डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी स्मृतिदिनानिमित्त परतूर येथे वृक्षारोपण,भाजयुमोच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन,पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्ष लागवड करा,युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजयुमोच्या वतीने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या सूचनेवरून युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या हस्ते परतूर येथे वृक्षारोपण करण्यात आले
 यावेळी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले
यावेळी बोलताना युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर म्हणाले की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि संगोपन महत्त्वाचे असून शामाप्रसाद मुखर्जी यांच्या मुक्ती दिनाचे औचित्य साधून आम्ही युवा मोर्चाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून आज परतूर येथे वृक्षारोपण केले असल्याचे ते म्हणाले
पुढे बोलताना ते म्हणाले की वातावरणातील अशुद्धी दूर करणे हरित महाराष्ट्राची संकल्पना अस्तित्वात आणणे या कामी युवकांनी पुढाकार घेतल्यास निश्चित पणाने आपण यशस्वी होऊ असेही यावेळी राहुल लोणीकर यांनी सांगितले
झाडे लावून ती जगवण्याची आपली प्रत्येकाची जबाबदारी असून प्रत्येकाने किमान एक झाड लावावे असे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थितांना केले
कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर सुधाकर बोरगुडे युवा मोर्चा जिल्हा महामंत्री संपत टकले सिद्धेश्वर सोळंके प्रफुल्ल शिंदे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गजानन उफाड युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शत्रुघन कणसे पंचायत समिती सदस्य शिवाजी पाईकराव बाळासाहेब सोळंके युवा मोर्चा तालुका महामंत्री रवी सोळंके युवा मोर्चा तालुका सरचिटणीस बंडू मानवतकर नगरसेवक संदीप बाहेकर कृष्णा आरगडे प्रकाश चव्हाण सुभाषराव खराबे सोनू अग्रवाल ज्ञानेश्वर जईद माऊली सोळंके बालाजी सांगोळे सरपंच शेख नदीम संभाजी वारे प्रकाश वायाळ गोरख घाडगे मलिक कुरेशी मुज्जू कायमखानी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती