सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

प्रा. सिध्दार्थ पानवाले यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा. सिद्धार्थ रामचंद्र पानवाले यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 
भन्ते कश्यप ली यांनी या पुरस्काराची जालना येथे प्रसिध्दीपत्रक आणि निवडीच्या पत्राद्वारे जाहीर केले.
  आंबेडकरी चळवळीसाठी आक्रमक वैचारिक भूमिका घेणे प्रसंगी रस्त्यावर येऊन मोर्चे आणि आंदोलन करणे कृतिशील चळवळ करणे यामुळे प्रा. सिद्धार्थ पानवले हे परिचित आहेत.

प्रा. सिद्धार्थ पानवले यांना मिळालेला हा चौथा पुरस्कार आहे.
याअगोदर तेजस फॉउंडेशन नाशिकचा युवा समाजभूषण पुरस्कार,होल्डिंग हँड्स औरंगाबाद चा पुरस्कार, तसेच मुबई येथील सोशल रिसर्च फॉउंडेशन चा सम्राट अशोक राष्ट्रीय धम्म दूत पुरस्कार मिळालेला आहे.

जालना येथे हा पुरस्कार येत्या 30 मार्च रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरीत केला जाणार आहे. 

हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वांकडून अभिनंदन केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत