सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे उपोषणाला उपस्थित राहावे-अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना

 जालना प्रतीनीधी समाधान खरात
जालना जिल्ह्यातील विविध प्रकारच्या हजारोच्या संख्येने दिव्यांग असून दिव्यांगसाठी ठोस असे कोणतेही धोरण शासनाने राबविलेले नाही व दिव्यांगाचे कायदे जीआर हे कागदपत्रे राहिलेले आहेत
      तसेच सन 1995 चा अपंग पुनर्वसन कायदा सन 2001 चे महाराष्ट्राचे दिव्यांग धोरण व सन 2016 चा अपंग हक्क संरक्षण कायदा याची देखील अमलबजावणी होत नाही याकरिता दिव्यांगाच्या संपूर्ण कल्याण व पुनर्वसनासाठी महाराष्ट्र शासनाने महिला बालकल्याण व मागासवर्गीय मंत्रालय प्रमाणे दिव्यांगाचे स्वतंत्र मंत्रालय व विभाग तयार करावा यासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री  आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशानुसार तसेच प्रहार अपंग संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा बापूराव काणे , राज्य संपर्कप्रमुख रामदास खोत  , मराठवाडा अध्यक्ष शिवाजी गाडे  यांच्या  नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे 25 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता दिव्यांग बांधवांनी उपोषणा करीता उपस्थित राहावे  व असे आव्हान अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना , विठ्ठल  चव्हाण, शंकर शिरगुळे  माजी जि. अध्यक्ष हनुमान माने ,बाळासाहेब , रवींद्र अंभोरे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर आडे माऊली कदम आबाजी भुंबर शेख फिरोज यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत