श्रीराम मंदिर संस्थानचा अनोखा श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा.

परतुर विशेष प्रतिनिधी विठ्ठल कुलकर्णी 
   दोन वर्षाच्या कोरोना महामारीमुळे साधेपणाने साजरा झालेला श्रीराम जन्मोत्सव अतिशय उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला.गेल्या दोन वर्षाचा खंड पडल्यामुळे यावर्षी अभुतपुर्व गर्दी या उत्साहाला होती.
श्रीराम मंदिर संस्थान परतुरचा श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास अनेक वर्षाची परंपरा आहे यावर्षी सुध्दा हा जन्मोत्सव उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा झाला.सोंगाव्दारे रामाचा जन्मोत्सव सोहळा दृश्य रुपात भक्तासमोर दाखवला जातो ज्याव्दारे प्रत्यक्ष जन्मोत्सव सोहळा अनुभवन्याचे भाग्य आपणास लाभत आहे अशी श्रीराम भक्ताचा भावना निर्माण होते.ईस्काँनच्या भक्तमंडळीने भजनाचे आयोजन करुन या उत्साहात भर घातली.आपल्या खुमासदार शैलीत धनंजय जोशी सर यांनी कथा सांगितली.आजच्या या रामनवमीच्या मुर्हुतावर शिवसेना जिल्हा संघटक मोहनजी अग्रवाल यांनी भक्ताची गरज लक्षात घेता 10 लाख रु.सभामंडप देण्याची घोषणा केली.यावेळी सोहळ्यात दशरथ राजे-कांतराव देशमुख,सुमंत प्रधान-शुभम सातोनकर,वशिष्ट ऋषी-प्रसाद बाप्ते,गंधर्व-शिवाजी काटे,शृंगऋषी-संजय सातोनकर,कांदे महाराज-सागर नंद रंभा-कु.आर्या कुलकर्णी तर भालदार-चोपदार श्रीपाद सातोनकर,प्रशांत डोम यांनी पात्र सादर केले.
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.गंगाधरराव पुराणिक, बाप्ते,अरुणराव शेपाळ,सुरेश नंद, दासोपंत पुराणिक संतोष नंदगोविंद सातोनकर,रामराव नंद,शामराव नंद,खंडेराव कुलकर्णी,सिध्दार्थ कुलकर्णी,विठ्ठल कुलकर्णी,गजानन सातोनकर,अंजिक्य पुरी आदीनी परिश्रम घेतले.ईस्काँन परिवारातर्फ फराळ वाटप करण्यात आला.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती