विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे उपोषणाला उपस्थित राहावे-अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना

 जालना प्रतीनीधी समाधान खरात
जालना जिल्ह्यातील विविध प्रकारच्या हजारोच्या संख्येने दिव्यांग असून दिव्यांगसाठी ठोस असे कोणतेही धोरण शासनाने राबविलेले नाही व दिव्यांगाचे कायदे जीआर हे कागदपत्रे राहिलेले आहेत
      तसेच सन 1995 चा अपंग पुनर्वसन कायदा सन 2001 चे महाराष्ट्राचे दिव्यांग धोरण व सन 2016 चा अपंग हक्क संरक्षण कायदा याची देखील अमलबजावणी होत नाही याकरिता दिव्यांगाच्या संपूर्ण कल्याण व पुनर्वसनासाठी महाराष्ट्र शासनाने महिला बालकल्याण व मागासवर्गीय मंत्रालय प्रमाणे दिव्यांगाचे स्वतंत्र मंत्रालय व विभाग तयार करावा यासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री  आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशानुसार तसेच प्रहार अपंग संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा बापूराव काणे , राज्य संपर्कप्रमुख रामदास खोत  , मराठवाडा अध्यक्ष शिवाजी गाडे  यांच्या  नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे 25 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता दिव्यांग बांधवांनी उपोषणा करीता उपस्थित राहावे  व असे आव्हान अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना , विठ्ठल  चव्हाण, शंकर शिरगुळे  माजी जि. अध्यक्ष हनुमान माने ,बाळासाहेब , रवींद्र अंभोरे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर आडे माऊली कदम आबाजी भुंबर शेख फिरोज यांनी केले आहे

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती