लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी रास्ता रोको करणाऱ्या ओबीसी समाजाव गुन्हे दाखल,असे कितीही गुन्हे दाखल करा आमचे आंदोलन आरक्षण घेतल्या शिवाय थांबणार नाही,ओबीसी समाजाचा एल्गार


प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
 वाटुर तालुका परतुर येथे आज सर्व ओबीसी बांधवांनी हिरावले गेलेले राजकीय आरक्षण तीव्र आंदोलन करत रास्ता रोको केला होता.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरक्षण बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहे .
यासंदर्भात ओबीसी समाजाच्या वतीने अशा प्रकारचे कितीही गुन्हे अंगावर घेण्यास तयार आहोत मात्र आमचा हक्क आम्ही सोडणार नाही जोपर्यंत आमचे राजकीय आरक्षण पूर्ववत लागू केले जात नाही तोपर्यंत आंदोलनाचा हा वनवा असाच पेटत राहील असा एल्गार ओबीसी बांधवांच्या वतीने करण्यात आला आहे
    खरेतर राज्यातील ओबीसी समाज हा राजकीय आरक्षणाविना अपंग झाला आहे अशा परिस्थितीमध्ये या समाजाला राजकीय आरक्षण देऊन पुन्हा एकदा राजकीय प्रवाहात अन्या ची गरज आहे मात्र सरकार आमच्या भावना समजून घ्यायला तयार नाही अशा परिस्थितीत लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत असू तर कुठे बिघडले कोरोना चे कारण पुढे करून राज्यसरकारचा आमचे आंदोलन चिरडण्याचा डाव असल्याचे मत ओबीसी समाजातून व्यक्त केले जात आहे आज वाटुर तालुका परतुर येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनाची सरकारने धास्ती घेतली असून यापुढे महाराष्ट्र पेटेल यामुळे सरकारने हे आंदोलन दडपण्यासाठी गुन्हे दाखल केल्याचा आरोप ओबीसी बचाव समितीच्या वतीने करण्यात आला आहे
 आज पोलिस प्रशासनाने रामप्रसाद थोरात,प्रवीण सातोणकर,जगदीश पडूळकर,मदन  हजारे,गजानन केसरखाने, विक्रम माने, राजू माने,शेख कलीम,राधाकिशन माने,धर्मराज जाधव,शरद पालवे,कृष्णा आरगडे, अर्जुन नाईक,विदुर जईद,भगवान पाटोळे,अशोकराव आघाव, इंद्रजीत घनवट,सोनाजी गाडेकर, शिवाजी तरवटे, लहू आढे यांच्यासह 100 ते 150 समाज ओबीसी बांधवावर गुन्हा दाखल केला आहे

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत