नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत फळबाग व बांबू लागवड योजनेचे अर्ज तात्काळ ऑनलाईन करा - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जागतिक बँकेच्या मदतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना हा अत्यंत महत्त्वाकांक्षी असणारा प्रकल्प सुरू केला होता या प्रकल्पाच्या माध्यमातून शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्णय करण्यात आला होता त्यानुसार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सुविधा या योजनेमार्फत दिल्या जातात मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पातील अनेक योजनांवर बंधने घालण्यात आली होती तसेच शेतकऱ्यांनी पूर्ण केलेल्या अनेक योजनांची अनुदान देखील प्रलंबित होते नवीन योजना करावी की न करावी अशा प्रकारची द्विधावस्था शेतकऱ्यांची होती परंतु आता पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस यांच्या रूपाने शेतकऱ्यांचे सरकार आलं असून शेतकऱ्यांनी फळबाग व बांबू लागवड करून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत फळबाग व बांबू लागवड अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर २०२२ असून त्यानंतर पोर्टल वरील फळबाग व बांबू लागवड घटक त्यानंतर बंद होणार आहे. ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप फळबाग /बांबू लागवड करता अर्ज केले नसतील त्यांनी लवकरात लवकर या योजनेमध्ये अर्ज करून लाभ घ्यावा. असे आवाहन देखील लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केलं आहे.

सर्व लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी यांनी आपल्या परिसरातील गावातील तसेच तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आपल्या स्तरावरून फळबाग लागवडीचा संदेश देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्यासाठी प्रयत्न करावेत सर्व कृषी सहाय्यक व समुह सहाय्यक यांनी शेतकऱ्यांना अर्ज ऑनलाईन करण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी असेही माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सुचित केले आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती