माणसाने जीवन जगण्यात समतोल साधला पाहिजे ----सरपंच उद्धव पवार

 तळणी/ प्रतिनिधी : मानवाला जीवनामध्ये तीन अवस्थांमधून जावे लागते, बाल्यअवस्था,तरुणपण आणि वार्धक्य या तीनही अवस्थांमधून जाताना आपण जे कर्म करतो त्याचे फळ निश्चितच मिळते असे प्रतिपादन तळणी येथील सरपंच उद्धव पवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, विभागीय कार्याध्यक्ष पंडितराव बोराडे, मंठा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अनिल बा. खंदारे यांच्या वाढदिवसानिमित्त तळणी येथे आयोजित कार्यक्रमात श्री पवार बोलत होते. वाढदिवसानिमित्त नेमिनाथ महाराज संस्थान मधील वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले तसेच मंठा येथेही ह भ प ज्ञानेश्वर महाराज  मदने माऊली यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांनाही  मिष्ठान्न वाटप करण्यात आले. तळणी येथे झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सरपंच उद्धव पवार यांनी सांगितले की, माणसाने गर्व अहंकार लोभ इर्षा आदिचा त्याग करून आनंदी जीवन जगावे. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पत्रकार समाजाचे प्रश्न सोडवतो असे सांगून त्यांनी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे विभागीय कार्याध्यक्ष पंडितराव बोराडे आणि मंठा कार्याध्यक्ष अनिल बा. खंदारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक कार्यक्रम राबविल्याबद्दल आयोजकांचे कौतुकही केले. तळणी व मंठा येथे झालेल्या कार्यक्रमाला ह भ प ज्ञानेश्वर महाराज, ह भ प निवृत्ती महाराज कांगणे, ह भ प अर्जुन महाराज बादाड, ज्येष्ठ पत्रकार बाबा काका कुलकर्णी, पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष दायमा, जिल्हा कार्यकारणी सदस्य रवी पाटील, तालुका अध्यक्ष बालाजी कुलकर्णी, पत्रकार संघाच्या महिला तालुका अध्यक्ष सौ मंजुषा काळे, माजी कार्याध्यक्ष तथा पत्रकार संघाचे सल्लागार अरुण राठोड, वसंतराव राऊत, गौतम सदावर्ते, डॉ आशिष तिवारी, आसाराम शेळके, केशव येऊल, प्रकाश भावसार, प्रवीण सरकटे,  नागेश भरदम यांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती