सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

तळणी येथे नूतन शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांच्या सत्कार संपन्न

  

तळणी (रवी पाटील):-  मंठा तालुक्यातील तळणी येथील केंद्रीय प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भागवत शिवाजी मूर्तडकर तर उपाध्यक्षपदी सौ.मंगल प्रभुसिंग चव्हाण यांची निवड यांची करण्यात आली आहे. पालक सभेतून निवडलेल्या सदस्यांमधून सर्वानुमते ही निवड करण्यात आली आहे. शनिवारी कोरोना विषयक सर्व नियमावलीचे पालन करून शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. निवडी नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री.जे.डी. इंगळे सर यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांचा सत्कार केला आहे.

पालक सभेतून सदस्य निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उपसरपंच श्री.सुधाकर सरकटे, ग्रामपंचायत सदस्य श्री.अमोल सरकटे, केंद्रीय मुख्याध्यापक श्री.जे.डी. इंगळे सर, शिक्षक आर.जी.खंदारे, डी. टी. शिंदे, पी.जे.वराडे, जी.ए. धारतरकर, एस.बी.गारोळे,ए. डी. आकाळ, एस.एस.येलेकर आदींसह गावकऱ्यांची  उपस्थिती होती.  नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समिती मध्ये अध्यक्ष भागवत मूर्तडकर, उपाध्यक्ष सौ.मंगल चव्हाण, सदस्य सुप्रिया जोशी, सोपान सरकटे, सौ.सुनीता कुकडे, ज्ञानेश्वर चौकसकर,रफिक शेख,सौ.अनुराधा हानवते ,गजानन लाड, शिक्षणतज्ञ अमोल सरकटे यांचा समावेश आहे.
यावेळी सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. जे.डी.इंगळे सर तर प्रमुख पाहुणे उपसरपंच श्री.सुधाकर सरकटे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. वराडे सर यांनी केले.सूत्रसंचालन श्री.गारोळे सर यांनी तर आभार श्री.शिंदे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व पालक व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत