सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

अतिवृष्टीने नुकसान झालेली फुलशेती बागायती प्रमाणे नुकसान भरपाई द्या



 
परतूर (प्रतीनीधी)
तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात फुलाची लागवड करून फूल उत्पादन करीत आहेत. यावर्षी मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने फूल शेतीचे पूर्ण नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करतांना फुलशेती ही जिरायती म्हणून पंचनाम्यात नोंद घेण्यात आली आहे. फुलशेतीला बागायती प्रमाणे नुकसान भरपाई देण्याची मागणी फूल उत्पादक शेतकर्‍यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे  निवेदनाद्वारे केली आहे.   
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परतूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी फुलशेती करीत आहेत. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आपली उपजीविका भागवत आहेत. परतूर, बामणी, शेलवडा, वलखेड, सोयंजना, हरेराम नगर, सिरसगाव, श्रीष्टी, वरफळवाडी, चिंचोली, रेवलगाव, सालगाव, उस्मानापूर, वैजोडा, यासह आदि गावात शेतकरी फुलशेती करीत आहेत. मागील सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. फुलशेतीचे पंचनामा प्रशासनाने करतांना जिरायती शेती म्हणून पंचनाम्यात नोंद केली आहे. फुलशेती करतांना शेतकर्‍यांना बागायती शेती प्रमाणे मुबलक पाणी लागते. यामुळे फुलशेती जिरायती नोंद न घेता बागायती क्षेत्र म्हणून नोंद घेण्यात यावी. आणि बागायती प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी. तसेच फळबाग अतिवृष्टीने नुकसान झाल्याने ते वगळण्यात आले आहे. यांची नोंद घेत बहुवार्षिक पीक म्हणून फळबाग नोंद घेऊन शासनाने घोषित केलेल्या नुकसाने प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर संपत टकले, अंगद खालापुरे, पांडुरंग गाडगे, अनंता सुरुंग, प्रभाकर नळगे, बळीराम खालापूरे, प्रभाकर जाधव, आसराम सुरुंग,दिलीप निकम, देवीदास खालापूरे, तुळशीराम बिल्हारे,  कैलास खालापुरे,गोरख गाडगे,अर्जुन नळगे, सुखादेव डव्हारे, यांच्यासह आदि फूल उत्पादक शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


 

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत