आपत्यकालीन लग्न चिंता नको 37 मुहूर्त....जिल्ह्यातील विविध इच्छुकांची जुळवाजुळव सुरू



सातोना प्रतिनिधी पांडुरंग शिंदे

काही अपत्यकालीन कारण असल्यास अगदी चतुर्मासातही लग्न करता येते. त्यामुळे आता लग्न मुहूर्त निश्चित करण्यासाठी विवाह इच्छुकांची जुळवा जुळव सुरू आहे. यासाठी मंगल कार्यालयाचे लॉन्स केटरिंग ब्रँड पथक घोडा सजावट अशा विविध बाबींनी प्राधान्य देण्यासाठी आधी लग्न मुहूर्त निश्चित केले जात आहेत.
त्यानुसार वधू-वरांच्या कुटुंबाकडून सर्व तयारी केली जात आहे.चतुर्मासात काही लग्न मुहूर्त असल्याने अनेकांची आता लग्नाचा बार ओढण्यासाठी नियोजन केले आहे.

आपत्यकालीन लग्नाचा मुहूर्ता कोणासाठी


चतुर्मासात आपत्तीकालीन विवाह मुहूर्त देण्यात आले आहेत. ज्यांचे आधीच लग्न ठरले आहे किंवा साखरपुडा झाला आहे घरात कोणी आजारी असेल किंवा या परिस्थितीतील लग्न लावायचे आहे अशांनी आपत्तीकालीन विवाह करावा काही घरगुती अडचण असल्यास आपत्तीकालीन विवाह करावा.


एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 37 आपत्तीकालीन लग्न तिथी

यंदा लग्न तिथी कमी असली तरी अधिक मास चतुर्मास काळातही लग्न करता येणार आहेत त्यासाठी दिवाळीनंतर तुळशीच्या विवाहाची वाट पाहावी लागणार नाही एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान आपत्तीकालीन 37 लग्न तिथी असल्याचे पंचकर्त्यांनी सांगितले आहे त्यामुळे या लग्नाच्या तिथी सुद्धा अनेक जण नोंदवितात.


गौणकाल आणि आपत्तीकालीन मुहूर्त

एप्रिल १५ २३ २४ २९ ३०

जून 30
जुलै १ २ ४ ५ ९ १० ११ १४

ऑगस्ट २२ २६ २८,२९.
सप्टेंबर ३,६,७,८१७,२४,२६
ऑक्टोंबर १६,२०,२२,२३,२४,२६,
नोव्हेंबर, १,६,१६,१८,२०,२२

अधिक मास 18 जुलै ते 16 ऑगस्ट

चतुर्मास 29 जून ते 23 नोव्हेंबर


मुख्य काळातील लग्न तिथी......
मे,२,३,४,७,९,१०,११,१२,१५,१६,२१,२२,२९,३०,
जून, १,३,७,८,११,१२,१३,,१४,२६,२७,२८,
 डिसेंबर६,७,८,१५,१७,२०,२१,२५,२६,३१,


तयारीची धूम धूम....

विवाहासाठी केवळ मुहूर्तच नाही तर पाहुणे मंडळीची सोय व्हावी यासह धुमधुमक्यात. लग्न करता यावे याचे नियोजन तीन ते चार महिने आधीच केले जात आहे त्यासाठी मनाप्रमाणे आणि वाडीच्या सोयीनुसार मंगल कार्यालय लॉन्स हॉल याची व त्यासाठी लागणाऱ्या केटरिंग सह विविध यंत्रणेची जुळवा जुळवा केली जात आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती