शेतकऱ्यांचे नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना मंत्रिमंडळात संधी द्यावी - अभिजीत कोदंडे


प्रतिनिधी -सुभाष वायाळ
माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आमदार बबनराव लोणीकर हे मराठवाड्यातील कष्टकरी शेतकऱ्यांचे संघर्षशील नेतृत्व असून लोणीकर यांनी गत मंत्रिपदाच्या काळात केवळ मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात पिण्याचे शुद्ध फिल्टर चे पाणी गरिबातील गरीब सर्वसामान्य व्यक्ती पर्यंत मिळावे यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या साथीने मराठवाड्यात महत्त्वकांक्षी अशी योजना मराठवाडा वॉटर ग्रीड साकार केली.
 ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, राजस्थान, कर्नाटक अशा विविध ठिकाणी जाऊन त्या त्या देशात व राज्यांमध्ये कार्यान्वित असलेल्या वॉटर ग्रीडच्या योजनांचा अभ्यास करून अशी योजना महाराष्ट्रात सुद्धा कार्यान्वित होऊ शकते व त्या दिशेने तत्कालीन भाजप सरकारने पाऊले उचलण्यास सुरुवात केली.

  मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना,परभणी, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली या शहरांमध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड हा पायलट प्रोजेक्ट राबवण्याचे ठरले परंतु सरकार बदलले गत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आमदार बबनराव लोणीकर यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड करिता भरीव निधीची तरतूद करावी अशी वारंवार मागणी केली सभागृहात सुद्धा वेळोवेळी आवाज उचलला परंतु गत सरकारने महत्त्वाकांक्षी असलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीड हा प्रकल्प रद्द करण्याचे महापाप केले.

 गत पाच वर्षाच्या कार्यकाळात सर्व जिल्ह्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचे योजना जलकुंभाच्या उभारणी, डांबरीकरणाचे रस्ते, परतुर एमआयडिसी मध्ये रुबन योजना प्रकल्प, शेतकऱ्यांच्या शेतीला वीज मिळावी याकरिता 132 के व्ही - 133 केव्ही उपकेंद्र उभारणी यासह अनेक विकास कामांवर भर दिला.

 दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूर पाई वारी मध्ये पायी वारी करणाऱ्या शेतकऱ्यांना - वारकऱ्यांना रस्ते अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले या वारकऱ्यांना खरी श्रद्धांजली म्हणून पंढरपूर वारीमध्ये जाणाऱ्या वारकऱ्यां करिता शेगाव ते पंढरपूर विशाल असा दिंडी मार्ग साकारण्यात आला.

 तत्कालीन महा विकास आघाडी सरकारच्या काळात निधीअभावी अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प रखडलेले आहेत ती पूर्णत्वास नेऊन महाराष्ट्र मराठवाड्याला समृद्ध बनवण्याकरिता आमदार बबनराव लोणीकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची खरी गरज असल्याची मागणी भाजप युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हा संयोजक अभिजीत कोदंडे यांनी केलेली आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती