सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतूर शहरात स्वच्छता मोहीम राबवावी - अर्जुन पाडेवार यांची मागणी

परतूर,दि.१(प्रतिनिधी) - शहरात साथरोग पसरू नये यासाठी नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात यावे तसेच नालेसफाई, जंतुनाशक औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी एका निवेदनाद्वारे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
    यासंदर्भात पाडेवार यांनी पालिकेच्या मुख्याधिका-र्यांना दिलेली निवेदनात म्हटले आहे की, शहरात घाणीचे प्रमाण वाढल्याचे दिसते.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरात साथीचे रोग झपाट्याने पसरू शकतात.सध्या शहराच्या अनेक भागात नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहताना दिसते.त्यामुळे दुर्गंधी देखील पसरते.रोगराई पसरू नये म्हणून शहरात जंतुनाशक औषधींची फवारणी करावी.तसेच शहरात तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी जेणे करून रोगराईचा प्रसार होणार नाही आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील असे या निवेदनात म्हटले आहे.
------------------------
  शहर परिसरात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण सापडण्याअगोदरच नगरपालिकांनी याची काळजी घेतली तर साथरोग वेळीच आटोक्यात येईल त्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करावी तसेच नगरपालिकेने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यासह जंतुनाशक औषधीची फवारणी करणे आवश्यक आहे. - अर्जुन पाडेवार, सामाजिक कार्यकर्ते, परतूर.
-----------------------------

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत