मंठा शहरात अभाविपच्यावतिने तिरंगा ध्वज पदयात्रा संपन्न,५०१ फुट लांबीचा भव्य तिरंगा ध्वज


मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
 दि.१३अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मंठा शहरामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य अशी ५०१ फूटी विक्रमी तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. स्वामी महाविद्यालय, मंठा येथे भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. 
      स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथून लहुजी चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, मार्केट कमिटी, बस स्टैंड, जय श्री राम चौक , डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या मार्गाने ही पदयात्रा काढण्यात आली. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम' अशा घोषणा देत मंठा शहरामध्ये विद्यार्थी कार्यकर्त्यांनी या पदयात्रेमध्ये आपला सहभाग नोंदविला. गाव गाव में जायेंगे, भारत नया बनायेंगे, 'स्वामी जी का क्या संदेश सुंदर सुहाना भारत देश' या घोषणेने मंठा शहर दुमदुमून गेले. या तिरंगा पदयात्रेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधि, सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वागत करीत आपला सहभाग नोंदविला. 
   पदयात्रेचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे राष्ट्रगीताने झाला.यावेळी माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, 
प्रदेश उपाध्यक्ष प्रा.नाना गोडबोले,प्रदेश सहमंत्री सुरज पावसे ता.प्रमुख सचिन बोराडे, अभाविप शहरमंत्री संदिप गायकवाड,विभाग संयोजक ऋषिकेश राऊत,निलेश बोराडे,नितिन राठोड,नंदु टकले,दुर्गेश राठोड,राहुल राठोड,निवास राठोड , प्रा.संजय चव्हाण, राष्ट्रिय स्वंसेवक सेवक संघ, बजरंग दल,मंठा शहरातील सर्व महाविद्यालय,पोलिस प्रशासन, मंठा शहरातील परिवार, सर्व विद्यार्थी बंधू,भगिनिंनी उपस्थित होते.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती