासाठी. आज रोजी सर्व लाभार्थ्यांचे बँक अकाउंट व आधार लिंक असलेली आधार कार्ड. सर्व संचिका तयार करून. तहसीलदार यांना तहसील कार्यालयात दाखल करण्यात आल्या आहेत.

प्रा. सिध्दार्थ पानवाले यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा. सिद्धार्थ रामचंद्र पानवाले यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  भन्ते कश्यप ली यांनी या पुरस्काराची जालना येथे प्रसिध्दीपत्रक आणि निवडीच्या पत्राद्वारे जाहीर केले.   आंबेडकरी चळवळीसाठी आक्रमक वैचारिक भूमिका घेणे प्रसंगी रस्त्यावर येऊन मोर्चे आणि आंदोलन करणे कृतिशील चळवळ करणे यामुळे प्रा. सिद्धार्थ पानवले हे परिचित आहेत. प्रा. सिद्धार्थ पानवले यांना मिळालेला हा चौथा पुरस्कार आहे. याअगोदर तेजस फॉउंडेशन नाशिकचा युवा समाजभूषण पुरस्कार,होल्डिंग हँड्स औरंगाबाद चा पुरस्कार, तसेच मुबई येथील सोशल रिसर्च फॉउंडेशन चा सम्राट अशोक राष्ट्रीय धम्म दूत पुरस्कार मिळालेला आहे. जालना येथे हा पुरस्कार येत्या 30 मार्च रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरीत केला जाणार आहे.  हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वांकडून अभिनंदन केले जात आहे.

संसारीक मनुष्याने परमार्थिक साधनेतील अनुभव समाजाला सांगावाह - हभप प्रमोद महाराज हडप

Image
तळणी प्रतीनीधी रवी पाटील जगदगुरू तुकाराम महाराज अभंगातून स्वतःच्या स्थितीत वर्णन करतात स्वतःचा अनुभव या ठिकाणी सांगतात *धन्य मी माने ना आपुले संचित राहिले से प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडो या वाही काळा हाती या* अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया असे म्हणतात की धन्य मी माणिक ते संचित पुण्याचे देतो कारण तुझ्या नावाच्या ठिकाणी माझी प्रीती म्हणजे आवड आतापर्यंत राहिलेली आहे त्याचं कारण माझं संचित आहे की मी काळाच्या तावडीतून सुटलोय जगद्गुरु लक्षण सांगतात की माझ्या जीवनामध्ये मला संत संगती प्राप्त झाली महाराज संत संगती प्राप्त झाली त्यात काय धन्यता वाटते प्रसंगतीमध्ये 24 ब्रह्म रसाचे पान करायला मिळतं आणि ब्रम्हरसाच पान करून मी सारखा ब्रम्हरस सेवन करतोय पण माझं पोट काही भरतच नाही मग पोट भरेल कसे ब्रम्हरसातून जे सात्वीक भक्तीरसाचा सुंगध दरवळेल ना त्या सुगंधाच्या दरवळणार्या सुंगधाततूनच पोट भरेल सुंगंधा मधील तो सुगंध घेण्याची जी ईच्छा मनुष्य करतो ना तेवढी जरी ईच्छा भगवत भक्ती साठी मनोभावे केली ना तर तो आवाज नक्कीच त्या भगवंता जवळ पोहचल्या शिवाय राहणार नाही . असे प्रतिपादन प्रम...