मा. ना .बच्चुभाऊ कडू (राज्यमंत्री)यांच्यावर केलेल्या आरोपातून व या संकटातून नक्कीच ते बाहेर पडतील . - अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार अपंग संघटना जालना
जालना प्रहार अपंग संघटनेचे संस्थापक व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राज्य मंत्री ओम प्रकाश बच्चुभाऊ कडू साहेब हे एक महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर एक लोकप्रिय नेते आहेत. तसेच महाराष्ट्रात व भारतात अपंगासाठी व निराधारांसाठी लोकांचे दैवत आहेत अहोरात्र अपंग व निराधारांसाठी झटणारे आणि न्याय मिळून देण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरत असतात अशा प्रकारचे काम इतरांना ते जमत नाही म्हणून त्यांना एक प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असून एखाद्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु भाऊ च्या पाठीमागे करोडो अपंग बांधव निराधार शेतकरी या लोकांचा आशीर्वाद आहे यामुळे भाऊंना बदनाम करण्याचा व एखाद्या प्रकरणात गोवण्याचा काही फरक पडणार नाही ते लवकर या आरोपातून नक्कीच बाहेर पडतील ही काळया दगडावरची रेघ आहे असे प्रसिद्धी पत्रकामध्ये अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार अपंग संघटना जालना यांनी म्हटले आहे.