सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने परतूर ते आंबा आजादी गौरव पदयात्रा

परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
महाराष्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्या वतीने अमृत महोत्सवा निमित्त 'आजादी गौरव यात्रा काढण्यात येणार असून यात्रेचे नेतृत्व मा.आ. सुरेशकुमारजी ''जेथलिया' हे करणार आहेत...

शनिवार दि. 13/08/2020 रोजी सकाळी 10 वा. मा.आ. सुरेशकुमारजी जेथलिया यांच्या संपर्क कार्यालय, परतूर ते बागेश्वरी देवस्थान,आंबा पर्यंत ही गौरव यात्रा काढण्यात येणार आहे.

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य लढ्याची गौरव गाथा जनतेमध्ये बिंबवण्यासाठी व भारतीय स्वातंत्र्यातील सहभागी स्वातंत्र्यवीरांना वंदन करण्यासाठी, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी ही आजादी गौरव पदयात्रा काढण्यात येत आहे.

या पदयात्रेत काँग्रेस कमिटीचे जालना जिल्हा अध्यक्ष मा. श्री. राजाभाऊ देशमुख, आ.राजेश राठोड,मा.श्री. राजेंद्रजी राख, मा. कल्याणरावजी दळे, अन्वरबापू देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

या आजादी गौरव पदयात्रेचा समारोप बागेश्वरी मंदिर प्रांगण आंबा येथे होणार असून, या यात्रेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन,परतूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात