Posts

आपत्यकालीन लग्न चिंता नको 37 मुहूर्त....जिल्ह्यातील विविध इच्छुकांची जुळवाजुळव सुरू

Image
सातोना प्रतिनिधी पांडुरंग शिंदे काही अपत्यकालीन कारण असल्यास अगदी चतुर्मासातही लग्न करता येते. त्यामुळे आता लग्न मुहूर्त निश्चित करण्यासाठी विवाह इच्छुकांची जुळवा जुळव सुरू आहे. यासाठी मंगल कार्यालयाचे लॉन्स केटरिंग ब्रँड पथक घोडा सजावट अशा विविध बाबींनी प्राधान्य देण्यासाठी आधी लग्न मुहूर्त निश्चित केले जात आहेत. त्यानुसार वधू-वरांच्या कुटुंबाकडून सर्व तयारी केली जात आहे.चतुर्मासात काही लग्न मुहूर्त असल्याने अनेकांची आता लग्नाचा बार ओढण्यासाठी नियोजन केले आहे. आपत्यकालीन लग्नाचा मुहूर्ता कोणासाठी चतुर्मासात आपत्तीकालीन विवाह मुहूर्त देण्यात आले आहेत. ज्यांचे आधीच लग्न ठरले आहे किंवा साखरपुडा झाला आहे घरात कोणी आजारी असेल किंवा या परिस्थितीतील लग्न लावायचे आहे अशांनी आपत्तीकालीन विवाह करावा काही घरगुती अडचण असल्यास आपत्तीकालीन विवाह करावा. एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 37 आपत्तीकालीन लग्न तिथी यंदा लग्न तिथी कमी असली तरी अधिक मास चतुर्मास काळातही लग्न करता येणार आहेत त्यासाठी दिवाळीनंतर तुळशीच्या विवाहाची वाट पाहावी लागणार नाही एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान आपत्तीका

लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयायात मानव विकास अंतर्गत 88 मुलींना सायकल चे वाटप

Image
परतूर ता.27 प्रतिनिधी कैलाश चव्हाण      परतूर येथील लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयाय मानव विकास अंतर्गत 88 मुलींना सायकल चे वाटप संस्थेचे सचिव कपिल आकात यांच्या हस्ते दि.25 रोजी करण्यात आले. या वेळी पोलीस निरक्षक शामसुंदर कौठाळे, माजी नगराध्यक्ष विनायक काळे प्रा. डॉ. भारत खंदारे, विलास पौळ यांची प्रमुख उपस्थिती होती.     ग्रामीण भागातील मुलींची पायपीट थांबावी व मुलींना वेळेवर शाळेत पोहचून ज्ञान ग्रहण करता यावे यासाठी केंद्रशासनाकडून इयत्ता आठवी च्या मुलींना मानव विकास अंतर्गत मोफत सायकलीचे वाटप करण्यात येते. या अनुषंगाने लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयातील 88मुलींना सायकालीचे वाटप करण्यात आले. या वेळी अंकुश तेलगड, विजय राखे, अखिल काजी, सचिन खरात,इजरान कुरेशी, शबीर शैख, संदीप वाघ,भालेराव सर, इसरार खतीब, मुख्यध्यापक संजय जाधव, रामराव घुगे, श्याम कबाडी, कैलास खंदारे, रामप्रसाद नवल, अनिल काळे, सुरेश मसलकर, सचिन कांगणे, बळीराम नवल, श्रीमती व्रदा डक, श्रीमती स्वरा देशपांडे, सुभाष बरकूले, राजाभाऊ वडेकर आदी उपस्थित होते. कार्यकामाचे सूत्र संचालन योगेश बरिदे यांनी केले तर आ

देशासाठी प्रानांची आहुती देणाऱ्या परिवाराचे सदस्य राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे हे दुर्दव्य! काँग्रेसच्या वतीने निषेध निदर्शनात मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी खंत व्यक्त केली.

Image
परतूर/प्रतिनिधी कैलाश चव्हाण                देशाच्या सेवेसाठी एक नव्हे तर दोन सदस्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अशा परिवारातील राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे हे लोकशाहीला घातक असून हे दुर्दवी असल्याचे प्रतिपादन मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी व्यक्त केली. खा.राहुल गांधी यांच्या रद्द केलेल्या खासदारिकीच्या निषेथ करत आज दिनांक 26 मार्च 2023 रोजी काँग्रेसच्या वतीने आयोजित निषेध निदर्शनात ते बोलत होते. यावेळी मा.आ.सुरेशकुमार जेथलिया, अन्वर बापू देशमुख, नितीनकुमार जेथलिया, बाळु काका आकात, बाबासाहेब गाडगे, इंद्रजित घनवट, संतोष दिंडे, सादेक बापू देशमुख, निळकंठ तौर,माउली तनपुरे, सुखलालाजी राठोड, एजाज जमीनदार, दादारावजी खोसे,बाळू काका ढवळे, बाजीराव खरात, मंजुळदास सोळंके,सचिन लिपने,विकास खुळे, श्रीरंगराव मोगरे,दत्ताकाका तौर, पांडू आबा कुरधने, रुस्तुम राव राजबिंडे, आणिकराव ढवले, उद्धवराव बोनगे, अशोकराव खरात, अर्जुन बरकुले,इंद्रजित डवले, बाळासाहेब भदर्गे,अण्णासाहेब लिपने आदींची उपस्तीती होती.  मोंढा भागातील काँग्रेस संपर्क कार्यालय परिसरात या निषेध निदर्शनात पुढे बोलताना जेथल

कृषी बाजार समिती निवडणूक युवा ने लढवावी - सचिन खरात (ता.अध्यक्ष शिवसंग्राम)

Image
 परतुर । प्रतिनिधी कैलाश चव्हाण          परतुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आता युवा शेतकरी पुत्रांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी अन् सुलतानी दोन्ही संकटे ओढवत असताना शेतकरी पुत्रांनी हक्काच्या कृषी बाजार समिती व शेतकरी हित चळवळ उभा करावी परतुर बाजार समितीत शेतकऱ्यांच्या बाबत समाधानकारक असे काहीच काम होत नाही, शेतकऱ्यांच्या हितासाठी आता शेतकरी युवा पुत्रांनी पुढाकार घेतला असून शेतकरी कृषी बाजार समितीची निवडणूक लढवावे असे आव्हान शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष सचिन खरात यांनी केले. कृषी बाजार समितीमध्ये गेल्या काही काळापासून निवडक व्यक्तींची सत्ता आहे. या ठिकाणी अपहार, असुविधा या बाबी वारंवार पुढे आलेल्या आहेत. शेतकऱ्यांना बाजार समितीत विश्राम व्यवस्था चांगली नाही, बाजार समिती इमारती बांधकाम झालेले आहे मात्र तेथील परिस्थिती मरणासन्न अवस्थेत आहे. बाजार समिती शेतकऱ्यांचा विश्वास संचालक मंडळाच्या दुर्लक्षामुळे जिंकू शकलेली नाही म्हणून आता शेतकऱ्यांच्या पोरांनी पुढाकार घेने आवश्यक आहे संपूर्ण जागेवर युवा शेतकरी उभे करून विजयी करण्याचा संकल्प केला असल्याचे शिवसंग्रामचे

विस्तार अधिकारी डॉ. अंजली कोळकर यांची राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कारासाठी निवड.

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  विस्तार अधिकारी तथा पदवीधर शिक्षिका यांची अविष्कार सोशल एज्युकेशन फाउंडेशन (एनजीओ) कोल्हापूर मराठवाडा शाखेच्या वतीने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार 2023 साठी निवड करण्यात आली आहे. अविष्कार फाउंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य व सांस्कृतिक क्षेत्रात गेली पंधरा वर्षापासून कार्यरत संस्था आहे. संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करते. या वर्षाच्या पुरस्कारासाठी संस्थेच्या वतीने विस्तार अधिकारी डॉ. अंजली कोळकर यांची निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की आपण शैक्षणिक (प्रशासकीय कार्य) क्षेत्रात केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे त्यामुळे आपणास राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन आपला गौरव करीत आहोत असेही दिलेल्या निवड पत्रात म्हटले आहे. या पुरस्काराने वि. अ. डॉ. अंजली कोळकर यांचे सर्वत्र स्वागत होत आहे सदरील पुरस्कार वितरण सोहळा दि. 26 मार्च रविवार रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

मराठावाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्य विविध उपक्रम

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण       निजामाच्या राजवटीतुन मराठवाडा मुक्त अनेक स्वातंत्र्यवीरांनी प्राणाची आहुती दिली तेव्हा निजामाच्या तावडीतुन आपली सुटका झाली त्या गोष्टीला यावर्षी 75 वर्ष पुर्ण होत आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समिती परतुर तर्फे वर्षभर विविध कार्यक्रम,उपक्रम सुरु आहेत.परतुर - मंठा तालुका आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम यांच अतुट नात आहे.या चळवळीसाठी परतुर येथे बैठक होवुन अनेक स्वातंत्र्यवीरांनी यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला व हौतात्म पत्करले याचे स्मरण म्हणुन या वीरांना अभिवादनाचा कार्यक्रम 26 मार्च 2023 रोजी जि.प.प्रशाला येथे सायंकाळी 5.00 होणार आहे तसेच 17 सप्टेंबर 2023 पर्यंत प्रत्येक महिन्यात विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येणार आहे तरी जास्तीत देशभक्त नागरीकांनी,माता-भगिनी,विद्यार्थी मित्रांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहान अमृत महोत्सव समितीचे श्री.प्रकाश काका दिक्षीत,डाँ.भानुदासजी कदम,विठ्ठल कुलकर्णी,अर्जुन जगताप,सचिन काटे,विकास पवार,योगेश दहिवाळ,गजानन मस्के,राहुल मोरे,कुणाल बन्सिले यांनी केले आहे.

पोहरागड (पोहरादेवी) येथे बंजारा जनजागृती महा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा - अर्जून नायक

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण     बंजारा समाजासह वंचित, उपेक्षित, कष्टकरी, शेतकरी, ऊसतोड कामगार बांधवांची काशी समजल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्र पोहरागड (पोहरादेवी) येथे दि. २९ मार्च रोजी अखिल भारतीय बंजारा जनजागृती महा मेळाव्याचे आयोजन सर्व संत महंतांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आले आहे, तरी समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बंजारा ब्रिगेड मराठवाडा संघटक अर्जुन नायक यांनी केले आहे.       या जनजागृती महा मेळाव्याला धर्मगुरु बाबुसिंग महाराज,महंत कबिरदास महाराज, महंत सुनिल महाराज, महंत रमेश महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत यशवंत महाराज, देवी - बापू भक्त महंत शेखर महाराज, महंत खुशाल महाराज यांच्यासह भारतभरातून येणाऱ्या संत महंत आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या महामेळाव्याला बंजारा ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड हे मार्गदर्शन करणार आहेत.          मागील अनेक वर्षापासून देश पातळीवरील अनेक समस्यांना बंजारा समाज तोंड देत असून त्याकडे कोणतेही शासन प्रशासन लक्ष द्यायला नसल्याने आता देशपातळीवर सामाजिक एकजुटीचा निर्णय घेण्याची वेळ आलेली असल्या