लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

श्रीराम मंदिर संस्थानचा अनोखा श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा.

परतुर विशेष प्रतिनिधी विठ्ठल कुलकर्णी 
   दोन वर्षाच्या कोरोना महामारीमुळे साधेपणाने साजरा झालेला श्रीराम जन्मोत्सव अतिशय उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला.गेल्या दोन वर्षाचा खंड पडल्यामुळे यावर्षी अभुतपुर्व गर्दी या उत्साहाला होती.
श्रीराम मंदिर संस्थान परतुरचा श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास अनेक वर्षाची परंपरा आहे यावर्षी सुध्दा हा जन्मोत्सव उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा झाला.सोंगाव्दारे रामाचा जन्मोत्सव सोहळा दृश्य रुपात भक्तासमोर दाखवला जातो ज्याव्दारे प्रत्यक्ष जन्मोत्सव सोहळा अनुभवन्याचे भाग्य आपणास लाभत आहे अशी श्रीराम भक्ताचा भावना निर्माण होते.ईस्काँनच्या भक्तमंडळीने भजनाचे आयोजन करुन या उत्साहात भर घातली.आपल्या खुमासदार शैलीत धनंजय जोशी सर यांनी कथा सांगितली.आजच्या या रामनवमीच्या मुर्हुतावर शिवसेना जिल्हा संघटक मोहनजी अग्रवाल यांनी भक्ताची गरज लक्षात घेता 10 लाख रु.सभामंडप देण्याची घोषणा केली.यावेळी सोहळ्यात दशरथ राजे-कांतराव देशमुख,सुमंत प्रधान-शुभम सातोनकर,वशिष्ट ऋषी-प्रसाद बाप्ते,गंधर्व-शिवाजी काटे,शृंगऋषी-संजय सातोनकर,कांदे महाराज-सागर नंद रंभा-कु.आर्या कुलकर्णी तर भालदार-चोपदार श्रीपाद सातोनकर,प्रशांत डोम यांनी पात्र सादर केले.
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.गंगाधरराव पुराणिक, बाप्ते,अरुणराव शेपाळ,सुरेश नंद, दासोपंत पुराणिक संतोष नंदगोविंद सातोनकर,रामराव नंद,शामराव नंद,खंडेराव कुलकर्णी,सिध्दार्थ कुलकर्णी,विठ्ठल कुलकर्णी,गजानन सातोनकर,अंजिक्य पुरी आदीनी परिश्रम घेतले.ईस्काँन परिवारातर्फ फराळ वाटप करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत