Posts

Showing posts from May, 2025

सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे अभूतपूर्व यश

Image
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण आमच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचा (फेब्रू- 2025) 12 वी कला शाखेतून 90.67 गुण मिळवून सर्व प्रथम आलेला गुणवंत विद्यार्थी किरण किसन बेरगूडे ह्याची नुकतीच फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे ( B.A) अभ्यासक्रमासाठी निवड झाली.  आज महाविद्यालयामध्ये संस्था सचिव तथा महाविद्यालयाचे सर्वेसर्वा आदरणीय कपिल  आकात यांच्या शुभ हस्ते किरण बेरगूडे आणि त्याच्या पालकांचा यथोचित सन्मान करून त्यास शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी सत्कारमूर्ती किरण बेरगुडे, वडील किसनराव बेरगुडे, महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. खंदारे सर , प्र.उपप्राचार्य प्रा.सोनपावले सर, कार्यालय प्रमुख प्रभाकर सुरुंग, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद यांची उपस्थिती होती.

शिक्षणाचे महत्व समजले तर भविष्य उज्वल होईल-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, महिला सक्षमीकरणासाठी उज्वल सेवाभावी संस्थेचा पुढाकार; हिरकणी पुरस्काराने कर्तबगार महिलांचा गौरव

Image
जालना प्रतीनीधी समाधान खरात    तरुणांनी ध्येय प्राप्तीसाठी डोळ्यासमोर टार्गेट ठेवले पाहिजे. त्याशिवाय कोणतेच यश गाठता येत नाही. त्यासाठी प्रत्येकाला शिक्षणाचे महत्व कळाले पाहिजे तरच भविष्य उज्वल होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दि. 26 मे 2025 रोजी उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत हिरकणी महोत्सव आयोजित केले होते. यावेळी उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी बोलत होते. दरम्यान व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के, प्रमुख पाहुणे म्हणून जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने, शाहीर अप्पासाहेब उगले, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापिठाचे प्रा. बापूराव बनसोडे, संस्थेच्या अध्यक्षा सौ. करुणा अच्युत मोरे यांची उपस्थिती होती. राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या आणि सामाजिक उपक्रमात सहभाग घेणार्या कर्तबगार महिलांचा हिरकणी पुरस्कार...

जीवनात अवैध मार्गाने संचय केलेले धनच बनते मनुष्याच्या दुःखाचे कारण-विजय महाराज वाघ

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील      द्रव्याचा चा तो आम्ही धरीतो विटाळ तुकोबारायांनी कधीच द्रव्याला धन मानले नाही तुकोबारायांनी कधीच संपतीला साधन मानले नाही तुकोबारायोकडे असे कोणते धन आहेत जे त्याला श्रेष्ठ मानतात तुकोबां रायांनी मानाचा कधीच स्वीकार केला नाही की कधी त्यांना त्याचा हव्यास त्यांना आला नाही . स्वर्ग आणि ब्रम्हपदाच्या धनाचा कधी त्यांनी विचार केला नाही तुकोबाना मान नको धन द्रव्य नको इंद्रपदाचे धन नको मग तुकोबांना नेमके कोणते धन साठवण्याचा सांगीतले तर विठ्ठल विठ्ठल हे धन आम्ही जतन केले . त्याचा उद्योग आम्ही सुरु केला . मग विठ्ठल धन आहे का परतू तुकोबा हे विठ्ठलाला धन मानतात तर तो विठल धनाचे कार्य करतो का ज्या वस्तू ला आपण जो दर्जा देतो ते कार्य त्याने केल पाहिजेकिर्तन करून धन द्रव्य गाडी घेऊन जर जमा करता येते तर हे सर्व वेश्येकडे सुद्धा आहे ना जर किर्तनातून अभिलषा ठेवली तर ते धन वेश्येने प्राप्त करून घेतले हे समजावे जीवनातअवैध मार्गाने संचय केलेले धनच बनते मनुष्याच्या दुःखाचे कारण असे प्रतिपादन विजय महाराज वाघ बनकर यांनी तळणी येथे केले श्री संत नेमिनाथ महाराजांच्या 72 ...

पाडळी शिवारात शेती रस्ता करण्याची ग्रामस्थांची मागनी, गावकऱ्यांच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  तालुक्यातील पारधी पाडळी येथील शिवारात शेतकऱ्यांना शेतात रस्ता करून देण्याची मागणी येतील ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.     यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मौजे पाडळी पारधी या गावचे पुनर्वसन परतूर वाटूर रोडवर नागापूर पाटीजवळ झालेले आहे. सदरील पुनर्वसन ते जुने पाडळी गाव हें सहा किमी अंतरावर बसलेले आहे. पुनर्वसन येथील शेतकऱ्यांच्या जमिनी या जुन्या गावाजवळ आहेत. जवळपास ५०० ते ६०० एकर जमीन या रस्त्यावर वहिती करणे अवलंबून आहे. गावात जाणारा सहा किमी प्रयन्त शेतरस्ता पूर्ण खराब झाला आहे, त्या पैकी दोन किमी रस्ता झाला आहे. उर्वरित चार किमी रस्ता पूर्णपणे खराब झाला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे पुनर्वसन येथिल शेतकऱ्यांना आपली शेती वहिती करण्यासाठी रस्ता नसल्याने शेतमाल वाहतून करणे व वाहतूकसाठी अडचणीत येत आहे. पावसाळ्यात रस्ता चिखलमय होत असल्यामुळे शेतकऱ्याचे हाल होत असल्याने पाडळी गावाच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चार किमी रस्ता त्वरित करुन द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर सरपंच प्...