सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

प्रलंबित मागण्यासाठी ब्राम्हण समाजाचे पळी-ताम्हण आंदोलन. , परतुरःसमाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी ब्राम्हण समाजाने लोकशाही मार्गाने आंदोलन करुन उपजिल्हाधिकारी कार्यालय परतूर येथे निवेदन सादर केले.

परतूर (प्रतीनीधी ) आखाली भारतीय बहूभाषीक ब्राम्हण महासंघाच्या वतीने उपवीभागिय अधीकारी कार्यालया समोर पळी ताम्हण वाजवून आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात 
समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करावे,तरुण व व्यावसायिकांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन 1000कोटीची तरतुद करावी,जिल्हास्थानी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह स्थापन करावे,ब्राम्हण समाजाविषयी जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यावर शिक्षा करणारा कायदा करावा,स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा,पुरोहित्य करणाऱ्यास 5000/मानधन सुरु करावे.कुळात गेलेल्या जमीन परत देण्यात याव्या आदी मागण्यासाठी समाजातर्फे यापुर्वी आझाद मैदान येथे आंदोलन,तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन आमदार-खासदार यांना स्मरण पत्राद्वारे जागो सरकार-जागो असे अभियान राबवण्यात आली,हिवाळी अधिवेशनात सुध्दा समाजाच्या मागण्यावर विचार झाला नाही,तेव्हा समाजाने या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी पळी-ताम्हण वाजवुन आंदोलन केले.
शासनाने विचार केला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असे निवेदनात म्हटले,निवेदनावर अँड.भगवानरावजी कवडी,अँड.डोल्हारकर,अँड.ए.आर.देशपांडे नगरसेवक मुरलीधर देशमुख,राजेश खंडेलवाल,माजी नगरसेवक विजय नाना राखे,लक्ष्मीकांत कवडी,सौ.अरुणाताई चामणीकर, उदय नेब वे.शा.स.तुकाराम गुरु गोळेगावकर,हरी गुरु जोशी,अंँड.प्रदीप राखे,नंदकिशोर कुलकर्णी,शामसुंदर चितोडा,समीर राखे, शाम जवळेकर,योगेश खंडेलवाल, सिध्दार्थ कुलकर्णी,प्रसाद बाप्ते,केदार शर्मा,योगेश रोहीनकर, शाम डंख,हेमंत कुलकर्णी  कल्याण अंबेकर,परिमल पेडगावकर पंकज कद्रे,अश्विन दायमा,अँड.पराग कुरुंदकर,पंकज पांडे,संतोष बोर्डे,संदिप पाटील,वल्लभ सारस्वत आदीच्या स्वाक्षया आहेत.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत