सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतूर पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी शेषराव वायाळ ,सचिव सुरेश कवडे तर कार्याध्यक्ष पदी अर्जुन पाडेवारयाची बिनविरोधी निवड,


परतूर /प्रतिनिधी
परतूर पत्रकार संघाची गुरुवार ता.22 रोजी येथील शासकीय विश्रांम गृहात मावळते अध्यक्ष शामसुंदर चितोडा व योगेश बरीदे याच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी मागिल कार्यकारणी संपुष्टात आणून नूतन  कार्यकारणी घोषित करण्यात आली.
यामधे  अध्यक्ष पदी शेषराव वायाळ, सचिव सुरेश कवडे कार्याध्यक्ष पदी अर्जुन पाडेवार याची  बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचबरोबर प्रवक्ते पदी कैलासराव सोळके, उपाध्यक्ष पदी  संतोष अखाडे,संजय देशमाने,सहसचिव माणिक जैस्वाल,कोषाअध्यक्ष सरफराज नाईकवाडी, सह कोषाध्यक्ष सय्यद तय्यब ,याची निवड करण्यात आले.यावेळी पत्रकार सय्यद वाजेद, मनीष अग्रवाल,इम्रान कुरेशी, सुरेश शिंदे, कैलास चव्हाण,शेख असेफ,प्रभाकर प्रधान,राजकुमार भारूका,राहुल मुज़मुले, शिवकुमार भारूका,माजेद ,तारेक,शाम सोनी,अजय कांबळे,सु.द.शिवनगिरीकर,शे.अथर,मोईन पाशा ,पांडूरंग शेजूळ कृष्णा धोंगडे आदीची उपस्थिती होती.....


Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत