सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी मोहन अग्रवाल यांची नियुक्ती


परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण
         परतूर नगररपालिकेचे माजी गटनेते मोहन अग्रवाल यांची शिवसेनेचा हिंदू गर्व गर्जना व शिवसंपर्क अभियान यात्रेत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जालना जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. 
       यावेळी मोहन अग्रवाल यांनी बोलतांना म्हणाले की, शिवसेनेच्या माध्यमातून एकनिष्ठतेने प्रामाणिक काम करून शहराचा विकासासाठी मोठा निधी आणून विकास कामे केली आहेत. शिवसेनेचे माध्यमातून यापुढे मोठी चळवळ उभा करून सर्वसामान्य नागरिकांच्या आणि शिवसैनिकांच्या पाठीशी उभा राहण्याची ग्वाही यावेळी मोहन अग्रवाल यांनी दिली आहे. 
यावेळी शिवसेनेचे उपनेते अर्जुनराव खोतकर, खासदार हेमंत पाटील, उपनेते विजय नहाटा, अमोल सुरुंग, बाबासाहेब चिखले, सतीश हजारे, दत्ता कातारे, अविनाश कापसे, अविनाश कापसे, दीपक हिवाळे, दत्ता अंभुरे, गजानन वटाने, गजानन आकात, गंगाधर गोरे, नितीन राठोड, सोनू डोलारकर, राजाभाऊ मुळे, विष्णू जगताप, बळीराम वाघमारे, रितेश अग्रवाल, अरुण धुमाळ, प्रल्हाद बोराडे, रामेश्वर खरात, शिवाजी लहाडे, उदयसिंग बोराडे, गजानन बोराडे, इत्यादी कार्यकर्त्यांनी मोहन आग्रवाल यांचा सत्कार केला.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत