सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने परतूर ते आंबा आजादी गौरव पदयात्रा

परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
महाराष्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्या वतीने अमृत महोत्सवा निमित्त 'आजादी गौरव यात्रा काढण्यात येणार असून यात्रेचे नेतृत्व मा.आ. सुरेशकुमारजी ''जेथलिया' हे करणार आहेत...

शनिवार दि. 13/08/2020 रोजी सकाळी 10 वा. मा.आ. सुरेशकुमारजी जेथलिया यांच्या संपर्क कार्यालय, परतूर ते बागेश्वरी देवस्थान,आंबा पर्यंत ही गौरव यात्रा काढण्यात येणार आहे.

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य लढ्याची गौरव गाथा जनतेमध्ये बिंबवण्यासाठी व भारतीय स्वातंत्र्यातील सहभागी स्वातंत्र्यवीरांना वंदन करण्यासाठी, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी ही आजादी गौरव पदयात्रा काढण्यात येत आहे.

या पदयात्रेत काँग्रेस कमिटीचे जालना जिल्हा अध्यक्ष मा. श्री. राजाभाऊ देशमुख, आ.राजेश राठोड,मा.श्री. राजेंद्रजी राख, मा. कल्याणरावजी दळे, अन्वरबापू देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

या आजादी गौरव पदयात्रेचा समारोप बागेश्वरी मंदिर प्रांगण आंबा येथे होणार असून, या यात्रेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन,परतूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत