सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

पोहरागड तीर्थक्षेत्र विकास कामाच्या भूमिपूजनाचे साथीदार व्हा -अर्जुन राठोड

परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण 
 12 फेबुवारी रोजी विविध मान्यवर उपस्थितमध्ये संत सेवालाल महाराज यांच्या अश्वारुड पुतळ्याचे अनावरण तथा विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेले तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे पार पडणार आहे. त्यामुळे बंजारा समाज बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहून पोहरागड तीर्थक्षेत्र विकास कामाच्या भूमिपूजनाचे साक्षीदार व्हा. असे आवाहन बंजारा ब्रिगेड चे महाराष्ट्र संघटक ,  सेवा भूमीचे अध्यक्ष व श्रीष्टी तांडा सरपंच अर्जुन  राठोड यांनी केले आहे.
   बंजारा समाजातील अगणित नागरिक विविध राजकीय पक्षामधील विविध पदावर कार्यरत आहे शिवाय समाजाच्या उन्नतीसाठी अनेक होतकरू युवक युवती व समाज सेवक काम करीत आहेत
. भारतात बंजारा समाजात हा भारतात विविध प्रांतात विविध राज्य मध्य वेग वेगळ्य वर्गवारी मध्य विखरलेला असून जवळपास 15 कोटी
या समाजाची लोकसंख्या आहे. मात्र मुलभूत सुविधा पासून अध्याप पर्यंत बंजारा समाज विकास पासून आजही  दूर आहे

या सर्वांचे उद्दिष्ट म्हणजे समाजाचा विकास होय. त्यामुळे त्यामुळे पक्षभेद गट तट ,संघटना ,विसरून सर्वांनी. एक बंजारा समाजाच्या प्रगतीसाठी एकत्रित येऊन सेवाध्वज कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन अर्जुन राठोड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत