सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा खोराड सावंगी विजेता तर आन्वीचा संघ उपविजेता



मंठा-प्रतिनिधी सुभाष वायाळ
दि.२४ बालेवाडी, पुणे येथे मे २०२२ मध्ये होणाऱ्या ४८ व्या राज्य अजिंक्यपद कुमार व कुमारी कबड्डी स्पर्धेसाठी जालना जिल्हा कबड्डी असोसियशनच्या वतीने प्रनुसरा नगर, मंठा येथे २३ रोजी आयोजित जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मंठा तालुक्यातील खोराड सावंगीचा संघ विजेता ठरला तर बदनापूर तालुक्यातील आन्वीचा संघ उपविजेता ठरला.

या स्पर्धेचे उद्घाटन युवानेते राहुल लोणीकर यांच्या हस्ते झाले तर याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदास पालवे, गणेश खवने, सतीश निर्वळ, विठ्ठल काळे, प्रसाद बोराडे, गणेश शहाणे, विजय घोडके, दत्ताराव खराबे, गंगाराम हावळे, नारायण दवणे, राहुल वाव्हळे, नंदकिशोर खर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेत जिल्हाभरातून कुमार गटातील चौदा कबड्डी संघांनी सहभाग नोंदवला तर कुमारी गटातील संघांनी या स्पर्धेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. यावेळी राहुल लोणीकर यांनी जालना जिल्ह्याच्या संघाने राज्य अजिंक्यपद आपल्याकडे खेचून आणण्यासाठी आपल्या क्रीडाकौशल्य पणास लावावे असे आवाहन केले. 

या निवड चाचणी स्पर्धेत पंजाब वाघ, बाबासाहेब मंडाळे, राजू थोरात, संतोष नागवे, नाना पाटोळे यांनी पंच म्हणून काम पाहिले तर के. जि. राठोड, गौतम वाव्हळ, पंकज राठोड, गणेश खराबे, कैलास उबाळे, गजानन शिवापुरे, मनोज ठाकरे, सतीश राठोड, जगदीश कुडे यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत