जय जवान, जय किसान' संघटनेची बैठक संपन्न

जालना (समाधान खरात)शासकीय विश्रामगृह जालना येथे 'जय जवान, जय किसान' संघटनेची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीचे आयोजन जय जवान जय किसान संघटनेचे जालना जिल्ह्याध्यक्ष ज्ञानेश्वर भुसारे यांनी केले होते. या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून जय जवान जय किसान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत हे उपस्थित होते. त्यांनी या ठिकाणी आलेल्या संघटनेच्या सैनिकांना मार्गदर्शन केले.

ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले की, जय जवान जय किसान या संघटनेच्या माध्यमातून शेतकरी व तरुणांसाठी खूपच चांगल्या प्रकारे काम जालना जिल्ह्यात सुरु आहेत. आपल्या संघटनेची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. सतत आपण आपले काम सातत्याने सुरू ठेवणे गरजेचे आहे. आपण समाजात काम जर सुरू ठेवले तरच आपली प्रगती होईल व आपल्या संघटनेचे काम पण चांगल्या प्रकारे सुरू ठेवता येईल. आपल्या संघटनेच्या प्रत्येक सैनिकांने कोणत्याही कामात स्वतः पुढाकार घेणे गरजेचे आहे. सतत समाजात महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी व शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण होत आहेत. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपण लढले पाहिजे. गोरगरिबांच्या मदतीसाठी आपण सतत धावले पाहिजे तरच आपण जय जवान जय किसान संघटनेचे सैनिक आपल्या म्हणता येईल. आपल्या कामाची समाजावर छाप पडली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी 'जय जवान, जय किसान' या संघटनेचे राष्ट्रीय  अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत व तसेच मराठवाडा अध्यक्ष हनुमान कदम व जालना जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भुसारे यांच्या हस्ते जालना तालुकाध्यक्ष प्रल्हाद ढवळे, जालना सचिव गजानन शेजुळ व घांसावगी तालुकाध्यक्ष गणेश कोरडे यानां संघटनेची नियुक्ती पत्र देण्यात आले. नियुक्ती झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला अभिषेक वडगांवकर, अमोल चोथे, रमेश शिंदे, विष्णू पाटील,  प्रल्हाद ढवळे, रवि सुरसे, राजेश काळे, रमेश खेत्रे, गजानन शेजुळ, तेजराव गंगावणे, राहुल बोबडे, कमांडो पद्माकर चंदनशिवे व डी.एफ.निंबाळकर यांची उपस्थिती

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती