Posts

Showing posts from August, 2021

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याचे मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच फिरत आहेत,त्यांना कधी पकडणार-जिल्हा उपाध्यक्ष कल्याण बागल

Image
परतूर (प्रतीनीधी) डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आठ वर्षे पूर्ण झाली आहे सीबीआयने त्यांच्या मारेकऱ्यांवर आरोपपत्र दाखल केले आहे मात्र,मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच फिरत आहेत. त्यांना कधी पकडणार,असा सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे  जालना जिल्हा उपाध्यक्ष कल्याण बागल यांनी केला.   महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परतुरच्या वतीने डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त डॉ.नरेंद्र दाभोलकर  हत्येच्या मुख्य सुत्रधारांना पकडण्यात यावे याकरिता उपविभागीय कार्यालय परतूर येथे निवेदन देण्यात आले होते याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जालना जिल्हा उपाध्यक्ष कल्याण बागल बोलत होते याप्रसंगी  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे परतूर तालुका अध्यक्ष एकनाथ कदम,जिल्हा प्रधान सचिव रमाकांत बरीदे,संभाजी तांगडे,दिलीप अण्णा मगर,सुनील खरात,अश्विन गुंजकर,लक्ष्मीकांत माने,देशमुख के.एन.,संतोष रनबावळे यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना कल्याण बागल म्हटले की,विज्ञानवादी समाजसुधारक डॉ.दाभोलकर,कॉ.गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही खुन

खरीप हंगाम संपत आलाय तरी बँकेतून शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळेना,परतूरच्या स्टेट बँकेची शेतकर्‍यांना उडवाउडवी,बँकेतील कर्मचारी व गार्ड करतात शेतकर्‍यांना आरेरावीची भाषा**पीककर्जाचे प्रकरने तात्काळ निकाली काढा अन्यथा गाठ शिवसेनेशी- शहर प्रमुख दत्ता पाटील

Image
परतूर(प्रतिनिधी) चालु वर्षीचा खरीप हंगाम संपत आलाय तरी परतूर परिसरातील शेतकर्‍यांना अजुन स्टेट बँकत पीककर्जासाठी चकराच माराव्या लागत आहेत.कुठल्याना कुठल्या कारणावरून कर्मचारी कामचुकार पणा तसेच पीककर्जासाठी चालढकल करतांना दिसत आहेत.आॅगस्ट महिण्याची 10 तारीख उजडली तरी शेतकर्‍यांना पीककर्ज काही वाटप होतांना दिसत नाही किंवा अत्यंत संथ गतीने वाटप होत असून पिक कर्ज वाटपामध्ये अनियमीतता होत असल्याचा आरोप शिवसेना शहर प्रमुख दत्ता पाटील सुरूंग यांनी स्टेट बँकेच्या विभागिय कार्यालयाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.  निवेदनात प्रामुख्याने म्हटले आहे की शेतकऱ्यांचा खरीप हंगाम चालु होऊन बरासा कालावधी उलटला तरी बँक काही ना काही कारणाने शेतकर्‍यांना पीककर्जासाठी वेठीस धरत आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असतांना परतूरच्या भारतीय स्टेट बँक  मधून गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांना वेळेवर पिक कर्ज मिळक नाही . त्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून परतूर शाखेमध्ये शेतकरी हा दोन - दोन महिन्यापासून शेतीची कामे सोडुन बँकेत चकरा मारीत आहे . त्यांना पिक कर्ज मिळकत नाही व काही ऐजंट हे

जाहिरातबाजीवर १६० कोटींची खैरात, कर्जबाजारी शेतकरी वाऱ्यावर! - भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची ठाकरे सरकारवर टीका,राज्यसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पिक विमा कंपनी "मालक" झाली त्यामुळे यावर्षी पीकविमा मिळणारच नाही ! -लोणीकर

Image
परतूर (प्रतिनिधी ) केवळ शब्दांची आतषबाजी करणाऱ्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या फसवणुकीत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अतिवृष्टी, वादळांसारख्या संकटात अगोदरच भरडलेल्या शेतकऱ्यास मदतीचा हात देण्याऐवजी स्वतःच्या जाहिरातबाजीवरच एकशे साठ कोटींची उधळपट्टी करून ठाकरे सरकारने शेतकऱ्यास उद्ध्वस्त केले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. महाविकास आघाडी सरकारने मोठ्या थाटात राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची गर्जना विधिमंडळात केली, त्याला दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्याच्या पदरात कर्जमाफी पडलेलीच नाही. खोट्या जाहिरातींवर एकशे साठ कोटींची उधळपट्टी करण्याऐवजी १५० कोटी रुपये कर्जमाफीसाठी दिले असते, तर संकटग्रस्त शेतकऱ्यास दिलासा मिळाला असता. राज्यातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कर्जमुक्त करण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. प्रत्यक्षात मात्र वीज दरवाढीचे धक्के देऊन शेतकऱ्यास वेठीस धरले जात आहे, पीकविम्याबाबतही विमा कंपन्यांशी साटेलोटे करून शेतकऱ्याची फसवणूक केली जात आहे, असा आरोप

परतूर शहराच्या विकासासाठी ५ कोटी निधी द्या - मोहन अग्रवाल यांची नगरविकास मंञ्याकडे मागणी

Image
परतूर /प्रतिनिधी शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा परतुर नगरपालिकेचे विरोधी पक्ष गटनेते मोहन अग्रवाल यांनी शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली परतुर शहराच्या विकास कामासाठी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शहराच्या विकासासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर करा, अशी मागणी निवेदनाद्वारे मंत्रालयात जाऊन प्रत्यक्षात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केलीआहे. परतुर शहराचा रखडलेला विकास पाहता शहरातील विविध भागात विकासकामा अभावी नागरिकां  बेहाल होत असून शहरातील  भुयार गटार योजनेमुळे गल्लोगलीत फुटलेले रस्ते स्वच्छतेचा आभाव व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नंतर शिवसेनेचे मोहन अग्रवाल यांनी  नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन  शहर विकास कामासाठी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर व उपजिल्हाप्रमुख पंडितराव भूतेकर यांची उपस्थिती होती.

परतूर शहरात स्वच्छता मोहीम राबवावी - अर्जुन पाडेवार यांची मागणी

Image
परतूर,दि.१(प्रतिनिधी) - शहरात साथरोग पसरू नये यासाठी नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात यावे तसेच नालेसफाई, जंतुनाशक औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी एका निवेदनाद्वारे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.     यासंदर्भात पाडेवार यांनी पालिकेच्या मुख्याधिका-र्यांना दिलेली निवेदनात म्हटले आहे की, शहरात घाणीचे प्रमाण वाढल्याचे दिसते.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरात साथीचे रोग झपाट्याने पसरू शकतात.सध्या शहराच्या अनेक भागात नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहताना दिसते.त्यामुळे दुर्गंधी देखील पसरते.रोगराई पसरू नये म्हणून शहरात जंतुनाशक औषधींची फवारणी करावी.तसेच शहरात तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी जेणे करून रोगराईचा प्रसार होणार नाही आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील असे या निवेदनात म्हटले आहे. ------------------------   शहर परिसरात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण सापडण्याअगोदरच नगरपालिकांनी याची काळजी घेतली तर साथरोग वेळीच आटोक्यात येईल त्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करावी तसेच नगरपालिकेन