सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

सेवली येये रिचार्ज शाप्ट च्या कामासाठी आ.लोणीकरांनी केला 25 लाखाचा निधी मंजुर, ज्ञानेश्वर शेजुळ यांनी केले उद्घाटन..

*
सेवली {प्रतिनिधी}. नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजने अंतर्गत आज जालना तालुक्पातील सेवली येथे रिचार्ज शाॅफ्ट च्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असुन या कामासाठी मा.मंत्री,आमदार बबनराव लोणीकर यांनी 25 लाख रुपयाचा निधी मंजुर करुन दिला आहे.व या कामासाठी भाजपा युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुलभैय्या लोणीकर यांनी विशेष प्रयत्न केले असुन आज भा.ज.पा.चे जालना जिल्हाउपाध्यक्ष, ज्ञानेश्वर {माऊली} शेजुळ यांनी या कामाचे उद्घाटन केले आहे.
यावेळी ज्ञानेश्वर शेजुळ म्हणाले कि रिचार्ज शाॅफ्ट च्या अॅक्टिविटीमुळे नाल्याच्या मध्येभागी सिमेंट नाल्याजवळ बोअर घेउन त्यामध्ये दगड,विटा,वाळु भरुन त्या बोअरचे पुनर्भरण केले जाणार असुन त्यामुळे पावसाळ्यात  व नाल्यात पाणी असेपर्यंत या बोअरचे पुनर्भरण होणार आहे.त्यामुळे आसपासच्या परिसरातील विहिरी व बोअरवेलच्या पाणी पातळीमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होणार असल्याची सविस्तर माहिती ज्ञानेश्वर शेजुळ यांनी यावेळी उपस्थितांना दिली.
यावेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्षा श्रीमती जिजाबाई जाधव,सरपंच शे.नविदभाई, उपसरपंच श्रीमती निलाबाई खंदारे,दिलीप जोशी,मा.सरपंच राजु देशमुख,शिवराज तळेकर,विकास पालवे,,समाधान वाघमारे,प्रमोद भालेकर,ग्रा.पं.सदस्य,ज्ञानेश्वर झोरे,गणेश झोरे,सौरभ माहोरकर,अजिम पटेल,अदिलपठाण,सचिन साकला,खाजा कुरेशी,कृषी सहाय्यक श्री आनंद भुतेकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती...
या कार्यक्रमादरम्यान कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे नियम पाळण्यात आले ह विशेष.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत