महसुल पथकाच्या सरकारी कामात अडथळा करणाऱ्या आरोपी सह १७ लाखाचे टिप्पर जप्त



मंठा-प्रतिनिधी सुभाष वायळ
. तालुक्यातील सासखेडा येथे दि. ११/०४/२२ रोजी दु ०२:०० वाजता येथील जिल्हा परीषद शाळे समोर अवैध रित्या साठवुन ठेवलेल्या वाळु साठ्यातुन वाळु भरतांना टिप्पर क्रमांक MH-21BG-4027 चे चालक व मालक व तेथेच कार मध्ये बसलेले इतर चार जण हे महसुल पथकातील तलाठी महेंद्र प्रभाकर साळवे तलाठी सज्जा दुधा ता मंठा जि जालना यांना अवैध रीत्या वाळु भरतांना आडळुन आले महसुल पथकातील तलाठी कारवाई करतील म्हणुन टिप्पर चालक व तेथेच कार मध्ये बसलेले इतर चार जणांनी तलाठी साळवे यांना धमदाटी करून टिप्पर मधील वाळु खाली करून तेथुन पळुन गेले.म्हणुन तहसीलदार मंठा यांच्या आदेशाने तलाठी साळवे यांनी सदरील आरोपींच्या विरूद्ध मंठा पोलीस ठाणे येथे सरकारी कामात अडथळा व अवैध वाळु चोरीचा गुन्हा दाखल केला आहे यात आरोपी (१)पवन सुभाष राठोड वय २४ वर्ष रा नायगांव ता मंठा टिप्पर चालक यास ताब्यात घेवुन टिप्पर चालकाच्या म्हणण्याप्रमाणे टिप्पर मालक विजय उत्तम चव्हाण वय ४२ वर्ष रा हिवरखेडा सध्याचा पत्ता तळणी फाटा रोहाऊस यांच्या राहत्या घरासमोरून टिप्पर क्रमांक MH-21-BG-4027 हे टिप्पर ज्याची अंदाजीत किंमत १७ लाख रूपय तपासासाठी जप्त करण्यात आले आहे.
सदरील कारवाई मा. प्रभारी पोलीस अधिक्षक साहेब जालना मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजु मोरे परतुर मां.पोलीस निरिक्षक संजयजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो उपनिरीक्षक बालभिम राऊत, पो अमलदार शाम गायके, आसाराम मदने,दिपक आढे,यांनी कारवाई करून गुन्हा उघडकिस आणुन एका आरोपीस अटक करण्यात आले.पुढिल तपास पो उपनिरीक्षक बालभिम राऊत हे करीत आहेत.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती