सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

रायपुर रेल्वे गेटजवळील पुलाची दुरुस्ती करा; नसता रेल रोको आंदोलन करणार-रमेश भापकर


     
       परतुर(प्रतिनिधी) रेल्वे प्रशासनाकडुन रस्ता क्रमांक प्रजिमा 27 व रेल्वे गेट क्रमांक 93 या रेल्वे गेटवर भूमिगत पुलाचे काम करण्यात आले आहे. या दरम्यान सदरील पुलाचे काम बोगसरित्या करण्यात आले असुन यावेळी पूलाच्या आजु-बाजुने पावसाचे पाणी जाण्यासाठी व्यवस्थित पर्यायी नालीची व्यवस्था करण्यात आली नसल्याने या पुलाच्या खाली ५ फुटांपर्यंत पाणी जमा होत आहे.रायपुरसह इतर गावांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने आज सकाळी माजीमंत्री बबनराव लोणीकर,युवामोर्चा महामंत्री राहुल भैय्या लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली  भाजपच्या वतीने परतुर रेल्वे स्थानकावर आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश भापकर यांनी रेल्वे प्रबंधकाला निवेदन सादर केले.त्यात सदरील पुलाची आठ दिवसात पुलाची दुरुस्ती करावी नसता भाजपच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी संपत टकले,शत्रुघ्न कणसे,अशोक बरकुले,शिवाजी पाईकराव,विष्णु बरकुले,उध्दव बरडे,डॉ.रविंद्र बरकुले,दत्तराव रायकर,प्रभाकर जाधव,तुकाराम मांटे,अशोक अंभोरे,उध्दव शेरे,सतिश सस्ते,पंडित आवटे,राजेभाऊ जगदाळे,गणेश हरकळ,हनुमान वाघमारे,यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,परतुर तालुक्यातील रस्ता क्रमांक प्रजिमा 27 व रेल्वे गेट क्रमांक 93 जवळ रेल्वे गेटजवळ भुमिगत पुलाचे काम करण्यात आले आहे.या पुलाच्याखाली पावसाळयाचे पाणी जमा होऊन
रायपुर,सिरसगाव,खांडवी, खांडवीवाडी, पिंप्रुळा रंगोपंत टाकळी व शेलगाव या अनेक गावांचा संपर्क तुटत आहे. येथुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना या पुलाच्या पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. व नागरिकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावरुण प्रवास करावा लागत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच रूग्णांना व महिलांना या पाण्यातुन आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असुन रेल्वे प्रशासनाने या पुलाची तात्काळ दुरुस्ती करून पाण्याची व्यवस्था करावी. सदरील ठिकाणीचे पाणी हे दुषित झाले असुन रायपुर गावात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने नागरीकांच्या जीवाशी न खेळता कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करून आठ दिवसात या पुलाची दुरुस्ती करून पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी. नसता भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश भापकर यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत