सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष संदीपजी बाहेकर यांची कोविड रुग्णाच्या कुटुंबियांना मदत,माजी मंत्री बबनराव लोणीकर व युमो महामंत्री राहुल लोणीकर यांच्या सूचनेवरून राबवला उपक्रम


परतूर येथे कोविड सेंटर मध्ये ऍडमिट रुग्णांच्या नातेवाईकांना मदत व्हावी या उद्देशाने भाजपा चे नगरसेवक तथा माजी उपनगराध्य संदीपजी बाहेकर यांनी माजी मंत्री बबनराव लोणीकर व युमो महामंत्री राहुल लोणीकर यांच्या सूचनेवरून परतूर कोविड सेंटर येथे ऍडमिट असलेल्या रुग्णाच्या कुटुंबियांची जेवणाची व्यवस्था करून, सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी पुढाकार घेतला असून परतूर येथे रोज सकाळ संध्याकाळ कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना डब्बा पुरवण्याचे काम ते करत आहेत.
 या संदर्भात संदीप बाहेकर म्हणाले की या कठीण प्रसंगी हॉटेल बंद असून रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण उपलब्ध होत नाही हा विचार करून माजी मंत्री बबनराव लोणीकर व युमो प्रदेश सरचिटणीस राहुल भैय्या लोणीकर यांच्या सूचनेवरून आपण ही सेवा करीत असल्याचे सांगितले
  पुढे संदीप बाहेकर म्हणाले की, आज कठीण परिस्थिती असून,या काळात आपण खंबीरपणे उभे राहून जनतेला धीर देण्याची गरज असून या साठी आपण हा उपक्रम राबवत असल्याचे ते म्हणाले

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत