लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

मा. ना .बच्चुभाऊ कडू (राज्यमंत्री)यांच्यावर केलेल्या आरोपातून व या संकटातून नक्कीच ते बाहेर पडतील . - अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार अपंग संघटना जालना

परतूर प्रतिनिधी /हनुमंत दवंडे 
 जालना प्रहार अपंग संघटनेचे संस्थापक व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राज्य मंत्री ओम प्रकाश बच्चुभाऊ कडू साहेब हे एक महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर एक लोकप्रिय नेते आहेत. तसेच महाराष्ट्रात व भारतात अपंगासाठी व निराधारांसाठी लोकांचे दैवत आहेत अहोरात्र अपंग व निराधारांसाठी झटणारे आणि न्याय मिळून देण्यासाठी व  शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरत असतात अशा प्रकारचे काम इतरांना ते जमत नाही म्हणून त्यांना एक प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असून एखाद्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु भाऊ च्या पाठीमागे करोडो अपंग बांधव निराधार शेतकरी या लोकांचा आशीर्वाद आहे यामुळे भाऊंना बदनाम करण्याचा व एखाद्या प्रकरणात गोवण्याचा काही फरक पडणार नाही ते लवकर या आरोपातून नक्कीच बाहेर पडतील ही काळया दगडावरची रेघ आहे असे  प्रसिद्धी पत्रकामध्ये अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार अपंग संघटना जालना यांनी म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत