ओबीसी राजकीय आरक्षणासाठी रास्ता रोको करणाऱ्या ओबीसी समाजाव गुन्हे दाखल,असे कितीही गुन्हे दाखल करा आमचे आंदोलन आरक्षण घेतल्या शिवाय थांबणार नाही,ओबीसी समाजाचा एल्गार


प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
 वाटुर तालुका परतुर येथे आज सर्व ओबीसी बांधवांनी हिरावले गेलेले राजकीय आरक्षण तीव्र आंदोलन करत रास्ता रोको केला होता.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरक्षण बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहे .
यासंदर्भात ओबीसी समाजाच्या वतीने अशा प्रकारचे कितीही गुन्हे अंगावर घेण्यास तयार आहोत मात्र आमचा हक्क आम्ही सोडणार नाही जोपर्यंत आमचे राजकीय आरक्षण पूर्ववत लागू केले जात नाही तोपर्यंत आंदोलनाचा हा वनवा असाच पेटत राहील असा एल्गार ओबीसी बांधवांच्या वतीने करण्यात आला आहे
    खरेतर राज्यातील ओबीसी समाज हा राजकीय आरक्षणाविना अपंग झाला आहे अशा परिस्थितीमध्ये या समाजाला राजकीय आरक्षण देऊन पुन्हा एकदा राजकीय प्रवाहात अन्या ची गरज आहे मात्र सरकार आमच्या भावना समजून घ्यायला तयार नाही अशा परिस्थितीत लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत असू तर कुठे बिघडले कोरोना चे कारण पुढे करून राज्यसरकारचा आमचे आंदोलन चिरडण्याचा डाव असल्याचे मत ओबीसी समाजातून व्यक्त केले जात आहे आज वाटुर तालुका परतुर येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनाची सरकारने धास्ती घेतली असून यापुढे महाराष्ट्र पेटेल यामुळे सरकारने हे आंदोलन दडपण्यासाठी गुन्हे दाखल केल्याचा आरोप ओबीसी बचाव समितीच्या वतीने करण्यात आला आहे
 आज पोलिस प्रशासनाने रामप्रसाद थोरात,प्रवीण सातोणकर,जगदीश पडूळकर,मदन  हजारे,गजानन केसरखाने, विक्रम माने, राजू माने,शेख कलीम,राधाकिशन माने,धर्मराज जाधव,शरद पालवे,कृष्णा आरगडे, अर्जुन नाईक,विदुर जईद,भगवान पाटोळे,अशोकराव आघाव, इंद्रजीत घनवट,सोनाजी गाडेकर, शिवाजी तरवटे, लहू आढे यांच्यासह 100 ते 150 समाज ओबीसी बांधवावर गुन्हा दाखल केला आहे

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती