बालविवाह रोकण्यासाठी समाजातील सर्वच स्तरावर पुढाकार होणे गरजेचे -गजानन इगळे

परतूर दि.28 प्रतिनिधी कैलाश चव्हाण
बालविवाह रोकण्यासाठी समाजातील सर्वच स्तरावर पुढाकार होणे गरजेचे असल्याचे मत दि.27 रोजी परतूर तालुक्यातील आंबा येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात भाग दोन व चार येथे आयोजित बालविवाह प्रतिबंध व किशोरी मेळाव्यात बाल संरक्षण जिल्हा अधिकारी गजानन इंगळे यांनी व्यक्त केले. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती डॉ. स्मिता रोडगे, श्रीमती आशा मगरे, मुख्यध्यापिका ज्योती साळवे, श्रीमती मंगल खवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    या वेळी पुढे बोलताना श्री. इंगळे म्हणाले की, बालविवाह ही समाजाला लागलेली कीड आहे आणि हे रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा बालविवाह होत असेल तर तात्काळ प्रशासनाला कळवावे असे सांगितले. या वेळी मुलींनी बालविवाह प्रति वेगवेगळी नाटिका सादर करत प्रभात फेरी काढली. या वेळी श्रीमती संगीता गोरे, श्रीमती राज्यश्री जाधव, श्रीमती दीपा नारायनकर, श्रीमती शीतल कुलकर्णी, श्रीमती सुकुमारी गोरे आदी शिक्षिका उपस्तीत होत्या.
फोटो ओळी- आंबा येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात बालविवाह प्रतिबंध कायदा विषयी माहिती सांगताना गजानन इंगळे दिसत आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण