मंठा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा - अखिल भारतीय मराठा महासंघ


मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ
मंठा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व मंठा तालुक्यातील ज्या मंडळात अतिवृष्टी झालेल्या मंडाळा मध्ये तात्काळ पंचनामे करून सरसकट अनुदान देण्यात यावे. अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ मंठा तालुक्याच्या वतीने मा. मुख्यमंत्र्यांना निवेदन तहसीलदार मंठा यांच्या मार्फत देण्यात आले.
     मंठा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जनवृष्टी झाली असल्यामुळे तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कोपा मुळे हिरावून घेतला आहे.अनेक शेतकऱ्यांच्या राहत्या घराचे नुकसान झाले आहे. सुखाचा संसार उद्ध्वस्त झाले आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे उभे पीक मुळा सही सडुन गेले आहे. काही पीके वाहुन गेले आहे यांमुळे शेतकरी आथिर्क मोठ्या संकटात सापडले आहेत त्यामुळे पंचनामे करून सरसकट मदत देण्यात यावी. नसता अखिल भारतीय मराठा महासंघ मंठा तालुक्याच्या वतीने लोकशाही मार्गाचा अवलंब करून आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने विचार करून नोंद घ्यावी ही विनंती यावेळी करण्यात आली. मंठा तालुक्याच्ये नायब तहसीलदार श्री दवने साहेब यांनी असे आश्वासन दिले की तात्काळ पंचनामे करण्यात येतील. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ मंठा तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख व तालुका कोषाध्यक्ष कैलास सरकटे आणि दिलीप चव्हाण, योगेश देशमुख, सुदंर काळे, योगेश दांडगे, कैलास भाग्यवान, महादेव खवने,अनंत चव्हाण, महादेव येऊल, राम किशन चव्हाण, अनिल घोडके, संतोष पवार, अभिषेक मुदळकर, प्रमेशवर मानकर, निलेश राठोड, राहुल सदावर्ते, आकाश राठोड, वैभव सदावर्ते आदी अखिल भारतीय मराठा महा संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती