सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

सेवली येये रिचार्ज शाप्ट च्या कामासाठी आ.लोणीकरांनी केला 25 लाखाचा निधी मंजुर, ज्ञानेश्वर शेजुळ यांनी केले उद्घाटन..

*
सेवली {प्रतिनिधी}. नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजने अंतर्गत आज जालना तालुक्पातील सेवली येथे रिचार्ज शाॅफ्ट च्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असुन या कामासाठी मा.मंत्री,आमदार बबनराव लोणीकर यांनी 25 लाख रुपयाचा निधी मंजुर करुन दिला आहे.व या कामासाठी भाजपा युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुलभैय्या लोणीकर यांनी विशेष प्रयत्न केले असुन आज भा.ज.पा.चे जालना जिल्हाउपाध्यक्ष, ज्ञानेश्वर {माऊली} शेजुळ यांनी या कामाचे उद्घाटन केले आहे.
यावेळी ज्ञानेश्वर शेजुळ म्हणाले कि रिचार्ज शाॅफ्ट च्या अॅक्टिविटीमुळे नाल्याच्या मध्येभागी सिमेंट नाल्याजवळ बोअर घेउन त्यामध्ये दगड,विटा,वाळु भरुन त्या बोअरचे पुनर्भरण केले जाणार असुन त्यामुळे पावसाळ्यात  व नाल्यात पाणी असेपर्यंत या बोअरचे पुनर्भरण होणार आहे.त्यामुळे आसपासच्या परिसरातील विहिरी व बोअरवेलच्या पाणी पातळीमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होणार असल्याची सविस्तर माहिती ज्ञानेश्वर शेजुळ यांनी यावेळी उपस्थितांना दिली.
यावेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्षा श्रीमती जिजाबाई जाधव,सरपंच शे.नविदभाई, उपसरपंच श्रीमती निलाबाई खंदारे,दिलीप जोशी,मा.सरपंच राजु देशमुख,शिवराज तळेकर,विकास पालवे,,समाधान वाघमारे,प्रमोद भालेकर,ग्रा.पं.सदस्य,ज्ञानेश्वर झोरे,गणेश झोरे,सौरभ माहोरकर,अजिम पटेल,अदिलपठाण,सचिन साकला,खाजा कुरेशी,कृषी सहाय्यक श्री आनंद भुतेकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती...
या कार्यक्रमादरम्यान कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे नियम पाळण्यात आले ह विशेष.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत