सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा खोराड सावंगी विजेता तर आन्वीचा संघ उपविजेता



मंठा-प्रतिनिधी सुभाष वायाळ
दि.२४ बालेवाडी, पुणे येथे मे २०२२ मध्ये होणाऱ्या ४८ व्या राज्य अजिंक्यपद कुमार व कुमारी कबड्डी स्पर्धेसाठी जालना जिल्हा कबड्डी असोसियशनच्या वतीने प्रनुसरा नगर, मंठा येथे २३ रोजी आयोजित जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मंठा तालुक्यातील खोराड सावंगीचा संघ विजेता ठरला तर बदनापूर तालुक्यातील आन्वीचा संघ उपविजेता ठरला.

या स्पर्धेचे उद्घाटन युवानेते राहुल लोणीकर यांच्या हस्ते झाले तर याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदास पालवे, गणेश खवने, सतीश निर्वळ, विठ्ठल काळे, प्रसाद बोराडे, गणेश शहाणे, विजय घोडके, दत्ताराव खराबे, गंगाराम हावळे, नारायण दवणे, राहुल वाव्हळे, नंदकिशोर खर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेत जिल्हाभरातून कुमार गटातील चौदा कबड्डी संघांनी सहभाग नोंदवला तर कुमारी गटातील संघांनी या स्पर्धेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. यावेळी राहुल लोणीकर यांनी जालना जिल्ह्याच्या संघाने राज्य अजिंक्यपद आपल्याकडे खेचून आणण्यासाठी आपल्या क्रीडाकौशल्य पणास लावावे असे आवाहन केले. 

या निवड चाचणी स्पर्धेत पंजाब वाघ, बाबासाहेब मंडाळे, राजू थोरात, संतोष नागवे, नाना पाटोळे यांनी पंच म्हणून काम पाहिले तर के. जि. राठोड, गौतम वाव्हळ, पंकज राठोड, गणेश खराबे, कैलास उबाळे, गजानन शिवापुरे, मनोज ठाकरे, सतीश राठोड, जगदीश कुडे यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत