परभणी जिल्ह्यातील गंभीर बनवलेला विजेचा प्रश्न सोडवा - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी,परभणी जिल्ह्यात १ - २२० केव्ही, २ - १३२ केव्ही व साधारणपणे २० - ३३केव्ही ची आवश्यकता-लोणीकर यांची माहिती

प्रतिनिधी समाधान खरात 
परभणी जिल्ह्यामध्ये विजेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून शेतकऱ्यांना आठ दिवस दिवसा तर आठ दिवस रात्री वीज मिळते आहे असे भारनियमन अधिकाऱ्यांनी कशाच्या आधारे केले आहे याचे उत्तर महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे नाही. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील गंभीर बनवलेल्या विजेच्या प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावे अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
परभणी जिल्ह्यातील विजेचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी जिल्ह्यात १ - २२० केव्ही, २ - १३२ केव्ही व साधारणपणे २० - ३३केव्ही करणे आवश्यक आहेत. सद्यस्थितीत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विजेसंबंधीची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. अशी माहिती देखील लोणीकर यांनी पत्राद्वारे फडणवीस यांना दिली आहे.

मागील पंचवार्षिक मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन ऊर्जामंत्री व विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालना जिल्ह्यात २ - २२० केव्ही, १ - १३२केव्ही व ४९ - ३३केव्ही मंजूर करून आपण जालना जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना दिलासा दिला होता त्यामुळे आज जालना जिल्ह्यातील विजेची परिस्थिती अत्यंत चांगली असून त्याबाबत शेतकरी समाधानी आहे. त्याच धर्तीवर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विचार करून लवकरात लवकर याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा अशी लोकप्रतिनिधी म्हणून व तमाम शेतकरी बांधवांची मागणी असल्याचे देखील लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे.

जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना देवेंद्र फडणवीस या मागणीचा सकारात्मक विचार करतील व देवेंद्र फडणवीस हेच जिल्ह्यातील विजेचा गंभीर बनलेला प्रश्न सोडवू शकतात याची खात्री असल्याचे लोणीकरांनी पत्रात म्हटले आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार