ऊस वेळेत जात नसल्याने शेतकरी हतबल, शेतकर्यांचा उपोषणाचा इशारा

आष्टी/प्रतिनिधी सुधाकर जाधव
परतूर तालुक्यातील श्रद्धा एनर्जी. मॉ बागेश्वरी साखर कारखाना येथील अनागोंदी कारभारामुळे काऱ्हाळा व लिंगसा शिवारातील ऊस लागवड शेतकरी हतबल झाला आहे.कारखान्याच्या गलथान कारभाराला वैतागून शेतकरी उपोषण करण्याच्या पावित्र्यात आहे.गेल्या वर्षी डिसेंबर जानेवारी, फेबरुवारी,मार्च,2021 मध्ये खोडवा ऊसाची नोंद असून,आज रोजी त्या ऊसाला 15 ते 16 महिने झाले आहेत. परंतु कारखान्याच्या नियमानुसार तोड येऊनही कारखान्याने ऊस तोड केली नाही
        त्या संदर्भात शेतकरी यांनी कारखाना येथील कर्माचारी यांना वेळोवेळी व्यक्तिगत व सामूहिक भेट देऊन, खोडवा ऊस तोडण्याची विनंती केली. परंतु त्यांनी आमाच्या विनंतीस मान न देता उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचे काम केल्याचा आरोप शेतकरी यांनी उपविभागीय अधिकारी परतूर यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. वेळेत ऊस तोडणी न झाल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली असून,मोठे आर्थिक नुकसान झाल्याने , आत्महत्या करण्याची वेळ आम्हा शेतकऱ्यावर आली आहे. कारखान्याचा गळीत हंगाम अंतील टप्प्यात असून,आम्ही शेतकरी हतबल झाल्याने, स्थानिक प्रशासनाने आमच्या ऊसाचा प्रश्न निकाली काढण्याची विनंती शेतकरी यांनी केली आहे. प्रशासनाने लक्ष घालून ऊसाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा नसता आम्ही काऱ्हाळा व लिंगसा शिवारातील शेतकरी येत्या 27 तारखेपासून आपल्या कार्यालयापुढे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा शालिनी सोळंके,गणेश,सोळंके, डिगांबर शेळके,शिवाजी शेळके,गोरख शेळके, जालिंदर शेळके,वामन,शेळके, विष्णू शिंदे,श्रीमंत जाधव,रमेश तांगडे, दत्ताराव दराडे, किसन गायकवाड,संदीप बोराडे, योगराज डवले,सचिन डवले,आसाराम जाधव,या शेतकरी यांनी उपविभागीय अधिकारी परतूर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती